Home Blog Page 159

Shegaon News धार्मिककार्तिक एकादशी. श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा,एक लाखाहून अधिक भाविकांनी घेतले श्रींचेदर्शनविदर्भातील पंढरीतभाविकांची मांदियाळी

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव दि. २३ प्रतिनिधी
जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय गजानन श्री गजाननचा गजर करत संत नगरी शेगाव येथे लाखाहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत आज २३ नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशीचा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी एक लाखाहून अधिक भाविकांनी श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

कार्तिक एकादशी निमित्त आज श्रीच्या पालखीची मंदिर परिक्रमा काढण्यात आली. यावेळी भाविकांनी श्रीच्या रजत मुखवट्याचे मनोभावे दर्शन घेतले. या उत्सवामुळे शेगावात पंढरीच अवतरल्याचे चित्र दिसत होते.

दरवर्षी कार्तिक एकादशीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपुरात जातात. परंतु काही कारणामुळे पंढरपूरला जावू न शकणारे भाविक या दिवशी विदर्भातील पंढरी असलेल्या शेगावात दाखल होवून श्री चरणी नतमस्तक होतात.

दरम्यान, आज सकाळ ४ वाजता पासूनच श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. कार्तिक एकादशी निमित्त आज ५ वाजता टाळ, मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात श्रीची पालखी मंदिर परिक्रमेसाठी मार्गस्थ झाली., टाळकरी, पताका धारी वारकऱ्यांचा सहभाग पालखी सोवत होता. तत्पूर्वी संस्थानच्यावतीने श्रींच्या रजत मुखवट्याचे ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात पारंपारीक पध्दतीने पुजन केले.

त्यानंतर श्री विठ्ठलाच्या तैल चित्राचे पूजन करण्यात आले. व भाविकांनी दर्शन घेतले. पालखी सायंकाळी मंदिरात दाखल झाली. यानंतर श्रींच्या पालखीची आरती करण्यात आली. श्रींच्या समाधी मंदिर दर्शनासाठी ३ तास लागत होते तर श्रींच्या मुख्यदर्शनासाठी ३० मिनिटे लागत होते. श्रींचे दर्शन झाल्यावर राज्यातील भाविकांनी महाप्रसाद घेऊन धन्य झाले.

https://www.suryamarathinews.com/crimenews-4/
भाविकांना फराळाचे वाटप.स्वंयसेवी संस्थांच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप शहरातील काही स्वंयसेवी संस्थांच्या वतीने बाहेर गावावरून येणाऱ्या भक्तांना फराळ, चहा, केळी व पाण्याचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यामुळे शहरात सर्वत्र भाविकांची मांदियाळी दिसून येत होती

श्रींच्या मंदिरात ६० हजाराच्या वर भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ९ वाजेदरम्यान एकादशीनिमित्त भक्तांना साबुदाणा उसळ, आमटी, भगर, केळी, नायलॉन चिवडा वाटप करण्यात आला. यावेळी जवळपास ६० हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. ShegaonNews

खासदार रामदास तडस याच्या हस्ते कबड्डी मॅट चे उदघाटन

0

 

स्थानिक खासदार निधीतून दिली कबड्डी मॅट

सिंदी(रेल्वे)- स्थानिक कबड्डी खेळाडूची मागणी लक्षात घेता व आधुनिक कबड्डी खेळण्याकरिता आपल्या स्थानिक खासदार निधीतून दिलेल्या कबड्डी मॅट चे उदघाटन रामदास तडस याच्या हस्ते आज पार पडले.

याप्रसंगी खासदार तडस यांनी बोलताना सांगितले की सिंदी करिता अनेक विकास कामे या मागील दहा वर्षात करण्यात आली आहेत या ठिकाणी रेल्वे उड्डाण पूल मंजुरी असो किंवा लॉजीस्टिक पार्क असो त्याच प्रमाणे सिंदी सेलडोह कांढळी हा राष्ट्रीय मार्ग असो या व्यतिरिक्त सिंदी च्या विकासासाठी सात हायमास्क, एक ओपन जिम आणि आता कबड्डी मॅट आदी विकास कामे केलेली आहे.

