Home Blog Page 39

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५” अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातून १७ पवित्र स्थळांची माती व जल गौरव रथात समाविष्ट! (Ajitpawar )

0

 

Ajitpawar:बुलढाणा, दि. ३० एप्रिल २०२५ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित “गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५” अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील विविध पवित्र आणि ऐतिहासिक स्थळांमधून माती व जल संकलन करून गौरव रथात समाविष्ट करण्यात आले.

हा महोत्सव पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.खा. प्रफुल्लभाई पटेल साहेब आणि प्रांताध्यक्ष मा.खा. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनातून साकार झाला.

Waqf Research Bill/वक्फ संशोधन बील काळा कायद्या विरोधात मुसलीम समाज बांधवांचे आज रात्री बत्ती गुल आंदोलन

जिल्हाध्यक्ष ऍड. नाझेर काझी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या गौरव रथ यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. संत गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावची माती, बाबासाहेब आंबेडकर यांचे पुण्य पदस्पर्श असलेले परतूडाचे जल व माती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी राणी गुणवंतीबाईंच्या जन्मस्थळ करवंड येथील माती, तसेच संत चोखामेळा, ताराबाई शिंदे, चक्रधर स्वामी यांच्यासह अनेक संतमहात्म्यांच्या स्थळांतील पवित्र माती व जलाचा समावेश या रथात करण्यात आला.

या पवित्र स्थळांमध्ये शेगाव, पातुडा जळगाव मैलगड, करवंड, अमडापूर, बुलढाणा, सैलानीबाबा दर्गा, जाळीचा देव, मढ, चिखली, मेहूणाराजा, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार व सिंदखेडराजा येथील माती व जलाचा समावेश होता.

Ajitpawar:गौरव रथाचे विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत झाले आणि या यात्रेने जिल्ह्याच्या संस्कृती, इतिहास व श्रद्धास्थानांचे महत्व अधोरेखित केले. “गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५” हा उपक्रम आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

Waqf Research Bill/वक्फ संशोधन बील काळा कायद्या विरोधात मुसलीम समाज बांधवांचे आज रात्री बत्ती गुल आंदोलन

0

 

Waqf Research Bill:संग्रामपुर [ प्रतिनिधी ] संपुर्ण भारत भर ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड यांच्या आव्हाला प्रतिसाद देते वक्त संशोधन अधिनियम २०२५ च्या विरुद्ध बतती गुल आंदोलन या शांती पुर्ण विरोध आंदोलनात सहभाग घेण्याचा निर्णण घेतला

असुन त्यांचाच एक भाग म्हणुन मुसलीम पर्सनल लॉ बोर्डचे विदर्भ सचिव मौलवी महेमुद बेग यांच्या अध्यक्षतेखाली तर मौलवी सैय्यद अफसर , मौलवी शेख अनिस मौलवी शेख अफसर , मौलवी शेख ईरफान , मुफ्ती अ रहेमान, मदर्सा , जामा मस्जिद चे सचिव ईरफानोद्दीन काझी आदि मान्यवरांच्या उपस्थितीत जियाउल उलुमच्या सभागृहात बतती गुल आंदोलन संदर्भात नियोजीत बैठक संपन्न झाली.

यावेळी मुसलीम समुदायातील सर्व विविध धार्मिक संघटना तसेच सामाजीक संघटनानी केंन्द्र शासन प्रशासन सत्ताधारी यांचे लक्ष वेधण्यासाठी संपुर्ण तालुक्यात आज दि ३० एप्रिल रोजी रात्री ९ ते ९ :१५ फक्त १५ मिनीट बतती गुल आंदोलनात सहभागी होऊन आपले प्रतिष्ठाने दुकान घर येथील लाईट बंद करुन बतती गुल आंदोलन करणार आहेत बतती गुल आंदोलन दरम्यान वक्फ विधेयक रद्द करा अश्या गगणभेदी घोषणा देत काळा कायद्या रद्दची मागणी केली जाणार.

Bhendwal Ghatmandni / भेंडवळच्या घटमांडणीने लक्ष वेधले: युद्ध, पाऊस आणि राजकीय परिस्थितीचा अंदाज.

यावेळी मौलवी महेमुद बेग यांनी वक्फ संशोधन काळ्या कायद्या मार्गदर्शन करतांना सांगितले कि भारतीय संविधान प्रत्येक भारतीयाला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क देते प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म पाळण्याचा प्रचार करण्याचा अधिकार आहे हा हक्क सार्वजनिक सुव्यवस्था नितिमत्ता व आरोग्य अधिन आहे वक्फ संशोधन विधेयकात ईतर धर्मिय सदस्यांचा समावेश केल्यामुळे मुसलीम समुदायाच्या धार्मिक स्वायत्तेवर परिणाम होऊ शकतो,

तसेच धार्मिक संस्थांना त्यांच्या धार्मिक बाबीचे व्यवस्थापन करण्याचा संपत्तीचा नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देते वक्फ बोर्ड हे मुसलीम धार्मिक संपत्तीचे व्यवस्थापन करतात इतर धार्मिक सदस्यांचा समावेशामुळे या अधिकारात क्षस्तक्षेप हे विधेयक मुसलीम समुदायांच्या धार्मिक स्वायत्ततेवर अंकुश ठेवण्याचा प्रकार तसेच संविधान कलम २९ सांस्कृतिक शैक्षणीक हक्काचे संरक्षण अल्पसंख्याकांना त्यांची संस्कृती जपण्याचा अधिकार देतो वक्फ संपत्ती हि मुसलीम समुदायांच्या सांस्कृतीक व धार्मिक ओळखीचा भाग या मधील बदल काहिना या हक्कावर परिणाम करणारे आहे.

शैक्षणीक संस्था स्थापना व व्यवस्थापन करण्याचा अधिकार देते शैक्षणीक संस्था वक्फ आहेत त्यांच्यावर वक्फ संशोधन काळ्या कायद्यामुळे दुरगामी परिणाम होऊ शकतात उदा . हिंदु मंदिर ट्रस्ट मध्ये गैर सदस्यांना समाविष्ट करण्याची सक्ती नाही मंग वक्फ बोर्डावरच असे का धार्मिक स्वायत्ततेवर परिणाम होतो सदर काळा कायदा संविधानाला कमकुवत करण्याचा प्रयत्न असुन केन्द्र शासनाने शेतकरी विरुद्ध काळा कायदा वापस घेऊन त्याच प्रमाणे वक्फ संशोधन विधेयक वापस घ्यावे जो पर्यत केन्द्र शासन सदर विधेयक परत घेत नाही.

Waqf Research Bill:अथवा रद्द करून वक्फ बोर्डचे अधिकार पुर्वरत बहाल करित नाही तो पर्यत शासन विरुध्द ऑल इंडिया मुसलीम पर्सनल लॉ बोर्डचे आंदोलन सुरूच राहणार आहे अशी घोषणा वजा ईशारा मुसलीम पर्सनल लॉ बोर्डचे विदर्भ सचिव मौलवी महेमुद बेग यांनी शासनाला दिला यावेळी मौलवी शेख अनिस , शेख अफसर , ईरफानोद्दीन काझी यांचे मार्गदर्शपर समायोचित भाषणे झालीत यावेळी छोटे खानी कार्यक्रमाचे संचालन मुफ्ती शोहेब यांनी केले तर आभार मदर्सा जियाउल उलुम अध्यक्ष मौलवी सैय्यद अफसर यांनी केले

Bhendwal Ghatmandni / भेंडवळच्या घटमांडणीने लक्ष वेधले: युद्ध, पाऊस आणि राजकीय परिस्थितीचा अंदाज.

0

 

Bhendwal Ghatmandni / बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीजवळ वसलेल्या भेंडवळ या गावात ३७० वर्षांहून अधिक जुनी घटमांडणीची परंपरा चालते. या परंपरेने आजही त्याचे संस्कृतिक महत्व टिकवून ठेवले आहे.

