त्यांनी’ हल्ला केला अन नाचणारे वऱ्हाडी सैरावैरा पळाले ; बुलढाण्यातील थरारक घटना ( buldhananews )

 

buldhananews:बुलडाणा: लग्नाची वरात निघाली, डीजेच्या आवाजावर सगळी वऱ्हाड मंडळी थिरकत होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, उत्साह होता पण तितक्यातच असं काही घडलं की सगळ्या वऱ्हाड मंडळीला वरातीतून पळाव लागल.

.हा सगळा अचंबित करणारा प्रकार घडला तो काल रविवार रात्री बुलढाणा शहरातील जांभरुण रोड परिसरात.

ज्या ठिकाणाहून वरात निघालेली होती तिथे एका झाडावर मधमाशांच अगडबंब पोळ जमलेल होत. इकडे वरातीत डीजेचा आवाज अन् आवाजाच्या तालावर वऱ्हाडी नाचत होते.

पण डीजेच्या आवाज व कंपनामुळे मधमाशांचे पोळ उटले आणि या मधमाशांनी वऱ्हाडी मंडळींवरच हल्लाबोल केला. त्यामुळे एका मिनिटातच नाचत असलेल्या मंडळीच्या आनंदाचे वेदनेत रुपांतर झाले.

महाराष्ट्रात चालला तरी काय? 1300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक खुलासा ( Maharashtra farmers )

सगळी मंडळी सैरावैरा करत पळत सुटली, अनेकजण मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाली. यामुळे लग्न सोडून अनेकांना दवाखाना गाठावा लागला.

 बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

buldhananews:दरम्यान, या वर्दळीत नवरदेव सुरक्षित असल्याने मांगल्याचा क्षण शुभ झाला अन् अखेर शुभमंगल झालं.. सध्या जखमी वऱ्हाडींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत, जखमींची संख्या दहा आहे.

Leave a Comment