Home Blog Page 32

Sonalikulkarni/हिंगणगाटचा माँ राणी गरबा महोत्सव दणक्यात साजरा – सोनाली कुलकर्णींच्या उपस्थितीने आठवा दिवस ठरला अविस्मरणीय

 

थीम आधारित वेशभूषांनी दिला सामाजिक संदेश, शेतकरी, जिजाऊ, डॉक्टर, पोलीस यांच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध

हिंगणगाट (प्रतिनिधी): सचिन वाघे

हिंगणगाट शहरातील लोकप्रिय माँ राणी नवरात्री गरबा महोत्सव 2025 यंदाही मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटात साजरा करण्यात आला. या महोत्सवाचा आठवा दिवस विशेष ठरला, कारण मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरणात एक वेगळीच झळाळी निर्माण झाली.

Sameerkunavar /पोहणा येथील ऐतिहासिक रुद्रेश्वर देवस्थानाला ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्र मान्यता; आ. समीर कुणावार यांच्या प्रयत्नांना यश

समाजप्रबोधनाचा एक वेगळा पैलू महोत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही थीम आधारित वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धकांनी समाजप्रबोधनात्मक विषय हाताळत शेतकरी, डॉक्टर, पोलीस, वकील, माँ जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, संत परंपरा यांसारख्या विविध भूमिकांद्वारे आपली सादरीकरणे साकारली.

विशेषतः शेतकरी वेशभूषेत तरुणांनी सादर केलेले सादरीकरण हृदय हेलावणारे ठरले. मुलींनी साकारलेली माँ जिजाऊ आणि राणी लक्ष्मीबाईची भूमिका देखील प्रेरणादायी ठरली. या सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षकांना भावनिक केलं आणि प्रचंड प्रतिसाद मिळवला.

सोनाली कुलकर्णींचा गौरव आणि गौरवोद्गार
सोनाली कुलकर्णी यांचे महोत्सवात विशेष स्वागत फुलांच्या वर्षावात आणि टाळ्यांच्या गजरात करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात हिंगणगाटकरांच्या उत्साहाचे व महोत्सवाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत म्हणाल्या,

Sonalikulkarni/> “हिंगणगाटचा गरबा उत्सव हा केवळ धार्मिक विधी नाही, तर सामाजिक जाणीव जागवणारे व्यासपीठ आहे. येथे प्रत्येक व्यक्तीचा सहभाग हेच या उत्सवाचे यश आहे.”गरबा, डांडिया आणि भक्तिभाव संपूर्ण कार्यक्रम साई मंदिर हॉल येथे पार पडला. आयोजक अतुल वांदिले आणि माँ राणी उत्सव समितीने हा सोहळा अत्यंत सुंदर रित्या पार पाडला.

Sameerkunavar /पोहणा येथील ऐतिहासिक रुद्रेश्वर देवस्थानाला ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्र मान्यता; आ. समीर कुणावार यांच्या प्रयत्नांना यश

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट, दि. १ ऑक्टोबर २०२५ तालुक्यातील पोहणा गावातील प्राचीन व ऐतिहासिक हेमाडपंथी रुद्रेश्वर देवस्थान आता अधिकृतपणे ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश प्राप्त झाले असून, पालकमंत्री पंकज भोयर यांनी याबाबत माहिती दिली.

यापूर्वी या देवस्थानास ‘क वर्ग’ तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळालेली असून, त्यानंतर परिसरात भक्तांच्या सोयीसाठी विविध सुविधा उभारण्यात आल्या होत्या. सौंदर्यीकरण, पथदीप, प्रसाधनगृह आणि सभागृह आदी विकासकामांनी मंदिर परिसरात नवचैतन्य निर्माण झाले.
रुद्रेश्वर मंदिर हे केवळ श्रद्धास्थान नसून, इतिहास, स्थापत्यकला आणि सांस्कृतिक वारसा यांचे अनोखे प्रतीक मानले जाते.

