Home Blog Page 581

घरगुती वादातून महिलेची हत्या मारेकरी आरोपी ताब्यात :  पोलिसांचा तपास सुरू

0

 

शहरातील आपातापा रोडवरील दमानी हॉस्पिटल मागे काल रात्रीच्या सुमारास घरगुती वादातून महिलेची हत्या केल्याची घटना रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. संगीता प्रशांत इंगळे असे मृतक महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीस ताब्यात घेतले असून आणखीन एका आरोपीचा पोलीस तपास करीत आहे.

शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आपातापा रोडवर संगीता प्रशांत इंगळे ही विवाहित महिला राहते. चाक़ू भोकसून पतीने केली पत्नीची हत्या  अकोला शहरातील सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन हद्दितील घटना संगीता प्रशांत इंगळे असे मृतक पत्नीचं नाव तर प्रशांत इंगळे असं मारेकरी पतीचं नाव असून आरोपी पती प्रशांत इंगळे हां रोजगारकरिता नाशिक येथे असून तो आपल्या मुलाला नेण्याकरिता आज अकोल्यात आला होता. यावेळी प्रशांतच्या आपातापा रोड़वरील एकता नगरातील राहत्या घरी दोंघा पती-पत्नींमध्ये मुलाला नेण्यावरुन भांडण झाले होते. हे भांडण विकोपाला गेल्याने आरोपी पतीनं रागाच्या भरात पत्नी संगीता हिच्या पोटावर चाकुने वार करून तिची हत्या केली दरम्यांनं, गेल्या अनेक दिवसांपासून दोघां पती-पत्नीत वादात सुरु होता तेव्हापासून संगीता ही अकोट फ़ैल परिसरात रूम करून दोन्ही मुलांबरोबर राहत होती या वादातून सदर महिलेची हत्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र कदम, सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनचे ठाणेदार भानुप्रताप मडावी यांनी तात्काळ पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतल्याची माहितीही समोर आली आहे. हत्येमागील कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नसून घरगुती वादातून हत्या झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी उशिरा रात्रीपर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

तलाठी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पौंधे यांना मारहाण , आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

0

 

 

(साखरखेर्डा )

येथील मंडळाधिकारी कार्यालयात कामकाज करीत असतांना एका इसमाने कार्यालयात घुसून तलाठी पोंधे यांना मारहाण करुन चावा घेतला . आणि सामानाची नासधूस केल्या प्रकरणी आरोपीस विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
साखरखेर्डा येथील पाण्याच्या टाकी जवळ तलाठी आणि मंडळाधिकारी कार्यालय असून या कार्यालयात प्रशांत शंकरराव पोंधे आणि संजय शिंगणे हे कामकाज करीत होते . दुपारी १२ वाजताच्या सुमारास मोहन दत्तू गवई रा . हिवरखेड ता . खामगाव यांचा मोबाईल वर फोन आला . पोंधे यांना भेटायचे आहे . मी कार्यालयात आहे , आपण भेटू शकता . त्यानंतर काही वेळातच सदर व्यक्ती कार्यालयात आला .आणि पोंधे कोन आहेत , त्यांना मला भेटायचे आहे . तलाठी यांनी परिचय देवून माझ्या सोबत काय काम आहे . ते सांगा . दत्तू गवई हे माझे वडील असून त्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नाही . अनुदान यादी पाहून सांगतो असे पोंधे यांनी म्हणताच मोहन गवई यांनी शिवीगाळ करून पोंधे यांना खुर्चीतून ओढून खाली पाडले . लाथाबुक्क्यांनी मारहाण करून प्रिंटर मशिन दोन्ही हातात धरुन जमिनीवर आदळले . त्याच्या तावडीतून सुटका करीत असतांना पोंधे यांच्या डाव्या हाताच्या आंगठ्याला कडाडून चावा घेतला . बोटातून रक्तश्राव झाला . गवई आणि पोंधे यांना सोडविण्यासाठी तलाठी संजय शिंगणे , कोतवाल शुभम अशोक कोतवाल , एकनाथ तुपकर यांनी पोंधे यांना सोडविले .
तलाठी प्रशांत पोंधे यांच्या तंक्रारीवरुन साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी आरोपी मोहन दत्तू गवई वय ४० वर्ष रा हिवरखेड , ता . खामगाव , जि . बुलडाणा यांच्या विरुद्ध विविध कलमाखाली आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतीबंधक अधिनियम कायद्या नुसार गुंन्हे दाखल केले आहेत .

रविकांत तुपकरांनी घेतली ऊर्जामंत्री ना.नितीन राऊतांची भेट.

0

 

महावितरणचे एम.डी असीम गुप्ता व मुख्य अभियंता पराग जांभूळकरांशी केली चर्चा..

मुंबई (20 नोव्हें.) – एकीकडे विजेचा व विज बिलांचा मुद्दा तापलेला असतांना, त्यातच जालना जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने सगळीकडे संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले आहेत..! रविकांत तुपकरांनी आज थेट मुंबई गाठत राज्याचे ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत यांची प्रत्यक्ष भेट घेवून या घटनेबद्दल सविस्तर चर्चा केली. तसेच शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. रब्बी हंगामावरच शेतकऱ्यांच्या आशा आहेत. शेतात पाणी आहे पण वीज नाही, लोडशेडींग मुळे व विद्युत रोहित्र मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांच्या महावितरण विरोधातील तीव्र भावना तुपकरांनी ना.राऊत यांच्यासमोर मांडल्या.

यासोबतच तुपकरांनी ना.राऊत यांच्याकडे अतिशय परखड शब्दात काही मागण्या केल्या आहेत. यामध्ये जालना जिल्ह्यातील पळसखेडा पिंपळे गावात शॉक लागून मृत्यू झालेल्या 3 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ भरीव मदत द्या, शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पूर्णवेळ विज द्या व लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करा तसेच बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात जळालेले विद्युत रोहित्र बदलून देण्यासाठी मुबलक ऑईल उपलब्ध करून देण्यात यावे यासर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार न झाल्यास सरकारला शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल,असा इशारा ही तुपकरांनी ऊर्जा मंत्र्यांना दिला.
रविकांत तुपकर यांनी यासंदर्भात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीम गुप्ता व महावितरण चे साहित्य व्यवस्थापनाचे राज्याचे मुख्य अभियंता श्री.पराग जांभूळकर यांचीही भेट घेवून विस्तृत चर्चा केली.
यावेळी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ अध्यक्ष दामोदर इंगोले उपस्थित होते.

शिक्षशिक्षक मतदारसंघ निवडणूक केंद्राची विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी केली पाहणी

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

दि.19 नोव्हे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी जिल्ह्यात 14 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक तालुका स्तरावर तहसिल कार्यालयात मतदान केंद्र देण्यात आले आहे. त्यापैकी बुलडाणा तहसिल कार्यालयातील मतदान केंद्राची आज 19 नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रावरील सुविधांची माहिती घेतली. तसेच व्यवस्थेबद्दल चर्चा केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, उपविभागीय अधिकारी श्री. हांडे, तहसिलदार राहुल खंडारे आदी उपस्थित होते.

विजबिल सवलतीसाठी सोमवारी भाजपाचे विजबिल होळी आंदोलन, नागरिकांनी सहभागी व्हावे – आ. डॉ. संजय कुटे यांचे आवाहन

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

आमदार डॉ. संजय कुटे
जळगावजामोद
राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला विजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी विजबिल होळी आंदोलन करण्यात येणार असून नागरिकांनी त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ. डॉ. संजय कुटे यांनी गुरुवारी केले.
यावेळी बोलताना डॉ कुटे म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ विजबिले आली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जामत्र्यांनीच स्वतः विजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे महावितरण सक्तीने विजबिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजपा विजबिलांच्या होळीचे आंदोलन राज्यात सर्वत्र करणार आहे.
ते म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प होऊन नागरिकांना फार मोठा आर्थिक ताण सहन करावा लागला. अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इतर राज्यांप्रमाणे हातावर पोट असणारे श्रमिक, रस्त्यावरील व्यावसायिक, बारा बलुतेदार, शेतकरी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक इत्यादींना स्वतःहून पॅकेज द्यायला हवे होते. या सरकारने अजूनही जनतेला पॅकेज दिलेले नाही. उलट वीज कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे भरमसाठ विजबिले आली. त्याबाबत रास्त सवलत देण्यासही सरकार तयार नाही. त्यामुळे भाजपाने या प्रश्नावर जनहितासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ठिकठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते सोमवारी विजबिलांची होळी करून सरकारचे लक्ष वेधतील. जनतेने या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले

लोकजागर ओबीसी जनगणना सिल्लोड तालुका समन्वयक पदी प्रा.सागर जैवाळ यांची निवड.

0

 

सूर्या मराठी न्युज प्रतिनिधी.

आमची जनगणना आम्हीच करणार या ऐतिहासिक सत्याग्रहात सहभागी धुरा सांभाळणाऱ्या जिल्हा व तालुका समन्वयक यांची अधिकृत यादी लोकजागर चे अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर यांनी जाहीर केली
लोकजागर अभियान तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात 18 ऑक्टोबर 2020 पासून  आमची जनगणना आम्हीच करणार या ओबीसी जनगणना सत्याग्रहाची सुरवात झालेली आहे.त्यानिमित्त गाव वार्ड समन्वयक ,तालुका समन्वयक आणि जिल्हा समन्वयक यांची नेमणूक सुरू आहे.
प्रा.सागर जैवाळ यांची सिल्लोड तालुका समन्वयक पदी निवड करण्यात आली.
केंद्र सरकार गेल्या नव्वद वर्षा पासून टाळाटाळ करीत असल्यामुळे
आमची जनगणना आम्हीच करणार ही भूमिका घेऊन लोकजागर चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांनी ओबीसी बांधवांनी मानसिक गुलामगिरी झुगारून जाती निहाय जनगणना सत्याग्रहात सहभागी व्हावे असे ते म्हणाले.

सासरच्या छळाला कंटाळून 22 वर्षीय नवतरुणीची दुहेरीहत्या की आत्महत्या

0

 

 

अकोला निंबा येथील सुबोध तायडे याच्या सोबत पूनम भारत वाकोडे रा भेंडवळ या मुलीचे लग्न निंबा तालुका बाळापूर येथील सुबोध सुरेश तायडे यांच्या सोबत 4 मे 2020 ला बौध्द पद्धतीने संपन्न झाले होते
पूनमचे लग्न होऊन 15 दिवसातच मुलाने मोबाईल वर पाहून आपल्या पत्नी सोबत वाईट कृत्य करीत होता व पत्नीला शारीरिक त्रास होत असल्याने ती विरोध करीत होती पण त्या नाराधमाला काहीच फरक पडत नव्हता ती त्या कृत्याला मान्य नाही झाली तर लातंबूक्यांनी मारझोड करीत होता या गोष्टीची कोणाकडे वाच्यफोडलीस तर जिवंत मारून टाकीन अश्या प्रकारच्या धमक्या देत होता पुनमची तब्येत या मुळे खूपच खराब झाली होती त्या करिता पूनम ला संग्रामपूर ला पुनमच्या मामा कडे आणून सोडले होते व पूनम सोबत होत असलेला प्रकार हा पूनमने आपल्या आई वळीलांना सांगितलं व म्हणत होती की मी आता जात नाही पण आई वळीलांनी पुनमची व पुनमच्या सासर मंडळींची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला पण त्या नराधम पतीला त्या सांगण्याचा काहीच फरक पडला नाही उलट तूला पूजा करण्याकरिता लग्न केले का तू का माझी बदनामी केली याचा राग मनामध्ये घेऊन 18/11/2020 ला सासर मंडळींनी पुनमची हत्या माझी मुलगी ही 6 महिन्याची गर्भवती होती केली असा आरोप पुनमच्या वळीलांनी सूर्या मराठी न्युज    सोबत बोलतांना केला आहे

प्रेम प्रकरणातुन तरुणीने केली आत्महत्या

0

 

(सूर्या मराठी न्युज)

आत्महत्याच प्रकरण वाढती वर असून औरंगाबाद येथे ही घटना घडली एका 22 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. औरंगाबादमधील क्रांतीचौक परिसरात ही घटना घडली आहे. मयत तरुणीला तिच्या प्रियकराच्या आईने वाममार्गाला लावेन अशी धमकी दिल्यामुळे तीने आत्महत्या केल्याचा आरोप तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे.

नमिता इंगोले (वय 22, रा. क्रांतीचौक परिसर) असे आत्महत्या केलल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी विनोद खेत्रे, अनिता खेत्रे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षापासून विनोद खेत्रे नावाच्या तरुणासोबत मयत तरुणीचे प्रेमप्रकरण सुरु होते.
याची कुणकुण विनोदच्या आईला लागल्यानंतर तीने शिवीगाळ करून तूला वाममार्गाला लावेन, अशी धमकी दिली होती. या प्रकरणी मयत तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्य़ादीवरून विनोद व त्याच्या आईवर तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक गजानन सोनटक्के या प्रकारणाचे बारकीने तपास करत आहेत.

सख्ख्या 3 भावांचा विहिरीत बुडून मृत्यू

0

 

 

विहीर दुर्घटनेप्रकरणी वीज वितरण कंपनीचा दोष; नातेवाईकांचा आरोप

भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथे ते काल रात्री तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला होता. याला कारणीभूत वीज वितरण कंपनी असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

जालना – भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथे ते काल रात्री तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला होता. याला कारणीभूत वीज वितरण कंपनी असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

विहीर दुर्घटनेप्रकरणी वीज वितरण कंपनीचा दोष; नातेवाईकांचा आरोपज्ञानेश्वर (वय- 24) परमेश्वर(वय – 20) आणि सुनील(वय – 18) अशा तीन सख्ख्या भावांचा एकाच विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. पहाटेपासूनच पळसखेडा पिंपळे या गावाकडे ग्रामस्थांनी धाव घेतली. या भावांचा मृत्यू विहिरीत पडून झाला असला, तरीही हा घातपात असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच या घातपाताला कारणीभूत वीज वितरण कंपनीच आहे, असा दावा नातेवाईकांनी केलाय. वीज वितरण कंपनी दिवसा वीज न देता रात्री पुरवठा करते. यामुळे शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतामध्ये फिरावे लागते. काल देखील अशाच प्रकारे या मुलांना विजेचा झटका लागून ते विहिरीत पडल्याची शंका मृतांचे नातेवाईक ज्ञानेश्वर जाधव यांनी केला आहे. रात्री ही दुर्घटना घडल्यानंतर आज सकाळी 11 वाजता पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक रुग्णालयाकडे पाठवले आहेत. ज्या विहिरीत या तिघांचा मृत्यू झाला, त्या ठिकाणाहून एक किलोमीटर अंतरावर जाधव परिवाराचे घर आहे.

दहा हजाराची लाच पोलिस कर्मचारी ला पडले महागात

0

 

येवला : सूर्या मराठी न्युज – या लाच प्रकरणात पोलिसांची यापूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या शहर पोलीस ठाण्यातील शिपायाने लाच मागितल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या पोलीस शिपायाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अतुल सुधाकर फलके असे या पोलीस शिपायाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बाभूळगाव येथे झालेल्या दोन गटांतील वादाच्या घटनेत फलके यांनी तक्रारदार आणि त्याच्या वडिलांवर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींवर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागिलती. यासंदर्भात तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे माहिती दिली. त्यावरून लाचलुचपत विभागाने २७ ऑक्टोबरला पडताळणी केली असता, लाच मागितल्याचे समोर आले.
त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.१८) शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

लागोपाठ करण्यात आलेल्या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ

तत्पूर्वी, दुसऱ्या एका चौकशीत फलके दोषी आढळून आले होते. चौकशीत समोर आलेल्या अहवालानुसार जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील यांनी फलके यांच्यावर गेल्या आठवड्यात निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान, लागोपाठ करण्यात आलेल्या या कारवायांमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या लाच प्रकरणी पोलिसांनी छव्वी वर प्रश्न चिन्ह निर्माण होतांना दिसत आहे