Home Blog Page 33

Msebnews/ महाराष्ट्र विद्युत वितरण कार्यालयावर बसपाचा दणका .…त्वरित कार्यवाही

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- बहुजन समाज पार्टी हिंगणघाट विधानसभा द्वारा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर बसपा नेता प्रलय तेलंग व इंजी. प्रा. नितेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धडक देण्यात आली.

Ajitpawar / पवारांनी मोठया आवाजात सांगितले,“लाडकी बहीण योजना बंद होणार की नाही?

हिंगणघाट तालुक्यातील बेला – वाघोली व अन्य शिवारामध्ये अनेक दिवसां पासून वीज पुरवठा खंडित झालेला आहे. खंडित वीज पुरवठा अभावी शेतकऱ्याना शेतामध्ये ओलीत करण्याकरिता त्रास होत आहे.

त्यामुळे पुर्वी झालेल्या पापसाच्या हजेरीने शेतकऱ्यांनी पेरणी केलेले पीक बियाणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कारण अद्याप पेरणी नंतर चा योग्य पाऊस झाला नाही. विद्युत वितरण विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना अतिशय त्रास देत आहेत.

सदर विषयाची गंभीरता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाच्या द्वारे पाच तासाच्या आत विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला. सदर निवेदन देताना नितेश कांबळे, प्रलय तेलंग,सुदेश जवादे, गणेश बावणे, मोरेश्वर जवादे, प्रदीप हाडके, अँड. मयुर मुन, अशोक कांबळे, सेवक वानखेडे,

Msebnews:मनोज कळसकर, विनायक पाटील, संजय भगत, रवींद्र भगत, प्रकाश नगराळे, सेवक वानखेडे, आवारी पाटील, प्रकाश पाणबुडे, राहुल मून, रामुजी वासेकर, बंडु थूल, भीमराव मुन, सुरेश भगत, अशोक मुन, चंदन थूल, राजकुमार मेश्राम, विजय पाटील, आनंद भगत, हरीश नाईक, विकास कोल्हेकर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंगणघाट चे श्री मुंगले, अर्णव घवघवे, राजवीर पुंड यांना संघात स्थान(hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- ऋषिकेश हरिद्वार मध्ये आयोजित अंडर- २३ राष्ट्रीय 9 ए साईड स्पर्धेत महाराष्ट्र टीम ला दुसरे स्थान प्राप्त झाले आहे. सर्व खेळाडूंनी उत्तम कामगीरी करीत महाराष्ट्र ला स्पर्धेत दुसरे स्थान मिळवून देण्यात योगदान दिले.

Ajitpawar / पवारांनी मोठया आवाजात सांगितले,“लाडकी बहीण योजना बंद होणार की नाही?

या संघामध्ये श्री मुंगले, अर्णव घवघवे, राजवीर पुंड (वर्धा), अनिश मुखर्जी, विर यादव (मुंबई), जिशान शेख (गडचिरोली), दिवेश येळने (भंडारा), अपूर्व अग्रवाल, संतोष बोरकर, हर्ष दमाहे, रिधान जैन, हितेश मेश्राम (गोंदिया) यांचा समावेश होता.

hingnghat:संघाचे कोच कार्तिक तूरकर तर व्यवस्थापक अनिल सहारे होते. खेळाडूंनी या यशासाठी राष्ट्रीय 9 ए साईड महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष श्री विमलेश अग्रवाल, संरक्षक विशाल अग्रवाल, मार्गदर्शक व स्थानिक कोच मंनान सर तसेच हिंगणघाट सी सी टी एफ एम शिक्षक संघटनेला व पालकांना या यशाचे श्रेय दीले.

Ajitpawar / पवारांनी मोठया आवाजात सांगितले,“लाडकी बहीण योजना बंद होणार की नाही?

