Home Blog Page 372

ती” दिवसभर फोनवर बोलायची म्हणून पतिनेच काढला काटा” मग शेवटी असी झाली ,पोलखोल’

0

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)

SURYA MARATHI NEWS

उदयपूरमध्ये तीन दिवसांपूर्वी पोलिसांना एका महिलेचा मृतदेह मिळाला होता. व या महिलेच्या हत्येचं गूढ उकलण्यात आता पोलिसांना यश आलं आहे. व त्या पतीनेच आपल्या पत्नीचा काटा काढला आणि नंतर सर्व बनाव रचला. खोटा याआधी देखील त्याने वारंवार पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला होता. परन्तु मात्र तेव्हा ती वाचली होती. व पतीने दारू प्यायल्यानंतर महिलेची हत्या केली. मग काय पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. व पतिनेच सांगीतले की माझी पत्नी दिवसभर फोनवर बोलत असायची त्यामुळे पत्नीच्या चारित्र्यावर मला संशय आल्याने तिची मीच हत्या केल्य़ाचं पोलीस तपासात समोर आलं आहे. व
पोलीस अधिकारी कमलेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान पती दौलत सिंहने आपणच गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. व त्याने सांगितले की, तो पत्नीसोबत घरात आधी दारू प्यायला. मग त्यानंतर दारूच्या नशेत तिच्या डोक्यात काठीने वार करून तिला बेशुद्ध केले. मग त्यानंतर दोरीने गळा आवळून तिची हत्या केली. व यासोबतच त्याने फोन देखील फ्लाइट मोडवरही ठेवला जेणेकरून लोकेशन ट्रेस होऊ शकले नाही. मग अधिकाऱ्यांनी गुरुवारी एका महिलेचा मृतदेह खड्डात पडल्याची माहिती मिळाली होती. गोगुंदा पोलिसांनी कसून तपास केला असता हे हत्या प्रकरण असल्याचं समोर आलं.
मग हेमाच्या चारित्र्यावर होता संशय
हेमा चौहान असं या महिलेचं नाव आहे. पोलिसांनी पतीची चौकशी केली. मात्र ठोस माहिती मिळाली नाही. पोलिसांनी हायवेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मृतदेह मिळाल्याच्या एक दिवस आधी रात्री पती दौलत सिंह कारमधून बाहेर पडत असल्याचं दिसत आहे. पोलिसांनी दौलतला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि त्याने गुन्ह्याचा स्वीकार केला आहे. तपासात समोर आलं आहे की, दौलत सिंह बऱ्याच काळापासून हेमाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. हेमा खूप वेळ फोनवर लोकांशी बोलायची. त्यामुळे पतीचा संशय बळावला.
पतीने आपला गुन्हा केला कबूल
अनेकवेळा दौलतने हेमाला बेदम मारहाणही केली. दौलतने पत्नीची हत्या केल्यानंतर कोणालाही शंका येऊ नये म्हणून पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता पतीने आपला गुन्हा कबूल केला आणि कट कसा रचला याबाबत माहिती दिली. व या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मग त्या नंतर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ही सर्व माहिती एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. Surya marathi news

सुशांतसिंह राजपूच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, कार अपघातात 4 लोकांचा दुर्देवी मृत्यू,

0

 

अनिलसिंग चव्हाण( मुख्य संपादक)

SURYA MARATHI NEWS

मुंबई, येथील  बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. व या बिहारमधील (Bihar) लखीसराय जिल्ह्यात मंगळवारी सकाळी जमुई जिल्ह्यातील खैरा पोलीस स्टेशन हद्दीतील भंडारा गावातील एका कुटुंबातील सहा जणांचा अपघाती मृत्यू झाला.अपघातातील सहा बळींपैकी चार सुशांत सिंग राजपूतचे जवलिक नातेवाईक होते. व या अपघातात सुशांत राजपूतचा भावोजी आणि हरियाणा कॅडरचे आयपीएस अधिकारी ओम प्रकाश सिंग यांचे चार नातेवाईक ठार झाले आहेत. व या ओमप्रकाश सिंह यांच्या बहिणीचा अंत्यसंस्कार केल्यानंतर, सुशांतच्या बहिणीचा पती आणि त्यांची दोन मुले आणि मुलीसह एकूण १० लोक सुमो व्हिक्टामधून प्रवास करत होते. जे अंत्यसंस्कार करून पाटणाहून त्यांच्या घरी परतत होते.