सध्या देशात कबड्डी ही मॅट वर खेळल्या जात असल्याने व सिंदी हे कबड्डीचे माहेर घर असल्यामुळे येथील कबड्डी खेळाडूची मागणी लक्षात घेत कबड्डी मॅट देऊन विदर्भस्तरीय मॅट वरील कबड्डी सामने आयोजित केल्यास त्या करिता संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन तडस यांनी यावेळी दिले या सर्व विकासाचा पाठ पूरावा अमोल सोनटके यानी केले.

उदघाटन कार्यक्रमा प्रसंगी नवयुवक क्लब चे अध्यक्ष अशोकबाबू कलोडे सचिव सुधाकर खेडकर, साई स्पोर्टींग क्लब चे अध्यक्ष गंगाधर कलोडे, आशिष देवतळे ,सुधाकर घवघवे ,विद्या निकेतन संस्थाचे सचिव संजय भन्साली, स्नेहल कलोडे दत्ता कोपरकर प्रवीण सिरसिकर आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे संचालन अमोल सोनटक्के तर आभार प्रदर्शन राहुल कलोडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी गौरव कलोडे, रामेश्वर घंगारे, रामभाऊ सोनटक्के, मोहम्मद इमरान, धनराज झिलपे, धर्मेंद्र झाडे, सागर अंभोरे गुल्लू भन्साली चंदन चव्हाण आदीनी प्रयत्न केले

मंडळाच मंडप उभारताला लोखंडी रॉडचा विजेच्या तारांवर पडल्याने दोन कामागारांचा मृत्यू

0

 

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयाच्या क्षेत्रात असलेल्या धामणगाव जवळील पान्हेरा येथे बेलदार समाजाच्या कानू सती माता यात्रेला सुरूवात झाली. या यात्रोत जळगाव (खान्देश) येथील आनंद लोकनाट्य तमाशा मंडळचे पथक मनोरंजनासाठी दाखल झाले होते.

या मंडळाच मंडप उभारताला लोखंडी रॉडचा विजेच्या तारांवर पडल्याने दोन कामागारांचा मृत्यू झाल तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे.

पान्हेरा गावातील कानू सती मातेच्या दर्शनावेळी तमाशा आनंद लोकनाट्य मंडळाच्या मनोरंजनासाठी पिंडल उभारताना लोखंडी पाईपच्या विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने नाट्य मंडळात काम करणाऱ्या दोन मजुरांना आपला जीव गमवावा लागला. तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे.

यात अंकुश वायाळ रा. नारायणगाव ता. सिन्नर जि. पुणे आणि विशाल गणेश भोसले, रा.जेजूर गणपती ता. भोकरदन यांचा यांचा जागवेरच मृत्यू झाला. तर राहुल शंकर जाधव, रा.मुंबई हा गंभीर जखमी झाला.

https://www.suryamarathinews.com/crimenews-3/

घटनेनंतर तिघांनाही धामणगाव बधे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारानंतर बुलढाणा जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना मृत घोषित केले तर एकाची प्रकृती चिंताजनक होती.

ग्रामीण पोलिसांनी दिले 40 गोवंशाना जीवदान

0

 

प्रतिनिधी शाम वाळस्कर मुर्तीजापुर

 

कत्तलीसाठी अवैद्यरित्या निर्दयतेने वाहनात कोंबून नेल्या जाणाऱ्या ४० गोवंशाचे प्राण मुर्तीजापुर ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले. पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोठ्या संख्येतील गोवंश एका वाहनात कोंबून नेल्या जात असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांना मिळाली.

खात्री लायक मिळालेल्या माहितीच्या आधारे ते लगेच सुदाम घुरगुंडे,गजानन सयाम, मनीष मालठाने,ज्ञानेश्वर रडके,विनोद याडे,विजय मानकर,लांजेवार हे आपल्या ताफ्यासह राष्ट्रीय महामार्गावरील सारिका पेट्रोल पंपाजवळ पोचले व सापळा रचला. राष्ट्रीय महामार्ग ५३ वरून येणारा आझाद ट्रान्सपोर्टचा सीजी ०४ एनएक्स ४७७९ क्रमांकाचा ट्रक अडवून वाहनाची पाहणी केली असता,त्यामध्ये निर्दयतेने कोंबून ठेवलेले गोवंश आढळून आले.याबाबत पोलिसांनी वाहनचालकाला विचारणा केली.