0

 

पुणे, मंगळवार – सत्तेवर असताना आपण स्वीकारलेल्या कल्याणकारी धोरणांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पारदर्शकता आणि बांधिलकीचे दृढ सन्देश दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २६व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी बालेवाडी येथे गेल्या काही दिवसात उपस्थित असताना, पवारांनी लाडकी बहीण योजना बंद होण्याच्या चर्चेला नकार देत “मी मंत्री असतो तोपर्यंत या योजनेला बंदी नाही” असे स्पष्ट सांगितले. Ladkibahinyojna

पवारांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून सांगितले, “जर मी पैसा सोडत नसतो, तर मग तो माझ्या खिशात जातो का?” असा सूटका सवाल करत त्यांनी विरोधकांच्या आरोपांवर तीव्र टीका केली.Ajitpawar

130 years / १३० वर्षीय आजीबाईचे निधन.नातेवाईकांनी फटाके आणि ढोलताशाच्या गजरात काढली अंत्ययात्रा…

सामाजिक न्याय विभागाला वळवण्याच्या आरोपांना ते निःशंकपणे नाकारत आहेत, कारण यंदा या विभागाला ४१ टक्के जास्त निधी दिला गेला आहे.

त्यांच्या भाषणातील मार्मिक वाक्य, “सर्व गोष्टींचं सोंग करता येते, पण पैशांचं नाही,” हे आर्थिक निर्णयांच्या गंभीरतेवर भर देत आहे.

Ladkibahinyojna:शेतकरी, कामगार, महिला आणि तरुणांसाठी निर्णय घेतले पाहिजेत अशी त्यांची भूमिका आहे.

भाजपसोबत युतीबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या मूल्यांवर चालणारा पक्ष आहे.

बहुमत न मिळाल्यामुळे इतर पक्षांबरोबर सत्ता स्थापन करणे भाग पडले, यामध्ये भाजपसोबतच केंद्रवर्ती नेतेही आहेत. विचारधारेशी कोणतीही तडजोड होणार नाही, असेही ते सांगितले.Ajitpawar

घरकुला संदर्भात हलगर्जी खपवून घेणार नाही – आमदार अमोल जावळे(gharkulyojna)

जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर पवार म्हणाले, “एखाद्या समाजाला निधी द्यायचा असेल, तर आकडेवारी महत्त्वाची असते. त्यामुळे केंद्र सरकारचा हा निर्णय योग्य आहे.”

Ladkibahinyojna :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांना तयारीला सुरुवात करण्याचे आवाहन त्यांनी केले असून यावेळी तरुणांना अधिक संधी देण्याची ग्वाही दिली आहे.

वटपोर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळवण्यासाठी महिलांनी करायचे व्रत..(vatpurnima)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

vatpurnima:वड हा अनेक वर्ष आयुष्य असणारा महा वृक्ष म्हणून ओळखला जातो त्यामुळेच आपण खूप वर्षांपूर्वीचे जुने वडांची झाडे आजही बघत आहोत 200 ते 300 वर्ष जुने वटवृक्ष आजही अस्तित्वात आहेत पूर्वीच्या काळी स्त्रिया तीन दिवसाचे व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून वडांची पूजा करतात एक दिवसीय व्रत करतात वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळवण्यासाठी महिलांनी करायचे व्रत हे व्रत केल्यावर आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळते.

आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती साथीदार मिळतो अशी धारणा आपल्या समाजात मागच्या बऱ्याच काळापासून रूढ आहे हिंद पंचागातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्य साधारण महत्त्व आहे.

130 years / १३० वर्षीय आजीबाईचे निधन.नातेवाईकांनी फटाके आणि ढोलताशाच्या गजरात काढली अंत्ययात्रा…

वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो म्हणूनच त्याला आधारवड म्हणतात वड पूजनामागे काही शास्त्रीय कारणेही सांगितली जातात वडाच्या झाडांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असल्याने स्त्रियांनी या झाडाच्या सानिध्यात राहणे चांगले असते त्यामुळे हे व्रत करणे अतिशय उपयुक्त ठरते याबरोबरच एकमेकींना वाण दिल्याने आपल्याकडून दान केले जाते.

