Home Blog Page 550

जिथे जातीपातीचा अंत नाही ते राष्ट्र होऊ शकत नाही – – बिग्रेडिअर मा . खा . सुधीर सावंत !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने साखरखेर्डा येथील अनिकेत सैनिक स्कूलमध्ये माजी अर्जुन गवई यांनी दहा क्विंटल अन्नदान वाटप केले !राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जयंती निमित्तानेअनिकेत सैनिक स्कूल मध्ये आज 12 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता अन्न वाटपाचे आयोजन करण्यात आले होते !यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मार्गदर्शक ‘माजी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंतसाखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे ‘कर्नल श्री रानडे ‘माजी सैनिक फेडरेशनची कार्याध्यक्ष कर्नल श्रीअंकुशे ‘माजी सैनिक फेडरेशनचे प्रवक्ते श्री निंबाळकर सर ‘महिला बचत गटाची जिल्हा समन्वयक श्री तायडे साहेब ‘सह नियंत्रण अधिकारी ‘श्री कुंदन सदाशिव ‘माहिमचे अधिकारी .महेश पाटील ‘आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते श्री मुरलीधर गवई ‘शिंदी गावचे सरपंच विनोद खरात .अनिकेत सैनिक स्कूल चे संचालक महादू गवई श्री बनसोड सर .श्री बंगाळे ताई .लोकमतचे पत्रकार अशोक इंगळे दिव्य मराठीचे संतोष गाडेकर ‘बागातदार निवृत्ती खरात ‘कवी रामदास कोरडे पत्रकार सचिन खंडारे आदी उपस्थित होते ‘यावेळी सर्वप्रथम बिग्रेडिअर सुधीर सावंत व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले !यावेळी आपल्या प्रास्ताविक भाषणात मधून अनिकेत सैनिक स्कूल चे सर्वेसर्वा .अर्जुन गवई यांनी आपल्या कार्याचा आढावा सांगितला ‘यानंतर आपल्या समारोपीय भाषणामध्ये बिग्रेडीअर सुधीर सावंत यांनी सांगितले की बाबासाहेबांनी जे संविधान दिले आहेत या मार्गाने आपण चालले पाहिजे राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब . छत्रपती शिवाजी महाराज यांनी कारभार चालवला .तसा कार्यभार चालायला हवा ‘तसेच ज्या देशांमध्ये जातीपातीचा अंत नाही ते राष्ट्र होऊ शकत नाही जात पात हे मिटायला हवे ! व ग्रामीण भागामध्ये अर्जुन गवई यांनी देशसेवेचा जो वसा घेतला आहे त्याला सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले !यानंतर अन्नदान वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी उपस्थित असलेल्या सर्व बांधवांना अन्नदान बिग्रेडिअर सुधीरजी सावंत यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले !कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत सैनिक स्कूल चे सर्वेसर्वा माननीय अर्जुन गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य श्री जाधव यांनी केले !कार्यक्रम यशस्वी ते साठी श्री शिंदे सर श्री पटेल ‘अंभोरे यांनी परिश्रम घेतले यावेळी शिंदी व परिसरातील सर्व माजी सैनिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या !

मोहाडी येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा तालुक्यातील मोहाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे त्यांची जयंती दि १२ जानेवारी ला आज उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण मोहाडीच्या कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर ग्रामसेविका सौ कल्पना बोरुडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे ग्रंथपाल ऋषिकेश रिंढे यांनी राजमाता जिजाऊ आउसाहेब यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या स्वराज्य घडविण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलेल्या अमूल्य कार्याचे वर्णन केले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वाचनालयाचे अध्यक्ष कैलास रिंढे यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच अशोक रिंढे व जिल्हा महासचिव संदीप इंगळे, परमेश्वर रिंढे आदी हजर होते.
छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गावातील मुलांना स्पर्धा परीक्षेविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त स्पर्धा परीक्षेची आयोजन करण्यात आले होते . त्यावेळी 50 विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग नोंदवला होता. 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले . या परीक्षेत एकूण 7 पारितोषिक ठेवण्यात आले होते.
यांमध्ये विवेक इंगळे, सतीश काळे, अजय इंगळे, हर्षल सुखदाने, प्रमोद इंगळे, कु. रोशनी मापारी, कु. साक्षी काळे आदी गुणवंतांना उपस्थितांकडून पारितोषिक वितरण करण्यात आले . यावेळी वाचनालय सचिवा मालता रिंढे ग्रामपंचायत सदस्य जिजाबाई इंगळे, रमेश रिंढे, प्रतीक रिंढे, अशोक रिंढे, तात्या गाडगे सर, संदीप रिंढे व सर्व स्पर्धक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी ग्रंथपाल ऋषिकेश रिंढे यांनी सर्वाचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