लखीसरायजवळ त्यांच्या कारला अपघात झाला ज्यात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी दोन जणांना जमुईला तर दोन जणांना पाटणा येथे रेफर करण्यात आले आहे. लखीसराय जिल्ह्यातील हलसी पोलीस स्टेशन अंतर्गत शेखपुरा रोड येथील पिपराजवळ ही घटना घडली. जिथे सुमो विक्टा आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात विकटामधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये लालजीत सिंग, नेमानी सिंग, रामचंद्र सिंग, बेबी सिंग, अनिता सिंग आणि प्रीतम सिंग यांचा समावेश आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले लोक हे खैरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून ते सर्व आपापसात नातेवाईक आहेत. तर चालक प्रीतम सिंग हा सोनपे येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. (हे वाचा:Bigg Boss 15: राकेश बापटच्या जाण्याने दुखी शमिताला विशाल देणार दगा; ) जखमींमध्ये बालमुकुंद सिंग आणि दिलखुश सिंग हे चौहानडीह येथील रहिवासी आहेत.

तर इतर दोन जखमींना पाटणा येथे रेफर करण्यात आले आहे. त्यांची नावे बाल्मिकी सिंग आणि टोनू सिंग अशी आहेत. त्यांच्यात बाप-मुलाचं नातेसंबंध होत. व या तसेच ते खैरा क्षेत्र, नवदिहा येथील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाइकांची अवस्था फारच वाईट झाली आहे असून . Surya marathi news

घुग्घुस भाजपातर्फे थोर स्वतंत्रता सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त अभिवादन

0

 

रमेश सुध्दाला
घुग्घुस चंद्रपूर

भगवान बिरसा मुंडा भारतीय स्वातंत्र्याचा आवाज बुलंद करणारे स्वतंत्रता सेनानी – विवेक बोढे यांचे मनोगत

सोमवार 15 नोव्हेंबर रोजी घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात घुग्घुस भाजपातर्फे थोर स्वतंत्रता सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी थोर स्वतंत्रता सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेसमोर द्विप प्रज्वलीत व माल्यार्पण अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मनोगत व्यक्त करतांना भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा दिवस भारतात आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.
भगवान बिरसा मुंडा हे भारतीय स्वतंत्र्याचा खरा आवाज बुलंद करणारे नायक होते त्यांचे भारताच्या स्वतंत्र लढ्यात मोठे कार्य उल्लेखनिय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांचा जयंती दिवस आदिवासी गौरव दिवस म्हणून घोषित केला म्हणून त्यांचे आभार मानतो व भगवान बिरसा मुंडा यांना कोटी कोटी नमन करतो.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे सिनू आडे, सुशील डांगे, प्रयास मंचच्या अध्यक्षा सौ. किरण बोढे, सत्या आगदारी, सुनीता इरवेणी, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, स्वाती गंगाधरे, पायल मांदाडे, प्रिया नागभीडकर, सौरभ सिंग उपस्थित होते.

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग: गुन्हा दाखल

0

 

SURYA MARATHI NEWS

विकी वानखेड़े, यावल

 

यावल तालुक्यातील किनगाव येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. व या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला ताब्यात घेतले आहे.व याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील किनगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आईवडीलांसह राहते. ४ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान संशयित आरोपी योगेश समाधान कोळी रा. किनगाव ता. यावल जि.जळगाव याने अल्पवयीन मुलीच्या मोबाईल क्रमांक मिळून संपर्क केला. व त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता अल्पवयीन मुलगी बसस्थानकाजवळ असतांना योगेश कोळी याने माझ्यासोबत चाल नाहीतर पळवून नेईल अशी धमकी देत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.व याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी योगेश कोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व पुढील तपास पोउनि जितेंद्र खैरनार करीत आहे. Surya marathi news

ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे मानधन थकीत

0

 

शेगाव: बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे मानधन थकीत असून एप्रिल ते नोव्हेंबर या दरम्यान चे मानधन रखडले असल्याने त्यांची दिवाळी अंधारात गेली आहे साधारणतः महिन्याकाठी एका अभियंत्याला पंधरा हजार रुपये पर्यंतचे मानधन सीएससी कंपनी च्या कडून देण्यात येते प्रति घरकुल 750 रुपये याप्रमाणे अभियंत्यांना मानधनाची रक्कम अदा करण्यात येते परंतु एप्रिल ते नोव्हेंबर या दरम्यान चे मानधन ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना देण्यात आलेले नाही संबंधित कंपनीचे अधिकारी बोरकर यांच्याशी अभियंत्यांनी संपर्क साधून मानधनाची मानधनाची मागणी केली असता त्यांना आज उद्या देऊ अशी टोलवाटोलवी केली जाते शेगाव तालुक्यात गजानन करांगळे राहुल भिसे निखिल गायकवाड या तिघांचे मानधन रखडले असून जिल्ह्यात एकूण 30 जणांचे मानधन रखडले असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच त्यांना कुठलाही महागाई भत्ता वगैरे देण्यात येत नसल्याचे त्यांनी सांगितले

माझा सत्कार हा चुंचाळे गावाचा सत्कार आहे कारण मला माझ्या गावानेच घडवले आहे-सैनिक कैलास लोहार. चुंचाळे येथे भारतीय बहुउद्देशीय संघ शाखा अनावरण,कोरोणा योद्धांचा सन्मान व ग्रंथालयाचा शुभारंभाचा कार्येक्रम संम्पन्न.

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

चुंचाळे ता.यावल येथे रविवार दि.१४ रोजी सायंकाळी ४ वाजता
भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाचे शाखा अनावरण.
ग्रंथालयाचा शुभारंभ.
कोरोना योद्धाचा सन्मान
अश्या कार्येक्रमाचे आयोजन भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले होते या कार्येक्रमाचे
उदघाटन कैलास वनलाल लोहार सैनिक चुंचाळे.
महेन्द्र पुंडलीक पाटील सैनिक विरावली यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्येक्रमाला
प्रमुख पाहूणे म्हणून सेवानिवृत्त सैनिक महेंन्द्र पाटील खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष सुनिल बाळकृष्ण नेवे चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील किनगाव इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलचे सचिव मनिष विजयकुमार पाटील वढोदा सरपंच संदीप प्रभाकर सोनवणे युवा सेना तालुका अध्यक्ष प्रविण तुकाराम सोनवणे,शे.युनूस शे.शफी मंन्सुरी संचालक मेष अँग्रो एजंन्सीज साकळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हासरचिटणीस विनोद लिलाधर पाटील डांभुर्णी येथील स्वयंदीप प्रतिष्ठानचे संचालक संदीप निंबाजी पाटील तेजस धनंजय पाटील जिल्हाअध्यक्ष स्टुडंन्स आँलंपिक असोसिएशन जळगाव सौ.निलीमा चंन्द्रकांत नेवे ग्रा.प.सदस्य साकळी किनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्राच्या वैद्यकीय आधीकारी डाँ.मनिषा महाजन साकळी प्राथमिकआरोग्यकेंन्द्राच्या वैद्यकीय आधीकारी
डाँ.स्वाती कवडीवाले सामाजीक कार्येकर्ते मिलींद जंजाळे पत्रकार डी.बी.पाटील,के.बी.खान,सुनिल गावडे इ.उपस्थीत होते कार्येक्रामाच्या सुरूवातीला दिप प्रज्वलन,भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व सैनिक जवान आणी कोरोणा योद्धा यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला यावेळी स्वयंदीप प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संदीप पाटील व किनगाव इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलचे सचिव मनिष पाटील यांनी ग्रंथालयासाठी शैक्षणीक व सामाजीक पुस्तीका मुबलक प्रमाणात देऊ असे सांगत आपले मनोगत व्यक्त केले तर तेजस पाटील यांनी ग्रंथालयाबाबत माहीती दिली तर किनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्राच्या वैद्यकीय आधीकारी डाँ.मनिषा महाजन यांनी आरोग्यसेवेबाबत माहीती देत जास्तीत जास्त लसिकरण होण्यासाठी आरोग्य विभागाला सहकार्ये करण्याचे आवाहन केले तसेच सैनिक कैलास लोहार यांनी सत्कारार्थी मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की माझा झालेला सत्कार हा संपुर्ण गावाचाच सत्कार आहे कारण मला माझ्या गावानेच घडवले आहे तर ग्रंथालय सुरू करण्यासाठी ज्यांनी संघटनेला सुचवले ते कार्येक्रमाचे उदघाटक महेंन्द पाटील (बिएसएफ जवान)विरावली यांनी सैन्यभरतीसाठी गावातुन तरूणांनी तयारी करावी व नियमीत व्यायामासह आभ्यासही करावा व त्यासाठी आपण सर्वोतोपरी मदत करू असे महेंन्द्र पाटील यांनी सांगीतले या कार्येक्रमाचे प्रास्तावीक पत्रकार बाबुलाल पाटीलसर तर सुत्र संचालन व आभार प्रदर्शन महेश पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चौधरी,लतीब तडवी,दिपक नेवे,विक्की वानखेडे यांनी परिश्रम घेतले यावेळी ग्रामस्थांनसह भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

