Home Blog Page 251

कार्यकाळ एक वर्षाचा विश्वास

0

 

प्रतिनिधी:(जालना)अमित साहेबांचा माझा कार्य अहवाल अमित साहेब यांच्या कडे सादर उपस्थित मनसे नेते दिलीप बापू धोत्रे सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे जिल्हाध्यक्ष गजानन भाऊ गिते तालुकाध्यक्ष कृष्णा खलसे व ॲड हरीदास लांडे जिल्हाध्यक्ष विधीकक्ष, श्रीकांत ठाकरे तालुका उपाध्यक्ष, कृष्णा पिसोरे तालुका उपाध्यक्ष, राम कातकडे तालुका उपाध्यक्ष,महादेव भोकरे तालुका सचिव,ओमकार गवळी,कृष्णा काटकर,गजानन गायके,मच्छिंद्र चव्हाण, ऋषिकेश शिवंत,वामन चौधरी, बाळु कावळे,जिवा जाधव,शाम तागड,कैलास डुकरे,अनिल डुकरे,दिपक राऊत,अमोल नांगरे, नागेश वाघमारे,अतुल धनेधर,रामेश्वर जाधव आदी उपस्थित होते.

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ, महाराष्ट्र च्या ( ग्रामीण ) क्षेत्राच्या जिल्हा सचिवपदी गोकुल तायडे यांची निवड

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील मनवेल वेथील पत्रकार गोकुळ तायडे यांची भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा ग्रामीण सचिवपदी निवड करण्यात आली आहे . हिंगोणा तालुका यावल वेथील ग्राम पंचायतच्या सभागृहात भारतीय बद्दुउद्देशीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी अय्युब जी पटेल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न होवुन या बैठकीत संघटनेत जळगाव जिल्हा ग्रामीणचे सचिव पदावर मनवेल येथील पत्रकार गोकुळ नामदेव तायडे यांची निवड करण्यात आली आहे . मागील काही दिवसापासुन संघटनेत राहुन काही सदस्य हे संघटनेशी एकनिष्ठ न राहता तसेच शिस्त आणी नियम पाळत नसल्याचे निर्दशनात आल्याने संघटनेचे राज्य प्रभारी अय्युब पटेल यांनी काही सदस्यांना संघटनेतुन कायमचे काढण्याचा निर्णय घेतला असुन , या अनुषंगाने पार पडलेल्या बैठकीत गोकुळ तायडे यांची निवड केली आहे . या बैठकीत संघटनेचे विभागीय समन्यवयक रणजीत भालेराव , यावल तालुका अध्पक्ष ए.टी .चौधरी, गोकुळ तायडे , बाळासाहेब आढाळे,राजेन्द्र आढाळे ,हर्षल आंबेकर , फिरोज तडवी , सुनिल पिंजारी , सैय्यद चाँदबादशा, ईमरान पिंजारी यांच्यासह अन्य पत्रकार बैठकीस उपस्थित होते .बैठकीत सावदा येथील जेष्ठ पत्रकार जितेन्द्र कुलकर्णी यांच्यावर श्रीदुर्गादेवी विर्सजनाच्या मिरवणुकी काही जणांकडून झालेल्या असभ्यवर्तनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आले .

शिव सेनेचे वतीने जिल्हाधिकारी ला निवेदन

0

 

