इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी
तेल्हारा 23 जुलै:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने,तेल्हारा तालुक्यातील गायरान ई-क्लास जमिनीवर शेती व रहिवासी साठी केलेले अतिक्रमण निकाशीत करू नये,अशी मागणी रिपाइं अकोला जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांच्या समवेत शिष्ट मंडळाने निवेदनाच्या माध्यमातून तेल्हारा तहसीलदार यांच्या कडे करण्यात आली.
या निवेदनाच्या द्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडे पार पडलेल्या अधिवेशनात आपल्या विधान भवनातील भाषणात महाराष्ट्रातील गायरान, वन जमिनावर शेतीसाठी आणि रहिवाशी करिता 4 हेक्टर पर्यंतचे केलेले.
अतिक्रमण, निकषित न करता,नमूद जमिनीचे सातबारे आणि रहिवाशी साठी करण्यात आलेल्या अतिक्रमण धारकांना त्यांच्या नावावर नमुना आठ ‘अ’ करण्यात यावे अशा प्रकारच्या तरतूद करण्यात आली आहे.
ही बाब तेल्हारा तहसीलदार यांना पटवून दिले.त्याचं प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिक्रमण धारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी एक मंत्री आणि दोन आमदारांची समिती गठीत करण्यात आली.
असून,नमूद समितीला आपला अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिल्याचे आपल्या भाषणात सांगितले,या कडे तहसीलदार यांचे लक्ष वेदले.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तेल्हारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर ,जिल्हाध्यक्ष सुनील अवचार, यांच्या समवेत जिल्हा महासचिव जे.,पी.सावंग,तेल्हारा तालुका अध्यक्ष गणेश थोरात,तेल्हारा शहर अध्यक्ष भारत पोहरकर,तेल्हारा सचिव भीमराव तायडे, अकोट तालुका महासचिव दिनेश पेटकर, संघटक सुरज
ramdasathvale:तायडे,ओबीसी आघाडी तेल्हारा तालुका अध्यक्ष विलास मनतकार ,दिलीप थोरात, शेषराव तायडे,गजानन बोदडे,प्रकाश तायडे,भास्कर पाचपोर, वसंतराव खेट्टे,शहादेव कुरवाडे,वेणूताई डोंगरे,रामा अलकर,दिलिप भगेवार, नंदू भगेवार,देवानंद तायडे,गजानन भांगे,अर्जुन दामोदर,यांच्या निवेदनावर सह्या आहेत.