यावल तालुका विधी सेवा प्राधिकरण व यावल तालुका वकील संघातर्फे सुरू करण्यात आलेल्या कायदेविषयक शिबीराची रविवारी १४ नोव्हेम्बर रोजी सकाळी १० वाजता रॅली काढून सांगता करण्यात आली.

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने यावल तालुका विधी सेवा प्राधिकरण व यावल तालुका वकील संघातर्फे २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान कायदेविषयक जनजागृती शिबीर तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी घेण्यात आला. या शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबीराची सांगता म्हणून आज रविवारी १४ नाव्हेंबर रोजी यावल न्यायालय येथून सायकल रॅली व पायी काढून शिबीराची सांगता करण्यात आली.

ही रॅली न्यायालयातून निघून यावल शहरातील प्रमुख मार्गावरील श्रीराम किराणा, बेहडे शॉपी, युसुफ बँड, म्हसोबा मंदिर, महाजन गल्ली, बोरावल गेट, पोस्ट ऑफिस मार्ग, नगरपरिषद या मार्गाने निघालेली रॅली परत न्यायालयात आली. न्यायालयाचे आवारात सदर महोत्सवाचा समारोपाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्या. एम.एस. बनचरे, सहन्यायाधीश व्ही.एस. डामरे, वकील संघाचे तालुकाध्यक्ष अॅड. धीरज चौधरी, सचिव अॅड. एन.पी. मोरे, वकिल संघाचे अॅड .शशिकांत वारूळकर, अजय बढे, हेमंत फेंगडे , विधी विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

घुग्घुस भाजपातर्फे पेट्रोल व डिझेल भाववाढ कमी करण्यासाठी निषेध आंदोलन

0

 

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

शुक्रवार 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता येथील गांधी चौकात घुग्घुस भाजपातर्फे महाराष्ट्र राज्य सरकारने पेट्रोल व डिझेल वरील व्हॅट कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा त्याकरिता भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या पुर्व संध्येला पेट्रोल वरील एक्साईज कर पाच रुपये प्रती लिटर तर डिझेल वरील एक्साईज कर दहा रुपये प्रति लिटर कमी करून जनतेला दिलासा दिला आहे. मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल व डिझेल वरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ही करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे अशी भाजपाची मागणी आहे. राज्यात डिझेल वर २४ टक्के व्हॅट आकारला जातो आणि पेट्रोल वर २५ टक्के व्हॅट आकारला जातो त्या खेरीज पेट्रोल वर प्रती लिटर सेसचा समावेश आहे.राज्य सरकारला पेट्रोल व डिझेल वर करापोटी तिस ते चाळीस रुपये मिळतात.
याप्रसंगी आंदोलनाचे नेतृत्व करणारे वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिझल व पेट्रोलचे दर कमी केले परंतु महाराष्ट्र सरकार आपला व्हॅट कमी करीत नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रात डिझेल व पेट्रोल चे भाव कमी झाले नाही व त्यांनी महाराष्ट्र सरकार विरोधी धोरणाचा तीव्र निषेध केला.
ठाकरे सरकार मुर्दाबाद महाविकास आघाडीचा निषेध असो अशी प्रचंड घोषणाबाजी व नारेबाजी करण्यात आली व घुग्घुस पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.
यावेळी चंद्रपूर भाजपा जिल्हामहामंत्री नामदेव डाहुले माजी जिप सभापती महिला व बालकल्याण सौ. नितुताई चौधरी, रणजित सोयाम जिप सदस्य विजय आग्रे तालुका महामंत्री वाहतूक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विनोद चौधरी, विकास जुमनाके उपसभापती पं. स. चंद्रपूर विनोद खेवले भाजयुमो महामंत्री तालुका चंद्रपूर, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, माजी सरपंच संतोष नुने, उपसरपंच मंगेश राजगडकर, पारस पिंपलकर माजी सरपंच सुभाष पिंपळशेंडे आशिष वाढई भाजपा युवानेते कमलाकर येरमे माजी सरपंच देवाडा, विनोद चाफले, ऋषी कोवे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बोबडे, साजन गोहने प्रकाश अलवलवार सरपंच वेंढली, सुनील राम, संजय भोंगळे, रत्नेश सिंग, सुरेंद्र जोगी,

नक्षलविरोधी कार्रवाईत मिलिंद तेलतुंबड़े सह ठार झालेल्या नक्षलवाद्याची नाव आली. समोर

0

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)

SURYA MARATHI NEWS

गडचिरोली-  येथील नक्षलविरोधी कारवाईत गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. व पोलीस नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेसह ठार झालेल्या 26 नक्षलवाद्यांच्या नावांची यादी समोर आली आहे.

व या कोरची तालुक्यातील मरदिनटोला जंगलात गडचिरोली पोलिसांच्या सी 60 पथकाच्या जवानांनी शनिवारी 13 नोव्हेंबर रोजी हे कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यात तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ठार झालेल्या नक्षलवाद्यांची यादी पुढील प्रमाणे मौजा मनटोला जंगल परिसरात झालेल्या चकमकीदरम्यान मरण पावलेल्या .

नक्षलवाद्यांचे नावे व पद.
1 अडमा पोडयाम – गंगलुर एरीया (छ.ग.) –
2 बंडू ऊर्फ दलसू राजु गोटा – रा. गोरगुट्टा, ता. एटापल्ली, जि. गड. – इनाम 4 लाख रुपये
3 प्रमोद ऊर्फ दलपत लालसाय कचसामी – रा. वडगाव, ता. कोरची, जि. गड. – इनाम 4 लाख रुपये
4 कोसा ऊर्फ मुसाखी – बस्तर एरीया, (छ.ग.) – इनाम 4 लाख रुपये
5 निरो – दक्षिण माड एरीया, (छ.ग.)
6 चेतन पदा – दक्षिण बस्तर (छ.ग.) – इनाम 2 लाख रुपये
7 विमला ऊर्फ ईमला ऊर्फ कमला ऊर्फ मान्सो सुखराम बोगा – रा. गजामेंढी, ता. धानोरा, जि. गडचिरोली – इनाम 4 लाख रुपये
8 किशन ऊर्फ जैमन – रा दरभा एरिया (छ.ग) – इनाम 8 लाख रुपये
9 जिवा ऊर्फ दिपक ऊर्फ मिलींद तेलतुंबके – रा राजुर ता.वणी जि. यवतमाळ, इनाम 50,लाख रुपये
10 महेश उर्फ शिवाजी रावजी गोटा, रा. रेगडीगुट्टा, गडचिरोली, डिव्हीसीएम कसनसुर दलम, एके -47, इनाम 16 लाख रुपये
11 भगतसिंग ऊर्फ प्रदिप ऊर्फ तिलक मानकुर जाडे. रा. खसोडा, गडचिरोली, एसीएम बॉडीगार्ड (मिलींद तेलतुंबडे), इनाम 6 लाख रुपये

12 सन्नू ऊर्फ कोवाची, रा. बस्तर एरीया, छत्तीसगड, कमांडर कसनसुर दलम, एके- 47, इनाम 8 लाख रुपये

13 प्रकाश ऊर्फ साधू सोनू बोगा, रा. संबलपूर, गडचिरोली, पिएम, कंपनी नं 4, एसएलआर, इनाम 4 लाख रुपये
14 लच्छु, रा. बस्तर एरिया, छत्तीसगड, पिएम कंपनी नं.4 बॉडीगार्ड प्रभाकर, 12 बोर, इनाम 4 लाख रुपये
15 नवलुराम ऊर्फ दिलीप हिरुराम तुलावी, रा. गजमेंढी, गडचिरोली, पिपिसीएम कंपनी नं 4, एसएलआर व 9 एमएम पिस्टल, इनाम 4 लाख रुपये
16 लोकेश ऊर्फ मंगू पोड्याम, मडकाम, रा. जागरगुंडा, दंतेवाडा,छत्तीसगड, डिव्हीसीएम व कमांडर कंपनी नं 4, एके -47,9 एमएम पिस्टल व युबीजिएल सेल, इनाम 20 लाख रुपये

ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे
या कारवाईत ठार झालेल्या 26 नक्षलवाद्यांमध्ये चार अनोळखी महिला नक्षल व सहा अनोळखी पुरुष नक्षवाद्यांचा समावेश आहे. कारवाई दरम्यान पोलिसांचे तीन जवान गंभीर जखमी झाले. जखमी पोलीस जवानांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे. आणखी नक्षलींच्या ओळखी पटवण्याचं काम सुरु आहे.

ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे
Milind Teltumbde | ज्याच्या डोक्यावर 1 कोटी 20 लाखाचं इनाम, तो देशातला सर्वात मोठा नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे ठार! झाल्याची माहिती समोर आली. Surya marathi news

वर्धा जिल्हा पालक मंत्र्याच्या व आमदार रणजीत कांबळे यांचा डॉ. आंबेडकर चौकात पुतळा दहन करून निषेध

0

 

हिंगणघाट :- वर्धा जिल्हा पेट्रोल पंप हटाव कृती समितीतर्फे संपूर्ण तहसील ठिकाणी वर्धा येथील पेट्रोल पंप हटलाच पाहिजे या मागणीकरिता येथील डॉक्टर आंबेडकर चौक मध्ये वर्धा जिल्हा पालकमंत्री तसेच आमदार रणजित कांबळे यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला मागील पाच महिन्यापासून वर्धा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला लागून पेट्रोल पंपचे बांधकाम त्वरित थांबून पेट्रोल पंप स्थलांतरित करण्यात यावे या मागणीसाठी मोर्चे धरणे आंदोलन तसेच शासनाला निवेदन देऊन सुद्धा अजून पर्यंत प्रशासनातर्फे व राज्य सरकारतर्फे कुठली हालचाल होत नसल्यामुळे आंबेडकरी जनतेत आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले असून राज्य सरकारने तसेच प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन पुतळ्या लागत पेट्रोल पंप त्वरित स्थलांतरीत करावा नाहीतर यापुढेही यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्‍यात आला यावेळी अनिल जवादे गोरख भगत अनिल मून रसपाल शेंद्रे विक्रांत भगत मनोज वासेकर कुणाल वासेकर अजय डांगरे सुभाष जीवन कर अनुला सोन कुंवर मंगला कांबळे व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा