Home Blog Page 34

Farmernews/ मनसेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन  शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा (दि. २२ सप्टेंबर) :वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.Farmernews

शंकर पोटफोडे (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धा) यांच्या मार्गदर्शनाखाली व जयंत कातरकर (जिल्हाध्यक्ष, शेतकरी सेना), नितीन अमृतकर (जिल्हा उपाध्यक्ष, मनसे) यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आले.rajthacry

गेल्या काही दिवसांतील अवकाळी पाऊस, हवामानातील अस्थिरता आणि कीडरोगामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी खत, बियाणे, औषधे, मजुरी यावर मोठा खर्च केला; मात्र आज पिकं उभ्या अवस्थेत नासाडीला गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
प्रमुख मागण्या :

1. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.

2. विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

3. पंचनामे लांबवण्याऐवजी तत्काळ पूर्ण करून मदत वितरित करावी.

4. शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी कर्जमाफी व अन्य सवलती द्याव्यात.

Farmernews /या वेळी प्रमुख उपस्थित होते :राजू बोंबले (जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी सेना), धर्मदीप हीवरकर (वर्धा तालुका अध्यक्ष), नितीन परतेकी (तालुका संघटक), पवन तडस (हिंगणघाट तालुका अध्यक्ष), ओम क्षीरसागर (शहर अध्यक्ष), किशोर भुरे, दिवाकर मून, राजू पोकळे, रोहित कल्याणी, मेहेर अळसपुरे, चंद्रशेखर राऊत, राहुल नागोसे, प्रेम नागेश्वर, शंकर वासनिक तसेच मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात उपस्थित होते

Atulvandile /राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात मोहता चौक येथे तीव्र निषेध करीत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार करण्यात आली. ..

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांच्या विरोधात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्षेपार्ह विधानसभा केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट शहरातील मोहता चौक येथे तीव्र निषेध आंदोलन करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
सार्वजनिक आयुष्यात काम करीत असताना विरोधात असलेल्या व्यक्तीचा देखील सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे.Atulvandile

मतभेद हे वैचारीक असले तरी त्यामुळे परस्परांचा अनादर होईल अशी विधाने होऊ नयेत हे तत्व अगदी काही वर्षांपर्यंत काळापर्यंत पाळले जात होते. पण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काही विकृतांना मोकळे रान देऊन आपले राजकीय हेतू साध्य करण्याचा अनिष्ट पायंडा विद्यमान राज्यकर्ते मंडळींनी पाडला ही अतिशय खेदजनक बाब आहे.स्व. राजारामबापू पाटील हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले विकासाभिमुख नेतृत्व होते. Sharadpawar

त्यांचे अकाली निधन झाल्यानंतर जयंतराव पाटील यांनी त्यांचा वारसा समर्थपणे पुढे चालविला आहे. या अशा समर्पित कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या नादान व्यक्तीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठिशी घालत असतील तर ते राज्याची सार्वजनिक संस्कृती पायदळी तुडविण्याचे काम करीत आहेत असे म्हणावे लागेल. अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.असे राष्ट्रवादीचे नेते अतुल वांदिले यांनी मत व्यक्त करीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरुद्ध तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. Sharadpawar

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले,तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे, शहराध्यक्ष बालू वानखेडे,शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, माजी नगरसेवक मोहम्मद रफिक, समाजसेवक सुनिल डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश धोटे,जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, जिल्हा सचिव मिलिंद कोपुलकर, माजी नगरसेवक बालाजी गहलोद,अल्पसंख्याक सेलचे पाशु मिर्झा, मो.अली अजानी, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, कृषी जिल्हाध्यक्ष प्रभाकर रेवतकर,युवक तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे, सुनील भुते,नितीन भुते,हेमंत घोडे, संजय गांभुळे,परम बावणे, सुनिल घोडखांदे,किशोर चांभारे, नदीमभाई,महिला शहर कार्याध्यक्षा सिमा तिवारी, मीना सोनटक्के, दिपाली रंगारी, आचल वकील,समता वाणी , सुलभा मुन, साधना ढवळे, दुर्गा येसंनकर, विनोद मिलमिले, अनिल लांबट,साहेबराव येडे,प्रशांत एकोणकर, बच्चू कलोडे, उमेश नेवारे, गजानन महाकाळकर,जितेंद्र रघाटाटे,बबलू शेख, कुणाल येसबरे, प्रवीण भुते,विपुल थुल, राहुल जाधव, देवा शेंडे, अमित रंगारी, शेखर ठाकरे,रवी गिरसावले, नरेश चिरकुटे,सुभाष सोयाम,राहुल जाधव, छोटू वानखेडे, विपुल वाढई,पंकज भट्ट, मोहम्मद शाहिद, हुकेश ढोकपांडे, दीपक चांगल,पंकज वांदिले,विजय हजारे, पप्पू आष्टीकर, मारोती राऊत, गोलू भुते,भारत बावणे, अमोल भिषेकर,अभय सावरकर, निखिल शेळके, आकाश हुरले, अभिजित साबळे,यश झाडे आदी उपस्थित होते.

Yavalnews/चुंचाळे पिक सरक्षण सोसायटी निवडणूक बिनविरोध. चेअरमन व व्हाईस चेअरमन पदी कोणाची निवड होते याकडे सर्वांचे लक्ष

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील चुंचाळे येथील पिक संरक्षण सोसायटी या संस्थेची सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूकीसाठी मुदतीपर्यंत १३ जागांसाठी तब्बल २९ उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते तर अर्ज छाननीत सर्वच्या सर्व अर्ज वैध देखील ठरले होते.

व एक जागा ही पहील्याच दिवशी बिनविरोध देखिल झाली होती उर्वरित 12 जागांसाठी 29 उमेदवार रिंगणात होते मात्र गावातील संस्थेचा पैसा वाचावा वस्तीचा विकास व्हावा या हेतूने गावातील सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिक व माजी ग्रामपंचायत सदस्य माजी चेअरमन यांनी दि.17 रोजी अर्ज माघारीच्या दिवशी निवडणुकीत अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना बसवून प्रत्येक समाजाला न्याय देऊन निवडणूक बिनविरोध केली.

बिनविरोध निवडून आलेले सदस्य सर्वसाधारण मधून
रवींद्र नामदेव पाटील, दिलीप नेमीदास नेवे, चंद्रकांत तुकडू चौधरी, विनोद लीलाधर पाटील, हिरामण मोतीराम पाटील, कलिंदर नथ्थु तडवी, दत्तू दयाराम कोळी, शेणफडू गोबा पाटील,
त्याचप्रमाणे महिला राखीव मतदारसंघात दोन जागांसाठी चमेलीबाई काशिनाथ पाटील, अनुसया रघुनाथ पाटील,तर इमाव (ओबीसी) राखीव मतदार संघात एका जागेसाठी गणेश ठाकूरदास चौधरी,त्याचप्रमाणे अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदारसंघात जुम्मा हसन तडवी,तर वि.जा भ.ज व विमाप्र राखीव एका जागेसाठी शुभम रवींद्र सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आता मात्र चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

Yavalnews/निवडणूक अधिकारी म्हणून नंदकिशोर मोरे हे काम पाहत आहे माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल राजपूत, रवींद्र पाटील, राजू सोनवणे, दगडू तडवी शेखर तडवी, चुंचाळे वि.का.सो चेअरमन सुनील नेवे व्हाईस चेअरमन इस्माईल तडवी, पीक संरक्षण चे माजी चेअरमन प्रदीप पाटील, बोराळे सरपंच माजी उज्जैनसिंग राजपूत,चुंचाळे तंटामुक्ती अध्यक्ष धनसिंग पाटील,पत्रकार प्रकाश चौधरी

Hingnghatnews /संत निरंकारी मिशन शाखा हिंगणघाट आणि रेल्वे वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :-सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपेने शनिवार, २० सप्टेंबर २०२५ रोजी संत निरंकारी मिशन शाखा हिंगणघाट आणि रेल्वे वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणघाट रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले.