असता,त्याच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी आरोपीकडून वाहन अंदाजे किंमत दोन लाख रुपये ताब्यात घेऊन वाहनातील कोंबलेले ४० गोवंश ताब्यात घेतले व पुढील देखभालीसह चराईसाठी श्री पुंडलिक बाबा गौरक्षण संस्थान सिरसो यांच्याकडे सुपूर्द केले. पोलिसांनी आरोपी ट्रक चालक सलमान शहा युसुफ शहा वय २८ रा.घोसला मैदापुर एमपी,संतोष भैरव भरवलाल वय ६०,मशीद अली रशीद अली वय २५ सारंगपूर एमपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे,अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे व एसडीपीओ मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्यानेतृत्वात ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.crimenews

उसनवारीचे पैसे देण्यास असमर्थता दाखविल्या ने एकास चाकू मारून केले जखमी

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव उसनवारी घेतलेले पैसे देण्यास असमर्थता दाखविल्या ने -दिपक गजानन हाडोळे वय ३५ वर्ष यास पोटात चाकू मारून जख्मी केल्याची घटना दि.२१/११/२०२३ रोजी ९.३० वा दरम्यान शिवहरी गेस्ट हाउस समोर घडली.

हकिकत अशा प्रकारे आहे दिपक गजानन हाडोळे हे काका प्रमोद हाडोळे यांचे हॉटेलवर जेवणकरीता डब्बा आणणेसाठी गेलो असता तेवढयात मंगेश विजय गणगणे रा खडकपुरा हा विजय उमाळे यांचे शिवहरी गेस्ट हाउस समोर आला व फी ला म्हणाला की, मला ८ हजार -रुपये दे फी ने आरोपी याला म्हटले की, मी तुला काही दिवस थांब मी काम करुन काही दिवसांनी पैसे देतो,

https://www.suryamarathinews.com/eknath-khadse/

असे म्हटले असता आरोपी यांने मला धक्काबुक्की करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली तेव्ढयात मंगेशने त्याचे जवळील फोल्डींगचा चाकु काढुन माझे डावे बरगडीवर मारला त्यामुळे जखम होवुन रक्त निघाले. व मंगेश याने त्या जागेवरील काहीतरी वजनदार वस्तु हातात घेवुन फी चे डावे डोळयाचे भुवइ जवळ मारले त्यामुळे जखम हावुन रक्त निघाले. तसेच मंगेश याने मला शिविगाळ करुन राप्टरने हातपाय तोडुन टाकीन अशी धमकी दिली, अशा फिचे तोंडी रिपोर्ट वरून

पोलिस स्टेशन शेगाव शहर मध्ये आरोपी विरूध्द अप नं ५८३ /२०२३ कलम ३२३, ३२४,५०४, ५०६ भादवी अन्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सहापोनी गजानन गावंडे हे करीत आहेत.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी घेतले श्रींचे दर्शन.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी यांनी केले नाथाभाऊंचा सत्कार eknath khadse

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव : महाराष्ट्र राज्याचे माजी महसुलमंत्री , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथराव खडसे यांनी दि.20/11/2023वार सोमवारला शेगांव येथील स्थानिक श्रीसंत गजानन महाराज मंदिर येथे श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले 20नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.50वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते मा.नाथाभाऊ खडसे साहेब व प्रदेश महीला अध्यक्षा रोहीणीताई खडसे यांनी श्रीचरणी नतमस्तक होऊन श्रीचा आशिर्वाद घेतला.

त्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष दिनेश भाऊ साळुंके. तालुकाध्यक्ष संजयभाऊ पहुरकर यांनी नाथाभाऊंचा सत्कार केला.

https://www.suryamarathinews.com/shegaon-2/

यावेळी वैभव पवार. शेगोकार. यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बरेच पदाधिकारी उपस्थित होते साहेबांचा हार घालून सत्कार करण्यात आला तसेच शहर अध्यक्ष दिनेश भाऊ साळुंके यांनी रोहीणीताई खडसे यांचा सत्कार केला. eknath khadse

Shegaon बस स्थानकावरून ३० वर्षीय विवाहीता मुलासह बेपत्ता

0

 

इस्माईल शेख बुलढाणा .जि.प्र.

शेगांव . तेल्हारा येथील ३० विवाहित महिला पिंपळगाव काळे येथे मावशी कडे जाते कसे म्हणून बेपत्ता झाल्यखची घटना दि.२१/११/२०२३ पूर्वी घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की डिगांबर मोहनसा उजवणे वय ३६ वर्ष व्यवसाय मुजरी रा. बंजरंग चौक, जुने शहर, पाण्याचे टाकीजवळ तेल्हारा ता. तेल्हारा जि. अकोला यांनी दि.२१/११/२०२३ रोजी शहर पो.स्टे ला फिर्याद दिली की माझे लग्न सन २०१३ मध्ये रोही गोस्ता ता. मानोरा जि. वाशिम येथील महादेव सुरपवार यांची मुलगी वैशाली हीचे सोबत झाले.

असुन, तिचेपासुन मला दोन मुल क्र १)आम वय ८ वर्ष, क्र २) कृष्णा वय ६ वर्ष असे असुन, मांगिल ८ महीण्यापुर्वी मी व माझी पत्नी वैशाली तसेच लहान मुलगा कृष्णा असे सुरत येथे कामानिमित्य गेलो होतो. तेथे माझे साळु सतिश काळे व साळी सौ. रुपाली काळे यांचे सोबत राहुन काम करत आहे.

दि. १८/११/२०२३ रोजी सकाळी ८ वा. मी माझी पत्नी सौ. वैशाली लहान मुलगा कृष्णा असे दिवाळी व भाउबिज सण साजरा करण्यासाठी गावी जाण्यास निघालो सुरत येथुन निघालो, रात्री ८.३० वा. मी माझी पत्नी सौ. वैशाली लहान मुलगा कृष्णा असे बस स्थानक शेगाव येथे तेल्हारा जाण्यासाठी बस ची वाट पाहत बसलो, बरेच वेळा बस न लागल्याने माझी पत्नी म्हणाली की, मी मुलासह माझे मावशीचे घरी पींपळगाव काळे येथे जाते,

तुम्ही रात्र गजानन महाराज मंदिर भक्त निवास मध्ये थांबा व उदया तुम्ही गावी जा, व मी उदया मुलासह गावी तेल्हारा येथे येते, असे सांगुन बस स्थानक शेगाव येथुन माझे लहान मुलासह निघुन गेली. व मी रात्र गजानन महाराज भक्त निवास येथे थांबलो.

दि. १९/११/२०२३ रोजी मी माझी पत्नी सौ. वैशाली हीचे मोबाइल क्र 8830439743 वर संपर्क केला असता, तिचा मोबाइल बंद होता. नंतर मी गावी तेल्हारा येथे जाउन पाहले असता, माझी पत्नी व मुलगा कृष्णा असे घरी पोहचले नाही. म्हणुन मी व माझा भाउ राजु उजवणे व इतर नातेवाइक यांनी परत शेगाव येथे येउन माझी पत्नी व मुलाचा शोध घेतला, तिचे मोबाइल क्र 8830439743 वर वेळोवेळी संपर्क केला असता, तिचा मोबाइल बंद येत आहे.

तसचे तिचेबाबत तिची मावशी चे घरी, तिचे मोहरी व इतर नातेवाईकांकडे विचारपुस केली असता, ती तिचे व इतर कोणत्याही नातेवाईकांकडे गेली नाही. तसेच तिचेबाबत काहीही माहीती मिळाली नाही. म्हणुन मी माझी पत्नी व मुलगा हरविलेबाबत तक्रार देण्यास आलो आहे. त्याचे शोध व्हावा, करीता तक्रार देत आहे.

https://www.suryamarathinews.com/१४-वर्षांच्या-मुलीचे-मुं/
सौ. वैशाली डिगांबर उजवणे वय ३० वर्ष व्यवसाय मुजरी रंग निमगोरा, उंची ५ फुट, बांधा सडपाळ, लाल रंगाची साडी व लाल रंगाचा ब्लाउज, पायात काळ्या रंगाची सॅन्डल, उजवे हातावर वैशाली नाव गोंदलेले क्र २ कृष्णा डिगांबर उजवणे वय ६ वर्ष . रंग गोरा उंची 3 फुट, बांधा सडपाळ , अंगात पीवळया रंगाचे टी शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, पायात निळया रंगाची साधी चप्पल, अशी फिर्याद दिली .याबाबत शहर पोलीसांनी हरविल्याची नोंद कली असुन पुढील तपास पोलीस करीत आहे. Shegaon

