Home Blog Page 32

पतंजली योग परिवार द्वारा आयोजित योग शिबीराला अतुल वांदिले यांची उपस्थित (Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट:- पतंजली योग परिवार हिंगणघाट व अभिनव विचार मंच हिंगणघाट द्वारा २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्ताने भव्य निशुल्क योग शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन निखाडे मंगल कार्यालय हिंगणघाट येथे करण्यात आले आहे.

सुलतानपूर ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी,काव्हरके यांची तात्काळ बदली करून, नियमित सेवा देणारे ग्रामपंचायत अधिकारी देण्यात यावे, अन्यथा ठिय्या आंदोलन.(Andolannews)

सदर योग शिबिराचा तिसरा दिवशी, या योग शिबीराला शुभेच्छा देण्याकरिता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, सचिन कापकर सदस्य अभिनव विचार मंच प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. शरीर स्वास्थ्या करिता नियमित योग, प्राणायाम, व्यायाम, करणे हाच उपाय आहे. योग साधक,साधिकांना मार्गदर्शन करताना प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले.

योग शिबिराचे मार्गदर्शन, प्राणायाम, सूर्यनमस्कार, आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या प्रोटोकॉलचे व आसनांचे प्रात्यक्षिक योगशिक्षिका प्राची प्रसाद पाचखेडे यांनी केले. योग शिबिराचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पंढरी तडस यांनी केले.

Hingnghat :पतंजली योग समिती व अभिनव विचार मंच द्वारा शहरात प्रमुख मार्गाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी हिरवी झंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली.

सुलतानपूर ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी,काव्हरके यांची तात्काळ बदली करून, नियमित सेवा देणारे ग्रामपंचायत अधिकारी देण्यात यावे, अन्यथा ठिय्या आंदोलन.(Andolannews)

0

 

सय्यद जहीर लोणार

Andolannews:सुलतानपूर ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून. ग्रामपंचायत मध्ये दररोज नागरिकांचे कामे पडतात परंतु ग्रामपंचायत अधिकारी हे कार्यालयामध्ये हजर नसतात.

Pratapraojadhav/हाताला भेगा पडण्याच्या तक्रार, डॉक्टर म्हणतात हा तर इसबगोल 

व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता बेकादेशीरपणे ठराव देणे, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे, महिला ग्रामपंचायत सदस्यांना उध्दटपणाची वागणूक देणे, माहिती अधिकार अर्जदाराला माहिती अधिकारांमध्ये माहिती न देणे व त्या अर्जदाराला माहिती अधिकाराने काय होते.

अशी उडवाउडवीची उत्तरे देणे, विकास कामाच्या संदर्भात अनिमित्तता ठेवून बोगस कामे करणे, सरपंचपती यांच्यासोबत संगणमत करून भ्रष्टाचार करणे. अशा विविध कारणामुळे भ्रष्टाचारी ग्रामपंचायत अधिकाऱ्याची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अन्यथा दोन दिवसाच्या नंतर ठिय्या आंदोलण करण्याचा इशारा देण्यात येत आहे.

निवेदनावर ९ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

नागवंशी संघपाल पनाड मेहकर-लोणार विधानसभा नेते,
सौ. रुपाली दिपक राजगुरू,
सौ. सिमा संतोष पवार,
सौ. सुनिता ज्ञानेश्वर हरकाळ,
संतोष राधाकिसन शिंदे,
जैबूनबी शेख अहमद,
राजेका परवीन जियाउल्ला,
सुमन मारोती पनाड,
सरस्वती वसंता निर्मळे

पातूर्डा प्रा.आरोग्य केंद्र इमारतीचे बांधकाम तत्काळ सुरू न केल्यास आंदोलन :संगीतराव भोंगळ ( sangitraobhongal)

0

 

sangitraobhongal:पातुर्डा ता. संग्रामपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम बऱ्याच महिन्या पासून रेंगाळत असून सदर बांधकाम सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मा. जि.प.उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी निवेदनाद्वारे मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना दिला आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,मौजे पातुर्डा बु. गावासह लगतच्या १३ ते १४ खेड्‌यांची लोकसंख्या पाहता, पातुर्डा बु. येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची नितांत आवश्यकता आहे.

Pratapraojadhav/हाताला भेगा पडण्याच्या तक्रार, डॉक्टर म्हणतात हा तर इसबगोल 

यासंदर्भात शासन व प्रशासनाकडे यापुर्वी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परिणामी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नविन इमारतीस मंजुरात मिळाली होती. सदर कामाची ई-निविदा घेतलेल्या ठेकेदाराचा आकस्मिक निधन झाल्यामुळे इमारत बांधकामास तांत्रिक अडचण निर्माण झाली होती.

मात्र सदर कामाची परत दुस-यांदा ई टेंडर प्रक्रिया करण्यात आली. ग्रामीण स्तरावर शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शेतकरी, शेतमजुर व नवजात शिशु सह सर्वांना प्राथमिक उपचाराची गरज भासते. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा पुरविता याव्या यासाठी नवीन ईमारतीचे बांधकाम लवकर सुरू करण्यात यावे.

जुनी इमारत क्षतीग्रस्त असल्यामुळे ती पाडण्यात आली आहे.त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथील आरोग्य सेवा पूर्णतः कोलमडली असुन, निव्वळ एकाच खोलीतुन रुग्णांना सेवा दिल्या जात असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे आरोग्य सेवेचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Drsanjaykute Home / जळगाव जामोदमधील शेतकऱ्यांचा संताप: भाजप आमदाराच्या घरावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न

या इमारत कामास ३ वर्षा आधी प्रशासकीय मान्यता मिळाल्याने, २ वर्षा आधीच ही इमारत पूर्ण होऊन जनसेवेसाठी समर्पित होणे गरजेचे असताना, प्रशासनाच्या दिरंगाईने परत नव्याने नवीन प्रशासकीय मंजुरात घ्यावी लागली, उशिरा झालेली निविदा प्रक्रिया त्यात आलेले अडथळे, आज रोजी सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही या इमारतीस आणखी उशीर होत असल्याने हा या परिसरातील नागरिकांवर होत

sangitraobhongal:असलेला अन्याय आहे. आम्ही अन्याय सहन करणार नाही. त्यामुळे मौजे पातुर्डा ता. संग्रामपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रलंबित इमारतीचे प्रत्यक्ष बांधकामात सुरुवात करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्या जाईल, त्याची सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील, संगीतराव भोंगळ यांनी पाणीपुरवठा योजनेसाठी केलेले आंदोलन आणि उपोषण सर्वश्रुत असून यावेळी ते कोणते आंदोलन करतात हे पाहणे औसुक्याचे ठरेल.

Pratapraojadhav/हाताला भेगा पडण्याच्या तक्रार, डॉक्टर म्हणतात हा तर इसबगोल 

0

 

बुलढाणा:मेहकर तालुक्यात हाताला भेगा पडण्याच्या आजाराची चर्चा सुरु झाली आहे. मेहकर तालुक्यातील शेलगांव देशमुख येथील विस गावाकऱ्यांना हाताला भेगा पडल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या.

केंद्रीय आरोग्य, आयुष राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांचा गृह मतदारसंघ असलेल्या गावातील हा प्रकार आहे. यामुळे आरोग्य यंत्रणानी भेगांची गंभीर दखल घेतली.

Samirkunavar / आ. कुणावारांनी केला ६८ वर्षीय दहावी उत्तीर्ण आजीचा हृदय सत्कार..

