शेगांव.१४ वर्षीय मुली सोबत एका अनोळखी युवकाने भुस्कटी मळा येथील बाथरूममध्ये नेउन जबरदस्ती शारीरिक संबध प्रस्तापित तसेच एकाने विनयभंग केल्याची घटना दि.१७/२/२०२४ रोजी उघडकीस आली.
हकीकत अशा प्रकारे आहे कि यातील फिचे आई वडील हे दोघेही भुस्कुटी मळ्या मध्ये साफ सफाइचे काम करतात.
फि ही वर्ग ९ मध्ये शिक्षण घेत असुन दिनांक १०/२/२०२४ रोजी फि ची तब्बेत बरोबर नसल्याने फि ही तीचे आई-वडीला सोबत भुस्कुटी मळा येथे गेली.
असता बिल्डींग नं .२ मध्ये कामावर असणारा एक गो-या रंगाचा मुलगा आकाशी रंगाचा शर्ट घातलेला, उभा भांग केलेला मुलाने फि ला आवाज देवुन बोलाविले व तीचे खांदयावर हात ठेवुन तिस-या मजल्यावरील बाथरूम मध्ये घेवुन गेला.
त्यावेळी बाथरूम मध्ये कोणी नव्हते व तेथे त्याने फि सोबत शारीरीक संबंध केले. व १० रूपयाची नोट दिली त्यावर त्याने त्याचा मोबाइल नंबर लिहुन दिला व म्हणत होता की, तु यावर मला कॉल करत जा असे म्हणुन फि चे खिशात 8788252638 असा.
मोबाइल नंबर लिहीलेली १० रूपयाची नोट घालुन तो निघुन गेला तसेच नमुद घतावेळी दरम्यान भुस्कुटी मळा येथे स्टाईलचे काम करणारे दोन अनोळखी इसमानी वारवार फि ला भुस्कुटी मळा येथे कामसुरु असलेल्या बील्डींग मध्ये नेवुन तीची छाती दाबुन तीचे हातात लींग देवुन हलवीण्यास सांगीतले.
crimenews: व फि चे जीन्स पॅन्टची चैन उघडुन तीचे लघवीचे जागेला घासले अश्या रिपोर्ट वरुन शहर पोलीसांनी अज्ञान आरोपीं विरूध्द गुन्हा क्रमांक ८१/२०२४ कलम ३७६ (२) (१), ३७६ (२) (एन), ३७६ (३), ३७६ डड, ३७६ डड अ, सहकलम पोक्सो ३ क, ३3, 4, 5 (L), 6 विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार हेमंतठाकरे यांच्या आदेशानुसार सपोनि श्रीकांत इंगोले शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
शेगांव crimenews: फेसबुकवर ओळख झालेल्या अमरावती जिल्ह्यातील ३८ वर्षीय विवाहित महिलेस एका पक्षाचे पद देण्याचे बहाण्याने शेगांव येथील घरी बोलावून शित पेयात गुंगिचे औषध देवुन जबरदस्ती शारीरीक संबंध प्रस्तापित केल्याची घटना दि. १७/२/२०२४ रोजी सायंकाळी ८.१२ वा उघडकीस आली.
हकिकत अशा प्रकारे आहे की, यातील फिर्यादी ही विवाहीत असुन तीला दोन अपत्ये आहे.फेसबुकच्या माध्यामातून आरोपी याच्यासोबत आळख झाली आरोपी हा फि स मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे मी पक्षात मोठे पद मिळुन देतो असे बतवानी करून देत होता.
फि चे जवळीक साधुन प्रेम व्यक्त करायचा नंतर आरोपी याने फिस माझी आइ आजारी आहे असे खोटे सांगुन त्याचे राहते घरी घेवुन गेला फि स कोल्ड्रिंक पिण्यास देवुन फि स गुंगी आल्यानंतर फि चेसोबत बळजबरीने संभोग केला व फोटो काढले.
