Home Blog Page 560

भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नालेगाव येथे भागीरथी माई यांचा ३९ वा स्मृतिदिन उत्साहात साजरा

0

 

प्रतिनिधी
ऋषी जुंधारे

विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नालेगाव येथे भागीरथी माई यांचा 39 वा स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत जी गायकवाड सर यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री विकास जगताप सर प्राचार्य संत नारायण गिरी महाराज महाविद्यालय विरगाव व संस्थेचे सचिव श्री.वाल्मीकरावजी सुरासे साहेब यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते भागीरथी माई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री. वाल्मीकरावजी सुरासे साहेब.यांनी केले तदनंतर प्रमुख पाहुणे श्री. विकास जगताप सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर *प्रा.चंद्रकांत गायकवाड सर यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमासाठी श्री. लाखे स्वामी, संस्थेचे संचालक श्री.दत्तात्रय सुरासे
माजी सरपंच राजू मामा सातपुते,मधुकर अण्णा शिंदे,भाऊसाहेब दादा काकडे ,मधुकर त्रिभुवन,बद्रीनाथ साबळे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जयश्री बोर्डे यांनी तर आभार श्रीमती. मनीषा उभेदळ यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक गंगाधर कटारे, निर्मला शिरसाठ, योगेश शिंदे, सागर राजपूत, रोहिदास त्रिभुवन, प्रवीण जाधव, भारत भोपळे गोकुळ पवार तसेच शिक्षकेतर कर्मचारी समाधान सुरासे, सुनील बोडखे, किशोर साळुंके, अमोल त्रिभुवन व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले

 

विजेच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकारी अभियंता शेतकर्याच्या बांधावर…

0

 

स्वाभिमानीचे सरनाईक,राजपुत यांनी केली होती उपाययोजना करण्याची मागणी…

चिखली–तालुक्यातील सोमठाणा येथील विद्युत ट्रान्सफार्मर वारंवार जळत असल्याने विजेच्या समस्या सोडवण्यात याव्यात,अशी मागणी स्वाभिमानी चे विनायक सरनाईक,नितिन राजपुत यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली होती.याची तातडीने दखल घेत कार्यकारी अभियंता माळोदे यांनी विजेच्या समस्या सोडवण्यासाठी दि०१जानेवारी रोजी शेतकर्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे.उपाययोजना करण्याबाबतच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. विजेच्या समस्या सुटणार असल्याने शेतकर्याना दिलासा मिळाला आहे.
सोमठाणा येथील जुने गावठाण १००के व्हि चा ट्रान्सफार्मर चार वेळा बदलण्यात आला परंतु तो नियमीत जळत असल्याचे समोर आल्याने शेतकर्याना शेतात पिकाला पाणी देण्याची समस्या निर्माण झाली होती.एकाच हातावर संपुर्ण लोड असल्याने आता पुन्हा नविन ट्रान्सफार्मर लावला तर तो जळणार असे दिसत असल्याने शेतकर्याच्या समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात यावा,अशी मागणी महावितरण कार्यालयाकडे करण्यात आली होती.या अगोदर उदभवलेल्या समस्या चिखलीचे सहाय्यक अभियंता गायकवाड यांच्या माध्यमातुन सोडवण्यात आल्या होत्या परंतु ट्रान्सफार्मर लावला तर तो पुन्हा जळणार असल्याची भिती शेतकर्याना निर्माण झाल्याने याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना होण्याच्या दृष्टिने शेतकर्यासह स्वाभिमानीचे विनायक सरनाईक,नितिन राजपुत,यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री एन डी माळोदे यांच्याकडे याबाबतची मागणी केली होती.शेतकर्याच्या समस्यांची जान असल्याने कार्यकारी अभियंता माळोदे यांनी सोमठाणा गाव गाठुण सदर ट्रान्सफार्मरची पाहणी केली याबाबत नविन पोल टाकुन लोड डीव्हाइड करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी गावातील समस्या मांडल्या असता मंदिरा जवळील जंगलेला मोडकळीस आलेला पोल व शेतातील वाकलेले पोल वायरींग करण्याच्या सुचना संबंधीत ठेकेदार यांना देण्यात आल्या आहेत.शेतकर्यानी कार्यकारी अभियंता मोळोदे व गायकवाड यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले आहे.यावेळी विनायक सरनाईक,नितिन राजपुत,भारत वाघमारे, महावितरण सहाय्यक अभियंता श्री डी जी गायकवाड,अवचितराव वाघमारे,अविनाश झगरे,छोटु झगरे,सुदर्शन वाघमारे,परमेश्वर झगरे, आंबादास झगरे, अरुण वाघमारे, ज्ञानेश्वर जाधव, भागवत झगरे, विठ्ठल झगरे, गणेश झगरे, प्रभाकर झगरे, विजय परीहार, गोटु वाघमारे यांच्यासह आदिंची उपस्थीती होती.