अक्षय्य तृतीया च्या दिवशी होणारी ही घटमांडणी देशाच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थिती आणि पीक-पाण्याच्या अंदाजांबाबत भाकीत वर्तवित असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्याकडे मोठे लक्ष लागले आहे.(bhendwalbhavishyvani )

Brekingnews/ शेगावमध्ये घरफोडीचा प्रयत्न; एक आरोपी ओळख पटलेला, दुसरा अद्याप फरार

भेंडवळच्या या प्राचीन परंपरेच्या पलीकडे देशातील राजकीय तणावाचे वातावरण आणि जगभरातील बदलांचे परिणाम शेतकऱ्यांच्या मनातील उत्सुकतेला आणखी वाढ देत आहेत.

भेंडवळचे भाकीत हे पारंपारिक पद्धतीने घडते आणि त्यात कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी, या परंपरेच्या पलीकडे शेतकऱ्यांचा विश्वास टिकून आहे.Buldhana bhendwal ghatmandani

अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही अशी भाकिते निव्वळ ठोकताळे असल्याचे म्हणते, तरीही भेंडवळ घटमांडणीला शेतकऱ्यांचा दृढ विश्वास आहे.

Buldhana bhendwal ghatmandani:या वर्षी ही मांडणी अक्षय्य तृतीया च्या दिवशी होणार असून, भविष्यातील युद्धाच्या शक्यतेच्या अंदाजावरही सर्वांचे डोळे ठाकलेले आहेत. सायंकाळी 5:30 वाजता ही घट मांडणी होणार असून, उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी त्याचे भाकीत जाहीर केले जाणार आहे.

भेंडवळची परंपरा: ३७० वर्षांहून अधिक जुनी.
भविष्यवाणी: पीक-पाण्याची स्थिती, राजकीय, आर्थिक परिस्थितीचा अंदाज प्रेक्षकांचा उत्सव देशभरातील शेतकऱ्यांचे, राजकीय नेत्यांचे लक्ष.

आजची घटमांडणी: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडणार.

 

Buldhana bhendwal ghatmandani:या पारंपरिक घटमांडणीच्या पलीकडे तिच्या भविष्यवाणींबाबत वादावादी चालत असला तरी, शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही परंपरा आजही महत्वाची आहे. ३५० वर्षांहून अधिक काळापासून चंद्रभान महाराजांच्या वारसाने ही परंपरा टिकवली आहे

Yavalnews / परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त कोरपावली येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तके वाटप…

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

Yavalnews:तालुक्यातील कोरपावली येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे अवचित्य साधून कोरपावली सरपंच विलास नारायण अडकमोल व गोविंद बहुउद्देशीय संस्था, कोरपावली चे अध्यक्ष श्री. नारायण हिरामण अडकमोल यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांना स्पर्धा परीक्षा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी पुस्तके वाटप करण्यात आली.

सर्वात आधी पुलवामा मध्ये शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर गावातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.

Brekingnews/ शेगावमध्ये घरफोडीचा प्रयत्न; एक आरोपी ओळख पटलेला, दुसरा अद्याप फरार

यावेळी खानदेश आयकॉन पुरस्कृत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश भाऊ फेगडे, जयंती उत्सव समिती अध्यक्ष देविदास तायडे, उपाध्यक्ष दीपक अडकमोल, ग्रामपंचायत सदस्य आरिफ तडवी, जुम्मा तडवी सत्तार तडवी ,अमोल नेहेते ,अफरोज पटेल ,दीपक नेहेते, भीमराव इंधाटे ,

बादल अडकमोल, मनोज अडकमोल, समाधान अडकमोल, विनोद अडकमोल, प्रवीण अडकमोल, भरत चौधरी, दीपक तायडे, सागर तायडे, सचिन भालेराव आदी समाज बांधव तसेच सर्व महिलावर्ग सहभागी होता.

Yavalnews:तरी त्यांच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुस्तक वाटप च्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक करण्यात येत आहे.