राष्ट्रवादीचा परिवर्तन जनसंवाद यात्रेला पोहना येथून सुरुवात

0

 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते अतूल वांदीले यांच्या नेतृत्वात झाली जन संवाद यात्रेला सुरुवात

प्रतिनिधि गुड्डू कुरैशी

 

शेतकरी ,सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या घेणार जाणून

हिंगणघाट :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात परिवर्तन जनसंवाद यातेला पोहणा येथील हेमाडपंथी शंकर मंदिरातून अभिक्षेक करुन सुरवात करण्यात आली आहे… माजी गृहमंत्री अनील देशमुख यांनी या यात्रेला हिरवी झेंडी दाखवत सूरवात
करण्यात आली…

.हिंगणघाट, समुद्रपूर सिंदी (रेल्वे) विधानसभा क्षेत्रात दि २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर पर्यंत प्रत्येक गावोगावी व घरोघरी हि यात्रा पोहचणार आहे. हि परिवर्तन जनसंवाद यात्रा अतुल वांदिले यांचे नेतृत्वात हिंगणघाट मतदार क्षेत्रातील संपूर्ण गावात जाणार असून १९ डिसेंबर रोजी समारोप होणार आहे.या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या विविध समस्या जाणून घेऊन त्याचा शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या यात्रेदरम्यान अतूल वांदीले व त्यांचे सहकारी गावा गावात मुक्काम करणारं असून यात्रा संपत पर्यंत विवीध गावातील मंदीर , शाळा हि मुक्कामाची जागा असणार आहे.घरगुती सिलेंडर, पेट्रोल, इलेक्ट्रीक बिल, यांचे गगनाला भिडलेल्या दरामुळे जनता मेटाकुटीस आली असून शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे शेतकरीही कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत परिवर्तन घडविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

आज जीवनावश्यक वस्तूचे प्रचंड भाव वाढवून महागाईने सर्वांचे कंबरडे मोडले आहे.४१० रुपयाला मिळणारे सिलेंडर आता ९६० रुपयाला विकत घ्यावे लागत आहे.पेट्रोल डिझेलचे भाव आकाशात भिडले आहे.६० रुपये लिटरचे डिझेल ९५ रुपये वाढ झाली आहे.मुलांच्या शिक्षणाची फी वाढली. जीवनाश्यक वस्तुंवर ५% जीएसटी टॅक्स लावला जात आहे

.बेरोजगाराची थट्टा लावली उच्च शिक्षित तरुणांसाठी कंत्राटी पध्दती सुरू करून शासन ठेकेदार बनलं.शाळा, महाविद्यालय, बस , रेल्वे याच खाजगीकरण सुरू झालं.ग्रामीण जनता औषध उपचाराअभावी मरणाचा दारात उभा आहे.ग्रामीण भागात दवाखाने नाही आणि दवाखाना आहे तर डॉक्टर नाही अशी विदारक परिस्थिती आपल्या मतदार संघामध्ये दिसून येत आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी जाणून बुजून या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे.कुठे नेऊन ठेवला आहे हिंगणघाट, समुद्रपूर,सिंदी (रेल्वे) मतदार संघ म्हणून आता वेळ परिवर्तनाची आली असून त्यासाठी परिवर्तन जनसंवाद यात्रा काढण्यात आली असल्याचे मत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी सांगितले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष सूनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, प्रदेश उपाध्यक्ष किशोर माथनकर, जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, राजेश धोटे,अमोल बोरकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे,सुनील भुते,जावेद मिर्झा, पोहना सरपंच नामदेवराव राऊत, माजी पंचायत समिती सदस्य ओंकारजी मानकर, तालूका अध्यक्ष राहुल वानखेडे, डॉ. वर्माजी जेष्ठ नेते,दामोदर वानखेडे, अनिलराव कोंबे, माजी सरपंच डॉ.दिवाकर वानखेडे, नीलकंठ कटारिया,तुषार थुटे, सुनील दाते उपसरपंच,राहुल गजानन वानखेडे, सुमित बारापात्रे, अमोल राऊत , मोहन मसाळकर, जगदीश वांदिले, अमोल मुडे,गजू महाकाळकर, पंकज भट्ट, राजू मुडे,सचिन पाराशर, वैभव साठोणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…

१४ वर्षांच्या मुलीचे मुंडन करून तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची अकोल्यातील घटना अत्यंत चीड आणणारी आणि संतापजनक आहे.

0

 

Crimenews १४ वर्षांच्या मुलीचे मुंडन करून तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची अकोल्यातील घटना अत्यंत चीड आणणारी आणि संतापजनक आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल होताच अकोला पोलिसांनी ताबडतोब ॲक्शन मोडमध्ये येत तासाभराच्या आतच त्या नराधमाच्या मुसक्या आवळल्यात. आता पोलिस लवकरात लवकर कारवाई करतील. व या हरामखोराला कठोरातील कठोर शिक्षा होईलच कारण महिलांची सुरक्षा व सन्मानासाठी आपले महायुती सरकार कटीबद्ध आहे.

पण या निमित्ताने एक गोष्ट पुन्हा समोर आलीय ती ही की, या प्रकरणातील आरोपी हा कुटुंबातीलच नातेवाईक होता. ओळखीतीलच व्यक्ती आपल्या मुला-मुलींवर इतक्या अघोरी थराला जाऊन अत्याचार करेपर्यंत पालक कसे काय अज्ञान राहिले?

आपल्या घरात येणाऱ्या व्यक्ती- नातेवाईक आपल्या मुलाबाळांशी कसे वागताहेत, याबाबतही पालक म्हणून आपण सतर्क राहायला हवं. मुलांना अशा व्यक्तींसोबत घरात एकटं सोडणं देखील धोकादायक आहे.https://www.suryamarathinews.com/जाफ्राबाद-शहरात-cctv/

अनेकदा मुलेही भीतीपोटी अशा घटना सांगण्यास धजावत नाहीत. त्यामुळेच पालक म्हणून मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवत त्यांच्याशी संवाद साधणे अत्यंत गरजेचं आहे, तेव्हाच अशा अपप्रकारांबद्दल मुले मनमोकळेपणाने आणि धिटाईने आपल्याशी बोलू शकतील…१४ वर्षांच्या मुलीचे मुंडन करून तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची अकोल्यातील घटना अत्यंत चीड आणणारी आणि संतापजनक आहे.

जाफ्राबाद शहरात CCTV कॅमेरे बसविण्याची युवासेनेचे मागणी

0

 

युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रमोद पाटील फदाट यांची जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

जाफ्राबाद- तालुक्यात चोरीच्या घटना या वाढत असल्याने शहरातील चौका-चौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसून चोरी व अवैध वाळू वाहतुक थांबवण्यासाठी प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रमोद पाटील फदाट यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

जाफ्राबाद शहरांच्या हद्दीतील प्रमुख चौकात प्रामुख्याने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे चौक,अहिल्यादेवी होळकर चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,महाराणा प्रतापसिंह चौक या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन शेतकरी बांधवांच्या होणारे शेतमाल चोरी,तसेच तालुक्यातील पुर्णा,धामना,केळणा या नदीपात्रातील वाळुचे अवैध चोरट्या मार्गाने उत्खनन करुन वाहतूक सर्रासपणे चालु आहे. शासनाचा दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडवून महसुलाची चोरी रेती तस्कर करित आहेत.

मौजे माहोरा ग्रामपंचायत या ठिकाणीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कॅमेरे बसविणे अत्यंत आवश्यक आहेत. कारण या ठिकाणावरून विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक नेहमी होत आहेत त्यामुळे शासनाच्या महसुलाच्या चोरी शोधणे पोलिस प्रशासनाला सोपे होईल .

मागील काही दिवसांपूर्वी व्यापारांचे गोडाऊन फोडून सोयीबीनचे पोते चोरट्यांनी लंपास केले होते. तरी सिसिटिव्हि कॅमेरे बसविणे अत्यंत आवश्यक असल्याने CCTV कॅमेरे लावल्यास कारवाई करण्यास मदत होईल. असे युवा सेना उपजिल्हाप्रमुख प्रमोद पाटील फदाट यांनी निवेदनात म्हटले आहे..