या अभियानात संत निरंकारी मिशन हिंगणघाटची साधसंगत तसेच सेवादलाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी मिळून स्थानक परिसर, प्लॅटफॉर्म आणि आसपासच्या भागांची स्वच्छता करून समाजाप्रती जबाबदारी व सेवा भाव दर्शविला.

या दरम्यान रेल्वे विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते आणि त्यांनी साधसंगत व सेवादलाच्या या सेवा कार्याचे कौतुक केले. मिशनच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की स्वच्छता ही केवळ शासकीय योजना नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, जे एकत्रितपणे पार पाडले पाहिजे.

Hingnghatnews /स्वच्छता अभियानाच्या समारोपावेळी साधसंगतने या सेवेला सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांचे आशीर्वाद मानत आभार व्यक्त केला आणि पुढेही समाजहितासाठी असे कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्याचा संकल्प केला.

Bajarnews/पावसाने उमरगा शहरातील आठवडी बाजाराचा उडवला बोजवारा

 

बातमीदार ऋषिकेश सुरवसे उमरगा

उमरगा प्रतिनिधी -: रविवारी दुपारनंतर उमरगा शहरात धुवाधार पावसाने हजेरी लावली पावसाचा जोर प्रचंड असल्याने रविवारच्या आठवडी बाजाराचा पुरता बोजवारा उडाला. रस्त्यावर चिखल, पाणी साचल्यामुळे बाजारात पालेभाज्या फळे विक्रेत्यांसह व्यापारी, ग्राहकांची पावसामुळे अक्षरशः तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले.

मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यांतच उमरगा शहरात रविवारी मोठा आठवडी बाजारात भरत असतो.

उमरगा तालुक्यातील पंधरा ते पंचवीस गावातील पालेभाज्या, फळे, विक्रेते, व्यापारी, नागरिक खरेदी विक्रीसाठी उमरगा तालुक्याला येत असतात. परंतु याचं रविवारच्या दिवशी दुपारनंतर धुवाधार पावसाने आठवडी बाजारात हजेरी लावली.

Bajarnews/पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, काही क्षणात आठवडी बाजार रस्त्यावर पाणी साचल्यामुळे पसारा आवरता आवरता बाजाकरूंची मोठी तारांबळ उडाल्यामुळे आठवडी बाजाराचा पावसाने पुरता बोजवारा उडाला आहे.

Pikvimanews/ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे

 

आणि तातडीने *सेलू तालुका ओला दुष्काळ जाहीर करा”शेतकरी मित्र परिवाराची मागणी

तहसील कार्यालयात जाऊन मंडल अधिकाऱ्यांना दिले निवेदन

निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात दिलेल्या “संपूर्ण कर्जमाफी” या महत्वाच्या आश्वासनाचा विसर पडलेल्या महायुती सरकारने तत्काळ संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांची पूर्णता सरसकट कर्जमाफी करून आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या या आक्रोशाकडे वेळीच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.farmernews

परंतु शेतकऱ्यांना दिलेला शब्द आणि शासनाची कृती यात प्रचंड तफावत दिसून येत असल्यामुळे शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे. अतिदृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे सोयाबीन पिकावर येल्लो मोजक नावाचा रोग आलेला आहे या रोगामुळे सोयाबीनचे पीक नष्ट झालेले आहे.

Pikvimanews /पावसामुळे आणि रोगामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झालेले आहे कापसावर बुरशी तुरीचे पीक नष्ट झाले आहे शेतकऱ्यांनी पिक विमा काढला परंतु पिक विम्याची रक्कम शेतकऱ्याला मिळेल की नाही या विचारात शेतकरी भ्रमित आहे शेतकऱ्याची आवाज म्हणून शेतकरी मित्र परिवारातर्फे आज तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.