असेही म्हणतात म्हणून या दिवशी सुहासनी आंब्याचे वाण देतात वडाचे झाड ज्याप्रमाणे अनेक वर्षासाठी जगते त्याचप्रमाणे आपला पती ही दीर्घायुष्य व्हावा म्हणून त्याला सुताने बांधून ठेवतात सुहासिनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना तुळशी पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र येतात.

vatpurnima:आणि पुजन करतात वड पौर्णिमेच्या दिवशी येथील महिला सौ कमलबाई आत्माराम सातपुते यांच्या घराजवळील वडांची पूजा करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती …

130 years / १३० वर्षीय आजीबाईचे निधन.नातेवाईकांनी फटाके आणि ढोलताशाच्या गजरात काढली अंत्ययात्रा…

0

 

संग्रामपूर ( अनिल सिंग चव्हाण )ः- प्रत्येक पुरुष महिलांच आयुष्य हे शतआयुषी व्हायाचे परंतु काळ बदलला. अन् शुद्ध पोष्टीक अन्न ,भाजीपाला मिळत नसल्याने सर्वांच आयुष्यमान नवीन पिढीत घटत ६० ते ६५ वर्षावर आले आले आहे.

परंतु संग्रामपूर शहरातील शिखल्लकार समाजातील एका आजीबाईचे वृद्धापकाळाने तब्बल १३० वर्षांनी गुजराथ मध्ये निधन झाले
“गुजराथ राज्यातील हिंमतनगर येथील शिख शिक्कलकर समाजाच्या १३० वय असलेल्या आजीबाई निवर्तल्या, त्यांच्या परलोकी जाण्याचे दुःख सर्व कुटुंबाला झाले.

Ravikanttupkar./तर मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही – रविकांत तुपकर आक्रमक..!

परंतु नातू ,पंतू, पंतूचे मुलं,मुली पाहिलेली आजी पाहिली असल्याने सर्व आनंद उपभोगून इहलोकी जात असलेल्या या आजीबाईंचा इहलोकीची प्रवास म्हणजे राहत्या घरातून निघालेली अंतयात्रा ढोलताशांच्या गजरात आणि फटाके फोडून काढण्यात आली.

विशेषम्हणजे महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असणा-या आदिवासी भागातील तसेच संग्रामपूर शहरात जन्मा पासून गेल्या ३५ वर्षापासून रहिवासी असलेले ” दयालसिंग चव्हाण व व अनिलसिंग चव्हाण चौथी पिढी असलेले यांची आजीबाई ह्यांचे गुजराथ मधील हिम्मतनगर येथील कोयल कौर दादी सरदारसिंग टाक यांचे दि. ८ / जुन /२०२५ रोजी दुपारी वयाच्या १३० व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.

कोयल दादी यांचं मोठं एकत्रित कुटूंब आहे.काही नातवंडे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात आहेत, तर कोयलदादी ह्या आपल्या वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत एक मनमोकळे निर्भीड असे जीवन जगल्या होत्या. तर मृत्यू नंतरही आपल्या कुटुंब परिवाराने आनंदाने जगावे अशी शिकावं त्यांनी दिली होती.

त्यात १३० वर्षे जगलेल्या कोयलदादी यांनी आपल्या मुलांचे लग्न आणि नातवांची,पंतूंची व पंतूच्या मुला- मुलींची देखील शुभ मंगल व इतर कार्ये पाहिली आहेत. त्यामुळे नातू,पंतूना अंगा खांद्यावर खेळविलेल्या कोयलदादी ह्या आनंदाने जीवन जगले असल्याने त्यांची अंत्ययात्रा त्या गेल्याचे दुःख व्यक्त करून न काढता दुःख बाजूला सारून काढण्याचे ठरविले होते. त्यामुळे
त्यांचे निधन झाल्यानंतर हिम्मतनगर येथे त्यांच्या गावी सर्व नातेवाईक आले.

130 वर्षीय कोयलदादी यांची दुसऱ्या दिवशी ९ / जुन रोजी त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोल ताश्यांच्या गजरात निघाली.

130 years :एखाद्या मृत व्यक्तीची अंत्ययात्रा अशा पध्यतीने काढली गेल्याने त्याची चर्चा गुजराथ आणि महाराष्ट्र राज्यात शिख शिक्कलकर समाजात चर्चेला येत आहे”..
अश्या शतआयुषी आजीबाईस भावपूर्ण श्रद्धांजली

Ravikanttupkar./तर मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही – रविकांत तुपकर आक्रमक..!

0

कर्जमुक्ती व पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा शेगावातून एल्गार .!