अवैध रेती उत्खनन करण्यास बंदी असताना तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध्य रेती वाहतूक,सुरूच. वरीष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष .

0

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात मात्र मोठ्या प्रमाणात अवैध्य रेती वाहतूक सुरू आहे त्यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे ,तसेच नदी नाल्यातील रस्ते खराब होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बैलगाडी नेणे सुद्धा मुश्कील झाले आहे. न्यायालयाने रेती उत्खनावर कठोर निर्बंध लादले आहेत मात्र न्याायालयाने दिलेल्या आदेशाला महसुल विभागा कडून केराची टोपली दाखविली जाते, संग्रामपूर तालुक्यातील टूनकी,काकनवाडा, वरवट बकाल,काटेल कोलद सह अनेक ठिकाणी, मनमानी पद्धतीने रेती उपसल्या जात आहे, यावर फार मोठी कारवाई होताना दिसत नाही, दरवर्षी कोटी रुपयांची रेती तस्करी करणाऱ्या वाहनावर तथा रेती साठा यावर कारवाई करण्यात आली होती ,पण आज मात्र तशी कार्यवाही होताना दिसत नाही,याचे कारण काय तर पाणी कुठी मुरत तर नाही ना? अशी जनते मध्ये चर्चा जोर धरत आहे या कार्यवाहीचाचा आकडा सबंधित प्रशासनाकडून दाखवत स्वतःच्या पाठीवर शाबासकी ची थाप मारून घेण्यात प्रशासन मश्गुल असल्याचे बोलले जात आहे,अनेकदा पर्यावरण प्रेमी व समाज सेवकांनी साठा पकडून व वृत्तपत्र ईले. व सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या प्रसारित करूनही स्थानिक तलाठी मंडळ अधिकारी व प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे, असे नागरिकात चर्चेला उधाण

लिंगा . पांगरी काटे गटग्रामपंचायत साठी एका जागेसाठी तिहेरी लढत ! ६ जणांची अविरोध निवड !

0

 

सिंदखेड राजा (प्रतिनिधी )

साखरखेर्डा येथून जवळच असलेल्या लिंगा -पांगरी काटे गट ग्रामपंचायत साठी सात सदस्य पैकी सहा सदस्यांची अविरोध निवड जवळपास निश्चितच मानला जात असून उर्वरित एका जागेसाठी तिहेरी लढत आहे ‘सात सदस्य निवडून देण्यासाठी अनेक अर्ज दाखल झाले होते परंतु निवडणुकीत होणारा खर्च टाळण्यासाठी आणि गावात शांतता रहावी यासाठी गाव पुढाऱ्यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत अविरोध करण्यावर भर दिला यासाठी ग्राम पंचायत अविरोध व्हावी यासाठी गावातील लोकांनी सुद्धा पाठिंबा दर्शविला ‘यातून प्रतिसाद देत सहा सदस्य विरोध निवडले यामध्ये ‘अंबादास भिवसन काटे ‘नंदा दिनकरराव काटे ‘किरण रवींद्र काटे ‘कांताबाई शालिग्राम वाघमारे ‘शिवाजी लिंबाजी थिगळे ‘आणि लिंगा येथील शरद चेके यांचा समावेश आहे ‘तर दुसरीकडे लिंग येथील अनुसूचित जातीसाठी एका जागेसाठी .अशोक भालेराव . मधुकर भालेराव ‘नितीन भालेराव ‘यांच्या तिरंगी सामना आहे ‘त्यामुळे आता एका जागेसाठी प्रचार आणि जोर धरला असून ‘निवडणुकीनंतर कोण बाजी मारेल हे स्पष्ट होईल !