Brekingnews/ शेगावमध्ये घरफोडीचा प्रयत्न; एक आरोपी ओळख पटलेला, दुसरा अद्याप फरार

0

 

शेगाव इस्माईल शेख

शेगाव .शहरातील विद्यानगर येथील कलामाई शाळेजवळ घरफोडीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी एका आरोपीची ओळख पटली असून दुसरा आरोपी अद्यापही फरार आहे. ही घटना दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2 ते 3 दरम्यान घडली.

Andolannews/ अन्नत्याग आंदोलनाचा चेंडू आता जिल्हाधिकारी यांच्या दालनात ७ मे रोजी जिल्हाधिकारी सोबत शेतकरी मंडळाच्या बैठकीचे आयोजन

फिर्यादी कमलसिंग किरतसिंग परीहार (वय 32) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख अहेमद शेख समय (वय 36, रा. आरास लेआउट, बुलडाणा) व त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या घरासमोरील दरवाजाचे कुलूप तोडण्याचा तसेच शेजारी राहणाऱ्या देवलाल ढगे यांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडी करण्याचा प्रयत्न केला.

ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर फिर्यादीने शेगाव पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305(A), 331(3), 62 व 3(5) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Brekingnews :या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक निलेश गाडगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.पोलिसांकडून दुसऱ्या अनोळखी आरोपीचा शोध सुरूआहे.शेगावपोलिसांनीनागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Andolannews/ अन्नत्याग आंदोलनाचा चेंडू आता जिल्हाधिकारी यांच्या दालनात ७ मे रोजी जिल्हाधिकारी सोबत शेतकरी मंडळाच्या बैठकीचे आयोजन

0

 

अकोला मूर्तिजापूर विलास सावळे

१ मे रोजी रखरखत्या उन्हात राष्ट्रीय महामार्गावर होणारे शेतकरी आंदोलन प्रशासनाने केलेल्या विनंतीवरून ८ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे व भारतीय किसान संघाचे राहुल राठी , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कैलास साबळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या सहमतीने दिली.
कुरूम, हातगाव, निंबा, जामठी या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीतून वगळण्यात आले आहे.

सोबतच पिक विमा आजपर्यंतही मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून अतिवृष्टीची मदत, पिक विमा ,त्वरित मिळावा याकरता पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांना वेळोवेळी निवेदन देऊन मदतीसाठी प्रयत्न करण्याची विनंती करण्यात आली होती. यावर अनेक दिवस लोटूनही शेतकऱ्यांना आजपर्यंत मदत जाहीर केल्या गेली नसल्यामुळे लोकशाहीने दिलेल्या अस्त्राचा उपयोग करून शेतकऱ्यांनी १ मे रोजी अन्न त्याग आंदोलनाची हाक दिली होती.

Yavalnews / यावल येथे सेवा हक्क दिनानिमित्त बिबटया हल्ल्यात मरण पावलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना आमदारांच्या हस्ते पन्नास लाखाची

आंदोलनाची धग लक्षात घेता तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मंडळांची सभा आज आयोजित केली होती. यावेळी वेगवेगळ्या गावातील ६० शेतकरी प्रतिनिधी हजर होते. या सभेमध्ये पिक विमा, पिकाचे टाकण्यात येत असलेले प्लॉट,पीक पाहणी व कापणी अहवाल त्याची माहिती शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध करणे, न मिळालेली अतिवृष्टीची मदत, यावर सांगोपसांग चर्चा होवून यावेळी अनेक शेतकऱ्यांनी प्रश्नांची मांडणी केली.

शेतकऱ्यांना मदत व्हावी याकरता पीक कापणी अहवाल संबंधीची जून मध्ये कार्य शाळा आयोजन, पीक विम्याचे प्रश्न सोडवण्यासाठी दरमहा सभा, आदि निर्णय घेऊन यावर जातीने लक्ष ठेवण्याचे आश्वासन संदीप अपार यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.या त्यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना प्रश्न सोडवण्यासाठी हक्काचे दालन उपलब्ध होणार आहे.

