भगवंत ब्राम्हणवाडे नांदगाव खंडेश्र्वर तालुका प्रतिनिधी
====================
नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील सातरगाव ग्राम विकासा पासुन
कोसो दुर असलेले एकमेव ग्राम
पंचायत म्हणजे सातरगाव गेली दोन वर्षांपासून ऐनवेळी तेथील ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते याना स्वतंत्र दिनाच्या दिवसालाच का? मागाव
लागतो गावाच्या विकासासाठी
न्याय. या भारत . India म्हणून अख्या जगात ओळख असलेल्या भारत म्हणजेच India या देशावर इंग्रजांनी मोजक्या सामाजिक कार्यकर्ते वर
माजी ग्रामपंचायत सदस्य. तथा सामाजिक कार्यकर्ते मा.प्रदिप भाऊ बोरकर यांच्या उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल
वडीलांच्या निधनानंतर साहव्याच दिवशी मुलाचेही झाले दुदैवी निधन उंटावद गावात शोककळा
यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
तालुक्यातील उंटावद येथील रहीवाशी तसेच उंटावद ग्रामपंचायतचे माजी सदस्य व दुध डेअरीचे विद्यमान संचालक सुधाकर उत्तमराव पाटील(वय ५४ वर्षे) यांचे शुक्रवार दि.२ एप्रील रोजी दुपारी १२ वाजता दिर्घ आजाराने निधन झाले विशेष म्हणजे सहा दिवसापुर्वीच दि.२८ मार्च रोजी रात्री १०:३० वा.त्यांचे वडील उत्तमराव नारायण पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते ते ८७ वर्षांचे होते वडीलांचे निधन झाल्यानंतर अवघ्या ६ दिवसांनी मुलाचे निधन झाल्याने पाटील परिवारासह उंटावद गावावर दुःखाचा डोगंर कोसळला आहे शेवटी नियतीचा खेळच अजब आहे व तो सर्वांना मान्य करावाच लागतो सुधाकर पाटील यांच्या पश्चातआई,दोनभाऊ,पत्नि,दोन मुले व सुन असा परीवार आहे ते गुलाबराव पाटील यांचे बंधू होत.

जळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस सेवा फाउंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सौ . मिनाश्री जावरे यांची निवड
यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
भुसावळ येथील महीला चळवळीतील सामाजीक कार्यकर्ता सौ . मिनाश्री सुनिल जावरे यांची जळगाव जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .कॉंग्रेस ग्रामीण सेवा फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव आनंद यांच्या प्रेरणेने तथा महाराष्ट्र राज्य सेवा फाउंडेशनचे प्रदेश प्रभारी हुसैन अली भाटी तथा प्रदेश अध्यक्ष सुभाषचंद्र गोडसे यांच्या आदेशाने जळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील सत्तार पटेल यांनी सौ .मिनाश्री सुनिल जावरे यांची निवड केली आहे . या निवडीचे काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले असुन , सौ . मिनाश्री जावेर यांना रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकराव चौधरी , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा पंचायत समिती गटनेता शेखर सोपान पाटील , जिल्हा परिषद गटनेते व काँग्रेसचे यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , कॉग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान , पंचायत समिती सदस्या कलीमा सायबु तडवी, व सरफराज सिंकदर तडवी , उमाकांत रामराव पाटील यांच्यासह आदी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभीनंदन केले आहे .