तुपकरांची बैलगाडीतून शेगावात मिरवणूक..!शेतकऱ्यांनी केले जंगी स्वागत

Ravikanttupkar:सोयाबीन- कापसाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, उसाचाही प्रश्न बिकट आहे., नुकसान भरपाई नाही, पेरणी तोंडावरील परंतु पीककर्ज नाही, कर्जमाफी नाही आज राज्यातील शेतकरी संकटात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एल्गार पुकारला आहे. सरकारने जर शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर येणाऱ्या काळात मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा गंभीर इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी संत नगरी शेगाव येथे बोलताना दिला. शेगाव येथील माहेश्वरी भवन येथे आयोजित एल्गार मेळाव्याला शेतकरी आणि तरुणांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला.Ravikanttupkar

संत नगरी शेगाव येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आज १० मे रोजी एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यापूर्वी रविकांत तुपकर यांनी संत गजानन महाराज मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. यावर्षी पाऊस वेळेवर वेळेवर येऊ द्या, पिके चांगली राहू दे आणि शेतकऱ्यांच्या घरात चांगले उत्पन्न येऊ दे, या सोबतच सोयाबीन आणि कापसाला चांगले दर देण्याची सद्बुद्धी व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची सद्बुद्धी या सरकारला दे अशी प्रार्थना रविकांत तुपकर यांनी संत गजानन महाराजांच्या चरणी केली.

पिंप्री येथे स्वतंत्र पाईपलाईनाची तातडीची गरज; सुवर्णाताई गणेश टापरे यांचा आंदोलनाचा इशारा(sarpanchnews)

पुढे बोलताना शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले की,
मी गेल्या 22 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी संघर्ष करीत आहे, त्याचेच फळ म्हणून या जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांनी मला लोकसभेत अडीच लाख मते दिली. एका अपक्ष उमेदवाराने अडीच लाख मते घ्यावी ही बुलढाण्याच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.
घाटाखालील मतदारांनी मला साथ दिली असती तर आज चित्र वेगळे असते. परंतु या भागातील लोकांना निकालानंतर पश्चाताप झाला. शेतकरी हीच माझी जात आहे आणि शेतकरी हाच माझा धर्म आहे. मी अजून केवळ शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठीच लढत आलो आणि यापुढेही शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाठीच लढत राहील, याची ग्वाही गजाननाच्या साक्षीनं देतो असेही रविकांत तुपकर यावेळी म्हणाले.Ravikanttupkar

ज्यांना निवडून दिलं त्यांनी आजपर्यंत जिल्ह्यासाठी काहीच केलं नाही. आरोग्य मंत्री आहेत परंतु जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न मोठा आहे. केस गळती, नख गळतीबाबत अजूनही संशोधन झालं नाही. ते केंद्रीय मंत्रीचं काय पंतप्रधान जरी झाले तरी या जिल्ह्याचा जे काही भलं करू शकत नाही असा टोला देखील यावेळी रविकांत तुपकर यांनी लगावला. ते म्हणतात मी मोदींच्या जवळ आहे जर ते मोदींच्या एवढे जवळ आहेत तर मग पिकविमा बद्दल, सोयाबीन कापूस भावाबद्दल शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल एक शब्द इथे का बोलत नाही असा सवालही यावेळी रविकांत तुपकर यांनी केला.

आधार फाउंडेशनच्या महिलांनी परंपरा व पर्यावरण यांची सांगड घालत वटवृक्ष लावून साजरी केली वटसावित्री.(vat purnima )

पिकविम्याचा प्रश्न सुरुवातीपासूनच आपण लावून धरला. विविध आंदोलन केली त्यामुळेच 2023 चा पाचशे कोटीचा आणि 2024 चा साडेसहाशे कोटींचा पिक विमा आपल्या जिल्ह्याला मंजूर झाला. राज्यात सर्वाधिक पिक विमा आजपर्यंत बुलढाणा जिल्ह्यालाच मिळाला हे आपल्या आंदोलनाचे यश आहे हे देखील त्यांनी ठणकावून सांगितले.
कर्जमाफी, पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी मी गेल्या महिन्याभरापासून राज्यभर दौरे सुरू केले आहेत. नाशिक, निफाड, सिन्नर, संगमनेर, अहिल्यानगर, शिक्रापूर, शिरूर,कर्जत, जामखेड, पंढरपूर, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर, बीड, नागपूर, अमरावती, आदि जिल्ह्यांमध्ये 27 मे रोजी सिंदखेडराजा येथे एल्गार मेळावा घेतला आणि त्यानंतर आज संत नगरीत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे असे देखील यावेळी तुपकर म्हणाले.

निवडणुकीपूर्वी सरकारने कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही. मात्र आता सरकारने शब्द पाळला नाही त्यामुळे शेतकरी थकबाकीदार झाले आहेत दुसरीकडे बँकांनी वसुली साठी तगादा लावला आहे. बँका नव्याने कर्ज देत नाहीत. वास्तविक कर्जमुक्ती करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे आता सरकारने शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ केले पाहिजे. ज्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने पिक विमा मिळाला पाहिजे, सोयाबीनला कापसाला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव फरक दिला पाहिजे,जंगली जानवरांमुळे पिकांचे 50% नुकसान होते त्यामुळे जनावरांचा बंदोबस्त केला पाहिजे, शेतमजुरांना विमा संरक्षण दिले पाहिजे, जिगाव प्रकल्पग्रस्तांना वाढीव दराने मोबदला मिळाला पाहिजे यासाठी आपण आता लढा तीव्र करायचा आहे. ही वेळ सरकारची आरती करायची वेळ नसून हातात रूम्हणे घ्यायची वेळ आहे.

राज्यभरातील शेतकरी आता एकत्रित येत असून आपल्याला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. सरकारने वेळेच आपल्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर येणाऱ्या काळात मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा ईशारा देखील यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत त्यावेळी या सरकारला कर्जमाफीची जाणीव करून देणे आवश्यक आहे.

जो कर्जमाफी की बात करेगा.. वही स्थानिक स्वराज्य संस्था मे राज करेगा, असा नारा आता गावोगावी देण्याची वेळ आली आहे. आपल्या न्याय हक्कासाठी मोठा संघर्ष करण्याची तयारी ठेवा असे आवाहन देखील यावे रविकांत तुपकर यांनी केले. यापूर्वी कार्यकर्त्यांनी रविकांत तूपकरांची सजवलेल्या बैलगाड्यातून जंगी मिरवणूक काढून त्यांचे स्वागत केले. या मेळावाला शेतकऱ्यांची गर्दी पहावयास मिळाली.

तुपकर झाले धुरकरी… बैलगाडीतून शेतकऱ्यांनी काढली मिरवणूक

एल्गार मेळाव्यासाठी शेगावात दाखल झालेल्या रविकांत तुपकरांची परिसरातील शेतकऱ्यांनी सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणुक कढत जंगी स्वागत केले. यावेळी शेगाव शहरातील अनेक व्यापारी स्वागतासाठी रस्त्यावर होते. रविकांत तुपकरांनी स्वतः बैलगाडी चालवत, धुरकरी होत बैलगाडीच्या रथाचे सारथ्य केले व बैलगाडी चालवतच ते सभाथळी पोहचले.

Ravikanttupkar :यावेळी ज्येष्ठ नेते वासूदेव उन्हाळे, आर. बी. देशमुख, राजू शेळके, संतोष खेर्डे, विलासराव पाटील, भवगन मोरे, गजानन देशमुख, सदाशिव जाधव, ज्ञानदेव कराळे, अमोल राऊत, अनंता मानकर, अक्षय पाटील, वैभव जाणे, मासूम शहा, आनंदा आटोळे, उमेशसिंग राजपुत, नाना खटके, प्रकाश पाटील, युनूस भाई, कु. वैष्णवी भारंबे, दीपक देशमुख, सचिन शिंगोटे, भागवत धोरण, अनंता शेळके, निलेश गवळी, वैभव माळी, सेख अस्लम, सुनील अस्वार, श्रीकृष्ण मसुरकर, भास्कर तांदळे, अवी बोरसे, नंदू गावंडे , सोपान खंडारे यांच्या सह हजारो शेतकरी उपस्थित होते.

पिंप्री येथे स्वतंत्र पाईपलाईनाची तातडीची गरज; सुवर्णाताई गणेश टापरे यांचा आंदोलनाचा इशारा(sarpanchnews)

0

 

sarpanchnews:जळगाव जामोद येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आज लोकनिकत्तआदर्श सरपंच सौ सुवर्णाताई गणेश टापरे यांनी स्मरणपत्र दिले.

या निमित्ताने, पिंप्री येथे स्वतंत्र पाईपलाईन तात्काळ सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ही मागणी नेटाने अमलात आणली नसल्यास, गावातील नागरिकांना आंदोलन करावे लागेल, याचा इशारा सौ सुवर्णाताई यांनी दिला आहे.

आधार फाउंडेशनच्या महिलांनी परंपरा व पर्यावरण यांची सांगड घालत वटवृक्ष लावून साजरी केली वटसावित्री.(vat purnima )

या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य आणि महिला मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पिंप्री येथे स्वतंत्र पाईपलाईनाची गरज स्पष्ट करण्यासाठी सुवर्णाताई गणेश टापरे यांनी अनेक निवेदने दिली आहेत.

या पाईपलाईनाच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचप्रमाणे झोपडपट्टी टेकड आणि नाल्यावरील मोरया निर्मितीसाठी आणि टेकड आणि पिप्री काथरगाव येथे वाढीव इलेक्ट्रिकल पोल मिळण्यासाठीही स्मरणपत्र देण्यात आले आहे.

sarpanchnews:या कामाची अंमलबजावणी शुक्रवारपर्यंत न झाल्यास महावितरण कंपनीवरही आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आधार फाउंडेशनच्या महिलांनी परंपरा व पर्यावरण यांची सांगड घालत वटवृक्ष लावून साजरी केली वटसावित्री.(vat purnima )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट;- आधार फाउंडेशनच्या महिला मंचा द्वारे स्थानिक उदय गृहनिर्माण सोसायटीतील हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये वटसावित्रीच्या पूजनाची पारंपरिक पद्धत जोपासत वटसावित्री चे पूजन म्हणजे वटवृक्ष लावणे ही काळाची गरज ओळखून खऱ्या अर्थाने वटसावित्री चा सण साजरा केला.

पर्यावरणाच्या दृष्ठीने अतिशय महत्त्वाचा सदापर्णी बहुवार्षिक वृक्ष म्हणजे वटवृक्ष होय. परंपरा आणि पर्यावरण याची योग्य सांगड घालून वटवृक्ष रोपण व त्याचे संवर्धनाचे कार्य आधार फाउंडेशनच्या महिलांनी हाती घेतला गेल्या नऊ वर्षापासुन हिंगणघाट शहर व परिसरात आधार फाऊंडेशन द्वारे विविध समाजपयोगी व मानवी कल्याणकारी उपक्रमाचे आयोजन केल्या जाते.

वकाना गावाच्या रस्त्यासाठी विजय वानखेडे ची लक्षवेधी भूमिका(pwdnews)

हा महाकाय वटवृक्ष शांत, थंड व सर्वाधिक प्राणवायू देणारा असून त्याची साल, मुळे व फळे अतिशय गुणकारी समजल्या जात असल्यामुळे शहरांमध्ये विविध ठिकाणी रोपणासाठी वटवृक्षाचे वृक्षारोपण समुद्रपुर नगरपंचायतिचे मुख्य कार्यकारी अधिकारी पौर्णिमा गावित,लोकमान्य हायस्कूल दारोडा शाळेच्या मुख्याध्यापिका उषा घोडमारे,आधार फाउंडेशनच्या कार्यकारी अध्यक्षा माधुरी विहिरकर,स्वाती अतुल वांदिले यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा गावित यांनी वृक्षारोपण हि काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती धार्मिक यांनी केले तर आभार प्रदर्शन शिल्पा हिंगणे यांनी केले.

vat purnima ):या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वैशाली लांजेवार,जयश्री काचोळे,निता गजबे,सविता येनोरकर,शितल देशकरी, अर्चना नांदूरकर,जयश्री पिसे, वैशाली निनावे, ज्योती हेमने, पौर्णिमा कावडकर,निर्मला बोकडे, चंद्रकला कलोडे,कविता हवाईकर, मिना सोनटक्के, विद्या गिरी, अर्चना दुरबुडे, सिमा तिवारी,दिपाली रंगारी, कल्पना उईके, जयश्री पिसे,वैशाली हेडावू,चित्रा नवघरे, शोभा भोयर, प्रिया डाखरे, इंदू देशमुख,संगीता चंदनखेडे, गौरी येनूरकर, कुसुम वंजारी, सरस्वती खंडाईट, विद्या डहाके, सुषमा डहाके, अनुसया खंडाईट,आचल वकील तसेच आधार फाऊंडेशच्या सदस्यानी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

वकाना गावाच्या रस्त्यासाठी विजय वानखेडे ची लक्षवेधी भूमिका(pwdnews)

0

 

गावाच्या रस्त्यासाठी विजय भाईंचा जोरदार लढा

pwdnews:वकाना गावाच्या रस्त्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष, विजय भाई वानखेडे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा प्रभाव केवळ गावापुरता नाही तर सर्व उपेक्षित गावांसाठी आहे.

पावसाळा,पूर, साठवणुकीसाठी अडचणी लक्षात घेता, ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या पावसाळा अन्नधान्याचे वितरण(rainupadate)

हे आंदोलन गावातील शेतकरी, मजूर आणि नागरिकांना रस्त्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी प्रेरित करत आहे.

वर्षानुवर्षे विलंबाने जिल्हा परिषद आणि पीडब्ल्यूडीला या रस्त्यासाठी मागणी केली गेली आहे, परंतु त्याला मंजुरी नाही. विजय भाईंनी झाडावर बसून, उपोषणाच्या माध्यमातून गावातील प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी एक लक्षवेधी मार्ग निवडला आहे.

हे आंदोलन केवळ रस्त्यासाठीच नाही तर गावाच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आहे.

pwdnews:विजय भाईंनी ऑल इंडिया पँथर सेना मार्फत गावकऱ्यांच्या व्यथा जगासमोर मांडल्या आहेत. या संघटनेची भूमिका आता केवळ दलित अत्याचारांविरुद्ध न लढता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून ते मूलभूत सुविधांपर्यंत विस्तारलेली आहे. हे प्रयत्न गावाच्या विकासाचा पाया घातला आहे.

पावसाळा,पूर, साठवणुकीसाठी अडचणी लक्षात घेता, ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या पावसाळा अन्नधान्याचे वितरण(rainupadate)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :-आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे कार्यक्षम लॉजिस्टिक्स आणि साठवणुकीसाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी NFSA अंतर्गत ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या अन्नधान्याची आगाऊ उचल दिनांक ३१ मे, २०२५ रोजी पर्यंत व वाटप दि. ३० जून, २०२५ रोजीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानूसार कार्यवाही करण्याबाबत शासनाचे संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.२. NFSA अंतर्गत करण्यात येणाऱ्या ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या अन्नधान्याची आगाऊ उचल व वाटप यासंदर्भात आढावा घेण्यासाठी शासनाकडून तसेच भारतीय अन्न महामंडळाकडून कार्यालयांना वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, यासंदर्भात शासनामार्फत दि. ०९.०५.२०२५ व दि. १४.०५.२०२५ रोजी व भारतीय अन्न महामंडळाकडून दि. २१ मे, २०२५ रोजी व्हिडिओ कॉन्फरंसद्वारे बैठक आयोजित करुन आढावा घेण्यात आला.

Crimenews/दुकान फोडणारे अट्टल चोरटे हिंगणघाट पोलीसाचे जाळयात

तथापि, जिल्ह्यांकडून करण्यात येणारी अन्नधान्याची उचल ही अत्यंत धिम्या गतीने होत असल्याने आजमितीस केलेली उचल ही अत्यल्प आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, माहे ऑगस्ट पर्यंतचे नियतन दि. ३१ मे, २०२५ रोजी पर्यंत उचल करणे आवश्यक आहे. मात्र, अन्नधान्याची उचल विहीत कालावधीत न झाल्यास पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

rainupadate:उपरोक्त प्रयोजनाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे.३. त्यामुळे आपणास सूचित करण्यात येत आहे की, NFSA अंतर्गत करण्यात येणाऱ्या ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या अन्नधान्याची आगाऊ उचल विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. तसेच, पात्र लाभार्थ्यांनी सदर अन्नधान्याची उचल रास्तभाव दुकानामधुन करावी,