नागपुरात यशस्वीपणे पार पडली लसीकरणाची ‘ड्राय रन’

0

 

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे मार्गदर्शन : अडचणींची नोंद घेण्याचे निर्देश

नागपूर, ता. २ : कोव्हिड विषाणूंवरील बहुप्रतीक्षित लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार नागपुरात तीन ठिकाणी ‘ड्राय रन’ यशस्वीपणे पार पडली. नागपूर महानगरपालिकेच्या के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत २५ जणांवर ‘ड्राय रन’च्या माध्यमातून लसीकरणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

सकाळी ९ ते ११ या वेळात ही ‘ड्राय रन’ पार पडली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप सेलोकर, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, समन्वयक डॉ. गोवर्धन नवखरे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. साजीद खान, के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ग्रीष्मा अग्रवाल, आर.सी.एच. अधिकारी डॉ. वैशाली मोहकर, धरमपेठ झोनच्या झोनल आरोग्य अधिकारी डॉ. मंगला पुरी, फार्मासिस्ट सौरभ पाचपोर आदी उपस्थित होते.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ‘ड्राय रन’ दरम्यान लसीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. शासनाच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या तयारीत काही त्रुट्या आहेत का, काही अडचणी आहेत का, ओळखपत्रानुसार लसीकरणासाठी नोंदणी करताना काही अडचणी येत आहेत का, याबाबत आरोग्य अधिकारी, कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली. ज्या काही त्रुट्या आहेत त्या दूर करा आणि अडचणी असतील तर त्याची नोंद करा, असे निर्देश दिले.

*कशी पार पडली ‘ड्राय रन’*

शासनाच्या निर्देशानुसार लसीकरणाची ट्रायल अर्थात ड्राय रन घेण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आलेल्या २५ आरोग्य कर्मचाऱ्यांची आजच्या ‘ड्राय रन’ साठी निवड करण्यात आली होती. आरोग्य विभागातर्फे त्यांना त्यासंबधीचे संदेश प्राप्त झाले होते. लसीकरण केंद्रात सर्वात पहिल्या बाकावर संबंधितांनी संदेश दाखवून लसीकरणासाठी बोलविण्यात आल्याचे निश्चित केले. या व्यक्तींचे शरीर तापमान तपासण्यात आले. हात सॅनिटाईज करण्यात आले. त्यांना टोकन नंबर देऊन केंद्रातील प्रतीक्षा कक्षात त्यांना पाठविण्यात आले. प्रतीक्षा कक्षात सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींना बसविण्यात आले. टोकन क्रमांकानुसार संबंधित व्यक्तीला लसीकरण कक्षात पाठविण्यात येत होते. प्रारंभी त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे संबंधित व्यक्ती तोच असल्याची खातरजमा करण्यात आली. ओटीपीच्या आधारे त्यांना लसीकरणासाठी पात्र ठरविण्यात येत होते. यानंतर लसीकरण अधिकाऱ्याकडे त्यांना पाठविण्यात आले. लसीकरण अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला लसीकरणाची माहिती दिली. लस कोणत्या कंपनीची आहे, लसीकरणानंतर काय नियम पाळायचे आहेत, पुढील लस घेण्याकरिता किती दिवसांनी यावे लागेल, लसीकरणानंतर अर्धा तास निगराणीखाली थांबायचे, त्यानंतर घरी गेल्यावर काही अडचण आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांना अथवा १०८ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती देण्यास सांगितले. लसीकरणानंतर सिरींज कट करून ती संबंधित बीन मध्ये टाकण्यात आली. यानंतर लसीकरण झालेल्या व्यक्तीला निगराणी कक्षात अर्धा तासाकरिता बसविण्यात आले.