सुमारे १००० ते १२०० वर्षांपूर्वी बांधले गेलेले हे मंदिर ५० फूट उंच, ८० फूट लांब आणि ३६ फूट रुंद असून, एकाच दगडातून कोरलेली दुर्मिळ पिंड व राष्ट्रकूटकालीन चतुर्मुख ब्रह्मदेवाची मूर्ती या वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयावर प्रतिक्रिया देताना आमदार समीर कुणावार म्हणाले, hingnghatnews

 

https://x.com/AnilsingC?t=CmSAEnZpEbhXPC4aXjRuRQ&s=09

X अकाउंटला आताच फॉलोव करायला विसरू नका

Sameerkunavar/“या निर्णयामुळे केवळ देवस्थानाचा गौरव वाढला नाही, तर पोहणा गावाची धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर नवी ओळख निर्माण झाली आहे. भाविकांची संख्या वाढेल, स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल आणि परिसराचे सांस्कृतिक महत्त्व अधिक दृढ होईल.”हा निर्णय पोहणा गावासाठी तसेच संपूर्ण हिंगणघाट तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे.

Atulvandile /हिंगणघाटचा अभिमान! नाशिक मोर्चाचे यशस्वी निरीक्षण करणाऱ्या अतुल वांदिले यांचा मुंबईत सत्कार

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट – संघर्षातून प्रगती साधणारे नेतृत्व म्हणजे अतुल वांदिले! राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस असलेले वांदिले यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर पक्षात महत्त्वाचे स्थान मिळवले आहे.

नुकत्याच 15 सप्टेंबर रोजी नाशिक येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राका गटाने आयोजित केलेल्या भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाचे निरीक्षक म्हणून वांदिले यांची निवड करण्यात आली होती. या मोर्चाचे संपूर्ण नियोजन, समन्वय आणि यशस्वी आयोजनाची जबाबदारी त्यांनी लीलया पार पाडली.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी अतुल वांदिले यांनी सलग 12 दिवस नाशिक जिल्ह्यात राहून, विविध गावांना भेटी देऊन, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि प्रेरणा निर्माण केली. त्याच्या यशस्वी आयोजनाची दखल स्वतः पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी घेतली आणि दिनांक 28 सप्टेंबर रोजी मुंबई येथील पक्ष कार्यालयात सन्मान चिन्ह देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Atulvandile/या गौरवप्रसंगी माजी आमदार सुनील भुसारा, रवींद्र पवार, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
“हा केवळ माझा नव्हे, तर हिंगणघाटच्या मातीचा सन्मान आहे,” असे नम्र उद्गार वांदिले यांनी सत्कारानंतर काढले.

Sameerkunavar/ हिंगणघाट | उपजिल्हा रुग्णालयातील वीज खंडित प्रकरणाचा आढावा

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- दी. 26 /09/25
शुक्रवारी रात्री उपजिल्हा रुग्णालयात वीज खंडित झाल्यामुळे रुग्ण व नातेवाईकांमध्ये तीव्र संताप उसळला. नवजात बालकांची व महिलांची जीवित सुरक्षाही धोक्यात आली.

आज आमदार समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली. संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, महावितरण व पोलीस प्रशासन उपस्थित होते.

नागरिकांनी व पत्रकारांनी व्यवस्थेतील त्रुटींवर रोष व्यक्त करत अनेक गंभीर मुद्दे मांडले:

वीज खंडित होणे

जनरेटर अद्याप बंद

शौचालयांची दुरवस्था

झाडाझुडपांची वाढ व औषधांचा अभाव

आ. कुणावार यांनी सर्व तक्रारींची दखल घेत दोषींवर तातडीने कारवाईचे निर्देश दिले व झाल्या प्रकाराची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाच्या उपसंचालकांना विस्तृत अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले.

Sameerkunavar /लवकरच येथील अव्यवस्थेचा प्रकार आरोग्यमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांचे कानावर घालून कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे कुणावार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Navdurga/हिंगणघाटची माँ राणी – भक्तांच्या श्रद्धेचा महासागर!

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट (जि. वर्धा): नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर हिंगणघाट शहरात माँ राणीच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. साई मंदिर, नंदोरी रोड परिसरात प्रतिष्ठापित करण्यात आलेली माँ राणीची आकर्षक मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

हिंगणघाटची माँ राणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या दुर्गा देवीच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना २२ सप्टेंबर रोजी नवरात्रारंभाच्या दिवशी करण्यात आली. माँ राणी नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात या भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मूर्तीची सजावट, मंडपातील आकर्षक रोषणाई, आणि साई मंदिर परिसरातील वातावरण भक्तिभावाने भरलेले आहे. परिसरात लहान मुलांसाठी झुल्यांची व्यवस्था, तसेच खवय्यांसाठी विविध खाद्यपदार्थांची खास मेजवानीही उपलब्ध आहे.

नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्र महोत्सवात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, विधिवत पूजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भव्य गरबा महोत्सव हे खास आकर्षण ठरत आहे. शहरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या ग्रामीण भागातील भाविक मोठ्या संख्येने माँ राणीच्या दर्शनासाठी येत आहेत.

Navdurga/भाविकांनी अधिक संख्येने उपस्थित राहून नवरात्रोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष अतुल वांदिले यांनी केले आहे.

Sadabhaukhot/उमरगा तालुक्यात आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांशी संवाद

 

बातमीदार-: ऋषिकेश सुरवसे

Sadabhaukhot/उमरगा : मागील काही दिवसांपासुन होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यासह उमरगा तालुक्यातही शेतातील पिकांसह शेतशिवाराचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची माजी कृषी राजमंत्री आमदार सदाभाऊ खोत व उमरगा नायब तहसीलदार भीमाशंकर बेरुळे जिल्हाध्यक्ष सुरज आबाचने यांनी बांधावर जावून पाहणी केली.

यावेळी नुकसानीचे पंचनामे करण्याची सुचना देऊन शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना दिले.

उमरगा तालुक्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांच्या शेतातील माती वाहून गेली आहे. मुग, उडीद व सोयाबिन पिकात पाणी उभारल्याने पिके नासुन गेली आहेत. तर तुरीसह इतर खरीप पिकांना पाणी लागुन ती पिवळी पडली आहेत. ऊसाचे फड आडवे झाले आहेत.

यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी वाट पहात आहेत.
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देण्याचे काम आमदार सदाभाऊ खोत यांनी केले.

त्यांनी तालुक्यातील येणेगुर, दाळिंब, येळी आदी गावात झालल्या नुकसानीचे शनिवारी (दि. २७) रोजी पाहणी केली. पाहणीदरम्यान उमरगा तालुक्यात शेती पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करुन घेण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगुन यावेळी शेतकऱ्यांना धीर दिला.

मनोज यमुलवाड मंडळ अधिकारी दाळिंब, रंजना राठोड ग्राम महसूल अधिकारी येणेगूर, जी बी शेख सहाय्यक कृषि अधिकारी येणेगूर, अविष्कार भालेराव सहाय्यक कृषि अधिकारी दाळिंब, सदानंद इंगळे ग्रामपंचायत अधिकारी येणेगूर उपस्थित होते
यावेळी शेतकरी महेश सोनवणे,महेबुब मुल्ला, महादेव बिराजदार, सतिश जाधव, शरण बिराजदार, अल्ताफ मुल्ला, अजीम खजुरे उपस्थित होते.

Sadabhaukhotआमदार सदाभाऊ खोत यांनी वैशाली चॅरिटेबल ट्रस्ट याठिकाणी भेट दिले असता भारतीय संविधान व बुद्ध आणि धम्म ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी वैशाली चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष-प्रा.अजय कांबळे , उपाध्यक्ष-अमोल कांबळे व सर्व संचालक मंडळ तसेच सरपंच-निवृत्ती पवार ,शिवलिंगप्पा माळी (माजी सरपंच), व्यंकटराव मोरे(माजी उपसरपंच),प्रा.जी.एस.सुरवसे ,आयु.भिमराव निवृत्ती कांबळे, आयु.रोहिदास कांबळे आयु.संदीपान गणपती कांबळे, आयु.नागनाथ श्रीपती कांबळे,बबन कांबळे, अभिमन्यू कांबळे, विशाल कांबळे,हरीश कांबळे बाबा पवार आदी उपस्थित होते आदीसह विविध गावातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Umrganews/भाऊसाहेब बिराजदार बँकेची २९ वी वार्षीक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

अतिवृष्टीने शेतकरी सभासद अडचणीत असल्यामुळे १०% लाभांश देणार – प्रा . सुरेश बिराजदार
————

बातमीदार ऋषिकेश सुरवसे

उमरगा : भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन प्रा . सुरेश दाजी बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.२७) रोजी श्रीराम मंगल कार्यालय उमरगा येथे उत्साहात संपन्न झाली. धाराशीव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी सभासद मोठ्या अडचणीत आलेला आहे .त्यामुळे यावर्षी दहा टक्के लाभांश वाटप करणार असल्याचे चेअरमन सुरेश बिराजदार यांनी जाहीर केले .

यावेळी संचालक सुनील माने ,गोविंदराव साळुंखे , साहेबराव पाटील , विजयकुमार सोनवणे,  व्यंकटराव सोनवणे,डॉ . मल्लिनाथ मलंग यांच्यासह पद्माकरराव हराळकर ,योगीराज कदम ,आर.डी माने,अभिजीत माडीवाले,किसन पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती
बँक आजतागायत सतत ऑडिट वर्ग ‘अ’ मध्ये आहे .

बँकेचा ठेवीदार हा व्यवसायाचा कणा असतो. ठेवीदारांनी बँकेवर दाखवलेला विश्वासावरच बँकेची प्रगती अवलंबून असते. याशिवाय लातूर शहरात पुढील तीन महिन्यात एक तर सोलापूर, बीड, पुणे जिल्हा कार्यक्षेत्रामध्ये भविष्यात उघडणार असल्याचे त्यांनी सांगितले. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी सभासद मोठ्या अडचणीत आहेत अशा परिस्थितीत त्यामुळे सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले .

पारदर्शक कारभार करून बँकेने विश्वासाने निर्माण केली आहे बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एटीएम , एस.एम.एस.,आरटीजीएस, एनईएफटी ,आय एम पी एस ,यु पी आय, सुरक्षीत लॉकर, सुविधा बँकेने सुरू केली आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी आर . के . शहापुरे यांनी सभे पुढील विषय वाचन केले . नानाराव भोसले यांनी मनोगत व्यक्त केले .सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी तर आभार संचालक साहेबराव पाटील यांनी मानले .

Umrganews/यावेळी सुनिल साळुंके , शमशोद्दीन जमादार , रमेश बिराजदार ,संचालक इंद्रजीत घोडके , संजय गायकवाड ,सतीश साळुंखे , रामकृष्ण बिराजदार ,शिवाजीराव मोरे , राहुल पाटील , मधुकर सोनवणे , ॲड संदीप ढगे -पाटील ,यांच्या सह अशोक कारभारी , कमलाकर काळे, मारुती पाटील,संजय जाधव , व्ही एम.पाटील ,सत्यनारायण जाधव ,आयुब पटेल ,पवन पाटील ,
प्रा. सतीश इंगळे ,दयानंद बिराजदार, ब्रिजेश बिराजदार, सुरेंद्र पौळ ,विजय चव्हाण ,संतोष शिरगुरे , सतीश सुरवसे ,विष्णू माने, भरत जाधव, श्री . तांबे, श्री . माळी याच्यासह बँकेच्या सातही  शाखेचे शाखाधिकारी, कर्मचारी, सभासद उपस्थित होते

jayshree shelke/ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न.

 

बुलढाणा /पालकमंत्र्यांना दिले निवेदन.सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्यासाठी शासनाने तात्काळ पावले उचलावी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर डीपीडीसी बैठकीच्या अनुषंगाने धडक देण्यात आली.jayshree shelke

पालकमंत्री तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना.मकरंद जाधव पाटील यांना मागणीची निवेदन ही देण्यात आले.यावेळी जिल्हासंपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, आमदार सिद्धार्थ खरात, शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई, शेळके, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर

बुधवत, जिल्हाप्रमुख गजानन वाघ, सहसंपर्कप्रमुख छगनदादा मेहेत्रे, सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने,डी एस लहाने सर, सुमित सरदार, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, आशिष रहाटे, गजानन ठोसर, विलास सुरडकर, तुकाराम काळपांडे, गजानन धांडे,सुनील घाटे,शिवसेना तालुकाप्रमुख विजय इतवारे,राजेंद्र वाघ, संतोष

jayshree shelke/दांडगे,विजय किसन धोंडगे,श्रीराम खिलदार,आत्माराम शेळके,ईश्वर पांडव, अशोक गव्हाणे नारायण हेलगे,जिल्ह्यातील शहर प्रमुख उपतालुका प्रमुख व सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते!

dhangar aarakshan/एसटी आरक्षणासाठी धनगर समाजाचे लाक्षणिक उपोषण

 

बातमीदार ऋषिकेश सुरवसे

उमरगा : महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, तसेच मागील दहा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले दीपक बोऱ्हाडे यांचे उपोषण सोडवण्यासाठी व धनगर समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावे, अशा मागनीचे निवेदन उमरगा तहसीलदार यांना शुक्रवारी (दि.२६) रोजी देण्यात आले.

उमरगा तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सकल धनगर समाजाची अनुसुचित जमातीच्या (एस.टी.) प्रवर्गात व भारतीय घटनेत ३६ क्रमांकावर धनगर ही एकच जमात असून, भारतातील इतर राज्यामध्ये अंमलबजावणी झालेली आहे.

परंतू महाराष्ट्र राज्यामध्ये स्वातंत्र्यापासून आजपर्यंत अनेक सरकारे आले आणि गेले फक्त आश्वासने देवून, जाणिवपूर्वक एस.टी. ची अंमल बजावणी करून .अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र देत नसून, या बाबत महाराष्ट्रातील दोन कोटी धनगर समाजावर फार मोठा अन्याय झालेला असून यासाठी मराठवाड्यातील जालन्यामध्ये धनगर समाजाचे दिपक बोऱ्हाडे हे गेल्या १० दिवसापासून आमरण उपोषणाला बसले असून, त्यांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय लाक्षणीक उपोषण करण्यात येत आहे.

तसेच शासनाने तात्काळ निर्णय नाही घेतल्यास विजयादशमी दसऱ्यानंतर महाराष्ट्रातील दोन कोटी धनगर समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

dhangar aarakshan/निवेदनावर अखिल भारतीय धनगर समाज संघटनेचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय गाडेकर, वैजीनाथ कागे, संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष कलिंदा घोडके, महिला प्रदेशअध्यक्षा शिवाजी गावडे, माजी नगसेवक गोविंद घोडके,जालिंदर सोनटक्के,बालाजी घोडके,अरुण गडदे,उत्तमराव घोडके,राम घोडके,खंडू दुधभाते,अर्जुन दुधभाते,गोपाळ घोडके,लक्ष्मी घोडके,सुवर्ण ब्याळे,कविता घोडके,सविता दुधभाते,शोभा हिंडोळे, कोंडाबाई वाघमोडे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Farmernews /शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे

प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी

ओला दुष्काळ जाहीर करा -शेतकरी मित्र परिवाराची मागणी

सिंधी रेल्वे तहसील कार्यालयात जाऊन
अधिकाऱ्यांना दिले निवेदन
शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे. अतिदृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे सोयाबीन पिकावर येल्लो मोजक नावाचा रोग आलेला आहे या रोगामुळे सोयाबीनचे पीक नष्ट झालेले आहे पावसामुळे आणि रोगामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झालेले आहे कापसावर बुरशी तुरीचे पीक नष्ट झाले आहे.

शेतकऱ्यांनी पिक विमा काढला परंतु पिक विम्याची रक्कम शेतकऱ्याला मिळेल की नाही या विचारात शेतकरी भ्रमित आहे शेतकऱ्याची आवाज म्हणून शेतकरी मित्र परिवारातर्फे आज तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता अधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन झालेल्या पिकाचा नुकसान पंचनामा करून तहसील कार्यालयात पाठवा शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे.

Farmernews /याकरिता शेतकरी मित्र परिवाराचे अध्यक्ष रवी भाऊ वाघमारे उपाध्यक्ष रामभाऊ सोनटक्के सचिव रामेश्वर घंगारे अमोल गवळी किशोर डकरे आशिष सातपुते जीवन बेलखोडे चंदन चव्हाण गणेश काळबांडे सुरेश गंगारे इम्रान राजू दांडेकर प्रभाकर तडस यशवंतजी बडवाई इत्यादी शेतकरी उपस्थित होते