यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे
यावल तालुक्यातील दहिगाव गण हा महिला सर्वसाधारण आरक्षण असून परिसरात पंचायत समिती निवडणुकीची राजकीय तयारी सुरू झाली असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सौ. यशश्री देवकांत पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी जनतेतून व कार्यकर्ते कडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.
सौ. यशश्री देवकांत पाटील या सचिव – छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन, यावल तसेच मा. सदस्य – संजय गांधी निराधार समिती, यावल असून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, क्रीडा व महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.
फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले, तर निराधार समितीच्या माध्यमातून गरीब, विधवा, अनाथ, ज्येष्ठ नागरिक व अपंग नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिल्या आहेत.
तालुकास्तरावर वैद्यकीय दाखले मिळावेत यासाठी , तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट गरीब गरजू लोकांना व्हावा यासाठी तालुकास्तरावर विविध शिबिरांचे आयोजन करून च्या संदर्भात केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.
त्यांच्या कार्यात ॲड. देवकांत बाजीराव पाटील यांचेही मोलाचे योगदान आहे. हे दाम्पत्य उच्चशिक्षित, प्रामाणिक व समाजाच्या सुखदुःखात सहभागी राहणारे कार्यकर्ते असून शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, सामाजिक, राजकीय व अध्यात्मिक सर्वच क्षेत्रांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
लोकांच्या मनात आपुलकी, सेवाभाव आणि प्रामाणिक नेतृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या सौ. यशश्री देवकांत पाटील या दहिगाव गण येथून पंचायत समिती साठी सर्वात योग्य महिला उमेदवार ठरत आहेत, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला व युवक वर्गात त्यांच्याबद्दल उत्साहाचे वातावरण असून, भविष्यात पक्षाकडून संधी मिळाल्यास त्या संधीचे सोने करून जनतेच्या विश्वासास पात्र ठरतील, असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या कार्याचा गौरव करत नागरिकांनी म्हटले आहे.
Yavalnews /की, “लोकहितासाठी समर्पित असलेली आणि विकासाचे स्वप्न सत्यात उतरवू शकणारी महिला म्हणजेच सौ. यशश्री देवकांत पाटील.” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अशा पात्र, जनसेवाभावी व लोकाभिमुख महिलेला संधी मिळावी हीच जनतेची अपेक्षा राहील उमेदवारीची संधी मिळाल्यास संधीचे सोने करून व सर्वसामान्यांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे या दांपत्याने विश्वास व्यक्त केला आहे.