Farmernews/शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शेतकऱ्यांचा शेतात जाऊन झालेल्या पिकाचा नुकसान पंचनामा करून मदत मिळाली पाहिजे याकरिता शेतकरी मित्र परिवाराचे अध्यक्ष रवी भाऊ वाघमारे उपाध्यक्ष रामभाऊ सोनटक्के सचिव रामेश्वर घंगारे स्नेहल कलोडे दत्ताभाऊ कोपरकर अजय कलोडे आशिष सातपुते अनुप वाघमारे संजय तळस धनराज झिलपे नरेंद्र सुरकार गुड्डू शेख इत्यादी शेतकरी उपस्थित होते

Shivshenanews/उबाठा शिवसेनेच्या वतीने उमरगा-लोहारा तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा
—————
बातमीदार ऋषिकेश सुरवसे, उमरगा

उमरगा प्रतिनिधी -: उमरगा-लोहारा तालुका सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, बाधित शेतकऱ्यांना प्रति एकरी ५० हजार रुपये मदत द्यावी, तसेच रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे व खत उपलब्ध करून द्यावे, अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवारी (दि१९) रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उमरगा-लोहारा तालुक्यात सतत झालेल्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्याची आर्थिक अडचण अत्यंत गंभीर झाली असून शेती उत्पादनावर आधारित शेतकऱ्यांचे उपजीविकेवर संकट आले आहे.

तसेच शासनाने यांचा सहानभुतीपूर्वक विचार करून तातडीने ओला दुष्काळ घोषित करून बांधित शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये इतकी मदत जाहीर करण्यात यावे, आणि शेतकऱ्यांच्या पुढील रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे व खत उपलब्ध करून देण्यात यावे. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

अन्यथा मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी सेना उबाठा पक्षाच्या वतीने शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.

Shivshenanews/यावेळी, जिल्हा प्रमुख शेतकरी सेना विजयकुमार नागणे, तालुका अध्यक्ष शेतकरी सेना विजयकुमार तळभोगे, मा.नगराध्यक्ष रझाक आत्तार, उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटील, मा.सभापती रणधीर पवार, जेष्ठ शिवसैनिक महावीर आण्णा कोराळे, तालुका सोशल मीडिया प्रमुख दत्ता शिंदे यांच्यासह डी.के. माने, राजेंद्र समाने, अप्पाराव गायकवाड, संगमेश्वर स्वामी, धीरज बेळमकर, संतोष कलशेट्टी, संतोष जाधव, तानाजी जाधव, पवन त्रिमुखे, आदिनाथ काळे, विजय गायकवाड, अभिषेक स्वामी, आकाश गायकवाड, सगर उमशेट्टी, सदाशिव पाटील, जयराम चव्हाण, बिराजदार श्रीकर, रवी बडोरे, मल्लिकार्जुन बिराजदार, रमेश पवार, आकाश शर्मा, शहाजी गायकवाड, पंडित माशाळे, विशाल गायकवाड, मारुती थोरे, अण्णाराव माने, शिवाजी गायकवाड, सिद्धराम हत्तरगे, निकेश मारेकर, विलास माने, प्रकाश बेळंबे, सदाशिव भातागळीकर, शंभूलिंग स्वामी, हरी मदने आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Hingnghatnews/चाकांवरून स्वप्नांचा प्रवास – शालेय मुलींना रोटरी कडून सायकल भेट

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त रोटरी क्लब हिंगणघाट तर्फे *सायकल बँक प्रकल्पांतर्गत* शाळेतील गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात आले. या उपक्रमात एकूण ५१ सायकली१० शाळांतील मुलींना वाटप करण्यात आल्या.

कार्यक्रम भारत विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार श्री. समीर कुणावार उपस्थित होते. मा. पी.डी.जी. श्री. राजे संग्रामसिंह भोसले तसेच समुद्रपूर येथील उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

समीरभाऊंनी रोटरी क्लबच्या उपक्रमांचे कौतुक करून पुढील वर्षी १०१ सायकली वाटप करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला भारत विद्यालयाचे प्राचार्य हरीश भट्टड विशेष उपस्थित होते. हा उपक्रम प्रोजेक्ट डायरेक्टर्स रोटेरियन डॉ. राजू निखाडे, रोटेरियन मुरली लाहोटी व रोटेरियन मुकुंद मुंधडा यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन रोटेरियन प्रा. जितेंद्र केदार यांनी केले.

Hingnghatnews /सेक्रेटरी रोटेरियन मंजुषा मुळे यांनी सर्व मान्यवरांचे व सदस्यांचे आभार मानले. रोटरी क्लबचे पास्ट प्रेसिडेंट्स दिगंबरजी खांडरे, अशोक बोंगिरवार, अशोक चंदनखेडे, संजय बोथरा, डॉ. राजू निखाडे, मुरली लाहोटी, मुकुंद मुंधडा तसेच रोटेरियन उदय भोकरे, शशांक खांडरे, वैभव पटेलिया, शाकीरखान पठाण, केदार जोगळेकर, पुंडलीकजी बकाने, विवेक तडस, प्रतिभा वांढरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Dharashivnews/बालविकास प्राथमिक विद्यामंदिरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

 

बातमीदार ऋषिकेश सुरवसे

उमरगा प्रतिनिधी -: येथील बालविकास प्राथमिक विद्यामंदिरात (दि.१७)रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजीवकुमार सोनकवडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन पांडुरंग काळे व दिलीप कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

तर ध्वजारोहण शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता कावळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने भाषणे, देशभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती श्रद्धा पुजारी यांनी केले.

Dharashivnews/तर आभार प्रदर्शन मोनिका नदीवाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका अश्विनी भोरे, पल्लवी मुटले, शबाना मुल्ला शिक्षक अक्षय राठोड व आकाश कटकधोंड यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.यावेळी शिक्षक, विद्यार्थी, व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loharanews /अतिवृष्टीच्या सरसकट मदतीसाठी कृषीमंत्री भरणे यांना प्रा सुरेश बिराजदार यांचे निवेदन

उमरगा : धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीच्या निकषाप्रमाणे पंचनामे पुर्ण करुण शेतकऱ्यांना सरसकट अतिवृष्टीची तातडीची मदत देण्यात यावी . या मागणीचे निवेदन कृषिमंत्री ना दत्ता मामा भरणे यांना राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा . सुरेश दाजी बिराजदार यांनी दि.१७ रोजी मुंबई येथे दिले आहे .

देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ऑगस्ट महिन्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील ४२ महसूल मंडळापैकी २२ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे .तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये आज अखेर आठ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे .असे असताना प्रत्यक्षात मात्र धाराशिव जिल्ह्यातील अनेक पर्जन्यमापक यंत्रे नादुरुस्त किंवा खराब झालेली आहेत. यामुळे चुकीच्या पर्जन्याची नोंद होत आहे. व त्यामुळे अनेक महसुल मंडळे अतिवृष्टीतुन वंचीत राहत आहेत. वास्तव परीस्थिती पाहता सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस व नुकसान झालेला आहे.

Loharanews /परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीपेक्षा दीडशे टक्के पेक्षा जास्त पावसाची नोंद असल्यामुळे काढणीस आलेले सोयाबीन,उडीद ,तुर इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे तरी ही बाब विचारात घेऊन यंत्रणेस पंचनामे करण्याचे आदेश व्हावे व धाराशीव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीची सरसकट नुकसान भरपाई मिळावी असे निवेदनात म्हटले आहे .