त्यानंतर फि हीने आरोपीस विचारणा केली असता तीचा फोटो व्हायरल करण्याची धमकी देवुन वेळोवेळी वेगवेगळ्या तारखेला व ठिकाणी तीचे सोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले.
crimenews: अशा फि चे लेखी रिपोर्ट वरून शहर पोलीसांनी आरोपी आशिष सत्यानारायण व्यास वय ३७ वर्षे, रा. स्वामी विवेकानंद चौक शेगाव याचे विरूध्द अप नं – ८३/२०२४ कलम ३७६ (२),(n),३२८,५०४,५०६ भादंविअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार ठाकरे यांचे आदेशाने सपोनि आयरे हे करीत आहेत.
आज दिनांक १७/२/२०२४ रोजी मा. तहसीलदार सो मोहन माला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली
यावल सूर्या मराठी न्यूज
(विकी वानखेडे)
Revenue News: तहसिल कार्यालय यावल येथील गौण खनिज चे पथक हे रात्री दिनांक 17/2/२०२४ रोजी गस्तीवर असतांना त्यांना भारत गॅस एजन्सी जवळ अवैध वाळू वाहतूक करणारे गाडी नं. MH 19,CX 1135 वाहन येतांना दिसले त्यांनी त्या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता.
त्या वाहन चालक यांनी गाडी थांबवली नाही पथकाने त्यांचा पाठलाग केला व त्या गाडीला चोपडा रोड भारत गॅस एजन्सी जवळ असता.
buldhanaurbanbank: संग्रामपुर तालुक्यातील पातुर्डा ते पातुर्डा फाटा रस्त्यालगत असलेले बुलडाणा अर्बन पातुर्डा शाखेचे गोडाऊन फोडण्याचा प्रकार दि १६ फेब्रुवारीच्या रात्री ११ :३० वाजता दरम्यान घडला.
पातुर्डा गावापासुन एक किमी अंतरावर बुलडाणा अर्बन चे वेअर हाऊस आहे. यामधे शेतकरी बांधवांचा शेतमाल तारण तत्वावर ठेवला जातो.
16 फेब्रुवारी चे मध्यरात्री च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पाठीमागुन ताराच्या सरंक्षण भिती वरुन चढून गोडाऊन परिसरात प्रवेश केला व टिनपत्रे उचकावून गोदामातील सोयाबीन व तूर चोरण्याचा प्रयत्न केला दि १७ फेब्रुवारी रोजी सकाळी हा प्रकार उघडकिस आला सदर घटनेची माहिती पोलीसांना समजताच पोलिसानी घटनास्थळी भेट देऊन तपासणी व पंचनामा केला आहे.
यात काही चोरी गेलेले आढळले नाही. मात्र राज्य महामार्ग व त्यात नेहमी वर्दळीचा रस्ता असलेल्या गोडाऊन मध्ये चोरीचा प्रयत्न आश्चर्य व्यक्त होत आहे.
तामगाव पोलीसांची पातुर्डा व परिसरातील गावात गस्त ची गाडी येण्यापूर्वीचा या गोडाऊन मध्ये चोरीचा प्रयत्न झाला गोडाऊन मध्ये कुत्रा सतत भुकत होता त्यामुळे चौकीदार यांना संश्य आल्याने गोडाऊनच्या पाठीमागे बॅट्रीक मारली असता.
अज्ञात व्यक्ती घटना स्थळा वरुन सरंक्षण भिंती वरुन पळून गेले कुत्र्यामुळे चोरांचा चोरीचा प्रयत्न फसला मात्र शेतमाल असलेले हमरस्त्यावरील गोडाऊन फोडण्याचा प्रकार चिंतानाचा विषय आहे.