भारत मातेची व देशाची सेवा पूर्ण करून आलेल्या सैनिक चे पातुर्डॉ खुर्द येथे जल्लोषात स्वागत
प स उपसभापती अंबादास
चव्हाण यांनी केला सत्कार
भारत माता व देशाची 24 वर्ष सेवा पूर्ण करून आपल्या जन्मभूमी परत आलेल्या सैनिकांचे पातुरडॉ बु येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले तर या वेळी प स उपसभापती अंबादास चव्हाण यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला
पातुरडॉ खुर्द येथील एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले श्री प्रभूदास अंबादास झाडोकार याना लहान पना पासून देश सेवा करण्याची व मिलीट्रि मध्ये भरती होन्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी अथक प्रयत्न करून अखेर आपल्या जिद्दीला यश प्राप्त दि 22/4/1997 ला मिलीटरी मध्ये भरती झाले असता सतत 24 वर्ष द मराठा रेजिमेंट मधील लिंथ इन फ्रटी मध्ये 24 वर्ष या देशाची व मातेची सेवा करून दि 31 मार्च ला सेवानिवृत्त झाले ते आपल्या जन्मभूमी येणार हे माहिती पडताच गावातील नागरिकांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली होती. पातुरडॉ खुर्द येथील महादेवाच्या मंदिराजवळ सैनिक प्रभूदास झाडोकार यांचे पुष्प वर्षाव करून सार्वजनिक स्वागत करण्यात आले तर प स चे उपसभापती अंबादास चव्हाण,भाजप किसान आघाडी जिल्हा उपाध्यक्ष व माजी प स सभापती सौ तुळसा बाई वाघ व वाघ परिवार यांच्या कडून शाल व श्रीफळ व पेढा खाऊ घालून त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी प स सभापती सौ रत्नप्रभा ताई धर्माळ,ऍड वीरेंद्र झाडोकार,ग्रा प सदस्य राजू झाडोकार, ग्रा सदस्या सौ सुनीता विठ्ठल वाघ,गणेश नांदोकार,दत्ता डिक्कर,राम वाघमारे,वैभव वाघ,शिवानंद झाडोकार,भागवत झाडोकार, आशिष म्हसाळ, नितीन येळणे, गणेश राहाटे, प्रमोद राहाटे,मुरलीधर वाघ,गाजनांन झाडोकार,विलास येणकर, संदीप झाडोकार, या सह गावातील नागरिक उपस्थित होते
देश सेवा मनात असली पाहिजे- सैनिक प्रभूदास झाडोकार
सेवा करण्याची इच्छा मनात असली पाहिजे त्या करीता जरुरी नाही की मिलीटरी मधेच भरती झालो पाहिजे तुम्ही गावात राहून पण देशाची सेवा करु शकता असे सैनिक प्रभूदास झाडोकार यांनी सत्कार करताना या वेळी सांगितले
संगीत परमेश्वराशी नाते जोडणारा रेशीम धागा सिध्दलींग शिवाचार्य महाराज ! साखरखेर्डा नाद ब्रह्म संगीत विद्यालयाचे उद्घाटन !
सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )
संगीत साखरे सारखे गोड असते माणसातली शुध्द शक्ती जागृत करण्यासाठी संगीत काम करते संगीतामध्ये रस आहेसंगीताच्या माध्यमातून नादब्रह्म आहे या व्दारे परमेश्वराशी नाते जोडता येते निरस वातावरणाला रसपूर्ण करण्याचे काम भारतीय संगीताने केले आहे. असे प्रतिपादन पलसिध्द महास्वामी मठाचे मठाधिपती ष ब्र सिध्दलींग शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले.
साखरखेर्डा येथे पलसिध्द महास्वामी मठात आयोजित नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दाऊतसेठ कुरेशी तर प्रमुख पाहुणे म्हणून वेदमूर्ती निळकंठ स्वामी मानवतकर, हदगाव मठाचे सोमनाथ स्वामी, रावसाहेब देशपांडे, अनिकेत सैनिक स्कूलचे चेअरमन अर्जुनराव गवई, उपसरपंच प्रविण पाझडे, संतोष जयस्वाल, विश्वनाथ आप्पा जितकर उपस्थित होते.
यावेळी नादब्रह्म संगीत विद्यालयाचे अध्यक्ष संगीत विशारद प्रा अभय मासोदकर यांनी आपल्या प्रास्ताविकात असे सांगितले कि, नव्या पिढीने संगीत कला आत्मसात करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, ग्रामीण भागात विठूनामाचा गजर घुमतो मात्र भारतीय संगीत कलाकारांची वाणवा असून भावी पिढीला संगिताचे बाळकडू पाजण्यासाठी साखरखेर्ड्याच्या पावन कुशीत नादब्रह्म विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवत असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रा.डॉ. शाम दुतोंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
भारतीय संगीत कलेला तारणारा एक तराणा आहे. महाराष्ट्राला या संगीताची अफाट अशी वैभवशाली परंपरा आहे, याच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये भारतीय संगीत कलेचा सिंहाचा वाटा आहे याच संगीताचा वारसा टिकवून ठेवण्याचं कार्य अनेक महान गायक, वादक, तथा संगीतकार करतात.
हिच परंपरा जपत “एक तरी अंगी असू दे कला नाहीतर काय फुका जन्मला” या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या उक्तीप्रमाणे सांगितीक यशाच्या प्रसन्न वळणावरचा आनंद अनुभवण्यासाठी येथे नादब्रह्म च्या माध्यमातून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तथा सर्व वयोगटातील रसिकांना शास्त्रीय, सुगम, संगीताचे धडे मिळणार आहे यानंतर वेदमूर्ती निळकंठ स्वामी मानवतकर, अर्जुनराव गवई यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश थोरहाते तर आभार प्रदर्शन संतोष गाडेकर यांनी केले. कार्यक्रमाला दीपक गवळी, गणेश खरात, चंचू बेंदाडे, शुभमसिंग ठाकूर, सुनील रिंढे, प्रफुल्ल जडे, बालनाथ कासार, डॉ प्रविण ठोसरे, अनिल कासार, विष्णू गायकवाड, डॉ संदिपकुमार सुरूशे, उमेश गंभीर उपस्थित होते.
सुनील डोंगरे (समाज सेवक) मित्र परिवार तर्फे संत ज्ञानेश्वर वार्ड येथे पाणी टॅकर चे लोकार्पण सोहळा संपन्न.
सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट संत ज्ञानेश्वर वार्ड येथे पाणी समस्या लक्षात घेऊन मा सुनिल डोंगरे (समाज सेवक) संत ज्ञानेश्वर वार्ड येथील जनतेला दिलेला शब्द पाळला व जनतेच्या पाणी समस्या लक्षात घेऊन स्वखर्चाने पाणी टॅकर वार्डासाठी उपलब्ध करून देण्यात आला या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर वार्डातील मोठ्या प्रमाणात जेष्ठ नागरिक युवा वर्ग उपस्थिती होते या प्रसंगी प्रामुख्याने जेष्ठ नागरिक श्री.बापुरावजी नरड,रमेशराव सांबरे साहेब, डेहने साहेब, नानाजी नागमोते, ठावरी सर, भैय्याजी निखाडे,भांडे सर, ठावरी सर, भोयर सर, संजय ठाकरे भाईजी,निलेश चहाकार,रूपेश बुरड, मनोज हरडे सिंदेकर सर, किशोर तडस, राजेंद्र सहारे,अशोकराव तुळनकर, अन्नाजी लढी,सुनिल नरड, किशोर मेघरे,अनिलराव भाईमारे, दंतुजी भोसले, मनोज जीवतोड,साटकर सर, ईत्यादी मोठ्या प्रमाणात वार्डातील नागरिक उपस्थित होते व कार्यक्रम यशस्वी पार पडला व योग्य पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात आले. 🙏
अजय पर्वत मनसे कामगार वर्धा जिल्हाअध्यक्ष यांनी केले मुख्यमंत्र्याला आव्हान
सचिन वाघे वर्धा
मुख्यमंत्री साहेबांनी मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधून Lock Doun बद्दल आणि कडक निर्बंध बद्दल दोन तीन दिवसात निर्णय घेण्याचे इशारा जनतेला कडक शब्दात दिला पण , मुख्यमंत्री साहेब तुम्ही पण एक काम करा अगोदर स्वतःपासून सुरू करा तुम्हाला मिळणारे मानधन बंद करा आणि सर्व मंत्री आमदार खासदार यांचे पण मानधन बंद करून सर्व क्षेत्रातील शासकीय व निमशासकीय प्रशासन जिल्हा अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सॅलरी बंद करून त्यांच्याकडून निस्वार्थ कार्य करून घ्या . जनतेला उदरनिर्वाहाच्या उपाय योजना राबवू नका मग बघा कोरोना साठी कोण लढतोय त्यातच सर्व लपलेला आहे नंतर Lock Doun करा . महाराष्ट्रात जनता कशे थैमान करतात बघा राज्याच्या पदावर गेल्या नंतर बोलणं कुणालाही जमत साहेब, पण गरिबाच्या घरी थोडं वाकून बघा कसे जगतात त.
श्री अजय परबत (मनसे कामगार जिल्हाध्यक्ष व पूर्व विदर्भ कार्यकारणी सदस्य)
अनोळखी इसमाची गळफास लावून आत्महत्या
गोदिया-शैलेश राजनकर
चिचगड,दि.0२ः चिचगड पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वासणी जंगल परिसरात एका अनोळखी इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.मृतकाच्या शरीरावर गडद हिरव्या रंगाच्या स्वेटर घातलेला असून असून हातावर इंग्रजीमध्ये के लिहिलेला आहे.मृतक 20 ते 22 वर्षाचा असावा असा अंदाज आहे. सदर मृतदेह छत्तीसगड भागातील असल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे.सदर प्रकरणाची नोंद चिचगड पोलीस स्टेशनला झाली असून प्रकरणाचा तपास पोलिस स्टेशनचे ठाणेदार अतुल तवाडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय इसकापे करीत आहेत. कुणाला सदर मृतदेहाची ओळख पटल्यास संबंधित फोनवर संपर्क साधावा ०८८८९५८५८४२ असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना च्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता !शहरातील व्यापारी . प्रतिष्ठाने, दुकानदार ,ऑटो , यांची कोरोना चाचणी करण्यासाठी निर्धारित दिलेल्या तारखे मध्ये जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हजर राहण्याचे आवाहन !5 एप्रिल पासून चाचणीला सुरुवात !
सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )
कोरणा च्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता व कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोविड चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी . सिंदखेडराजा तालुक्यातील यंत्रणा सतर्क झाली असून .मुख्याधिकारी नगरपालिका सिंदखेड राजा ‘गट विकास अधिकारी .वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय ‘तालुका आरोग्य अधिकारी तथा तहसीलदार सिंदखेड राजा ‘यांच्यासह यांनी एक पत्रक जारी केले असून ‘शहरातील व्यापारी, प्रतिष्ठाने, दुकानदार ,ऑटोचालक व त्यांच्या कामावरील सर्व कर्मचारी,यांना दिल्या तारखेवर ‘जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन ‘कोरोना चाचणी करून घेण्याचे आव्हान सिंदखेड राजा तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे ‘तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘कोरोना चाचणी करून मिळेल ‘यामध्ये आडगाव राजा प्राथमिक आरोग्य केंद्र ‘ /मलकापूर पांगरा ‘साखरखेर्डा ‘ /किनगाव राजा /या प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश असून सकाळी दहा वाजता निर्धारित वेळेत व्यापाऱ्यांनी हजर राहायचे आहे ‘यामध्ये व्यापारी व दुकानदार वर्ग यांची वर्गवारी तयार केली असून !
१)दिनांक ५एप्रिल पासून ‘सर्व किराणा दुकानदार व कर्मचारी !
२) ६ एप्रिल सर्व कापड दुकानदार व कर्मचारी ‘
3 ) ७एप्रिल .सर्व हॉटेल मिठाईवाले चहा दुकानदार कर्मचारी खानावळ ‘
4 ) ९एप्रिल सर्व फळ ‘भाजीपाला .दूध विक्रेते ‘
5)दिनांक 12 एप्रिल ‘सर्व इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ,हार्डवेअर दुकानदार, कर्मचारी ‘
6 )दिनांक 15 एप्रिल ‘सर्व वाहन विक्री दुरुस्ती ‘दुकानदार कर्मचारी ‘
7)दिनांक 17 एप्रिल ‘सर्व शहरे ऑटोचालक ‘
8)दिनांक 19 एप्रिल ‘सर्व वेल्डिंग वर्कर व भंगारवाले ‘
9 ) दि . २० एप्रिल ‘सर्व इस्तरी वाले दोबी दुकानदार ‘
10 ) दि . 22 एप्रिल ‘केस कीर्तनकार व ब्युटी पार्लर वाले ‘
11 )दिनांक 23 एप्रिल ‘सर्व पान टपरी धारक व पंचर दुकानदार ‘
12 )दिनांक 26 एप्रिल .सर्व देशी दारू विक्रेता ‘वाईन बार ‘वाईन शॉपी बियर शॉपी दुकानदार ‘
13 )दिनांक 27 एप्रिल ‘सर्व ज्वेलर्स व कर्मचारी ‘
14 )दिनांक 28 एप्रिल ‘सर्व फ्लॅट व पाणीपुरवठा कर्मचारी ‘
15 )दिनांक 29 एप्रिल .सर्व फूट वेअर विक्रेता ‘
16 )दिनांक 30 एप्रिल ‘सर्व मेडिकल पॅथॉलॉजी लॅब व सर्व कर्मचारी ।
17 )दिनांक 2 मे ‘सर्व चिकन मटन व अंडी विक्रीते ‘
18 ) दि . 3 मे ‘सर्व जनरल व टेशनरी दुकानदार ‘या सर्वांनी दिलेल्या तारखे मध्ये जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन आपली कोरोना चाचणी करावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्रकुमार साळवे यांनी केले आहे ‘
शिंदी ते साखरखेर्डा रस्त्याच्या कडा भरण्याचे काम सुरू !
सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )
शिंदी ते साखरखेर्डा रस्त्याचे काम पूर्ण झाले असून रस्ता उंच असल्यामुळे खाली गेलेली वाहने वर येताना स्लीप होते ‘त्यामुळे वर वाहने येत असताना अनेक अडचणी निर्माण होतात ‘अनेकदा अपघात सुद्धा झालेले आहेत ।मेरा बुद्रुक येथे स्वयंपाकी साठी जाणाऱ्या मालवाहतूक गाडी चा असाच रस्त्याच्या कडेला स्लिप होऊन गाडी पलटी झाली होती ‘यामध्ये चार महिला गंभीर जखमी झाल्या होत्या ‘याबाबत दैनिक भारत संग्रामने बातमी प्रकाशित केली होती ‘त्यामुळे त्वरित ठेकेदाराने रस्त्याच्या कडा भरण्याचे काम हाती घेतले असून एक ते दोन दिवसांमध्ये मुरमाच्या कडा रस्त्याच्या कडा भरण्याचे काम पूर्ण होईल ।त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल ‘