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे एक पथक शेलगाव देशमुख मध्ये दाखल झाली. ह्या रुग्णांची तपासणी करण्याकरिता जिल्हा स्तरावरील जिल्हा साथरोग तथा सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रशांत तांगडे ,वैद्यकीय अधिकारी तथा त्वचारोग तज्ज्ञ डॉ.बालाजी आद्रट उपस्थित होते. स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी मिश्रा, आरोग्यसेवक, आरोग्य सेविका तथा गावातील सगळ्या आशा सेविका व ईतर कर्मचारी वृंद यांनी सदर तपासणी केली .

पथकाने २० रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी जवळपास सगळ्या रुग्णांना इसबगोल हा आजार असल्याचे दिसून आले. त्यांना हा आजार मागील १२ महिने ते ५ वर्षांपासून आहेत. मागील १-२ वर्षांपासून बुलढाणा व अकोला येथील त्वचारोग तज्ञांकडुन रुग्णावर उपचार सुरु असल्याचे निष्पन्न झाले .
काय म्हणतात डॉक्टर?

Drsanjaykute Home / जळगाव जामोदमधील शेतकऱ्यांचा संताप: भाजप आमदाराच्या घरावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न

सदर आजार हा संसर्गजन्य नाही. ह्या आजाराचा व पाण्याचा काहीही संबंध नाही.विविध प्रकारच्या प्रतिजन, हानिकारक पदार्थ संपर्कात आल्यास स्वयंप्रतिकार ( ऑटोम्मुने ) पध्दतीचा हा आजार उद्भवू शकतो, असे डाक्टर तांगडे यांनी सांगितले.

Pratapraojadhav / दुसरीकडे सर्व रूग्णांनी घ्यावयाची काळजी व उपचार याबाबत सविस्तर मार्गदर्शन रुग्णांना व स्थानिक वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Samirkunavar / आ. कुणावारांनी केला ६८ वर्षीय दहावी उत्तीर्ण आजीचा हृदय सत्कार..

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट दि.१४ जून हिंगणघाट तालुक्यातील जामणी ( गोजी ) येथील ६८ वर्षीय वृद्ध महिलेने ५१ टक्के गुण प्राप्त करीत नुकतीच १० वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली.

याची विशेष दखल घेऊन आ. कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.
त्या तालुक्यातील बुरकोणी येथील मूळच्या रहिवासी आहेत इंदुबाई सिंधुजी सातपुते अशी त्यांची पूर्वाश्रमीची ओळख व जामणी(गोजी) येथील बोरकर परिवारात त्यांचे लग्न झाल्यानंतर त्या श्रीमती इंदुबाई ज्ञानेश्वरजी बोरकर या नावाने ओळखल्या जातात.

Drsanjaykute Home / जळगाव जामोदमधील शेतकऱ्यांचा संताप: भाजप आमदाराच्या घरावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न

विवाहानंतर अनेक वर्षे कुटुंबाचे पालनपोषण करण्यात वेळ गेला परंतु मनात १० वी अनुत्तीर्ण असल्याची खंत होती,
शेवटी सत्र २०२४- २५ मध्ये वयाच्या थेट ६८ व्या वर्षी त्यांनी ५१ टक्के गुण प्राप्त करीत १० वीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण करीत समाजापुढे आदर्श निर्माण केला.

त्यांनी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन हिंगणघाट या संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शन घेतले.त्यांनी दहावीत भारत विद्यालय वेळा येथे प्रवेश घेऊन दहावी उत्तीर्ण केली.

त्यांना दोन मुले व एक मुलगी,नातवंड असा मोठा आप्तपरिवारआहे. त्यांनी वयाचे ६८ वर्षातही शिक्षणाची जिद्द बाळगून तरुण विद्यार्थी, विद्यार्थिनीनाही अंतर्मुख करणारे यश प्राप्त केले आहे.

अखेर बच्चू कडूंच्या उपोषणाला यश;शेतकरी कर्जमाफीचा निर्णय: बच्चू कडूंच्या उपोषणाला मिळालं यश ( bacchukadu)

अशा या आजीच्या यशाची दखल घेऊन आमदार समीर कुणावार यांनी आज हिंगणघाट येथील स्थानिक जन संपर्क कार्यालयात हृदय सत्कार केला.