तहसीलदाराचे दायित्व भटकंती करणाऱ्या अनाथांना दिले मोफत जेवण !

0

 

जळगाव (खान्देश )

असे अनेक कमी लोक असतात डीजे गोरगरिबांना मदत करतात भटकंती करणार्‍या अनंत लोकांना रात्रीच्या वेळी आपल्या पोटासाठी वणवण फिरावे लागते ‘मोजकीच लोक असतात की जे मनाचा उदारपणा दाखवून त्यांना जेवण देतात तसाच उदारपणा जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्याचे तहसीलदार नितीन कुमार देवरे व साखर खेडा येथील तलाठी व जळगाव जिल्ह्यामध्ये तलाठी म्हणून नोकरीला कार्यरत असलेले सुमित गवई यांनी ७ जानेवारीला जळगाव शहरातील गरीब भटकंती लोकांना मोफत अन्न वाटप केले ‘यावेळी त्यांनी जोपासलेल्या सामाजिक दायित्व मुळे अनेकांकडून त्यांचे कौतुक होत आहे . त्यांच्यासोबत चांदसर बु भागांचे तलाठी सुमित गवई वाहनचालक अस्लम भाई उपस्थित होते ‘

साखरखेर्डा येथील बाजार शुक्रवार ऐवजी गुरुवार लाच ‘शुक्रवारी होणार मतदान!

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे !
विदर्भातील तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा येथील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि यासाठीच प्रशासनाने त्याच दिवशी असणारा आठवडी बाजार रद्द करून त्याऐवजी गुरुवार लाच आठवडी बाजार भरणार आहे ।शुक्रवार ला असणारा आठवडी बाजार हा रद्द होणारच अशी शंका भाजीपाला विक्रेते यांनी वर्तवली होती ।त्यामुळे भाजीपाला विक्रेते फळविक्रेते यांना गुरुवारी आपले दुकान मांडावी लागणार आहेत ।साखरखेर्डा हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव आहे या ठिकाणी होणारी निवडणूक ही अतिशय चुरशीची होणार आहे त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला आहे ।साखरखेर्डा हे गाव सर्वात मोठी असल्यामुळे आसपासची 35 ते 40 खेडे या गावची जोडलेली आहेत त्यामुळे अनेक खेड्यापाड्यातील लोकांचा कामानिमित्त रोज साखरखेर्डा येथे येणे-जाणे असते !

टूनकी येथे खुलेआम रेती तस्करी सुरूच कारवाई मात्र शून्य , महसुल विभागाचा साफ दुर्लक्ष

0

 

(सुर्या मराठी न्युज ब्युरो)

अवैध रेती उत्खनन करण्यास बंदी असताना तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध्य वाळू वाहतूक,सुरू,!!
अवैध रेती उत्खनन करण्यास बंदी असताना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात मात्र मोठ्या प्रमाणात अवैध्य वाळू वाहतूक सुरू आहे त्यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे ,न्यायालयाने रेती उत्खणावर कठोर निर्बंध लादले आहेत मात्र न्याालयाने दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखविली जाते, संग्रामपूर तालुक्यातील टूनकी सह अनेक ठिकाणी, मनमानी पद्धतीने रेती उपसा केला जात आहे, यावर फार मोठी कारवाई होताना दिसत नाही, दरवर्षी कोटी रुपयांची रेती तस्करी करणाऱ्या वाहनावर तथा रेती साठा यावर कारवाई करण्यात आली होती परंतु आज मात्र तशी कारवाई होताना दिसत नाही, कारवाईचा आकडा सबंधित प्रशासनाकडून दाखवत स्वतःच्या पाठीवर शाबासकी ची थाप मारून घेण्यात प्रशासन मुषागुल असल्याचे बोलले जात आहे,अनेकदा पर्यावरण प्रेमी व समाज सेवकांनी थाठा वृत्तपत्र मीडिया चे बातम्या प्रसारित करूनही प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे, अशी नागरिकात चर्चा होत आहे,

आमदार पुत्र निरज रायमुलकर यांच्या वाहनाचा जालना जवळ टायर फुटून अपघात ! ४ जण किरकोळ जखमी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मेहकर मतदार संघाचे शिवसेना आमदार तथा पंचायत राज समिती अध्यक्ष संजय रायमुलकर यांचा मुलगा निरज रायमुलकर यांच्या इनोव्हा गाडीचा दि . ९जानेवारीच्या रात्री १२ चे दरम्यान जालना येथे अपघात होऊन मुलासह पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत#शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचा मुलगा निरज संजय रायमुलकर व त्याचे मित्र काल दि.९ ला संभाजीनगरला गेले होते. परत येताना जालना शहरातील कन्हेयानगर ते बीड बायपास रस्त्यावर गाडीचे (क्रमांक MH 28 BK 2777) टायर फूटून तीने रस्त्याच्या खाली ३ते ४ पलटी घेत सरळ झाली. या अपघातात निरज संजय रायमुलकर, वरद ठाकूर, ऋषी पागोरे,प्रतिक इंगळे, व सुनील पंडारे किरकोळ जखमी झाले. निरज रायमुलकर हे स्वतः वाहन चालवत होते.सुदैवाने आ.संजय रायमुलकर काल मेहकर येथे होते. तर एक वर्षापूर्वी याच तारखेला मेहकर जानेफळ रस्त्यावर आ.संजय रायमुलकर यांच्या गाडीचा अपघात होऊन त्यात आ.संजय रायमुलकर यांना दुखापत झाली होती.

निरोड अतिक्रमण धारकांचा नमुना ८अ चा प्रश्नन मार्गी लावणार. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे आश्र्वासन.

0

 

संग्रामपूर : (ता.प्र.) तालुक्यातील निरोड (बाजार) येथिल बंद पडलेल्या बाजाराची शासकीय जागा अतिक्रमण धारकांच्या नावे करण्यात यावी अशी मागणी अनुप देशमुख यांनी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या कडे निवेदनातून केली आहे. निरोड येथिल ५० ते ५५ कुटुंब गेल्या पन्नास वर्षापासून गावालगत बंद असल्याने बाजाराच्या जागेवर गट नंबर २१७ मधे वास्तव्यास आहेत. ह्या रहीवासी असलेल्या नागरिकांना ग्राम पंचायत मार्फत विजेचा, पाणीपुरवठा, लागणा-या ईतर सुविधा मिळत आहे‌त.परंतु या जागेवर वास्तव्य करून राहणा-या लोकांच्या नावे शासनाने घरकुल मंजूर केले पण यांच्या नावाने गाव नमुना ८अ नसल्यामुळे हे सर्व लाभार्थी घरकुल योजने पासून वंचित राहत आहेत. या संदर्भात पाठपुरावा करुण जिल्हा प्रशासन दिरंगाई करत आहे. त्यामुळे अतिक्रमण धारकांच्या नावे गाव नमुना ८अ ग्रामपंचायत दप्तरी नोंद करण्यात यावी याकरीता अनुप देशमुख, दिनेश सुरळकार, यांनी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी हा निरोड वासियांचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्र्वासन पालकमंत्री डॉ शिंगणे यांच्या कडुन देण्यात आले.

मुख्यमंत्री ठाकरे,खा.प्रफुल पटेल आज भंडारा येथे

0

 

गोंदिया शैलेश राजनकर

भंडारा,दि.10 : भंडारा जिल्हा रुग्णालयात १0 नवजात आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून मरण पावल्याची मनाला पिळवटून टाकणारी घटना घडली. या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून, ही समिती शासनाला तीन दिवसांत अहवाल सादर करणार आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीचे नेते व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल हे रविवारी दुपारी १२ वाजता दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पाहणी करणार आहेत. तसेच नवजात बालके गमावलेल्या पालकांचीही ते भेट घेणार आहेत. अतिरिक्त सचिव आशिष सिंग, परिवहनमंत्री अनिल परब आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हेदेखील या दौर्‍यात असणार आहेत.