येत्या ७ मे रोजी अकोला येथील जिल्हाधिकारी यांच्या समवेत होणाऱ्या चर्चेतून सकारात्मक निर्णय न झाल्यास ८ मे पासून राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा निर्धार राजू वानखडे, राहुल राठी , कैलास साबळे व उपस्थित शेतकरी प्रतिनिधींनी जाहीर केला.

Andolannews :या वेळी सुभाष मोरे, छोटू पाटील बोंडे, प्रफुल्ल मालधूरे नंदकिशोर बबानिया, डॉ. संजय उमाळे, पंकज वानखडे, आनंद बांगड, विकी तिवारी,अजय गोरले, प्रीतम देशमुख, अक्षय देशमुख, गणेश भोसले, कमल किशोर जयस्वाल, पुरुषोत्तम धवक, अरुण गावंडे, ज्ञानेश्वर मोरे, प्रदीप भोयर, संदीप मोरे, अनिल राठोड,अरुण बोंडे उपस्थित होते.

Yavalnews / यावल येथे सेवा हक्क दिनानिमित्त बिबटया हल्ल्यात मरण पावलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना आमदारांच्या हस्ते पन्नास लाखाची

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

Yavalnews:तालुक्यातील मागील दोन महीन्यात मनवेल आणी डांमुर्णी या दोन ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन चिमूकल्या बालकांचा बळी गेला होता, या बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रूपयेप्रमाणे ५० लाख रूपयांचे धनादेश चोपडा यावल मतदारसंघाचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले .

यावल येथील पंचायत समितीच्या सभागृहात सेवा हक्क दिना निमित्त आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .

Yavalnews /यावल तहसील कार्यालयात सावळा गोंधळ शिधापत्रीका धारकांची आर्थिक लुट व रेशनिंग धान्याची काळया बाजारात विक्री : आमदार चंद्रकांत सोनवणे झाले संत्पत

या तालुकास्तरिय आढावा बैठकीस यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार , यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ .मंजुश्री गायकवाड ( बोरसे ),पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी विश्र्वनाथ धनके,यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी

जहॉंगीर तडवी यांच्यासह वनविभागाच्या पश्चीम क्षेत्राचे वनपाल विपुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थित मनवेल तालुका यावल येथे दिनांक ६ मार्च रोजी बिबट्याच्या हल्ल्यात केशव बारेला या ७ वर्षीय बालकाला आपला जिव गमवावे लागले होते तर डांभुर्णी तालुका यावल या गाव शिवारात दिनांक १५ एप्रील रोजी मेढपालन करणाऱ्या ठेलारी कुटुंबातील रत्नाबाई या २ वर्षीय लहान चिमकुलीचा बिबट्याने बळी घेतला.

Yavalnews:होता,दरम्यान या मरण पावलेल्या दोघा बालकांच्या कुटुंबास शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत तात्काळ मिळावी याकरीता चोपडा यावल मतदारसंघाचे आमदार प्रा . चंद्रकांत सोनवणे यांनी सातत्याने शासन दरबारी सर्वतोपरीने प्रयत्न करीत त्यांना आर्थिक मदत मिळून दिली .

Yavalnews /यावल तहसील कार्यालयात सावळा गोंधळ शिधापत्रीका धारकांची आर्थिक लुट व रेशनिंग धान्याची काळया बाजारात विक्री : आमदार चंद्रकांत सोनवणे झाले संत्पत

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

Yavalnews:तहसील कार्यालयात दलालांच्या आर्थिक गोंधळामुळे सर्वसामान्याना मोफत मिळणारे रेशनकार्ड मिळवण्यासाठी दोन दोन हजार रुपये घेतले जात असून, स्वस्त धान्य दूकानदार हे वितरणासाठी मिळालेल्या धान्यातुन अर्धापेक्षा अधिक धान्य साठवन करून काळया बाजारात विकत असल्याबाबतच्या तक्रारी असल्याची माहिती आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी यावल येथे सेवा हक्क दिना निमित्ताने संपन्न झालेल्या आढावा बैठकीत दिली .