Samirkunavar /याप्रसंगी भाजपा शहर कार्यकारी अध्यक्ष संजय माडे, बाळासाहेब इंगोले, रविभाऊ दांडेकर , प्रमोद नौकरकर, कमलाकर महाकाळकर, भारती महाकाळकर, उषा बाभुळकर, कुसुम रंगारी, मीना देशमुख, सुदा चौधरी, शितल वाणी, अपर्णा हिवंज इत्यादी तसेच त्यांचे कुटुंबीय, भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Drsanjaykute Home / जळगाव जामोदमधील शेतकऱ्यांचा संताप: भाजप आमदाराच्या घरावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न

0

 

Drsanjaykute Home:भाजप आमदार संजय कुटे यांचे घर जाळण्याचा प्रयत्न: अतिवृष्टीची मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप, जळगाव जामोद पोलिसांत गुन्हा

जळगाव जामोदमध्ये राज्याच्या वर्तमान राजकीय वातावरणात एक धक्कादायक घटना घडून आली.

भाजपचे माजी मंत्री व विद्यामन आमदार डॉ.संजय कुटे यांच्या निवासस्थानावर संतप्त शेतकरी निघालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीच्या नुकसानीवर मदत न मिळाल्यामुळे संतापला आणि त्यांनी आमदाराचे घर पेटवून देण्याचा दहशतवादी प्रयत्न केला.

अखेर बच्चू कडूंच्या उपोषणाला यश;शेतकरी कर्जमाफीचा निर्णय: बच्चू कडूंच्या उपोषणाला मिळालं यश ( bacchukadu)

काल मध्यरात्री जळगाव जामोद परिसरात डॉ.संजय कुटे यांच्या निवासस्थानी या घटनेची खळबळ उडाली. संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी विशाल मुरुख यांनी आमदाराच्या घरासमोर पेट्रोलचा कॅन घेऊन प्रवेश केला व घराचे बाहेरील भाग जाळण्याचा प्रयत्न केला.

शेतकऱ्यांचा संताप इतका जास्त होता की, ते स्वतःच्या शेतीच्या नुकसानीवर वेळेवर मदत न मिळाल्यामुळे आमदाराकडेच खेळत जमले.

 

हिवाळ्यातील अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकांना मोठे नुकसान झाले आहे.

या नुकसानीची भरपाई घेण्यासाठी शासनाकडे अर्ज करण्यातही शेतकऱ्यांना राजकीय नेत्यांची मदत मिळत नाही, अशी तक्रार रूढ आहे.

याच पार्श्वभूमीवर जळगाव येथेही शेतकऱ्यांच्या मनातील असंतोष जागृत झाला आणि त्याची अट्टल अभिव्यक्ती या घटनेच्या रूपात झाली.

या घटनेमुळे जळगाव जामोद आणि आसपासच्या भागात तातडीने पोलीस तैनात करण्यात आले. आरोपी शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आमदार संजय कुटे यांनी घटनेची तपासणी करीत असल्याचे सांगितले आहे.

ते स्थानिक पत्रकारांना सांगतात, “हे कृत्य स्वीकार्य नाही. शेतकऱ्यांच्या समस्येवर चर्चा होणे गरजेचे आहे, परंतु हिंसक मार्ग कधीही योग्य नाही.”

या घटनेचा राजकीय आणि सामाजिक परिणाम मोठा आहे. शेतकरी समुदाय आर्थिक अडचणीतून जात असताना, सरकार आणि राजकारणी यांची प्रतिक्रिया दुर्लक्षित झाली की, ग्रामीण भागात अशा प्रकारचे उद्रेक वाढत राहतात.

देशभरातील इतर राज्यातही शेतकऱ्यांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला आहे, पण महाराष्ट्रातील ही घटना सर्वांना जागृत करणारी आहे.sanjaykutehome

विशेषज्ञांच्या मते, शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्याची प्रक्रिया सोपी व पारदर्शी असणे आवश्यक आहे.

Ajitpawar / शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा?

“शेतकऱ्यांच्या समस्यांवर लगेच कारवाई झाली पाहिजे, अन्यथा अशा प्रकारच्या घटना वाढू शकतात,” असे एका कृषी विशेषज्ञाने सांगितले.

विशेष पाहणीमध्ये लक्षात येते की, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती, शासनाच्या मदतीची अपर्याप्तता आणि राजकीय नेत्यांची निष्क्रियता या घटनेची मुख्य कारणे आहेत. याला परिणाम म्हणून ग्रामीण भागातील शांतता धोक्यात येऊ शकते.

 

Drsanjaykute Home:या घटनेनंतर, आमदार व इतर स्थानिक नेत्यांच्या सुरक्षेची चौकशी वाढवण्यात आली आहे. पोलीस आणि प्रशासनाने या प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेतली आहे.

अखेर बच्चू कडूंच्या उपोषणाला यश;शेतकरी कर्जमाफीचा निर्णय: बच्चू कडूंच्या उपोषणाला मिळालं यश ( bacchukadu)

0

 

bacchukadu: अखेर बच्चू कडूंच्या उपोषणाला यश; शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, काय ठरलं!

राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळावी या मागणीचा पाठपुरावा करणाऱ्या प्रहार पक्ष नेत्यांच्या दृष्टीस्पद असलेल्या बच्चू कडू यांनी अन्नत्यागाच्या रूपात उपोषण सुरू केलं होतं. त्यांना शासनाशी संवाद साधता आला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मोठी घोषणा केली.

Bachhukadu / प्रहारचे नेते बचू कडू यांच्या समर्थनार्थ प्रहारचे मुक्काम आंदोलन

ही बातमी फेब्रुवारी सुरू असलेल्या या सामाजिक आंदोलनाचा उल्लेखनीय टप्पा ठरत आहे.devendrafadnvis

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीच्या पाठपुराव्यात बच्चू कडू यांनी अन्नत्याग सुरू केला. त्यांच्या पाच दिवसांच्या उपोषणानंतर, आज सहावा दिवस असताना त्यांची प्रकृती खालावली होती.

ही घटना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषण स्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली. भेटीच्या वेळी, बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि उपोषण करणाऱ्या बच्चू कडूंशीही फडणवीस यांनी थेट चर्चा केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या प्रक्रियेवर तातडीने काम करण्याचे आश्वासन दिलं. त्यांनी घोषणा केली की, कर्जमाफीसाठी त्वरित समिती स्थापन करण्यात येईल आणि या समितीमध्ये बच्चू कडू यांचाही समावेश असेल. या समितीचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: “शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीला आम्ही गंभीरपणे घेत आहे. त्वरित समिती स्थापन करत आहोत. बच्चू कडू यांना या समितीमध्ये घेतले जाईल. समितीच्या अहवालानंतर कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल.

चंद्रशेखर बावनकुळे (पालकमंत्री, अमरावती)शेतकऱ्यांच्या समस्येला शासन गंभीरपणे घेत आहे. उपोषण स्थळी मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंशी थेट संवाद साधला आहे.

Ajitpawar / शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा?

ही घोषणा केवळ एका आंदोलनापुरतीच मर्यादित नाही, तर शेतकऱ्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दिशेने राज्य सरकारचं उत्तरदायित्व दाखवते. यासाठी तयार करण्यात येणाऱ्या समितीमध्ये शेतकरी आणि प्रतिनिधी यांचाही सहभाग याची हमी देण्यात आली आहे.

bacchukadu:शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणं, त्यांच्या आर्थिक परिस्थितीला सुटकारा देतं आणि शेतीक्षेत्रातील आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यास मदत करू शकतं.

Bachhukadu / प्रहारचे नेते बचू कडू यांच्या समर्थनार्थ प्रहारचे मुक्काम आंदोलन

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Bachhukadu:हिंगणघाट :-माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चुभाऊ कडू गुरुकुंज मोझारी जि. अमरावती येथे शेतकऱ्याची कर्जमाफी करावी व दिव्यांगाना प्रति महिना रु. 6000/- मानधन व अन्य मागण्या घेऊन दि. 08 जून 2025 पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करीत आहेत.

Ajitpawar / शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा?

परंतु हें सरकार त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष देत नसल्यामुळे बच्चुभाऊंच्या अन्नत्याग आंदोलनास पाठींबा म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज शुक्रवारी दि. 13 जूनला उपविभागीय कार्यालया हिंगणघाट येथे तीव्र निदर्शने करण्यात आले.

उपविभागीय कार्यालयात घुसू पाहणाऱ्या शेकडो प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्वरित रोखले त्यावेळी प्रहारच्या संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या व्हरांड्यात जोरदार नारेबाजी करून तहसील कार्यालयाचा परिसर दुमदुमून टाकला व शेवटी प्रहार कार्यकर्त्यांनी ठोकला उपविभागीय अधिकारी यांच्या दारातचजवळपास एक तास मुक्काम ठोकताच पोलिसांनी केवळ पाच कार्यकर्त्यांना आत जाऊन निवेदन देण्याची परवानगी दिली.

Ravikanttupkar / संघटना निर्दालनाच्या नावाखाली सरकारची कारवाई”- रविकांत तुपकर

प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजू कुबडे यांनी निवेदन देऊन त्वरित मागण्या मान्य करण्याची मागणी केली.
यावेळी प्रहारचे जिल्हाप्रमुख सुरज कुबडे, प्रहारचे माजी जिल्हाप्रमुख देवा धोटे, प्रहारचे माजी शहर प्रमुख अजय लढी,प्रहार विद्यार्थी संघटनेचे माजी जिल्हाप्रमुख अंकित दांडेकर, दिनेश गलांडे,अक्षय मरापे, अजय खेडेकर, ऋषभ तडस, प्रहार दिव्यांग आघाडीचे राजेश पंपनवार,महेंद्र बोरकर, नितीन केसूरकर मयूर पुसदेकर,रोशन बरबटकर,शेखर

जामूनकर, विशाल ठाकूर, सुमित भोयर, भूषण फुलझेले, सुरज डफ, अमोल धारने, सागर आत्राम,रितिक इतवारे,अनंता वायसे, नाना नागठाणे, गजानन देव्हाडे,गौरव रामटेके, अजय कान्हारकर, गजानन केसूरकर, नितेश भोमले, अमजद पठाण, बालू चव्हाण,भूषण जिकार, बंटी मडावी, मंगेश धोटे, शुभम

Bachhukadu/ डाखोरे, सेवक भोयर, किरण तांदळे, अनिकेत भोयर, अविनाश भोंगारे, संदीप जुमडे, तुषार उरकांदे, समिर गुडढे, रितेश इरखेडे, ऋषभ नुकडे, हिमांशू भांबेकर, भोजराज हुलके, मोरेश्वर खोंड, जीवन ठाकरे, सतीश गलांडे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Ajitpawar / शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा?

0

 

 

Ajitpawar:राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं पुन्हा मोठं विधान; म्हणाले.

अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.

Ravikanttupkar / संघटना निर्दालनाच्या नावाखाली सरकारची कारवाई”- रविकांत तुपकर

या निर्णयाचा शेतकऱ्यांसह त्यांच्या नेत्यांकडून केली जाणारी मागणी आणि त्यावरील सरकारची भूमिका यांच्या संदर्भात हे विधान महत्त्वपूर्ण आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारण्याचा सरकारचा कधीही विचार नव्हता,असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Ajitpawar / पवारांनी मोठया आवाजात सांगितले,“लाडकी बहीण योजना बंद होणार की नाही?

त्यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणे, खतांची उपलब्धता आणि पीककर्ज वाटप यांचा आढावा घेतला. राज्यात बी-बियाण्यांचा पुरेसा साठा आहे, मात्र डीएपी खताची काहीशी टंचाई भासत आहे. त्या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे.

Ajitpawar:अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील विविध पक्षांचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात, ही महाराष्ट्राची संस्कृती राहिली आहे, असे ते म्हणाले.

Ravikanttupkar / संघटना निर्दालनाच्या नावाखाली सरकारची कारवाई”- रविकांत तुपकर

0

 

Bachhukadu / शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने अलीकडे ‘महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम 2024’ हे विधेयक विधानसभेत सादर केले आहे, ज्यामुळे शहरी नक्षलवादाविरोधात कठोर कारवाई करण्याची योजना आहे. या विधेयकात बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावर जोर दिला आहे, परंतु विरोधी पक्षांचा हा कायदा विरोधकांचे निर्दालन करण्यासाठी आहे, अशी टीका आहे.bachhukadu

शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरून सरकारला विरोधकांकडून तीव्र विरोध होत आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून या कायद्याचा विरोध करताना म्हटले आहे, “अर्बन नक्षलवाद म्हणून सामान्य माणूस जो सरकार विरोधात बोलेल त्यांना हे तीन वर्षांसाठी जेलमध्ये टाकणार. सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.

Msebnews/ महाराष्ट्र विद्युत वितरण कार्यालयावर बसपाचा दणका .…त्वरित कार्यवाही

” या कायद्यात बेकायदेशीर संघटनेच्या सदस्याला अशा संघटनेच्या बैठकांमध्ये किंवा कोणत्याही कृत्यात सहभागी होणाऱ्यास 3 वर्षे कारावास आणि तीन लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे. संघटनेचा सदस्य नसताना संघटनेला कोणत्याही पद्धतीने मदत केल्यास दोन वर्षे शिक्षा आणि दोन लाखांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

 

 

शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरून सरकारच्या कारवाईचा विरोधकांकडून विरोध होत आहे कारण त्यांना असे वाटते की या कायद्याचा वापर विरोधकांचे निर्दालन करण्यासाठी केला जाईल. दुसरीकडे, सरकारचा या कायद्यामागील उद्देश शहरी नक्षलवादाचा बीमोड करणे आहे, मात्र त्याचा विरोधकांच्या थेट बोलण्यावर कसा प्रभाव पडेल याबद्दल चिंता आहे.

शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरून सुरू असलेला वाद हा एक महत्वाचा राजकीय मुद्दा बनला आहे. या कायद्याच्या मागे सरकारच्या कारवाईचा विरोधकांकडून विरोध असला तरीही, शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरून कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे,bacchukadu

असे सरकारचे म्हणणे आहे. या प्रक्रियेत सामान्य नागरिकांचा आवाज दाबला जाणार की का हा कायमचा प्रश्न आहे.

Ajitpawar / पवारांनी मोठया आवाजात सांगितले,“लाडकी बहीण योजना बंद होणार की नाही?

 

विरोधी पक्षांच्या वतीने या कायद्याच्या विरोधात आक्षेप घेतला जात आहे कारण ते म्हणतात की हा कायदा सामान्य माणसाच्या स्वातंत्र्यावर घाला आहे. विरोधकांचा असा आरोप आहे की याचा वापर विरोधकांचे निर्दालन करण्यासाठी केला जाईल.

Ravikanttupkar :शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरून सरकारच्या कठोर कारवाईचा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारला त्याच्या कृती आणि कायद्याच्या परिणामांवरून स्पष्टीकरण द्यावे लागेल. सामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे आणि बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करणे या दोन्ही बाबींचा संतुलन राखावा लागेल