एक दिवा सैनिक व पोलीस साठी हा उपक्रम हाती घेऊन मागील चार वर्षांपासून संग्रामपूर तालुक्यातील रुधाना येथील सध्या पुणेला स्थायिक असलेले अविनाश तायडे हे सैनिक व पोलीस याना दिवाळीचे मिठाई व फराळ वाटप करून त्याच्या सोबत दिवाळी साजरी करत असतात
मागील चार वर्षांपासून अविनाश तायडे हे हा उपक्रम चालवत आहेत त्याच्या उपक्रमाची सर्व स्तरातून कौतुक होत आहे
संग्रामपूर तालुक्यातील रुधाना वकाना येथील व सध्या पुणे ला स्थायिक असलेले अविनाश तायडे दिवाळी ला आपल्या तालुक्यात येऊन दरवर्षी दिवाळी चा फराळ शेगाव, संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात असलेल्या सैनिक व पोलीस बांधव यांच्या घरी जाऊन फराळ व मिठाई वाटप करतात या कार्यासाठी अविनाश तायडे हे महाराष्ट्र भर प्रसिद्ध आहेत राष्ट्रप्रथम समूह या संघटनेच्या माध्यमातून हे कार्य सुरू असते या वर्षी 12 गावात जाऊन सैनिक व पोलीस याना मिठाई फराळ वाटप करून त्याचा सम्मान केला आपल्या देशातील हेच खरे हिरो आहेत ना की बॉलिवूड,नशेळे अकटर,हे आहेत सैनिक व पोलीस हे आपल्या परिवाराला कोणत्याच सन उत्सवात वेळ देऊ शकत नाही ते आपली जिमेदारी पार पाडत आपले रक्षण करत असतात मग त्याचा व त्यांच्या परिवार चा सम्मान करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे हे आपले भाग्य समजा ही भावना सर्व तरुण वर्गामध्ये रुजवावी सर्वांनी यांचा आदर्श घ्यावा या वर्षी रुधाना,वकाना, पातुरडा बु,पातुरडा खुर्द,टूनकी,बावनबीर,सोनाळा, सगोडा, चांगेफळ,तसेच शेगाव, जळगाव जामोद, तामगाव,सोनाळा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तेथील ठाणेदार व सर्व कर्मचारी याना पण दिवाळी ची मिठाई व फराळ दिला या वेळी प्रकाश बोदडे सर,निखिल जाधव,ऋषिकेश राहाटे, कैलास धर्माळ, अंकुश तायडे,ज्ञानू म्हसाळ,मोहन बोपले,वैभव धर्माळ,हे उपस्थित होते