यासंदर्भात माहिती देताना आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले, शासनाच्या निर्देशानुसार आज ‘ड्राय रन’ घेण्यात आली. शासनाच्या संपूर्ण दिशानिर्देशांचे येथे पालन करण्यात आले. यासंदर्भात आपण संपूर्ण पाहणी केली आणि आढावा घेतला असताना ही ‘ड्राय रन’ यशस्वीरीत्या पार पडल्याचेही ते म्हणाले. यासंदर्भात शासनाला अहवाल पाठविण्यात येणार असून पुढील दिशानिर्देशानुसार मनपा कार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मेट्रो प्रवाश्याची रेकॉर्ड रायडरशीप

0

 

ऍक्वा लाईन मार्गिकेवर तब्ब्ल १५४११ प्रवाश्यानी केला मेट्रो ने प्रवास

नागपूर ०२: काल दिनांक १ जानेवारी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रवासी सेवामध्ये तुफान गर्दी आढळून आली तब्बल १५४११ पेक्षा जास्ती नागरिकांनी नागपूर मेट्रोच्या ऍक्वा लाईन मार्गिकेवर मेट्रोने प्रवास केला. हा आता पर्यंतच्या सर्वात मोठा ऊंचाक आहे महत्वपूर्ण म्हणजे १ जानेवारी २०२१ (शुक्रवार) रोजी छत्रपती मेट्रो स्टेशन येथील प्रस्तावित बांधाकामा करीता ऑरेंज मार्गिकेवरील (रिच – १) सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवासी सेवा बंद होती. काल एक मेट्रो लाईन बंद असून देखील मेट्रोच्या प्रवासी सेवा मध्ये वाढ ही महत्वपूर्ण बाब आहे.

मेट्रोच्या प्रवासी संख्येत गेले काही दिवस सातत्याने वाढ होत असून मागच्या रविवारी प्रवासी सेवामध्ये तुफान गर्दी आढळून आली होती ज्यामध्ये तब्बल २२१२३ नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला होता .एवढच नव्हे तर सुटीचा दिवस वगळता इतर दिवसाला देखील मेट्रोची सरासरी रायडरशिप १० हजाराच्या वर आहे.

नागपूर शहरामध्ये २५ कि.मी. अंतराचे मेट्रोचे जाळे नागरिकांन करिता उपलब्ध असून या मार्गिकेवर दर १५ मिनिटांनी मेट्रो ट्रेन प्रवाश्यांच्या सेवेकरता सज्ज आहे. सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी व सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान नियमित मेट्रो सेवेचा लाभ घेत येत आहे.

महा मेट्रो तर्फे प्रवाश्यान करिता विविध सोई सुविधा मल्टी मॉडेल इंट्रिग्रेशन अंतर्गत उपलब्ध करण्यात येत असून मेट्रो प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासंबंधी सेवा महा मेट्रोने सुरु केली असून नागरिकांना याची पसंती मिळत आहे. तसेच शहरातील प्रतिष्टीत व्यक्ती, अधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील नागरिक मेट्रोने प्रवास करून नागरिकांनी जास्तीत जास्ती मेट्रोचा उपयोग करावा या करिता नागरिकांना प्रेरित करीत आहेत तसेच महा मेट्रोने शहरातील व स्टेशन परिसरातील प्रतिष्टीत व्यक्तीना महा मेट्रोच्या स्टेशनचे अॅेम्बेसेडर म्हणून महा मेट्रोशी जोडले आहे.

या व्यतिरिक्त महा मेट्रोतर्फे नागरिकांन करता सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ अनोखी योजना आखण्यात आली असून फक्त ३००० रुपये मध्ये संपूर्ण ३ कोचच्या मेट्रो ट्रेन मध्ये वाढदिवस, प्री-व्हेंडिंग शूट,लग्नाचा वाढदिवस व इतर कार्यक्रम साजरा करू शकतात तसेच प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासंबंधी सेवा सुरु केली असून नागरिकांची याला देखील पसंती मिळत आहे. महा मेट्रोच्या वतीने नव वर्षाच्या निमित्याने न्यू ईयर कार्निवलचे आयोजन मेट्रो स्टेशन येथे करण्यात आले आहे. जेथे विविध प्रकारचे १७ स्टॉल्स उपलब्ध आहे. या शिवाय आयुर्वेदिक तसेच पर्यावरण पूरक वस्तू देखील विक्रीला असतील. नागपूरकरांनी राईड करून या सर्व सोईंचा लाभ घ्यावा, असे आवाहन महा मेट्रो तर्फे करण्यात येत आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त 3जानेवारीला प्रा .सचिन खरे यांचे फेसबुक वर व्याख्यान 

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सामाजिक समता अभियानातर्फे आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्राध्यापक तथा सामाजिक कार्यकर्ते व व्याख्याते सचिन खरे यांचे दिनांक 3 जानेवारीला फेसबुक’वर सायंकाळी ७वाजता जाहीर व्याख्यान होणार आहे ‘ स्त्री उद्धारक सावित्री बाई फुले ‘हा व्याख्यानाचा विषय असूनजास्तीत जास्त लोकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आव्हान सामाजिक समता अभियान बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे ।

मलकापूर पांग्रा जवळ कंटेनरचा अपघात सुदैवाने जीवित हानी टळली !

0

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर ड्रायव्हरचा नियंत्रण सुटून वळण रस्त्यावर कंटेनर बाजूला असलेल्या डोंगराच्या कडेला धडकल्यामुळे कंटेनर चे समोरील बाजूचे मोठ्या प्रमाणामध्ये नुसकान झाले ‘ एम एच 12 एच डी -1862नेहा क्रमांकाचा कंटेनर 31 डिसेंबरला मलकापूर प्रांगा च्या दिशेने येत होता ।येताना रस्त्यावर वळण असल्यामुळे तसेच कंटेनर हे मोठी असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व बाजूला असलेल्या डोंगराच्या कडेला कंटेनर धडकले !यामध्ये चालक किरकोळ जखमी असून त्यावर उपचार सुरू आहे सुदैवाने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही !

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला सर्वांनी अभिवादन का करावे?

0

 

अजहर शाह मोताळा तालुका प्रतिनिधी

मोताळा:- छत्रपती शिवाजी राजांनी सुरू केलेला शिवशक पेशव्यांनी बंद पाडला आणि मुघलांचा फसली शक सुरु केला. पेशव्यांनी छत्रपती संभाजीराजांना तीन वेळा मारण्याचा कट केला आणि शेवटी संस्कृतवरती प्रभुत्व मिळविल्यामुळे औरंगजेबाच्या ताब्यात देऊन ब्राह्मणीधर्मानुसार त्यांना हाल हाल करून ठार मारले !

पहिल्या बाजीराव पेशवेव्याने गुजरात जिंकणाऱ्या मराठा सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना तह करण्यासाठी आळंदीजवळ बोलावून कैदेत टाकले आणि त्यांना कैदेत मारले. त्यांच्या मुलाला द्वेषापोटी दगाबाजीने मारले !

तिसऱ्या पानिपताच्या वेळेस अब्दाली युद्धाचे नियोजन करत होता, तर पेशवे यज्ञ, याग, होम हवन, भेदाभेद, व्रतवैकल्ये करण्यात दंग होते. भोजनाचे वेळी पेशवे हे जाधवराव, निंबाळकर, घोरपडे, शिंदे, होळकर, भोसले, पवार, जगदाळे इत्यादी मराठा सरदारांनादेखील पंक्तीला घेत नसत, शिवाजीराजानी कधीही भेदभाव केला नाही. पेशव्यानी अनैतिकतेचा कळस गाठला होता. अब्दाली युद्धाचे नियोजन करत होता, तेंव्हा पेशवे जप तप आणि भोजनाचे नियोजन करत होते. म्हणजे सदाशिव पेशव्याने एक लाख मराठयांना अब्दालीच्या समोर नेवून बळी दिले, तेंव्हा महाराणी ताराराणी म्हणाल्या “बरं झालं पेशवाई बुडाली”. पानिपतात पेशव्यांच्या पराभवाचा महाराणी ताराराणीला आनंद झाला, इतका पेशव्याबद्धल महाराष्ट्रात रोष निर्माण झाला होता !

छत्रपती शिवाजी महाराजांचे सातारा गादीचे वंशज पहिले छत्रपती प्रतापसिंह महाराज हे लहान वयात गादीवरती आले, तेव्हा दुसऱ्या बाजीराव पेशव्याने त्यांच्या शिक्षणावर बंदी घातली, कारण हा बाल छत्रपती शिकला तर शहाणा होईल आणि शहाणा झाला तर तो आपल्या अंकित राहणार नाही, म्हणून त्यांच्या शिक्षणावर बंदी घातली !

छत्रपती घराणे त्यांना चोरून शिकवेल म्हणून पेशव्यांनी सातारच्या राजवाड्या भोवती गुप्तहेर नेमले, तेव्हा छत्रपती प्रतापसिंह महाराजांची आई रात्री अडीच वाजता चोरून शिकवायची. छत्रपतींची ही अवस्था तर सामान्य रयतेचे पेशव्यांनी काय हाल केले असतील…?
याची कल्पना करा !

पेशव्यांना धडा शिकवण्यासाठी सातारा येथून पुण्याकडे सैन्य घेऊन निघालेल्या छत्रपती चतुरसिंग भोसले यांना दगाबाजीने पकडून दुसऱ्या बाजीरावाने कोकणातील कांगोरी किल्ल्यात डांबून छत्रपती चतुरसिंगांना हाल-हाल करून ठार मारले !

अमृतराव पेशवेव्याने खंडणी न देणाऱ्या शेतकऱ्यांना तापलेल्या तव्यावर उभे करून छळले, तर शेतकऱ्यांच्या लहान मुलांच्या बेंबीत आणि कानात तोफेची दारू भरून त्याला अग्नी द्यायचा, त्यामुळे मुलांचे डोके आणि पोट फुटायचे, इसिस, तालिबानी, नक्षली, सनातनी जसे निरपराध लोकांना निर्दयपाने मारतात, तसेच पेशवेदेखील निरपराध प्रजेला निर्दयपणे मारत असत !

इंदूरच्या विठोजी होळकर यांना पुण्यात हत्तीच्या पायाला बांधून पेशव्यांनी हालहाल करून ठार मारले. पेशवेकाळात अस्पृश्यांना तर माणूस म्हणून जगायचा अधिकार नव्हता. त्यांचा प्रचंड छळ झाला. कंबरेला केरसुणी आणि गळ्यात मडके अशी अस्पृश्याची अवस्था होती !

युद्ध-वास्तव

पेशव्यांनी सर्वाधिक छळ ब्राह्मण महिलांचा केला, महिलांचा जन्म जणू कांही उपभोग घेण्यासाठीच आहे, अशी महिलांची स्थिती पेशवाईत होती. त्या छळाचे या ठिकाणी वर्णन करणे देखील उचित ठरणार नाही !

छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्या समतावादी, बुद्धीप्रामाण्यवादी, लोककल्याणकारी, महिलांचा सन्मान करणाऱ्या शासन व्यवस्थेला मूठमाती देण्याचे काम पेशव्यांनी केले, त्यामुळेच 500 शूरवीर मावळ्यांनी 300 ब्रिटिशांच्या मदतीने 28 हजार पेशव्यांचा पराभव केला. त्या 500 शूरवीरामध्ये मराठा, महार, मुस्लिम, राजपूत, मातंग धनगर, इत्यादी मावळे होते !

मराठा-महार-मुस्लिम खांद्याला खांदा लावून भावाप्रमाणे पेशवाई विरोधात लढले. त्यांची यादी पेरणे कोरेगाव – भीमा येथील विजयस्तंभावरती आहे. त्या 500 सैनिकांपैकी खंडोजी माळवदकर हे एक शूर मराठा वीर होते. त्यांना ब्रिटिशांनी बक्षीस म्हणून जमीन इनाम दिली, त्यांच्या शेतालगतच हा विजयस्तंभ आहे !

500 मावळ्यांनी 300 ब्रिटीशांची मदत घेतली किंबहुना ब्रिटिश आणि पाचशे मावळे एकत्र येऊन पेशव्याविरुद्ध लढले, म्हणून त्यांना देशद्रोही ठरवता येणार नाही, कारण 1818 साली देश, राष्ट्र ही संकल्पना नव्हती, त्या काळात विविध संस्थाने होती. देश, राष्ट्र ही संकल्पना 1947- 1950 नंतर आली !

500 मावळ्यांना देशद्रोही ठरविणार्‍यांनी टिपू सुलतानविरुद्ध इंग्रजांना मदत करणाऱ्या पेशव्याबद्दल आपले मत स्पष्ट करावे, तसेच पेशव्यांनी 1802 साली इंग्रजाबरोबर वसईचा तह केला होता व इंग्रजांची तैनाती फौज पदरी बाळगली होती !

छत्रपती प्रतापसिंह महाराजांना कैद करण्यासाठी इंग्रजांना मदत करणाऱ्या व शनिवारवाड्यावरचा जरीपटका खाली उतरवून इंग्रजांचा युनियन जॅक फडकविनाऱ्यानी राष्ट्रवादाच्या व देशप्रेमाच्या वल्गना करणे हास्यास्पद आहे !

