Home Blog Page 574

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त उंद्री येथे त्यांना अभिवादन !

0

सिंदखेड राजा ( सचिन खंदारे )

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी चिखली तालुक्यातील उंदरी येथेमहात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले !
जनाधार बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण भाऊ दानवे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले !यावेळी त्यांनी सांगितले की महात्मा फुले यांना अभिप्रेत असणाऱ्या समाज सेवेसाठी आपण सदैव तत्पर असतो !
यावेळी !
किरण दानवे,कैलाश भाऊ हजारे,गोपाल ठाकरे, पुरुषोत्तम अवचार, अजय गिर्हे, संदिप खेडेकर ,अमोल शिरसाठ, श्याम नाईकवाडे,सतीश ठाकरे,राम जुमडे,नितीन रसाळ , कृष्णा चरखे, अमोल ओवाळकर ,गणेश हजारे,सुरेश खंडारे, व समस्त मित्र परिवार ,,,आदी उपस्थित होते,

माजी सैनिक अर्जुन गवई ने दिला मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात !शिवाय दोन भावंडांचा उचलणार शैक्षणिक खर्च –

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

हराळ तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथील करण रामदास महाजन हा गरीब होतकरू विद्यार्थी साखरखेर्डा येथील अनिकेत सैनिक स्कूलमध्ये इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत होता परंतु जागतिक महामारी असलेल्या कोरोना संकटाच्या काळात शाळा बंद असल्यामुळे हा विद्यार्थी त्याच्या मूळ हराळ गावी घरीच होता ‘करंन आर्थिक परिस्थिती हलाखीची होती ।अगोदरच कर यांचे वडील काकाचे निधन झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारीत्यांची विधवा आई श्रीमती लक्ष्मीबाई रामदास महाजन वश्रीमती जिजाबाई लक्ष्मण महाजन यांच्यावर येऊन पडली !त्यातच करंन चा17 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मूळ गावी अल्पशा आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे आणखीनच भार त्याच्या आईवर पडला ‘भावी आधार हातातून निसटून गेला !करण हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता ।ही माहिती माजी सैनिक पता अनिकेत सैनिक स्कूल चे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक अर्जुन गवई यांना कळताच त्यांनी महाजन कुटुंब यांना संविधान दिनानिमित्त छोटेखानी कार्यक्रमांमध्ये 26नोव्हेंबर रोजी साखरखेर्डा येते माणुसकीचा धर्म जोपासून अनिकेत अर्जुन गवई व विमलताई हिवाळे यांच्या हस्ते महाजन कुटुंबियांना पाच हजार रुपये रोख मदत दिली ।यावेळी अध्यक्ष अर्जुन भाऊ गवई ‘देवानंद शिंदे मुख्याध्यापक प्रदीप जाधव डोंगर दिवे सर अंभोरे सर दैनिक देशोन्नती चे पत्रकार मनोज पऱ्हाड ‘आदी यावेळी उपस्थित होते !शिवाय करन ची आईश्रीमती लक्ष्मी महाजन । काकू .जिजाबाई महाजन मामा दिगंबर वाणीयांच्या हातात मदतीची रक्कम सुपूर्द करण्यात आली !अर्जुन गवई यांनी दाखवलेल्या माणुसकीच्या दर्शनामुळे संपूर्ण परिसरामध्ये त्यांचं कौतुक होत आहे !

राज्यपालांनी धनगर समाजाच्या उन्नतीसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापन करण्याचे राज्य शासनाला निर्देश द्यावे- यशवंत मल्हार सेनेच्या वतीने राज्यपालांना निवेदनाद्वारे मागणी

0

 

संग्रामपुर [प्रतिनिधी] :- राज्य शासनाने धनगर समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची व धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचे निर्देश राज्यपालांनी राज्य शासनाला द्यावे अशा मागणीचे निवेदन महामहिम राज्यपालांना मल्हार सेनेच्या वतीने देण्यात आले याबाबत राज्यपाल महोदयांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाची दीड संख्या इतकी लोकसंख्या असून परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी 1950 साली संविधानामध्ये धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण दिले होते मात्र मागील सत्तर वर्षांमध्ये धनगर व धनगड हा निरर्थक शाब्दिक वाद उत्पन्न करून शासनकर्त्यांनी धनगर समाजाला शैक्षणिक आर्थिक संस्कृती विकासापासून व आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे पाप केले आहे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी धनगर समाजाची उपेक्षाच केली असून निवडणुकीमध्ये खोटी आश्वासने देऊन त्यांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेतला महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाजाची दीड कोटी इतकी प्रचंड जनसंख्या असून राज्यातील खेडोपाडी ग्रामीण विभागात हा समाज उपेक्षित जीवन जगत आहे धनगर समाज शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक व आर्थिक विकासापासून वंचित राहिलेला आहे धनगर समाजाची आर्थिक उन्नती व्हावी त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा या समाजाच्या शैक्षणिक संस्कृती व आर्थिक विकासासाठी अखिल भारतीय यशवंत मल्हार सेना संघर्ष करीत आहे महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना भारतीय यशवंत मल्हार सेने चे अध्यक्ष संजय पुकळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने धनगर समाजातील प्रलंबित विविध मागण्यांचे निवेदन सोपविले निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यात धनगर हेच जात असून धनगर आणि धनगड या दोन्ही जातींचे स्वतंत्रपणे सर्वे करण्यात यावा धनगर जातीतील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मेळावा त्यांचे शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी स्वतंत्रपणे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून वार्षिक अंदाजपत्रकात पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांचे भारताच्या स्वातंत्र्यासाठी विकासामध्ये योगदान उल्लेखनीय असे असून त्यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात करावे अशी शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे करावी धनगर जातीतील मेंढपाळ यांना जंगलात राहावे लागते त्यामुळे त्यांचे मुलं-मुली शिक्षणापासून वंचित राहतात ह्याचप्रमाणे जंगलात साप झाल्यामुळे त्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार सुद्धा मिळत नाही अशा वेळेस अनेकांना प्राण सुद्धा गमवावे लागत आहेत या गोष्टीचा विचार करून गायरान जमिनी च्या धर्तीवर मेंढपाळांना शासकीय वन जमिनीचे वाटप करण्यात यावे आदी विविध मागण्या करण्यात आले आहेत

90 वर्षीय आजी वर अत्याचार करणाऱ्यास 34 वर्षीय नराधमाला अटक ,

0

 

माणुसकीला काळिमा फासणारी घटना ,

चंद्रपूर ,

भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या महालगाव ( काळू ) या गावातील दिनांक २६/११/२०२० रोज गुरुवार ला या वृद्ध महिला च्या घराशेजारी राहत असलेल्या नरेंद संभाजी नन्नावारे या 34 वर्षीय नराधमांने त्या ९ ० वर्षीय वृद्ध महिलेल्या घरी झोपुन असलेल्या त्या वृद्ध महिलेवर घरी कोणी नसल्याच्या फायदा घेत त्या खोलीतील लाईट बंद करून त्या महिलेवर अतिप्रसंग केला . झालेल्या घटनेची हकीकत फिर्यादी तातोबाजी वाढरे यानी भिसी पोलीस स्टेशन ला तोंडी रिपोर्ट दाखल करून त्या आरोपी नरेंद संभाजी नन्नावरे वर कलम 376 , 450 , 323 , भादवी या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास भिसी पोलीस स्टेशन करीत आहे .

हतेडी बु येथे संविधान दिन साजरा !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

बुलडाणा तालुक्यातील हतेडी बु येथे संविधान दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सुरवातीला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विक्राम जाधव हे होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सचिनखरे , झिने सर हे होते. याने यावेळी बोलतांना प्रा. सचिन खरे यांनी संविधान निर्मिती मागील बाबासाहेबांची भूमिका व संविधान निर्माण करत असतांना बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षाची व कष्टाची जाणीव करून देवून प्रत्येक नागरीकांनी संविधानीक मुल्यांची जोपासना करावी.व संविधानाचे पालन करावे असे प्रतिपादन केले.तर झिने सरांनी संविधानाचे महत्व विशद करुन संविधानाची प्रस्ताविका समजून सांगीतली .यावेळी ज्ञानेश्वर जाधव , साहिल जाधव यांनी सुद्धा आपले विचार मांडले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनिल झिने यांनी केले . यावेळी कार्यक्रमाला बहुसंख्य महीलांची उपस्थीती होती.

तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने संविधान दिन साजरा..!

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

मेहकर येथे तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाटीकेमध्ये26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.सुभाष भाऊ बैलके हे होते,तर प्रमुख उपस्थिती म्हणून मेहकर येथील तथागत ग्रुप महाराष्ट्र सचिव मा.अनिल भाऊ देबाजे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष मा.अख्तर भाई कुरेशी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.वरील सर्व मान्यवरांची भारतीय संविधानावर समायोचित भाषणं केले व कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई व मान्यवरांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केले व छोटेखानी भाषणामध्ये सांगितले की,भारतीय इतिहासातील संविधानच्या अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली असली तरी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे “भारतीय संविधान” 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस,अहोरात्र मेहनत घेऊन या संविधानाची निर्मिती केली, या रोजी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्‍या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. म्हणून 26 नोव्हेंबरला हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय संविधानांचा विजय असो आदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
या प्रसंगी मा.कुणाल भाऊ माने, कैलास भाऊ दुगाने,प्रमोद अंभोरे,राजकुमार ऊचित,विजय सरकटे,विजय कंकाळ,सतिष शेटाणे,असलम भाई गवळी,समाधान पवार,सचिन बनचरे,रवी जोरावर पंकज जाधव,योगेश अवसरमोल,सुनिल गवई यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार मा.कपिल भाऊ इंगळे यांनी मानले.

ऊकळी -सुकळी येथे संविधान दिन साजरा !

0

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मेहकर तालुक्यातील ऊकळी सुकळी ता.मेहकरतेथे संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी येथील तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्यच्या वतीने संविधान दिन साजरा…! ऊकळी सुकळी ता.मेहकर येथील तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्यच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाटीकेमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.आणी ऊकळी सुकळी येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये तथागत ग्रुप महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री संदिप भाऊ गवई यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन केले व त्यांनी छोटेखानी भाषणामध्ये सांगितले की,भारतीय इतिहासातील संविधानच्या अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली असली तरी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे “भारतीय संविधान” 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस,अहोरात्र मेहनत घेऊन या संविधानाची निर्मिती केली,या रोजी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्‍या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. म्हणून 26 नोव्हेंबरला हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.भारतीय संविधानांचा विजय आसो आदी घोषंनी संपूर्ण परिसर दणाणुन सोडला.. या प्रसंगी तथागत फाउंडेशन व तथागत ग्रूप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा,श्री.संदिप भाऊ गवई , मा.सुभाष भाऊ बैलके, मा.अनिल भाऊ देबाजे मा.अख्तर भाई कुरेशी,कुणाल भाऊ माने, कैलास दुगाने,सतीश शेटाने, प्रमोद अंभोरे, सुरज शेटाने, हर्षल राऊत शरद तुरूकमाने, विनायक तुरूकमाने,आवारे साहेब,शशिकांत धांडे ,करण राऊत, रोहित तुरूकमाने, आदित्य तुरूकमाने,सुमित झरे, अमर अंभोरे,यांची उपस्थित होती..!

हिवरा आश्रम येथे संविधान दिन साजरा

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्या आदेशावरुन मेहकर तालुक्यातील हिवराआश्रम येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.हिवरा आश्रम येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये मा.राजुभाऊ उचित व विजय सरकटे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन केले व त्यांनी छोटेखानी भाषणामध्ये सांगितले की,२६ नोव्हेंबर
भारतीय “संविधान दिवस..”
“डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांनी आपल्या रक्ताची शाई करुन शरीराची पर्वा न करता “2 वर्ष 11 महिने 18 दिवस” एवढ्या कालावधीमध्ये “395 कलमे आणि 8 परिशिष्टे” लिहून जगातील सर्वात महान बलशाली राज्यघटना लिहिली.लेखणी तर सर्वांच्याच हातात होती.ताकत तर सर्वांच्याच मनगटात होती.पण,राज्यघटना लिहण्याची ताकत तर फक्त बाबासाहेबांच्याच रक्तात होती.26 नोव्हेंबरला हा दिवस संविधान दिन म्हणुन साजरा केला जातो.. यावेळी तथागत फाउंडेशन व तथागत ग्रूप महाराष्ट्र राज्य राजकुमार उचित बुलडाणा जिल्हा संघटक,विजय सरकटे बुलडाणा जिल्हा युवा अध्यक्ष,विजय कंकाळ हिवरा आश्रम शहर अध्यक्ष,युनुस भाई शहा,रवि जोरावर,सुमित मोरे,सुधीर बोरुडे,अरुन मगरे,अमिन शहा,अनीस शहा,विनोद वानखेडे,संदिप सोनुने आदी कार्यकर्ते उपस्थित होते..!

जिल्हा सांगली तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतिने संविधान दिन साजरा…!

0

 

 

ता.शिराळा येथे तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप भाऊ गवई यांच्या आदेशावरुन तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याच्यां अध्यक्षस्थानी महीला आघाडी सचिव निताताई बनसोडे ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणुन प.म.महीला आघाडी सौ.मंगलताई नांगरे व सांगली जिल्हा अध्यक्ष मा.तुषार शिदे शिराळा तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव कांबळे,सचिव बाळासाहेब कांबळे
महासचिव डॉ.विनोद झाडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. शिराळा येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य महीला आघाडीच्यां निताताई बनसोडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन केले व त्यांनी छोटेखानी भाषणांमध्ये सांगितले की,भारतीय इतिहासातील संविधानच्या अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली असली तरी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे “भारतीय संविधान” 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस,अहोरात्र मेहनत घेऊन या संविधानाची निर्मिती केली, या रोजी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्‍या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. म्हणून 26 नोव्हेंबरला हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावेळी तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या महीला आघाडी सचिव निताताई बनसोडे व जिल्हा अध्यक्ष मा.तुषार भाऊ शिंदे,मा. ज्ञानदेव कांबळे, मा.बाळासाहेब कांबळे,डॉ.विनोद झाडे,मा.अनिकेत पवार मा.ओंकार पाटील संजय माने विशाल खोत व महीला आघाडी कार्यकरत्या सौ.मंगलताई भीमराव नांगरे
सौ.ज्योतीताई अवघडे सौ.विद्याताई सोनवने सौ.प्रगतीताई घोलप सौ.सुनीताताई घोलप सौ.यशवंतीताई चांदणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते..

शिंदी येथील शेत शिवारात रोह्याचा हैदोस ! शेतकरी त्रस्त वन विभागाने बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी !

0

 

सिंदखेड राजा । (सचिन खंडारे)

अगोदरच शेतकरी अतिवृष्टीच्या संकटातून सावरत नाही तोच हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता !त्यामध्ये अनेक पिकांचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता !खरिपाच्या दुबार तिबार पेरणी करूनही हातात काहीच राहिले नव्हते !परंतु पाऊस जास्त पडल्यामुळे शेतकरी रब्बी हंगामाच्या पेरणी कडे वळला !यामध्ये गहू हरभरा मका ‘हायब्रीड मिरची शेतकरी रब्बी हंगामात घेऊ लागला !परंतु ही पिके ही जंगली प्राण्यांमुळे नेस्तनाबूत होऊ लागली आहे !शिंदी शिवारातील अनेक शेतांमध्ये दोनशे रोहींचा कळप असून शेतकऱ्यांचे हायब्रीड गहू व हरभरा अशा पिकांचे नुकसान करत आहे !अनेक शेतकऱ्यांची पिके फस्त केली आहे :त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे !तरी वन विभागाने त्वरित यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहे ‘अन्यथा वन विभागाच्या कार्यालय मध्ये आम्ही ठाम मांडून बसू असा इशारा नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे ‘बरोबर यामध्ये किशोर बंगाळे तेजराव खरात राजेश खंडारे भगवान गवई समाधान गवई असे 25 ते 30 शेतकऱ्यांनी यावेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे ।