Home Blog Page 134

सिंदखेड राजा परिसरात एमआयडीसी उभारून युवकांच्या हाताला रोजगार द्या ( MIDC )

0

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे महेश भय्या डोंगरे पाटील यांची मागणी

 

MIDC: 12जानेवारी ला छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोक राजे जाधव यांच्या माध्यमातून माननीय महेश भैया डोंगरे पाटील मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक यांच्या कडे मागनी करण्यात आली होती.

सिंदखेड राजा परिसरात एमआयडीसी (MIDC) उभारून युवकांच्या हाताला रोजगार द्या अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे महेश भय्या डोंगरे पाटील यांनी केली आहे .

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

सदर निवेदनात म्हटले आहे की,मातृतीर्य सिंदखेड राजा शहराचा स्वतंत्र परिचय देण्याची गरज नाही,परंतु ज्या शहराने स्वराज्याची प्रेरणा दिली तेथील विकासाचा अनुशेष कायमच वाढत चालला आहे.

शहरातील विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागावे यासाठी आम्ही सरकार दरबारी प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. शहर विकासाच्या दृष्टीकोनातून युवक युवतींना बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी तरुण मुलामुलींना त्यांच्या पायावर उभ करण्यासाठी हाताला काम मिळाल्यानंतर नशापाणी पासून प्रवृत्त करण्यासाठी व भावी आयुष्य सुरळीत व चांगले जाण्यासाठी त्यांच्या हाताला काम देणे महत्वाचे आहे.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

MIDC: त्याकरिता सिंदखेड राजा शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर एमआयडीसी (MIDC) उभारून त्यांच्या हाताला रोजगार द्यावा,अशी मागणी महेश भय्या डोंगरे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन केली आहे.

मंदिरात कोणाला प्रवेश द्यायचा कोणाला नाही हे ही आता मोदी ठरवणार का?”; मला मंदिरात जाण्यापासून का रोखले ( Rahul Gandhi )

0

 

Rahul Gandhi : अयोध्या काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सध्या आसाममध्ये पोहचली आहे. तर जिथे काँग्रेस नेते राहुल गांधी वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थानी पोहोचले आहेत पण त्यांना आता आत जाण्याची परवानगी दिली जात नाही.

तर आता या दरम्यान, राहुल गांधींना परवानगी न मिळाल्यानंतर आता काँग्रेसचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मंदिराबाहेर धरणे धरून बसले असून आत जाण्याची परवानगी देण्याची मागणी करत आहेत.

आता तर दुसरीकडे तर मंदिरात कोणाला प्रवेश द्यायचा आहे किंवा नाही हे देखील मोदीच ठरवणार का ? असा संतप्त सवाल या ठिकाणी राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

तर आता आसामच्या बटाद्रवा पोलिस स्टेशनच्या व्यवस्थापनाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अयोध्येतील राम मंदिराचा ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा संपल्यावरच मंदिरात जाण्यास सांगितले आहे. तर तो पर्यंत मंदिराबाहेर उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते,राहुल गांधी म्हणतात,

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

“काय प्रॉब्लेम आहे? मी आत का जाऊ शकत नाही, माझा काय दोष आहे की मी मंदिरात जाऊ शकत नाही. असं काय असा संताप आरोप त्यांनी व्यक्त करताना दिसून येत आहे.

फक्त या वेळेस राहुल गांधी यांना काय अडवले जात आहे असं यावेळी राहुल गांधींसोबत काँग्रेस नेते गौरव गोगोई, जयराम रमेश आणि इतरही दिसत आहेत. जयराम रमेश म्हणाले, “एखाद्या व्यक्तीला मंदिरात जाण्यापासून रोखले जात आहे,

मग काय इथल्या खासदारालाही मंदिरात जाऊ दिले जात नाही, ही लोकशाहीची हत्या आहे. हे का केले जात आहे?”

तर आता जयराम रमेश पुढे म्हणाले, “आपण लोकशाही देशात राहतो. मात्र स्थानिक खासदार गौरव गोगोई यांनाही येथे रोखले जात आहे. हा अन्याय आहे.”

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Rahulgandhi : मग आता गौरव गोगोई म्हणाले की, सर्वांना मंदिरात जाण्याची परवानगी आहे, फक्त राहुल गांधींनाच नाही, का? त्याला मंदिरात जायचे आहे, तो भगवान शंकराचा भक्त आहे पण त्याला आत जाण्यापासून रोखले काय जात आहे असं संतप्त सवाल या ठिकाणी व्यक्त केले जात आहे.

Reliance Jio आली जबरदस्त सेवा, आता विकत घेण्याचं टेन्शन नाही; आता मिळेल रेंटने घेता येणार ( Laptop, phon )

0

 

Laptop, phon: रीलायन्स जिओनं आता एक उत्तम सेवा सादर केली आहे, ती ज्यामध्ये लॅपटॉप, फोन आणि डेटासाठी एअरफायबर सेवा स्वस्त दरात उपलब्ध करून दिली जात आहे.

तर हा एक रेंटल प्लॅन आहे, तर आपण आता ज्यामध्ये कोणताही लॅपटॉप, फोन आणि Jio AirFiber सारखी भरपूर इतर सेवा खरेदी करण्याऐवजी भाड्यानं घेतली जाऊ शकतात.

 


ही जिओची फायनान्शिअल सर्व्हिस असून विशेषतः कॉर्पोरेट्ससाठी आहे. याचा अर्थ ही सेवा सामान्य युझर्ससाठी नाही.

काय आहे Daas सर्व्हिस?

आपण पाहू ही सेवा DaaS म्हणून ओळखली जाते. तर आपण ज्यामध्ये डिव्हाइस ठराविक कालावधीसाठी भाड्यानं दिलं जातं, तर जे दर महिन्याला किंवा एका ठराविक हप्त्यात भाड्यानं दिले जाऊ शकतं.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

तर या मोठ्या कंपन्यांना एकाच वेळी हजारो लॅपटॉप आणि मोबाइल फोन खरेदी करावे लागतात, तर आता ज्यामध्ये खूप पैसा खर्च होतो, तर नफा मिळविण्यासाठी अनेक वर्षे लागतात, ज्यामुळे कंपन्यांवर खूप आर्थिक भार पडतो.

तर आता अशा समस्यांचा सामना करण्यासाठी जिओनं लॅपटॉप, फोन आणि इतर डिव्हाईसेस रेंटनं देण्याची योजना आणली आहे. तर आता ही योजना कोणत्याही स्टार्टअप किंवा छोट्या कंपनीसाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

काय आहे जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस?

रिलायन्स जिओच्या मुकेश अंबानींच्या समूह रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नवीन जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसनं DaaS चे फायदे स्पष्ट केले आहेत,

तर आता त्यानुसार DaaS फायनान्शिअल सर्व्हिस कमी जोखमीच्या आहेत.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Laptop, phon: जिओ च्या मुकेश अंबानी यांच्या मते Jio Financial Services (JFS) चं उद्दिष्ट देशातील प्रत्येक क्षेत्रासाठी आर्थिक सेवा प्रदान करणं आहे. तर आता लाभ घेयून आपलं स्वप्न पूर्ण करू सकता.

मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत घट हे स्वच्छता मोहीमेचे यश; संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( eknathshinde )

0

 

मुंबई दि. २१ – eknathshinde : मुंबई महानगरात संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबवण्यात येत असून या मोहिमेंतर्गत आज कुर्ला परिसरातील अनेक मंदिरांची स्वच्छता करण्यात आली.

या मोहिमेमध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. मुंबईत राबवण्यात येत असलेल्या संपूर्ण स्वच्छता (DEEP CLEAN) मोहिमेमुळे मुंबई शहरातील प्रदूषणाची पातळी घटली असून प्रदूषणाची पातळी ३५० वरून १०० ते ८- पर्यंत खाली आली आहे. हे या संपूर्ण स्वच्छता मोहिमेचे यश असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

कुर्ला परिसरातील शिवसृष्टी येथील श्री गणेश मंदिर, श्री. नंदिकेश्वर मंदिर, श्री हेरंब मंदिर, सिद्धेश्वर सहकारी गृह निर्माण संस्था, श्री शनैश्वर मंदिर, चेंबुर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सपूर्ण स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. खासदार राहुल शेवाळे, आमदार मंगेश कुडाळकर, माजी आमदार तुकाराम काते, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, संपूर्ण स्वच्छता मोहीम ही एक लोकचळवळ झाली आहे. टप्प्या- टप्प्याने संपूर्ण स्वच्छता मोहीम राज्यात राबवण्यात येत असून या मोहिमेच्या माध्यमातून लवकरच स्वच्छ, सुंदर व हरित महाराष्ट्र होण्यास मदत होणार आहे. या अभियानामध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे.

२२ जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन पंतप्रधान श्री. मोदी यांनी केले आहे. त्याला देशातील सर्व नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे संपूर्ण स्वच्छता मोहिमेला गती मिळाली आहे. मुंबईतही अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे.

आज कुर्ला येथील अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेचे खरे हिरो हे स्वच्छता कर्मचारी आहेत. दिवस-रात्र हे कर्मचारी मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी काम करत असल्याचेही सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

मुंबईची जगभरात एक वेगळी ओळख आहे. या ठिकाणी देश, विदेश तसेच जगभरातून नागरिक येत असतात. म्हणून त्यांना अपेक्षित अशी मुंबई पाहण्यासाठी स्वच्छ मुंबई व सुंदर मुंबई करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण स्वच्छता मोहीम (Deep Clean Drive) ही मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून सिडको, एमएमआरडीए आणि मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. या मोहिमेला शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, सफाई कर्मचारी तसेच शासकीय यंत्रणांसह नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

यावेळी परिसरातील नागरिक, तरुण मंडळांचे कार्यकर्ते, मंदिरांचे विश्वस्त, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमेदरम्यान मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता कर्मचारी, परिसरातील नागरिक आणि भाविक यांच्याशी संवाद साधला.

*रस्त्याने जाणाऱ्या मुलांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद*
दरम्यान, कुर्ला पूर्व भागात स्वच्छता मोहीम आटोपून परतत असताना रस्त्याच्या कडेला चालत जाणारी दोन लहान मुले मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना दिसली. या मुलांच्या हातात गदा होती. रस्त्याने आपल्या आईसोबत चालत जाणारी ही गदाधारी मुले पाहून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांचा ताफा थांबवला. स्वतः त्या लहान मुलांना जवळ बोलावले.

त्या लहानग्यांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत फोटोही काढला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या या आपुलकीच्या वागणुकीने ही लहान मुले भारावून गेल्याचे यावेळी दिसले.

मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलन मागे घ्यावे, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आवाहन
मराठा आरक्षणासाठी शासन सकारात्मक आहे. मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या कक्षेत बसणारे आरक्षण देण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच ओबीसी व इतर कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करावं 

eknathshinde : शाश्वत आणि कायद्याच्या चौकटीत टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला मिळावे ही शासनाची भूमिका आहे. त्यासाठी वेगवेगळ्या आघाड्यांवर शासन काम करत आहे. यासर्व गोष्टींचा विचार करता मराठा आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केले.

नणंद-भाभी ! या अफेअरच्या चर्चांदरम्यान चक्क शुबमन गिलच्या बहिणीबरोबर दिसली सारा तेंडुलकर, ( videoviral )

0

 

Videoviral: सेलिब्रिटींचे अफेअर्स, व या डेटिंग चर्चा कलाविश्वात कायमच रंगलेल्या पाहायला मिळतात.

पण मागील गेल्या अनेक महिन्यांपासून भारताचा युवा क्रिकेटर शुबमन गिल आणि सचिन तेंडुलकरची लेक साराच्या अफेअरच्या फार मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या आहेत.

आता या शुबमन आणि सारा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना फार उधाण आलं आहे. तर आता अफेअरच्या चर्चांदरम्यानच सारा तेंडुलकरला शुबमनच्या बहिणीबरोबर स्पॉट करण्यात आलं आहे.

तर आता सारा आणि शुबमनची बहीण शहनिल गिल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सारा आणि शहनिल एकाच कारमध्ये बाजूला बसल्याचं दिसत आहे. एका पार्टीनंतर त्यांना स्पॉट करण्यात आलं. या व्हिडिओत शुबमनच्या बहिणीने चेहऱ्यावर मास्क लावल्याचं दिसत आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

पण, आता पापाराझींचा कॅमेरा समोर येताच साराने तोंड लपवल्याचंही दिसत आहे. तर आता तसेच सारा लाजतानाही दिसत आहे. पण आता वुम्पला या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

तर आता या सारा आणि शहनिलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.

तर आता या “रिश्ता पक्का समझे”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने तर “अरे वाह नणंद-भाभी एकत्र” असंही एकाने म्हटलं आहे. मग काय trb”वहिनीला भेटायला आली होती ती”, अशी कमेंटही केली आहे.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करावे 

मग आता या दरम्यान, ‘कॉफी विथ करण’मध्ये सारा खानने “सारा का सारा इंडिया गलत सारा के पिछे पडा है” असं म्हणत तिच्या आणि शुबमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

 

Videoviral :तर त्यानंतर शुबमन आणि सारा तेंडुलकरच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता पुन्हा त्यांच्या डेटिंगच्या फार चर्चा रंगल्या असं दिसत आहेत.

सर्वात खतरनाक पुलाचा हा VIDEO; पहा धाडसी लोकांचीही झाली हवा टाईट ( viralvideo )

0

 

Viralvideo : हा आहे सर्वात खतरनाक व्हिडीओ जे भारतातील सर्वात लांब समुद्री पूल अटल सेतू काही दिवसांपूर्वी खूप चर्चेत आला होता.

तर आता एका अशा पुलाचा व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल होतो आहे, जो पाहूनच आपण धडकी भरेल. व हा सर्वात जगात अशी काही ठिकाणं आहेत, जिथं जाण्याचं खूप धाडस प्रत्येक जण करत नाही.

पण आता अशाच ठिकाणांपैकी हा एक पूल. जो एक फूट ब्रीज आहे. ते पण हा पूल इतका धोकादायक आहे की प्रत्येकजण त्यावर चढण्याचं धाडस करत नाही.

तर हा पूल दोन पर्वतांच्यामध्ये बांधला आहे. तर या पुलाची उंची 460 फूट आहे, तर लांबी 328 फूट म्हणजे 100 मीटर आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

ही माहिती वास्तविक हा पूल दुहेरी काचेचा पूल आहे. पुलाच्या खाली खोल दरी आहे, ज्यात पडलं तर मृत्यू निश्चित. या पुलाचं नाव आहे रुई ब्रीज. यामुळेच हा पूल नुसता बघता धोकादायक वाटतो.

मात्र, इथं अनेक लोक फिरताना दिसतात.

तर आता हा पूल आहे कुठे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. हा पूल चीनच्या झेनजियांग प्रांतातील शेंगजियानजू व्हॅलीवर बांधला गेला आहे.

मग हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @gunsnrosesgirl3 नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 12 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 73 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे,

मग हा तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाईक करून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

 लाईव्ह पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Viralvideo: तर हा व्हिडिओ पाहून कोणी म्हणतंय की ‘हा पूल आधुनिक अभियांत्रिकीचं उत्तम उदाहरण आहे’,

तर कोणी म्हणतंय की ‘मी कधीच या पुलावर चढणार नाही’. कारण कि एका युझरनं लिहिलं आहे की, ‘मी जर या पुलावर चढून वरून खाली पाहिलं तर नक्कीच मरेन’. असं कॉमेंट्स येत आहे.

पद्मश्री गायक सुरेश वाडकर सौभाग्यवती पद्मावाटकर यांनी सुरेल गीत गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले ( Sureshvadkar )

0

 

भजन, गझल, गाजलेल्या गाण्यांचे श्रोत्यांवर गारूड

सुरेश वाडकरांच्या जादूई सूरांनी गाजविला महासंस्कृती महोत्सवाचा दुसरा दिवस हजारोंच्या संख्येने श्रोत्यांची उपस्थिती

विदर्भाच्या अयोध्येत आज हंसराज रघुवंशी यांचे भक्तीगीत

नागपूर, दि. 20 – विख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या जादूई सूरांनी महासंस्कृती महोत्सवाचा दुसरा दिवस गाजवला.रामटेक गडकिल्याच्या पायथ्याशी भक्तीगीत, भजन, गाजलेली चित्रपट गाणी, गझल त्यांनी आपल्या मधूर आवाजात सादर केली.

हजारोंच्या संख्येने उपस्थित रसिक श्रोते आणि मनाला भिडणारा सुमधुर स्वर अशी साद- प्रतिसादाची मैफल रामटेकरांनी अनुभवली.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने रामटेक येथील नेहरू मैदानावर पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचा शुभारंभ काल करण्यात आला.

लाईव्ह पाण्यासाठी इथे क्लिक करा 

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी रामायणावर आधारित नृत्य नाटिकेचे सादरीकरण करीत रसिकांची मने जिंकली होती. त्यानंतर आज दुस-या दिवशी आवाजाचे जादूगर सुरेश वाडकर यांची गाणी श्रोत्यांच्या हृदयाला भिडली.

सुरेश वाडकर यांनी प्रामुख्याने हिंदी आणि मराठी गाणी गायली. अनेक हिट गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिला आहे.

हिंदी-मराठीच नव्हे तर भोजपुरी, सिंधी आणि कोकणी भाषांमध्येही अनेक गाणी गायली आहेत. आज त्यांच्या याच गाण्यांना पुन्हा एकदा नेहरू स्टेडियमवरील श्रोत्यांची वाहवा मिळविली.

आले होते जरांगेंना समजवायला, मग काय तर स्वत:च मोर्चात सामील,सरकारमधील नेत्यानंच हा मोठा निर्णय ( bacchu kadu )

नेहरू मैदानावर त्यांनी सादर केलेल्या ‘मेघा रे मेघा रे’, ‘ए जिंदगी गले लगाले’ , लगी आज सावन की फिर वो झडी है, सांज ढले गगन तले, और इस दिल मे क्या रखा है, मैं हू प्रेम रोगी यांसारख्या त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली.

‘प्रेमरोग’, ‘सदमा’ या चित्रपटातील त्यांच्या गाण्यांनी श्रोत्यांवर अक्षरशः गारूड केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी गुरुवंदना गायली.

 महोत्सवाच्या दुस-या दिवशी आ. ॲड. आशीष जायस्वाल, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसिलदार हंसा मोहने आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Sureshvadkar उद्या, दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता सुप्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशी यांच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. सर्वांसाठी हा कार्यक्रम निःशुल्क असणार आहे.

आले होते जरांगेंना समजवायला, मग काय तर स्वत:च मोर्चात सामील,सरकारमधील नेत्यानंच हा मोठा निर्णय ( bacchu kadu )

0

 

bacchu kadu: अमरावती : आले होते मनोज जरांगेंना समजवायला, मग काय तर स्वत:च मोर्चात सामील होणार; सरकारमधील नेत्यानंच घेतला हा मोठा निर्णय

२० जानेवारी २०२४ : हजारो मराठ्यांसह मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी या गावातून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने मनोज जरांगे पाटील आता थेट मुंबईत धडकणार आहे.