यावल पंचायत समितीच्या सभागृहात सेवा हक्क दिना निमित्त आयोजित विविध शासकीय विभागाच्या कार्याचा आढावा घेण्यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत अध्यक्षस्थानाहून आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे बोलत होते . यावेळी यावल तहसीलच्या पुरवठा विभागाच्या कार्यपध्दती बाबत स्वस्त धान्य लाभार्थ्याच्या अनेक तक्रारी असल्याची माहीती खुद्द आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी दिली .

Hingnghat / नगर परिषद अंतर्गत विविध विकासकामांचे आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते भूमिपूजन

दरम्यान अनेक श्रीमंतांकडे गरीबांच्या हक्काचे पिवळे कार्ड असुन ते तात्काळ चौकशी करून रद्द करण्यात यावेत तसेच तहसील कार्यालयात शिधापत्रिका मिळवण्यासाठी लाभार्थ्यांकडून दोन दोन हजार रूपयांची होणारी दलालांच्या माध्यमातुन होणारी आर्थिक लुट त्वरीत थांबवावी व स्वस्त धान्य दुकानदाराकडून काळया बाजारात विक्री जाणाऱ्या धान्याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी असे यावल येथे नुकतेच रूजु झालेले तालुका पुरवठा अधिकारी अभिमन्यु चराटे यांना आदेश दिले आहे .

Yavalnews:या आढावा बैठकीस तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ .सौ.मंजुश्री गायकवाड ( बोरसे ), आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आठवडे ,यांच्यासह विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी या आढावा बैठकीस उपस्थित होते .

Hingnghat / नगर परिषद अंतर्गत विविध विकासकामांचे आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते भूमिपूजन

0

 

प्रतिनिधी :- सचिन वाघे

हिंगणघाट :- नगर परिषद अंतर्गत नगरोत्थान व दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत ९कोटी ५० रूपयांचे विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते आज दी. २८/४/२४ ते ०२/०५/२०२५ पर्यंत सुरू राहणार असून यामध्ये शहरातील विविध विकासकामे होणार आहेत.

या भूमिपूजनाच्या पहिल्या टप्प्यात शितला माता मंदिर परिसरातील शासकीय जागेवरील संरक्षण भिंत बांधकाम किंमत ६० लक्ष येथून सुरूवात झाली असून याच जागेवर अग्निशमन दलाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण पार पडले.

Shivsena / शिवसेना ( उबाठा ) गटाचे नगरसेवक बंटी वाघमारे यांचे सह असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हिंगणघाट नगरपालिकेच्या (MC) अग्निशमन दलात (Fire Brigade) आणखी एक नवे वाहन दाखल झाले आहे. आग, अपघात, इमारत कोसळणे अशा घटनांमध्ये तत्काळ मदत पोहचवण्यासाठी सर्व सुविधायुक्त असलेले शीघ्र प्रतिसाद वाहन आपत्कालीन परिस्थितीत (Emergency Situation) मदतीसाठी, नागरिकांना वाचवण्यासाठी या वाहनाचा मोलाचा उपयोग होईल,हिंगणघाट नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बळकटीकरणासाठी आमदार समीर कुणावार यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत होते राज्य शासनाकडून हिंगणघाट नगरपालिका अग्निशमन दलाकरीता अत्याधुनिक सुविधा असलेले अग्निशमन वाहन उपलब्ध झाले आहेत वाहन आवश्यक सर्व साहित्याने सज्ज
आधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहन आपत्कालीन परिस्थितीत त्वरित घटनास्थळी पोहोचण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. वाहनात प्राथमिक उपचार, स्ट्रेचर उपलब्ध आहेत. आगीवर जलद नियंत्रण मिळवण्यासाठी ३०० लिटर पाण्याची व ५० लिटर फोमची क्षमता आहे.

