Home Blog Page 155

“मनोज पाटील  व छगन भुजबळांनी आप आपले शब्‍दांना आवर घालावा”, कडूंचा सल्‍ला, Bachhu kadu

0

 

अमरावती : जालन्यातील अंबड येथे ‘OBC आरक्षण एल्गार सभा’ पार पडली. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना लक्ष्य केले त्‍याचे पडसाद राज्यभरात उमटत असून मनोज जरांगे यांनीही छगन भुजबळांवर सुरु टीका केली आहे.

आमदार बच्‍चू कडू यांनी या दोन्‍ही नेत्‍यांना सबुरीचा सल्‍ला दिला आहे.

तर या प्रसार माध्‍यमांशी संवाद साधताना बच्‍चू कडू म्‍हणाले, ‘जे काही होईल, ते कायद्यानेच होणार आहे. तर कायद्याच्‍या बाहेर काही होणार नाही. त्‍यामुळे मराठ्यांच्‍या विरोधात जो काही आव आणला जात आहे, तो चुकीचा आहे, तर मला असे वाटते.

 

https://www.suryamarathinews.com/lonar-lake/

मनोज जरांगे पाटील यांनीही एकेरी भाषेत बोलू नये. छगन भुजबळ यांनी देखील जरांगे यांच्‍या सासऱ्यापासून ते खालच्‍या पातळीपर्यंत जाऊ नये. असं माझं दोन्‍ही नेत्‍यांनी शब्‍दांवर संयम ठेवायला हवा’. कारण कि त्यांचं परिणाम चुकीचा झालं नाही पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे बच्चू कडू,, bachhukadu

टिपु सुलतान जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद Tipu Sultan

0

 

इस्माईल शेख बुलढाणा. जि. प्र

शेगांव: शहिदे वतन हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त रविवार 19 नोव्हेंबर रोजी आठवडी बाजारातील डॉ.असलम खान यांच्या शिफा क्लिनिक येथे आयोजित भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्थानिक आठवडी बाजार परिसरातील शहिद अ.हमीद चौक येथील डॉ. असलम खान यांच्या शिफा क्लिनिक येथे रविवारी सकाळी 11वा.या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.

दुपारी दोन वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ.दाऊद देवाणी यांनी शंभर च्या वर नेत्र रुग्णांची मोफत नेत्र तपासणी केली.यावेळी डॉ.असलम खान हे ऊपस्थीत होते,नेत्र तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर असलम शेख,शिफा क्लिनिक,रिलीफ मेडीकल अ.हमीद चौक आठवडी बाजार व देवाणी चष्मा घर ,सहारा आय क्लिनीक मेन रोड शेगांव यांचे सहकार्य लाभले tipusultan

Lonar Lake लोणार येथे आलेल्या पर्यटकाची कार पलटली; त्यात एक ठार, तर तीन गंभीर जखमी.

0

 

Buldhana लोणार सराेवर पाहून आपल्या गावाकडे जात असलेल्या पर्यटकांची अचानक कार उलटल्याने एक जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना लाेणार सराेवराजवळ किन्ही रस्त्यावर १८ नाेव्हेंबर राेजी घडली. आहे.

या अपघातानंतर कार तीन ते चार वेळा उलटली. सूरज शिवाजी गुडवे (२५, रा. ठाणे) असे मृतकाचे नाव आहे.

मुंबई व ठाणे येथील पर्यटक इनाेव्हा कार (एमएच ०१ एएक्स ९८९८)ने सकाळी शेगाव येथे दर्शन घेऊन लाेणार सराेवर पाहण्यासाठी आले हाेते. अचानक सराेवर पाहिल्यानंतर ते मुंबईकडे परत जात हाेते. या दरम्यान, मध्ये लाेणारवरून समृद्धी महामार्गाकडे जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या खाली उतरली आणि ती कार दाेन ते तीन वेळा पलटी झाली .Lonar Lake

या अपघातामध्ये सूरज शिवाजी गुडवे यांचा जागीच मृत्यू झाला तर सूर्यकांत शिवाजी गुडवे (२७), निहाल संदीप सुर्वे (१ वर्ष), साहिल संजय गुडवे (२०), नीता संदीप सुर्वे (३३) हे गंभीर जखमी आहे. सर्व जखमींना जालना येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे.

https://www.suryamarathinews.com/बाईक-वर-जात-असताना-अचानक-म/

या घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनास्थळावर पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे, संतोष प. चव्हाण, पाठवण्यात आले आहे राजेश घोगरे आदींनी भेट देऊन जखमींना तातडीने जालना येथे उपचारार्थ पाठवण्यात आले आहे
Lonar Lake

टिपु सुलतान जयंती निमित्त 19 नोव्हेंबर रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव: शहिदे वतन हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त रविवार 19 नोव्हेंबर रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.स्थानिक आठवडी बाजार परिसरातील शहिद अ.हमीद चौक येथील डॉ. असलम खान यांच्या शिफा क्लिनिक येथे रविवारी सकाळी 11 ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ.दाऊद देवाणी हे केवळ 50 नेत्र रुग्णांचीच मोफत नेत्र तपासणी करणार आहेत.

त्यामुळे गरजू रुग्णांनी त्वरीत रिलीफ मेडीकल अ.हमीद चौक आठवडी बाजार मो.क्र.9420834600, व देवाणी चष्मा घर ,सहारा आय क्लिनीक मेन रोड शेगांव 9604243414 येथे नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

श्री जलाराम बाप्पा जयंती प्रित्यर्थ १९ नोव्हेंबरला ”स्वर्णीम महोत्सव

0

 

प्रमोद जुमडे/वर्धा

“हिंगणघाट येथील शीतला माता मंदिराजवळ दानी महाराजाच्या मंदिरातील जलाराम बापाच्या मूर्तीची स्थापनेला 51वर्ष पूर्ण होत आहे. जयंतीनिमित्त प्रसादाचा कार्यक्रम व भजन पूजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.या मंदिरात 1973 साली बाप्पाच्या मूर्तीची स्थापना नरली बाई माधव जी चंदाराणा यांच्या हस्ते करण्यात आली होती.

त्या वर्षापासून प्रसादाचा कार्यक्रम हरीभाई, अरुण भाई व डाह्या भाई हे सुरत वरून हिंगणघाट ला येऊन त्यांचे सुपुत्र मनोज, जयेश, राकेश, नितीन व संजय चंदाराणा कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी करतात.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 19 नोव्हेंबरला दुपारी बारा ते संध्या आठ पर्यंत प्रसादाचा सर्वांनी लाभ घेण्याचा आग्रह चंदाराना परिवाराणी केला आहे.

बाईक वर जात असताना अचानक मधमासाच्या  हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू

0

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील रिधोरा खंडोबा येथील शेतकरी सुरेश शिवराम कळमकर वय (४०) यांचा मधमाशांच्या हल्ल्यात १७ नोव्हेंबर रोजी सकाळी मृत्यू झाला. असून  शेतकरी दुचाकीवर शेतात जात असतांना अचानक  नाल्याच्या काठीही घटना घडली.

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता ते शेतकरी आपल्या   शेतात जात होते. रिशोदार शिवारातच त्यांच्यावर मधमाश्यांनी अचानक हा हल्ला केला. या मधमाशांचा हल्ला होत असतांनाही त्यांनी त्यांच्याबाबत घडत असलेल्या या प्रकाराची माहिती गावातील मित्राला फोन लावून दिली. परंतु त्यानंतर गावातून काही लोक तातडीने घटनास्थळी पोहोचले .

तेव्हा घटनास्थळी सुरेश कळमकर हे ग्रामस्थांना बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. ताबडतोब  त्यांना त्यानंतर  तातडीने धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना बुलढाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आले. परंतुl बुलढाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

असून मृतक सुरेश कळमकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई ,वडील व भाऊ, बहिण असा आप्त परिवार आहे.

रुग्णवाहिका असूनही खासगी वाहनाचा आधार  घ्यावा लागते धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार या प्रकरणात समोर आला आहे. मृकाच्या नातेवाईकांनी त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जखमी अवस्थेत सुरेश कळमकर यांना धामणगाव बढे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणण्यात आल्यानंतर डॉक्टरांना त्यांच्या निवासस्थानामधून बोलावून आणावे लागले. तर दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध असताना त्यावरील चालक जागेवर  नव्हता. याच परिणामी खासगी वाहनाचा शोध घेऊन त्या वाहनाद्वारे सुरेश कळमकर यांना बुलडाणा येथे हलवावे लागले.

या प्रकाराबाबात तीव्र नाराजी व्यक्त केलेले आहे या सर्व प्रकाराला जबाबदार कोण आहे.

Maratha Reservation: आता तोडगा निघाला आहे ? OBC कोट्याला  धक्का न लावता मिळणार लवकर मराठ्यांना आरक्षण!

0

Maratha Reservation:

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन  आता राज्यातील वातावरण  खूप  तापलं आहे.  तरी लवकर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे.  तरी त्या आधीच सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. या साठी  शिंदे सरकार लवकर निर्णय घेणार..

तरी यापार्श्वभूमीवर एक मोठी अपडेट समोर येत आहे. कि मराठा समाजाला  लवकर आरक्षण देण्यासाठी  शिंदे  सरकार स्वतंत्र कायदा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तरी या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी समूदायामध्ये खूप  तेढ निर्माण झाले आहे.  या शिंदे सरकार  लवकर तोडगा निघाला? OBC कोट्याला धक्का न लावता सरसकट मराठ्यांना मिळणार आता  आरक्षण!Maratha Reservation

या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. तरी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. त्याआधीच सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे.

यापार्श्वभूमीवर एक मोठी अपडेट समोर येत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार स्वतंत्र कायदा करणार असल्याची माहिती सामच्या सूत्रांनी दिली आहे.

या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी समूदायामध्ये तेढ निर्माण झाले आहे. मनोज जरांगे यांनी ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. ओबीसी नेत्यांनी याला विरोध केला आहे. त्यामुळे सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थिती सरकारने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता EBC च्या धर्तीवर मराठा आरक्षणाचा नवा कायदा आणण्याची शिंदे  सरकारने पूर्ण तयारी सुरु केली आहे.

येणारे  नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये यासंबंधी कायदा आणला जाण्याची दाट शक्यता  नाकारता येत  आहे. तरी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. या मराठा-कुणबी नोंदी राज्यभरात आढळून येत आहेत. त्यामुळे ओबीसी समाजात असुरक्षितेची भावना निर्माण झाल्याचं बोललं जातं. त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी सरकारने तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे.Maratha Reservation

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात येईल. ओबीसी समाजाने मनात कोणताही संभ्रम ठेवू नये. त्यांच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही, असा शब्द शिंदे यांनी दिला होता. त्यानुसार आता कायदा करुन स्वतंत्रपणे मराठा समाजारा आरक्षण देण्यासाठी सरकारने कंबर कसल्याचे समजते.

मनोज जरांगे यांनी ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. ओबीसी नेत्यांनी याला विरोध केला आहे. त्यामुळे सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थिती सरकारने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता EBC च्या धर्तीवर मराठा आरक्षणाचा नवा कायदा आणण्याची सरकारने तयारी सुरु केली आहे.Maratha Reservation

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये यासंबंधी कायदा आणला जाण्याची दाट शक्यता आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. मराठा-कुणबी नोंदी राज्यभरात आढळून येत आहेत.

त्यामुळे ओबीसी समाजात असुरक्षितेची भावना निर्माण झाल्याचं बोललं जातं. त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी सरकारने तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

https://www.suryamarathinews.com/mahamarg-bus-accident/

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण लवकर  देण्यात येईल. ओबीसी समाजाने मनात कोणताही संभ्रम ठेवू नये. त्यांच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही, असा शब्द शिंदे यांनी दिला होता. त्यानुसार आता कायदा करुन स्वतंत्रपणे मराठा समाजा आरक्षण देण्यासाठी शिंदे सरकारने कंबर कसल्याचे आता समजते आहे. तरी लवकर गोड बातमी मिळणार..Maratha Reservation

Mahamarg Bus Accident/ खाजगी बसने दुचाकीवरील तिघांना चिरडले होते.तिघांचे बळी घेणारा फरार ट्रॅव्हल्स चालक गजाआड; तीन दिवसानंतर अटक

0

 

Mahamarg Bus Accident

बुलढाणा : खाजगी बसणे राष्ट्रीय महामार्गावर तिघांचे बळी घेणाऱ्या व अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या चालकास नांदुरा पोलिसांनी तीन दिवसाच्या आत अटक केली. असून घटनेच्या तिसऱ्या दिवशी आरोपीला अटक करण्यात आली. व संदीप विश्वनाथ पवार (रा. डिग्रस खुर्द, ता.पातुर, जि. अकोला ) असे आरोपी चालकाचे नाव आहे.

राष्ट्रीय महामार्गावर वडनेर (भोलजी) पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस नायक विक्रमसिंह राजपूत यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

राष्ट्रीय महामार्गावरून आरोपीने १४ नोव्हेंबरला आपल्या ताब्यातील खासगी बस भरधाव वेगात व चुकीच्या बाजूने चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली. राष्ट्रीय महामार्ग क्रं ५३ वरील वडनेर (भोलजी) नजीकच्या हॉटेल विश्वगंगा जवळ ही दुर्घटना घडली होती.

पण या अपघातात गोपाल शालीक राणे, स्वप्नील करणकार (जळगाव खान्देश), आकाश राजु आखाडे ( कल्याण) यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. या दरम्यान, १६ नोव्हेंबर रोजी चालक संदीप पवार याला नांदुरा पोलीसांनी ताब्यात घेतले.

https://www.suryamarathinews.com/sameer-wankhede-समीर-वानखडे-ncb/

व त्याच्याविरुद्ध भादंवीच्या कलम २७९, ३०४ (अ), मोटर वाहन कायद्याच्या कलम११९/१७७, १८४, १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नागेश जायले व हवालदार उमेश भारसाकळे करीत आहेत.

सूर्या मराठी न्यूज वेबसाईटला लाईक करा फॉलो करा crime news /Mahamarg Bus Accident

sameer wankhede समीर वानखडे NCB जोनल डायरेक्टर यांचे शेगाव मध्ये मोठ्या जल्लोषात सपत्नीक स्वागत……..

0

 

समीर वानखडे हे एक भारतीय राज्यसेवा अधिकारी आयआरएस ऑफिसर आहेत त्यांना भारतामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जनरल डायरेक्टर च्या रूपात ओळखले जात आहेत शेगाव येथील दौऱ्यावर आज आले असता त्यांनी प्रथमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमेला हर अर्पण करून.

तसेच त्यांच्या पदस्पर्शाने सुरुवात केली तसेच गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांचे खूप मोठे जल्लोषात स पत्नीक क्रांति रेडेकर वानखडे स्वागत पियुष ओवे,प्रविण सर बोदडे, ऍड इशारे सर, अजय सुरवाडे ऍड प्रथमेश माने आनंद गुजर विकास पवार गजानन बांगर अजय सुरवाडे अलकाताई बांगर महेंद्र थेटे शिबू खान बंटी सुर्वे या गावातील लोकांनी खूप मोठ्या जल्लोषाने त्यांचे स्वागत केले.

https://www.suryamarathinews.com/mumbai/

 

समीर वानखडे यांनी बोलताना डॉक्टर बाबासाहेबांविषयी समाजाला प्रेरणा मिळावी त्यांच्या संविधानाविषयी संविधानातील कलम विषयी आणि मी आज जो काही आहे तो फक्त माझ्या डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या आणि आम्हाला समर्पित केलेल्या संविधानाच्या जोरावर आहे असे बोलताना त्यांनी पत्रकार माध्यमांशी सांगितले  sameer wankhede

राष्टॣमाता ईंदीरा गांधी न.प.विद्यालयाची विद्यार्थीनी कु.प्राची टवरे हिची राज्य स्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी निवड..

0

 

इस्माईल शेख बुलढाणा .जि. प्र.

शेगांव: राष्टॣमाता ईंदीरा गांधी न.प.विद्यालयाची विद्यार्थीनी कु.प्राची टवरे हिची राज्य स्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे . येथील राष्टॣमाता ईंदीरा गांधी नगर पालीका विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थीनी कु.प्राची अमोल टवरे हिने अमरावती येथे पार पडलेल्या विभागीय जिमनॅस्टिक स्पर्धेत रजत पदक पटकावून यश संपादन केले.

क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे विभागीय जिमनॅस्टिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

अभ्यासात अतीशय हुशार असलेल्या कु.प्राची टवरे हिने अमरावती येथे पार पडलेल्या विभागीय जिमनॅस्टिक स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. पुणे येथे 26 ते 29 नोव्हेंबर पर्यंत होणाऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी कु. प्राची अमोल टवरे हिची निवड झाली आहे.तीचे या यशाबद्दल अभिनंदन होत आहे