बुलडाणा अर्बन शाखा पातुर्डा बु बॅक मॅनेजर राजेश व्दारकादास गांधी यांच्या लेखी फिर्यार्दी वरुन तामगाव पोलीसांनी ३ ते ४ अज्ञात आरोपी विरुध्द कलम अज्ञात ४ आरोपी विरुद्ध कलम ३८० , ४६१ , ४२७ , ५११ , ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले तामगाव पोस्टेचे ठाणेदार राजेंद्र पवार, यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोहेकाॅ नंदकिशोर तिवारी, संदीप सोनोने करीत आहे
झोया श्वानने पातुर्डा फाटा रसत्यावर दाखविली चोरांची वाट
बुलडाणा येथील श्वान आजारी असल्याने अकोला जिल्ह्यातील झोया डॉग नामक श्वान श्वान पथकाला पाचारण करण्यात आले घटना स्थळी चोरट्याचे चपला व १ जोडे याचा वास झोया डॉगने घेऊन गोडाऊन पासुन हाकेच्या अंतरावर पातुर्डा फाटा रसत्यावर चोरट्यांची वाट दाखवली पुढे चोरटे वाहनात बसुन निघुन गेले श्वान पथकात पीएसआय अनिल जगताप , पो कॉ किरण अहिर व सहकारी श्वान झोया यांचा सहभाग होता.
buldhanaurbanbank:गोडाऊनचे टिन पत्रे उचकावुन चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याचे ठसे तज्ञ यांनी ठसे घेतले
१५व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार शिलाई मशीन प्रशिक्षण दिल्यानंतर गरजू महिलांना शिलाई मशीन देण्याच्या मोबदल्यात मंजूर निधीतून ५० टक्के रक्कम म्हणजे १ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना यावल तालुक्यातील चुंचाळे गावातील ग्रामसेवक आणि डीडीपी ऑपरेटर याला जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगीहात पकडले आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी रा.साकळी ता.यावल आणि ऑपरेटर सुधाकर धुडकू कोळी (वय-३५) रा. चुंचाळे ता.यावल असे लाचखोर संशयित आरोपींची नावे आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील चुंचाळे गावात राहणारे तक्रारदार यांच्या वडिलांची नावे एक संस्था आहे. यातून या संस्थेच्या माध्यमातून १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीमधून गावात शिलाई मशीन प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागातील महिला व युवतींना स्वावलंबी करण्याच्या योजनेसाठी केंद्र शासनाकडून २ लाख रुपये निधी मंजूर झाला होता.
या मंजूर झालेल्या निधीची ५० टक्के क्कम म्हणजे १ लाख देण्याची मागणी चुंचाळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी यांनी केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार दिली.
दरम्यान विभागाने तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या पडताळणीसाठी शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता वाजेच्या सुमारास सापळा रचला. ग्रामसेवक हेमंत जोशी यांनी सांगण्यावरून ग्रामपंचायत ऑपरेटर सुधाकर धुडकू कोळी यांनी १ लाख रुपयांची रक्कम घेतली. तेवढ्यात जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने ऑपरेटरला पैसे घेताना रंगेहात पकडले. दरम्यान याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
brekingnews: यांनी केली कारवाई पोलीस उपअधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील,स.फौ.सुरेश पाटील, पो.ना. बाळू मराठे, सुनिल वानखेडे, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर ,पो.ना.किशोर महाजन,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ,पो. कॉ.प्रणेश ठाकुर, पो. कॉ. अमोल सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.
आज दिनांक १७/२/२०२४ रोजी मा. तहसीलदार सो मोहन माला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली
तहसिल कार्यालय यावल येथील गौण खनिज चे पथक हे रात्री दिनांक 16/2/२०२४ रोजी गस्तीवर असतांना त्यांना हिंगोना जवळ अवैध वाळू वाहतूक करणारे गाडी नं. MH 31 CQ 7914 वाहन येतांना दिसले.
त्यांनी त्या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्या वाहन चालक यांनी गाडी थांबवली नाही पथकाने त्यांचा पाठलाग केला.
व त्या गाडीला हिंगोना रोड वरील जवळ पकडले असता त्या वाहन चालक याला वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याच्या जवळ परवाना नव्हता त्या मुळे त्याला यावल
breking news: येथे पकडून तहसील कार्यालय यावल येथे जमा करण्यात आले. सोबत तलाठी यावल ईश्वर कोळी, तलाठी डो. कठोरा वसीम तडवी, तलाठी साकळी मिलिंद कुरकुरे हजर होते वाहन मालक किरण वसंत बादशह यांच्या मालकीचे असून त्यात दीड ब्रास रेती हे गौणखनिज आढळून आहे.
Firnews: मात्र या चिपळूणमधील झालेलं दगडफेक प्रकरणात पोलिसांनीअखेर मोठी कारवाई केली आहे.
तर आता या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपच्या तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर या शुक्रवारी रात्री उशिरा हा गुन्हा पोलिसांनी दाखल करण्यात आला.
तर चिपळूनमधील घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले असून, दगडफेकीचे व्हिडीओ पोलिसांनी तपासून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
तर या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्गमध्ये जाऊन केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांच्यावर फार मोठी टीका केली होती.
परंतु या ही टीका राणे यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे पाहायला मिळत आहे. पण आता या मुळे भास्कर जाधव यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी गुहागर मतदार संघामध्ये जाहीर सभा आयोजित केली होती .
तर या मात्र, या सभेआधीच गुहागरमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
तर या जाहीर सभेआधी माजी खासदार निलेश राणे यांची चिपळूणमधून रॅली काढण्यात आली होती.
तर या रॅलीदरम्यान हा रडा झाला. रॅलीदरम्यान निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थक आमनेसामने आले. दोन्ही कार्यकर्त्याकडून जोरदार दगडफेक करण्यात आली.
मात्र या जमावर नियंत्रण मिळवताना पोलिसांची देखील चांगलीच दमछाक झाली. परंतु आता या प्रकरणात पोलिसांनी तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांवर अखेर गुन्हे दाखल केले आहेत.
भास्कर जाधवांनी काय टीका केली होती?
तर आता रत्नागिरीत झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती.
नारायण राणे पदांसाठी भीक मागत फिरणार असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला होता. या टीकेनंतर नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर दिलंय.
Firnews: तर आता भास्कर जाधव यांनी जर पुन्हा विधान केलं तर चोप देणार, सोडणार नाही, असा इशाराच नारायण राणे यांनी दिला. ठाकरे गटाच्या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर सडकून टीका केली होती.
समाजाने खचून न जाता आपला धनगर आरक्षणाचा लढा यशस्वी करुया….
…प्रकाश भैय्या सोनसळे
अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र संघटना महाराष्ट्र राज्य
मुंबई उच्च न्यायालयाने धनगर समाजाची अनुसूचित जमातीमधून (एसटी) आरक्षण देण्याची याचिका फेटाळली आहे. यामुळे गत अनेक वर्षांपासून आरक्षणाची आग्रही मागणी करणाऱ्या या समुदायाला जबर झटका बसला आहे. न्यायालयाने या प्रकरणी दाखल असणाऱ्या धनगर समाजाच्या सर्वच याचिका धुडकावून लावल्या आहेत.
धनगर समाजाकडून गत अनेक वर्षांपासून एसटीमधून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. या प्रकरणी काही संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने शुक्रवारी त्यांची याचिका फेटाळून लावली.
आवश्यक बाबींची पूर्तता नाही
धनगर समाजाला एसटी म्हणजे अनुसूचित जमातींमधून आरक्षण मिळावं, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे.
मागच्या काही दिवसांत या आंदोलनांची तीव्रता वाढली होती. तसेच धनगर आरक्षणाबाबत कोर्टातही धाव घेण्यात आली होती. धनगर समाजाचा एनटीमधून एसटी प्रवर्गात समावेश व्हावा, अशी मागणी धनगर समाजाकडून करण्यात येत होती. मात्र, यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता आणि पडताळणी झालेली नाही, असे सांगत न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल काथा यांनी धनगर आरक्षणासंदर्भातील याचिका फेटाळून लावल्या आहेत.
पडताळणी निकष अपूर्ण
सध्या धनगर समाजाला एनटी (भटक्या जमाती) प्रवर्गाचे साडेतीन टक्क्यांचे आरक्षण आहे. एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळाले असते, तर धनगर समाजाचे आरक्षण 7 टक्क्यांवर गेले असते.
मात्र, धनगर समाजाला अनुसूचित जातींचे आरक्षण देण्यासाठी पूर्तता आणि पडताळणीचे निकष पूर्ण होत नसल्याचे कारण देत न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठाने सर्व याचिका फेटाळून लावल्या. धनगर समाजाची अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी रास्त नाही. ती मान्य करता येणार नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले.
मुंबई हायकोर्ट सध्या चालू असलेल्या आरक्षणाच्या याचिका आज हाय कोर्टाने फेटाळल्या त्यामुळे एकूणच धनगर समाजाला धक्का बसला आहे तब्बल 75 पेक्षा जास्त तारखा नंतर हा अनपेक्षित निकाल कोर्टाने दिला आहे या याचिकेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र धनगर समाजाला मोठा धक्का बसला आहे.
आज सकाळी जवळपास 11.00 वाजल्यापासून अंतिम निकाल वाचन चालू होते दुपारी 4.30 च्या सुमारास निकाल जाहीर केला सदर निर्णय न्यायमूर्ती पटेल आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठाने दिला आहे निर्णय देताना सांगण्यात आले आहे की अशा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्हाला हस्तक्षेप करता येणार नाही धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्याचा आम्हाला अधिकार नाही हा सर्वस्वी अधिकार संसद आणि संसदमंडळाचा आहे कायद्यात दुरुस्ती करत संसदेतूनच हे आरक्षण दिलं जाऊ शकतं.
असं म्हणत एसटी मधून आरक्षण देण्यासंबंधीत सर्व याचिका हायकोर्ट करण्याचे ठरले आहेत हायकोर्टाच्या या निर्णयानंतर धनगर समाज याचिका करते पुढे काय भूमिका घेणाऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
dhangarandolan: समाजाने आजच्या या निकालाबद्दल खचून न जाता महाराष्ट्रातून धनगर एसटी आरक्षणाचा लढा कसा मजबूत होईल याकडे लक्ष दिले पाहिजे माय माऊलींनी आपले मुलं या आरक्षण लढ्यामध्ये सामील करून आपल्या मुलाबाळांच्या न्याय हक्कासाठी आपल्या युवकाने आरक्षण लढ्यात सामील झाले पाहिजे असे धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भैय्या सोनसळे यांनी म्हटले आहे
शेगाव : शेकडो राम भक्तांना प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला घेऊन जाणाऱ्या शेगाव ते अयोध्या धाम या ‘अयोध्या आस्था रेल’ला हजारो रामभक्तांच्या उत्साहात आणि जल्लोषात आ डाॅ संजय कुटे यांनी हिरवा सिग्नल देऊन शुभारंभ केला. यावेळी जय श्री रामच्या घोषणांनी शेगाव रेल्वे स्थानक परिसरातील वातावरण राममय झाले होते.
सुमारे 500 वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष आणि हजारो बलिदानानंतर अयोध्येत उभारलेल्या भव्य राम मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यासाठी जगभरातील रामभक्त आतुर आहेत. संत गजानन महाराजांची पावन भूमी असलेल्या शेगाव येथून अयोध्येपर्यंत ‘आस्था स्पेशल ट्रेन’ असल्याने रामभक्तांना सुरक्षित प्रवास आणि उत्तम सुविधेसह दर्शनाची संधी मिळणार असल्याचे आ डाॅ संजय कुटे यांनी सांगितले.
यावेळी आ डाॅ कुटे यांनी प्रत्येक रामभक्ताशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या, रेल्वे प्रशासनाने राम भक्तांना कुठेही गैरसोय होणार नाही याची विशेष दक्षता घेऊन अतिशय कौतुकास्पद नियोजन केले त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले.
जिल्ह्यातून आणि विशेषतः आपल्या शेगाव नगरीतून या पहिल्या ट्रेनने अयोध्येला जाणारे रामभक्त अत्यंत भाग्यशाली आहेत.असेही आ डाॅ संजय कुटे आवर्जुन म्हणाले.’रामलला हम आयेंगे मंदिर वही बनायेंगे’ ही घोषणा व स्वप्न सत्यात उतरविल्याबद्दल मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार आ डाॅ संजय कुटे यांनी व्यक्त केले.
आ डाॅ संजय कुटे रामभक्तांना भेटून आस्थेने विचारपूस करत होते,तेव्हा अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रु तरळत होते.रामभक्तांच्या भावना दाटून आल्या होत्या,भावनिक वातावरण निर्माण झाले.एकीकडे आनंदाचा पूर आल्याचे चित्र स्टेशन परिसरात दिसून येत होते.
फटाक्याच्या आतषबाजीत, ढोल ताशाच्या गजरात वाजतगाजत रामभक्तांना आस्था ट्रेन पर्यंत पोहचून देण्यात आले.
ayodhanews: याप्रसंगी आ अॅड आकाश फुंडकर,जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,ऋषीकेश जाधव,माजी आ तोताराम कायंदे,डाॅ अपर्णाताई कुटे,विनोद वाघ,प्रमोद कुटे,राजेंद्र गांधी,प्रदिप सांगळे,बंडू पाटील,विजय भालतडक,गजानन जवंजाळ,पवन शर्मा, ज्ञानेश्वर साखरे ,दिपक शर्मा,राजेश अग्रवाल,सचिन ढमाळ,संतोष रायणे,शिवसेनेचे उमेश अवचार,संतोष लिप्ते आदीसह प्रमुख पदाधिकारी हजर होते.
शेगाव. दि १५ उद्योजक गौरव पुरस्कार २०२४’ या कॉर्पोरेट क्षेत्रातील एक मोठा पुरस्कार मानला जातो. यावर्षीच्या पुरस्काराचे मानकरी म्हणून बुलढाणा जिल्हयातील आळसाणा या गावातील युवा उद्योजक इंजिनियर विनोद इंगळे यांची निवड करण्यात आली आहे.
बांधकाम क्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल ही निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सिनेक्षेत्रातील अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते टीप टॉप प्लाझा मुलुंड येथे विशेष उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
विनोद भिकाजी इंगळे हे मूळचे शेगाव तालुक्यातील आळसना येथील असून शिक्षणांनंतर करियर घडविण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली आणि आपल्या मेहनतीच्या भरवश्यावर मुंबईतच “विनोद बिल्डकाँन” नावाची कंपनी स्थापन करून आपलं विश्व निर्माण केलं.
लिफ्ट मॅन स्विफ्ट मीडिया , मुंबई या संस्थेकडून दरवर्षी व्यवसाय आणि उद्योगक्षेत्रामध्ये सातत्याने भरीव कामगिरी करणाऱ्या, तसेच चाकोरीबाहेरील नव्या वाटा धुंडाळणाऱ्या उद्योजकांना उद्योजकता विकास, उत्पादकता, संशोधन, ग्रामीण रोजगार, निर्यात क्षमता आदी विविध निकष लक्षात घेऊन या उद्योजकांची निवड करण्यात येते.
यावर्षी उद्योजक गौरव पुरस्कार २०२४ साठी इंजिनियर विनोद इंगळे यांना हा प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सिनेक्षेत्रातील अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते टीप टॉप प्लाझा मुलुंड येथे विशेष उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
shegaonnews: विषेता विनोद इंगळे हे खामगांव चे प्रतिष्ठित नागरिक कालकथित शंकरराव पुताजी वानखेडे (रेल्वे ड्रायव्हर) तसेच दलितमित्र सिताबाई शंकरराव वानखेडे यांचे पंतू आहेत.या यशाचे श्रेय विनोद इंगळे त्यांचे आजोबा सुभाष वानखेडे, राजुभाऊ वानखेडे व सर्व वानखेडे परिवार खामगांव तसेच आई वडील, भाऊ, बहीण,मित्र, सर्व इंगळे परिवार तसेच सर्व पहुरकर परिवार आळसना यांना देतात. त्यांच्या या यशामुळे आळसना गावच नाही तर शेगांव तालुका, बुलडाणा जिल्हयाचे नावं रोशन केले आहे.