तर आता या वेळोवेळी सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली पण त्यांची ही चर्चा निष्फळ ठरल्याचे पाहायला मिळाले.

पाकिस्तानचा चौथा पराभव! सलग खेळाडूंनी एकमेकांवर फोडलं शेवटी खापर; आता अस्तित्वाची लढाई ( PAK vs NZ )

आता तर या सरकारमधील नेत्यानंच मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

आता सरकार म्हणून भूमिका संपली असून एक आंदोलक म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्च्यात सहभागी होणार असल्याचे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

 

हा तर जरांगे पाटलांनी सांगितल्यानुसार सगे-सोयरे या शब्दाच्या दुरूस्त्या केल्या. सरकारने या दुरूस्तीवर सकारात्मक होत सगे सोयरे याचा प्रश्न मिटला असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

येथे क्लिक करून लाईव्ह पहा 

bacchu kadu: म्हणुन आता त्यामुळे सरकार निर्दयी झाले, असे म्हणता येणार नाही, असे स्पष्टपणे बच्चू कडू यांनी सरकारला म्हटले आहे.

पाकिस्तानचा चौथा पराभव! सलग खेळाडूंनी एकमेकांवर फोडलं शेवटी खापर; आता अस्तित्वाची लढाई ( PAK vs NZ )

0

 

PAK vs NZ : पाकिस्तानी संघाने आता सलग चार सामने गमावल्या नंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डात नवा भूकंप झाला.

लाईव्ह पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

आता तर अध्यक्षांनी राजीनामा देताच एकच खळबळ माजली. तर आता पाकिस्तानी संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून तिने पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे.

यजमान न्यूझीलंडने चार सामने जिंकून ४-० अशी विजयी आघाडी घेतली. पण आता शुक्रवारी झालेला चौथा सामना गमावताच पाकिस्तानी ने तर खेळाडूंची चिडचिड झाली.

मग आता सामन्यानंतर बोलताना मोहम्मद रिझवान आणि कर्णधार शाहीन आफ्रिदी यांनी खेळाडूंवर पराभवाचे खापर फोडले.

आगामी येणाऱ्या सर्व निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने निवडणूक लढेल – अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस ( Nationalist Congress Party)

आता पाकिस्तानने चालू मालिकेत पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी केली पण विजय मिळवता आला नाही.

आता न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण, मोहम्मद रिझवान वगळता एकाही पाकिस्तानी फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

रिझवानने २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ६३ चेंडूत ९० धावांची नाबाद खेळी केली. अखेरच्या काही षटकांमध्ये मोहम्मद नवाजने २१ धावांची स्फोटक खेळी करून पाकिस्तानची धावसंख्या १५० पार पोहोचवली.

पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत ५ बाद १५८ धावा केल्या. यजमान न्यूझीलंडने प्रत्युत्तरात १८.१ षटकांत ३ बाद १५९ धावा करून सलग चौथा विजय मिळवला.

पाकिस्तानचा सलग चौथा पराभव!
सलग चौथ्या पराभवानंतर पाकिस्तानी कर्णधार शाहीन आफ्रिदीने सांगितले की, मला वाटते की ज्या पद्धतीने मोहम्मद रिझवानने सुरूवात केली होती.

तर ते पाहता आम्ही चांगली कामगिरी केली होती. पण, दुर्दैवाने अखेरच्या काही षटकांमध्ये आम्ही त्याचा फायदा घेऊ शकलो नाही. मला वाटते की या खेळपट्टीवर १७० धावा व्हायला हव्या होत्या.

मग आता जर आम्ही संधीचा फायदा घेतला असता तर नक्कीच सामना जिंकला असता. एकूणच आफ्रिदीने अखेरच्या काही षटकांमध्ये अपेक्षेप्रमाणे धावा झाल्या नसल्याचे नमूद केले.

या मोहम्मद रिझवानने पराभवानंतर आपल्या संघातील गोलंदाजांचे कान टोचले. तो म्हणाला, “माझे शतक व्हावे यासाठी मी खेळत नव्हतो. तर मला इफ्तिखारने सांगितले की, या खेळपट्टीवर १५० धावा पुरेशा आहेत. इथे मोठी धावसंख्या होऊ शकत नाही.

 

 

तर या आमच्या गोलंदाजांना विकेट घेता येत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याबद्दल उमर गुलला विचारा तो सांगेल. शाहीन आफ्रिदीने सुरूवातीला बळी घेतला पण मधल्या काही षटकांमध्ये काहीच करता आले नाही.”

PAK vs NZ: मग आता खरं तर या खेळपट्टीवर १७० धावा करायला हव्या होत्या असे पाकिस्तानी कर्णधार शाहीन आफ्रिदीने म्हटले.

आगामी येणाऱ्या सर्व निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने निवडणूक लढेल – अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस ( Nationalist Congress Party)

0

 

हिंगणघाट शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी बैठक पार पडली

या बैठकीला हिंगणघाट शहरातील सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हिंगणघाट शहरातील पदाधिकारी बैठक प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात स्थानिक साई मंदिर हॉल येथे पार पडली.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोर्चे बांधणी, आणि आगामी येणाऱ्या निवडणूका, युवकांचे संघटन मजबूत करण्याचा दृष्टीकोणातून स्तविस्तर चर्चा करण्यात आली.

बस अपघात: ६ महिने उलटूनही मात्र शासकीय मदत नाहीच, शेवटी मृतांचे नातेवाईक करणार फडणवीसांच्या घरासमोर रामनामाचा जप? ( Buldhana Bus Accident )

आगामी येणाऱ्या ग्रामपंचायत अशो कि नगर पंचायत, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा सर्व निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व ताकतीसशी लढेल व निवडून सुद्धा येईल असे मनोगत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले.

Nationalist Congress Party: यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, महिला विदर्भ विभागीय अध्यक्षा डॉ सुरेखाताई देशमुख, ओबीसी सेल वर्धा जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा उपाध्यक्ष राजेशजी धोटे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सैन्य दलाचे वर्धा जिल्हाध्यक्ष पुंडलिकजी बकाने, जेष्ठ समाजसेवक संतोषजी तिमांडे,अमोल बोरकर, अल्पसंख्याक सेल जिल्हा उपाध्यक्ष जावेदजी मिर्झा, माजी नगरसेवक बालाजी गहलोत,माजी नगरसेवक अनिल भोंगाडे,प्रवीण श्रीवास्तव,गोमाजी मोरे, मारोती महाकाळकर,अजय पर्बत,राजू मेसेकर,प्रल्हादजी तुराळे, शेखर जाधव, महिला शहर कार्याध्यक्षा सिमा तिवारी, महिला तालुका अध्यक्षा शगुप्ता शेख, सुचिता सातपुते, मिनाक्षी धाकने,सविता गिरी, विद्या गिरी, सुजाता जांभुळकर, दिपाली रंगारी,रंजनीताई महाकाळे, नितीन भुते, जगदीश वांदिले, संजय गांभुळे,नदीम भाई, किशोर चांभारे, परम बावणे, उमेश नेवारे, धनराज टापरे,मकसूद बावा,अनिल लांबट, गजानन महाकाळकर,

अरविंद ठाकरे, गजानन कलोडे, प्रवीण भुते, अनिल भुते, हेमंत घोडे, अरविंद रघाटाटे, सुशील घोडे, राजू मुडे, हर्षल सॅम्युअल, शेखर ठाकरे, रोहित बक्षी, सचिन घोडे,प्रशांत मेश्राम, अमित रंगारी, नितेश नवरखेडे, प्रशांत लोणकर, सुनील ठाकरे, विशाल मुंजेवार, वैभव साठोने, आदित्य बूटे, यांच्यासह हिंगणघाट शहरातील सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.