इमारत कोसळल्यास किंवा एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत, अपघातस्थळी मदत कार्यासाठी, बचाव कार्यासाठी आपत्कालीन टूल बॉक्स, लाईफ जॅकेट, वूड कटर आदी साहित्य सामग्री उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत पोहचवण्यासाठी या वाहनाचा उपयोग होईल,

शहराचा विस्तार वाढत असल्याने अग्निशमन सेवा बळकट करण्याची गरज आहे. राज्य शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधल्यावर एक वाहन तत्काळ उपलब्ध केले आहे. सदर वाहन बाजार परिसरात किंवा अत्यंत अरुंद रस्त्यांवर घटनास्थळी पोहोचण्यासाठी उपयुक्त आहे,त्यामुळे अग्निशमन दलात वाहनांची संख्या वाढवण्यासाठी व अग्निशमन केंद्रांची उभारणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

Hingnghat :असे मनोगत आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केले या प्रसंगी त्यांनी वरील मनोगत व्यक्त केले या लोकार्पण सोहळाला माजी नगराध्यक्ष निलेश ठोंबरे, मुख्याधिकारी उरकुडे,शहराध्यक्ष भूषण पिसे, माजी नगरसेवक धनंजय बकाणे, अर्चना कुबडे,देवा कुबडे, अमोल खंदार,भाष्कर शेंडे,दिपक चौधरी,राजू कामडी, अतुल नंदागवळी, अग्निशमन अधिकारी गौरव गाणार , नगर अभियंता जगदीश पटेल,नासरे, इंजिनिअर अली,गिरीश गंडाईत सुनील डोळस वैभव येनगंधलवार नितीन जंगले किशोर समर्थ व अग्निशमन विभागातील कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Shivsena / शिवसेना ( उबाठा ) गटाचे नगरसेवक बंटी वाघमारे यांचे सह असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

0

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :-दि. २७ एप्रिल २०२५
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा व महीला कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.

आज दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी हिंगणघाट शहरातील शिवसेना ( उबाठा ) गटाचे नगरसेवक बंटी वाघमारे यांचे सह असंख्य कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच आमदार समीर कुणावार यांची कार्यशैली पहाता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

bjpnews/ भाजपमध्ये राहुल शिरसोले-संजय इंगळे यांचा जाहीर प्रवेश; जळगाव विधानसभा मतदारसंघातील नेतृत्वावर विश्वास”

सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दि. २७ एप्रिल २०२५ रोजी आमदार समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालय हिंगणघाट येथे करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने बंटी वाघमारे , गजानन फाले, बाळासाहेब भोयर, गणेश अंबुलकर, केशव देवलकर, शालिक सुरपाम, गणेश नांदे, सुभाष दाते, शरद नांदे, विजू आत्राम, सुरज आत्राम, शुभम कोसरे, विठ्ठल बावणे, आकाश आत्राम, प्रकाश टिपले, नारायण अवचट,

महादेव महाजन, अक्षय तितरे , सागर कोल्हे, सचिन सातघरे, अक्षय बाकडे, विकी आतराम , साहिल मन्ने , आकाश साठोणे, शुभम नैताम, मनोज हसतबांधे, विनोद सहस्त्रबुद्धे , विजय बोबडे, अनिकेत खडसे इत्यादी सह असंख्य कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात रीतसर प्रवेश देण्यात आला.. उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

Brekingnews / हिंगणघाट नजीकच्या नांदगाव(बो.)येथील मालगोदामाला आग लागून लाखो रुपयांची सरकी आगीत भस्मसात झाली.

सदर कार्यक्रमाला आमदार समीर कुणावार यांचे सह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे , भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे ,भाजपा विधानसभा प्रमुख संजय डेहणे, डॉ. उमेश तुळसकर, भाजपा जिल्हा सचिव प्रा. किरण वैद्य, भाजपा हिंगणघाट शहर अध्यक्ष भूषण पिसे, हिंगणघाट पंचायत समिती माजी

Shivsena :सभापती शारदा आंबटकर , समुद्रपूर पंचायत समिती माजी सभापती सुरेखा टिपले, ज्येष्ठ कार्यकर्ता वसंतराव पाल गुरुजी, रवी येनोरकर, ज्ञानेश्वर भागवते, माजी नगरसेवक धनंजय बकाने, रवी काटवले, माजी नगरसेवक देवा पडोळे, माजी नगरसेवक बंटी वाघमारे, अमोल खंदार ..
इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.