ज्यावेळेस कोरेगाव भीमा येथे युद्ध सुरू होते, तेंव्हा शिवाजीराजांचे अत्यंत तरुण वंशज छत्रपती प्रतापसिंह महाराज व राजपरिवाराला दुसऱ्या बाजीराव पेशव्याने वासोटा किल्यावर नजरकैदेत अर्थात कैदेत ठेवले होते. छत्रपतींना कैदेत टाकणाऱ्या पेशव्याना पराभूत करून त्या पाचशे शुरावीरांनी खरे तर छत्रपतींच्या अपमानाचा बदलाच घेतला. पेशव्यांचा पराभव झाल्यानंतरच प्रतापसिंह महाराजांची सुटका झाली !

एवढे मात्र नक्की की शिवरायांचे पाचशे मावळे जुलमी पेशवाई विरुद्ध खांद्याला खांदा लावून 1 जानेवारी 1818 रोजी लढले व शिवस्वराज्याची वाताहात लावणाऱ्या पेशव्यांना धडा शिकवला, त्यांचा तमाम मराठा, बौद्ध,ओबीसी,एससी,मुस्लिम यांना अभिमान वाटायला हवा !

जुलमी पेशव्याविरुद्ध त्यांनी गाजवलेल्या शौर्यामुळे इंग्रजानी पेरणे येथे विजयस्तंभ उभारला. त्यामुळे तमाम बहुजन समाजाला त्या विजय स्तंभा बद्धल अभिमान वाटायला हवा !

त्यामुळे आम्ही 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत आहोत !

आपल्या पूर्वजानी एकोपा जपला, आपणही एकोपा जपूया !

संदर्भग्रंथ-

1)छत्रपती शिवाजी महाराज-वा सी बेंद्रे
2)छत्रपती संभाजी महाराज-वा सी बेंद्रे
3)नामांतर औरंगाबाद आणि पुण्याचे-शरद पाटील
4)पानिपत 1761-त्र्यंबक शेजवलकर
5)सातारच्या राज्यक्रान्तिचा इतिहास-प्रबोधनकार ठाकरे
6)दाभाडे घराण्याचा इतिहास-परांडकर
7)महात्मा फुले -धनंजय कीर

उपविभागीय अधिकाऱ्यांना वरली मटका सुरू करण्याची केली मागणी

0

 

 

जळगांव  जामोद शहरातील सुशिक्षित बेरोजगार मंगेश हरिभाऊ तेलंगडे यांनी आज दिनांक १/१/२०२१रोजी उपविभागीय अधिकारी जळगाव व पोलीस निरीक्षक यांना विनंती अर्ज बुलढाणा जिल्हा पालक मंत्री शिंगणे साहेब, गृहराज्यमंत्री, जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांनासुद्धा विनंती अर्जाच्या प्रती पाठवल्या या अर्जामध्ये जळगाव शहरातील बेरोजगार तरुणाने उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना अशी मागणी केली आहे की जळगाव शहरामध्ये मला माझे व माझ्या परिवाराचे उदरनिर्वाह करण्यासाठी वरली मटका तितली बोर्ड सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी माझ्या अर्जाचा विचार न झाल्यास मी संबंध संबंधित कार्यालयासमोर आत्मदहन करण्याची परवानगी तरी द्यावी अशी विनंती अर्जात म्हटले आहे त्याचे कारण असे की जळगाव शहर व तालुक्यामध्ये अवैध रेती, अवैध नकली दारू गुटखा, वरली मटका तीतली बोर्ड,अशा विविध प्रकारचे अवैध धंदे, येथिल राजकिय पुढार्यांचे नातेवाईक, मित्र यांचे चालु आहेत मी सुद्धा बेरोजगार युवक आहे मला माझ्या परिवाराचे चरितार्थ चालवण्यासाठी जे काही फी असेल ते देण्यास तयार आहे व या चालु असलेल्या अवैध धंद्याचे पुरावे मि देण्यास तयार आहे त्याकरिता मला सुद्धा वरिल प्रमाणे व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्यात यावी न दिल्यास आत्मदहनाची तरी परवानगी द्यावी असे दिलेल्या अर्जात नमूद आहे

 