वर्धा हिंगणघाट मलक नईम

आज दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोज गुरुवारला दुपारी 2:00 वाजता वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख बाळाभाऊ राऊत सह संपर्कप्रमुख रविकांची बालपांडे यांच्या सूचनेनुसार वर्धा जिल्ह्यातील ” शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे”
या पक्षाचे जिल्हाप्रमुख अनिल भाऊ देवतारे , हिंगणघाट वर्धा जिल्ह्याचे संघटक भारत भाऊ चौधरी , वर्धा जिल्हा उपप्रमुख बाळू मिरापूरकर, हिंगणघाट तालुकाप्रमुख श्री. सतीश धोबे व शहर प्रमुख सतीश ढोमणे ,उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने, नगरसेवक मनीष देवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. जिल्हाधिकारी साहेब ,वर्धा तथा मा. पोलीस अधीक्षक साहेब ,वर्धा यांना हिंगणघाट शहरातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरा पूर्ववत सुरू करण्यासाठी लागणारा खर्च रूपये:- 07:00 लाख नियोजन समिती मधून मंजूर करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात मा. जिल्हाधिकारी, वर्धा व पोलीस अधीक्षक साहेब ,वर्धा यांना विनंती करण्यात आली की, हिंगणघाट शहरांमध्ये दोन वर्षांपूर्वी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जिल्हा नियोजनामार्फत सीसीटीव्ही कॅमेरे शहराच्या मुख्य ठिकाणी लावण्यात आले होते .परंतु मागील एक वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत प्रमुख रस्त्याचे (सिमेंट रस्ता बांधकाम) बांधकाम करण्यात आले. त्यावेळेस त्या कॅमेऱ्याचे केबल बांधकाम विभागाचे ठेकेदार यांच्या हाताने काढण्यात आले होते. तेव्हापासून सदर सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहे .नंतर ते केबल पुन्हा लावण्यात आलेले नाही ,पोलीस स्टेशन मधील कंट्रोलिंग यंत्र सुद्धा बंद आहे. शहरातील विविध विषयावर अफवा येतात जसे मुली – मुले चोरीच्या बातम्या तथा गांजा, दारू ज्याचे मोठे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. त्या अनुषंगाने मागील दिनांक 11 ऑक्टोबर 2022 ला आमचे शिष्टमंडळ पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन हिंगणघाट यांना भेट देऊन सदर विषयावर चर्चा करून निवेदन देण्यात आले होते .त्यामधील त्यांनी मुख्य कारण म्हणून आमचे सीसीटीव्ही बंद असल्यामुळे आपल्याला कंट्रोलिंग करता येणे शक्य होत नाही .बंद असलेले यंत्रासाठी खर्च जवळपास 7:00 लाख रुपये एवढा आहे. एवढा निधी पोलीस विभागाकडे उपलब्ध नसल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहे .म्हणून आम्ही मा. जिल्हाधिकारी वर्धा यांना विनंती केली की ,आपण नियोजन समिती मधून सदर निधी मंजूर करून द्यावा जेणेकरून सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ववत सुरू होईल व शहर सुरक्षित होईल,या संदर्भात मा.आमदार श्री अभिजित वंजारी यांना फोन वर सांगितले त्यांनी सुध्दा हा विषय जिल्हा नियोजन समिती च्या बैठकीत घेतो असे म्हटले. अशे असायाचे पत्र त्यांना सुद्धा देण्यात आले आहे. निवेदन देण्याकरिता सेलू तालुका प्रमुख सुनील परिसे, तालुका संघटक नितीन ढगे, वर्धा उप तालुका प्रमुख प्रमोद पांडे, विजय कंगाले, मनोहर नाईक आदि शिवसैनिक उपस्थित होते**.

सततच्या पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान,शेतकर्यांची सोयाबीन बाजारात येताच दरात घसरण;मजुरांचे सोंगणीचे दरात दुप्पट वाढ:

0

 

(प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना)

जालना परतिच्या पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे.सोंगणीस आलेली खरीपाची पिके पाण्यात असल्याने शेतकऱ्यांचे प्रंचड नुकसान होत आहे.हातातोंडाशी आलेला घास पावसात खराब होत असल्याचे पाहतांना शेतकऱ्यांचा जिव मात्र कासविस होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रंचड नुकसान झाले होते.परिसरातील सोयाबीन पिकाची सोंगणी-मळणी आदी कामे सुरू असतांना पाऊस पडत आहे.काही ठिकाणी सोंगणी करून शेतात सोयाबीनच्या पेंढ्याची पसर पडली आहे.तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांनी सोयाबीन च्या गंज्जी घातले आहे.पावसामुळे सोयाबीन च्या पेंढ्याच्या खालच्या बाजूला शेंगाना कोंब फुटू लागली आहे.तसेच नुकसान होण्याची शेतकर्यांना चिंता लागत आहे.नेर परीसरात खरीपाची सोयाबीन,बाजरी,मका आदी पिके सोंगणीस आली आहेत.तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन सोगण्यांस सुरवातही केली होती. मात्र गेल्या दोन तीन दिवसापासुन परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे.त्यामुळे या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.अतिवृष्टीमुळे या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.बहुंताश पिंकामध्ये मोठया प्रमाणावर पाणी साचले आहे.आधिच अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले आहे.सोयाबिन पिकाची काढणी चालु आहे.मात्र पावसाने शेतकर्यांच्या कष्टाचे पाणीच-पाणी केले आहे.त्यामुळे काढणीस आलेले सोयाबिन पीक उद्वस्त झाले आहे.त्यामुळे नेर परिसरात मंगळवारी दुपारी तीन ते चार दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने कपाशीसह,सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले.बाधित पिकाचे प्रशासनाने त्वरित पंचनामे करावे.अशी मागणी शाम राठोड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद जालना यांनी प्रशासनाकडे केली आहे.