खाद्यतेल व गॅस सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका 

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

गॅस व खाद्यतेलाचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या व मजूर वर्गाच्या खिशाला मोठा फटका बसला आहे ‘खाद्यतेलाचे भाव सध्या 120 रुपये 124 रुपये किलो दराप्रमाणे असून ‘घरगुती गॅस सिलेंडर चे भाव सुद्धा 50 रुपयांना महागल्यामुळे संसारांमध्ये आवश्यक असणाऱ्या खाद्यतेल व गॅस सिलेंडर ह्या दोन्ही गोष्टी जीवनाश्यक असून यामुळे मजूर वर्ग व सर्वसामान्य नागरिक भाववाढीमुळे त्रस्त झाली आहे ‘तिकडे बाजारपेठेमध्ये सोयाबीन पिकाची आवक वाढली आहे व एकीकडे खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहे त्यामुळे 95 ते 100 रुपये किलो दराप्रमाणे मिळणारे खाद्यतेल आता 124 रुपये किलो दराप्रमाणे मिळत आहे ‘त्यामुळे गरीब व मजूर वर्ग आता खाद्य तेल व गॅस सिलेंडरचे भाव कमी करावी अशी मागणी करत आहे ‘

मेरा खुर्द येथील अधिग्रहित केलेल्या जमिनी ऐवजी शेत रस्ता व नाली चा वापर केला कालव्यासाठी !शेतकऱ्यांचे पाटबंधारे विभागाला निवेदन !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथील शेतकऱ्यांच्या वापरासाठी असलेल्या शेत रस्ता व नाली वरच पाटबंधारे विभागाने त्याचा वापर कालव्यासाठी केला आहे अशी संतापजनक घटना मेरा खुर्द येथे घडली आहे ‘सविस्तर वृत्त अशी की मेरा खुर्द येथे पाटबंधारे विभाग बुलढाणा यांनी अधिग्रहित केलेल्या जमिनीवर शेत रस्ता व नाली चा वापर कालव्यासाठी 0. 27 आर .जमीन घेऊनलघु पाटबंधारे विभागाने यावर पाट ‘कालवा टाकला नाही .तर अगोदरच असलेल्या नाली व शेत रस्त्यावरच कालव्याचा पाट टाकला गेला आहे .व बांधकाम केली आहे ‘त्यामुळे शेत रस्ता व नाली पूर्णपणे बजून गेली असून त्या नालीच्या शेजारील आसपासच्या 30 ते ४० शेतामध्ये पाऊस पडल्यानंतर पाणी तसेच साचून राहते ‘त्यामुळे शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुस्कान होत आहे ‘व शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा रस्ता राहत नाही व शेत रस्ता हा पूर्णपणे बंद झाला आहे ‘याला पूर्णपणे लघु पाटबंधारे विभाग बुलढाणा जबाबदार आहे असा आरोपही शेतकऱ्यांनी निवेदनात केला आहे ‘मेरा खुर्द येथील बँक ऑफ महाराष्ट्रा च्या जवळील शेत रस्त्यावरच लघु पाटबंधारे विभागाने कालवा बांधला आहे त्यामुळे लघु पाटबंधारे विभागाने अधिग्रहित केलेल्या जमिनीवर पाट न बांधता रस्त्यावरच पाट बांधल्यामुळे शेतकरी आक्रमक झाली आहे ‘याबाबत त्यांनी या आशयाचे निवेदन दिनांक 30 डिसेंबर रोजी लघु पाटबंधारे विभाग उपविभागीय अधिकारी खडकपूर्णा प्रकल्प दे . राजा यांना निवेदन दिले आहे ‘या निवेदनावर ज्ञानेश्वर शंकर भुसारी, प्रकाश नामदेव भुसारी, भास्कर नामदेव भुसारी, बाजीराव नामदेव भुसारी, तेजराव नामदेव भुसारी, सुधाकर नारायण भुसारी, परमेश्वर नारायण भुसारी, प्रकाश रावसाहेब भुसारी ,उमेश रावसाहेब भुसारी ‘ निलेश बाजीराव भुसारी, गजानन तेजराव भुसारी, नंदकिशोर प्रकाश भुसारी, दिनकर विठोबा शेळके ,शंकर विठोबा शेळके ,संदीप प्रल्हाद शेवाळे, रईस देशमुख ‘जावेद देशमुख ‘नंदू आत्माराम वराडे ‘रमेश आत्‍माराम वराडे .शशिकांत रामकृष्ण वराडे ‘आधी शेतकऱ्यांच्या या निवेदनावर सही आहेत,