शिक्षकपर्व उपक्रम अंतर्गत कार्य प्रेरणा शिबिर

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- शिक्षा मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत दरवर्षी ‘शिक्षक पर्व’ उपक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते सन 2022- 23 साठी दिनांक 15 ऑक्टोबर पर्यंत शिक्षक पर्व उपक्रम घेण्याविषयी सुचित करण्यात आले होते. त्यानुसार पंचायत समिती हिंगणघाट येथील शिक्षकांसाठी दिनांक:- 11/10/ 2022 ला कार्यप्रेरणा शिबिराचे आयोजन ज्ञानदा हायस्कूल सातेफळ येथे करण्यात आले. या शिबिरामध्ये जिल्ह्याच्या गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने व निपुण भारत उद्दिष्ट पूर्तीसाठी विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यप्रेरणा शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे, शिक्षणाधिकारी लिंबाजी सोनवणे ज्येष्ठ अधीव्याख्याता डॉ. नीतू ताई गावंडे ,मंजुषाताई ओंढेकर अधिव्याख्याता मधुमती सांगळे, गटशिक्षणाधकारी अरविंद राठोड, विस्तार अधिकारी सुभाष टाकळे, शाळेचे मुख्याध्यापक निकित गेडाम, शाळेचे मुख्याधिकारी लकी खीलोसिया व सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. या कार्य प्रेरणा शिबिरात 21 व्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन- अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून विकसित करण्याच्या दृष्टीने ज्ञानरचनावाद, सहअध्यायी अध्ययन, ABL,सहकार्यात्मक अध्ययन, खेळ आधारित अध्यापनशास्त्र, तंत्रज्ञान अनुदेषित अध्यापन शास्त्र, स्वयं अध्ययनास चालना देणाऱ्या अध्यापन पद्धती, कला आधारित अध्यापन शास्त्र, ERAC अध्यापन पद्धतीची माहिती देण्यात आली. या शिबिरात ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. नीतूताई गावंडे यांनी संकल्पना प्राप्ती प्रतिमान पद्धती व मंजुषाताई ओंढेकर यांनी जिक्सो परिमाण पद्धती यावर आधारित पाठाचे सादरीकरण केले. पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करणारे उपक्रमशील शिक्षक मंगेश डफ, राहुल खोडे, नरेंद्र नन्नावरे, सीमा दाते, राजश्री दांडेकर यांनी शाळेत राबवलेल्या उपक्रमाचे सादरीकरण करून अधिव्याख्याता मधुमतीताई सांगळे यांनी घेतलेल्या गटचर्चेच्या माध्यमातून विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे उत्तर दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी अरविंद राठोड यांनी तर संचालन विषयसाधनव्यक्ती कु. कविता घोडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन समग्र शिक्षा अभियान कर्मचारी यांनी केले

न्यायालयाचा अपमान डॉक्टरांनी दिली खोटी माहिती

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट :- शहरातील नामवंत डॉ. प्रकाश लाहोटी यांचे हिंगणघाट शहरातील महेश ज्ञानपीठ यांच्या ताब्यावरून धर्मदाय आयुक्त येथे प्रकरण चालू आहे. दि.6 ऑक्टोंबर ला संबंधित प्रकरणाची तारीख होती यावेळेस डॉक्टर प्रकाश लाहोटी गैरहजर होते त्यांनी गैरहजर राहण्याचे कारण दिले . त्यासाठी डॉ. मुखी यांनी डॉ. प्रकाश लाहोटी यांना सर्दी ,खोकला ,ताप असल्यामुळे त्यांना प्रवास करण्यास मनाई केली आहे व आराम करण्यास सांगितले होते. त्या आधारावर पुढील तारीख देण्यात आली. प्रत्यक्षात डॉक्टरनी न्यायालयाला दिलेले माहिती ही खोटी आहे याबाबत पुरावा आहे. त्याच तारखेला डॉ. प्रकाश लाहोटी यांचा दवाखाना सुरू होता व त्यांनी पेशंट तपासले म्हणजे त्यांनी त्यांचा व्यवसाय केला. न्यायालयाला खोटी माहिती देणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे. आज डॉक्टरचे प्रमाणपत्र जोडल्यास न्यायालयामध्ये खऱ्याचा खोटं व खोट्याचं खरं सुद्धा करता येते , काही डॉक्टर याच्या आड मध्ये खोटे प्रमाणपत्र देऊन व्यवसाय करतात

जालना तालुक्यातील मौजपुरी सर्कल सह परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान:

0

 

(तुकाराम राठोड/जालना)

जालना तालुक्यातील मौजपुरीसह परिसरात मंगळवारी दुपारी तीन ते चार दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने कपाशीसह,सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले.बाधित पिकाचे प्रशासनाने त्वरित पंचनामे करावे अशी मागणी भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस रामदास गायकवाड यांनी केली आहे.

हिंगणघाट नगरपरिषद कडून आव्हान दिव्यांग व्यक्तिंचे मोफत ऑनलाईन रजिस्ट्रेशन

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- नगर परिषद,द्वारे शहरातील नागरीकांना आव्हान करण्यात येते की, दिव्यांग व्यक्तीचे दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र UDID प्रमाणपत्र देणे साठी रजिस्टेशन करणे सुरु आहे. तरी सर्व नागरीकांनी आपल्या कुटुंबातील दिव्यांग व्यक्तिचे रजिस्ट्रेशन करण्याकरिता खालिल CSC सेंटरला व तसेच इतरही CSC सेंटरला जावुन रजिस्ट्रेशन करून सहकार्य करावे.

हिंगणघाट आश्रय शहरी बेघर निवारा येथे जागतिक बेघर दिन सप्ताह साजरा

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट —
दि.10 ऑक्टोंबर
केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत प्रेरणा वस्ती स्तर संघ संस्था द्वारा चालविण्यात येणाऱ्या आश्रय शहरी बेघर निवारा कमला नेहरू शाळा हिंगणघाट येथे जागतिक बेघर दिन सप्ताह साजरा करण्यात आला त्यामध्ये संस्था चालकांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. शहरातील मुख्य ठिकाणी जाऊन बेघर शोधणे निवऱ्यातील बेघराचे पुनर्वसन करणे निवाऱ्यामध्ये रांगोळी स्पर्धा परीक्षा घेणे निबंध स्पर्धा इत्यादी कार्यक्रम राबविण्यात आले जागतिक बेघर दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निवारा चालकांनी मा, मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, रोटरी क्लब अध्यक्ष पराग कोचर,डॉ.मुखी ,नारायण सेवा मित्र परिवारातर्फे अग्रवाल सर, विपिन सर ,शैक्षणिक संस्थेचे शीलाताई बोरकर मॅडम ,नांदे सर, सांगोळे सर ,सीमा मेश्राम ,राजश्री बांबोळे ,समाजसेवक दिनेश वर्मा, वृक्षारोपण मित्रपरिवार तर्फे नितीन क्षीरसागर, नगरसेवक मनीष देवळे ,सतीश धोबे कार्यक्रमाला उपस्थित होते. मान्यवरांना फुल झाड देऊन स्वागत करण्यात आले. नगरपरिषद हिंगणघाट एन-यु- एल-एम विभागातर्फे श्रीमती सुजाता जावळे मॅडम, इंदुरकर मॅडम,कटारिया मॅडम , सिलेब- सी-एल-एफ अध्यक्ष अनुताई मानकर व संस्था अध्यक्ष शारदा भाले व ए एल एफ ची संपूर्ण कार्यकारणी तसेच बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या .

कामचुकार ग्रामसेवक सुदाम शिंदे याच्यावर तात्काळ कारवाई करा

0

 

आवार गावातील नागरिकांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

आवार येथील ग्रामसेवक सुदाम शिंदे हे नेहमीच ग्रामपंचायत कार्यालयात सतत गैरहजर राहत असून ते आपल्या मुख्यालय राहीत राहत नाहीत त्यामुळे नागरिकांना महत्त्वाच्या दाखल्यांसाठी नाहक त्रास सहन करा लागत आहे त्यामुळे या कामचुकार ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आवार येथील नागरिकांनी 12 ऑक्टोंबर रोजी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले

सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की सचिव सुदाम शिंदे हे त्यांच्या कर्तव्यात कसूर करत असून गत एक वर्षापासून शिंदे यांनी ग्रामपंचायतीची ग्रामपंचायत मध्ये आमसभा घेतलेली नाही तसेच ग्रामपंचायतचे कोणते विकास कामे चालू आहेत किंवा चालू होतील याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच जुलै 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आवारगावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदरहू नुकसानीचे सर्वेक्षण ग्रामसेवक व तलाठी यांच्याकडे सोपविण्यात आले होते परंतु सदर सर्वे हा ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता तसेच गावामध्ये मुनादी न देता कोणाच्या तरी घरी बसून कागदोपत्री हा सर्वे केल्याचे दिसून येत आहे कारण सर्वेक्षणात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व शेतकऱ्यांच्या नावाची निघालेली यादी यामध्ये कोणतेही साम्य आढळून येत नाही तसेच ग्रामसेवक आणि शेताचे सर्वेक्षण करतेवेळी शेतकऱ्यांच्या कोणत्याही सर्वेक्षणाच्या अहवालावर स्वाक्षरी घेण्यात आलेली नाही त्यामुळे सदरहू अतिवृष्टीचा शेत सर्वेक्षण हे शेताच्या बांधावर जाऊन वस्तुनिष्ठ न करता अंदाजे करण्यात आलेला आहे किंवा तोंड पाहून केलेला आहे त्यामुळे संबंधित सचिव शिंदे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी कारवाई न झाल्यास 16 ऑक्टोबर पासून ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील असा इशारा या निवेदनातून देण्यात आलेला आहे या निवेदनावर शेख इरफान शेख मन्नान, मुकीन बेग मशीन बेग, शेख अनिस शेख तसलीम, दिनेश बोदळे, चेतन इंगळे , प्रकाश अवचार , रमेश वानखडे आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत