Home Blog Page 355

भव्य नागरी सत्कार

0

डी एस. पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

मागे झालेल्या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या निवडणूकीत मा.वसंतराव संभाजीराव नागदे साहेब यांचे पॅनल भरघोस मतांनी निवडून आलेले आहे.
त्या निमित्ताने उस्मानाबाद जनता सहकारी बँक शाखा निलंगा यांच्या वतीने नूतन चेरमन मा. वसंतराव संभाजीराव नागदे साहेबांचे व सर्व नूतन संचालकांचा भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी निलंगा नगरीचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडीत धुमाळ, हरिभजन पौळ, उस्मानाबाद जनता सहकारी बँक निलंगा येथील सर्व कर्मचारी वर्ग आणि निलंगा नगरीतील प्रतिष्ठीत नागरिक व व्यापारी उपस्थित होते.

घुग्घुस भाजपातर्फे नाताळ निमित्त ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

शनिवार 25 डिसेंबर रोजी नाताळ निमित्त घुग्घुस भाजपातर्फे ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.
घुग्घुस शहरातील अनेक चर्चला भाजपा पदाधिकाऱ्यांनी भेट दिली व ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
ख्रिश्चन धर्मात प्रभू येशू मसिह यांचा जन्मदिवस नाताळ हा उत्साहात साजरा केला जातो.
त्याअनुषंगाने घुग्घुस भाजपा पदाधिकाऱ्यांनी अनेक चर्चला भेट देऊन ख्रिस्ती बांधवासह केक कापून नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
नाताळ निमित्त घुग्घुस शहरातील चर्च रोषणाईने सजविण्यात आले होते. ख्रिस्ती बांधवांनी चर्च मध्ये एकत्रित येऊन प्रार्थना केली व एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितु चौधरी, माजी सरपंच संतोष नुने, भाजपाचे नामदेव डाहुले, विनोद चौधरी, सिनू इसारप, साजन गोहने, नितीन काळे, सिनू कोत्तूर, अनिल मंत्रिवार, उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय समोर आझाद हिंद शेतकरी संघटनेचे  3 रा दिवशीही आमरण उपोषण,सुरुच

0

 

वन विभागाच्या दोषी अधिकारी यांना कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी कारवाई करून बडतर्फ करा या मागणी करिता आझाद हिंद संघटनेच्या वतीने दिनाक 24/12/2021 रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा समोर आमरण उपोषण,!, सुरु केले तरी आज दिन दिवस झाले कोणत्याही प्रकारची करवाई झाली नाही.

जीगाव प्रकल्प भूसंपादन प्रकरण क्र,33,2009/10 मौजे यरली जुने गावठाण तालुका नांदुरा जिल्हा बुलडाणा येथील 156 घरांचे लाक डांचे मूल्यांकन चुकीचे व अवैध प्रकारे स्वतःचे स्वार्था साठी वन रक्षक पठाण यांनी शासनाची व लाभार्थ्यांची फसवणूक केली,
तसेच संग्रामपूर तालुक्यातील सावळी येथील वन जमिनीवर अतिक्रमण, जप्ती केलेला वाळूसाठा,,जेसीबी द्वारे रस्तातयार केल्या प्रकरणात पंचनामा असताना ठोस कारवाई न केल्यामुळे,अधिकारी,डी,बी, कटारिया यांचेवर निलंबनाची कारवाई करा !, या मागणीसाठी दिनाक 24/12/2021 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय समोर वर्षाताई ताठरकार ,शेख सईद शेख कादिर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे,

सावळी येतील वन जमिनीवर जप्ती केलेल्या , वन परिक्षेत्र अधिकारी जळगाव जा यांनी अद्याप ठोस कारवाई न केल्यामुळे पदावरून बडतर्फ करा,अशी तक्रारीत मागणी केली जिल्हा अधिकारी कार्यालय बुलडाणा यांना दिनांक 24/12/2021 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले की पचनामा नुसार योग्य ती कारवाई करणे अपेक्षित असताना अद्याप कार्यवाही केली नाही व करत नाही, करिता कर्तव्यात कसूर केल्या वरून पदावरून कमी करणे न्याय व उचित आहे, असे तक्रारीत नमूद केले आहे,
तक्रारीवर सौ, वर्षाताई तथरकर व शेख सईद शेख कदिर , सुर्या मराठी न्यूज़ साठी अनिलसिंग चव्हाण सह निलेश चिपडे बुलढाणा

येशु मसीहच्या जन्मदिनी ” शहरातील चर्चना काँग्रेस तर्फे भेट

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : ख्रिश्चन समाजाचे प्रेषित येशु मसीह यांचा जन्मदिवस हा नाताळ म्हणून साजरा केला जातो.
नाताळ हा पवित्र उत्सव ख्रिस्ती बांधवातर्फे अत्यंत आनंदांत साजरा केल्या जातो.
या दिवशी ख्रिसमस “ट्री” ला आकर्षक रित्या सजविल्या जाते
समाजबांधव चर्च मध्ये एकत्रित होत प्रार्थना करतात एकमेकांना शुभेच्छा देतात.

आज नाताळच्या पवित्र दिनानिमित्त घुग्घुस शहर काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व पदाधिकारी यांनी शहरातील विविध चर्चला भेट दिली केक कापून समाजबांधवाच्य आनंदात सहभाग घेतला याप्रसंगी रोशन दंतालवार, नुरुल सिद्दिकी, विशाल मादर, स्टीवन गुंडेटी,अलीम शेख,मोसीम शेख,सुकमार गुंडेटी, रोहित डाकूर, बालकिशन कुळसंगे,अंकुश सपाटे,सुनील पाटील,आरिफ शेख, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

प्रधानमंत्री घरकुल योजनेत भ्रष्टाचार चौकशी प्रकरणात हिंगणघाट नगरपालिका लोकप्रतिनिधी व प्रशासन पारदर्शी किती !

0

 

हिंगणघाट नगरपालिका मुख्याधिकारी यांना दि. 25. 10 .21 ला दिलेल्या निवेदनात घरकुल अपंग लाभार्थी प्रदीप कवडूजी मुकपिडवार राहणार डॉ मुजुमदार वार्ड हिंगणघाट यांनी सांगितले की, हिंगणघाट नगरपालिकेत प्रधानमंत्री अतिक्रमण घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. यादीची चौकशी करावी व खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा या संदर्भात हिंगणघाट नगरपालिका मुख्याधिकारी यांनी दि. 9. 12 .21 ला उत्तर दिले कि, तुमचे घरकुल नामंजूर करण्यात येत आहे कारण ही जागा आरक्षित आहे या जागेवर खेळाचे मैदान म्हणून तुम्हाला घरकुल नामंजूर करण्यात येत आहे. या जागेवर नगरपालिका यांनी खेळाचे मैदान दाखविले आहे.
मोका चौकशी केल्यास या जागेवर कुठेही खेळाचे मैदान दिसत नाही तर संपूर्ण जागेवर घरे आहे तसेच या ठिकाणी अनेक योजनेतू रोड ,नाल्या झालेले आहे घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे शिवाय या ठिकाणी एकीकडे हिंगणघाट नगरपालिका प्रशासन नकाशा मध्ये प्ले ग्राउंड खेळाचे मैदान सांगते तर दुसरीकडे दलित वस्ती योजनेतून रोड बनविते नगरपालिकेकडून अण्णाभाऊ साठे दलित वस्ती योजनेतून रोड सुद्धा करण्यात येणार आहे नगरपालिका मुख्याधिकारी यांनी दिलेले उत्तर व प्रत्यक्ष जागेवर मोका चौकशी केल्यास जागेवर घरांची वस्ती आहे. यावरून हिंगणघाट शहरातील लोकप्रतिनिधी व प्रशासन किती पारदर्शी आहे हे लक्षात येते.
संबंधित पुराव्यासहित लवकरच जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषणास बसणार आहे असे प्रदीप मुकपिडवार यांनी सांगितले आहे .

अटल बिहारी वाजपेयी म्हणजे भारतीय राजकारणातील एक सुसंस्कृत चेहरा! – जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

0

 

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी.

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

सुशासनदिनी श्रमिकांना श्रमिक कार्डचे वाटप,जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार व कविता वाचन संपन्न.

घुग्घुस | शनिवार, दि. २५ डिसेंबर.
देशाचे माजी पंतप्रधान, श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहराच्या वतीने आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात आजचा दिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचेहस्ते अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे स्थानिक जेष्ठ पदाधिकारी महिकाली राजन्ना, पूनम शंकर, वासुदेव ठाकरे, शैलेंद्र कक्कड, निलकंठ नांदे आणि मंदेश्वर पेंदोर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्रमिक बांधवांसाठी केंद्र सरकारतर्फे मोफत देण्यात येत असलेल्या श्रमिक कार्डचे श्रमिकांना वाटप करण्यात आले. यासोबतच श्रद्धेय अटलजींच्या “क्या हार में, काय जीत में, किंचित नहीं भयभीत में” या कवितेचे याठिकाणी वाचन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना, माजी पंतप्रधान श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी जी हे देशाचे सर्वमान्य नेते होते. पंतप्रधान म्हणून देशाच्या निर्णयप्रक्रियेत, विकासप्रक्रियेत सर्वांना सहभागी करुन लोकशाही व्यवस्था बळकट करण्याचे काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केले. अटलजींच्या माध्यमातुन भारतीय राजकारणाला सुसंस्कृत चेहरा मिळाला. देशातील सर्व धर्म, पंथ, प्रांताच्या बंधु-भगिनींच्या मनात विश्वास निर्माण करणारे अटलबिहारी वाजपेयी जी आदर्श राजकारणी होते. त्यांच्या नेतृत्वात नवभारताच्या निर्मितीसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले. आणि आता मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील “अटलजी ते मोदीजी” असा विकासाचा आलेख वृद्धिंगत होतो आहे. असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले. यासोबतच त्यांनी मोदी सरकारच्या सात वर्षीय लोकहिच्या निर्णयांची, विविध योजनांची उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, माजी जि. प. सभापती नीतू चौधरी, माजी सरपंच संतोष नुने, संजय तिवारी, साजन गोहणे, सिनू इसारप, बबलू सातपुते, शरद गेडाम, अनिल मंत्रीवार, विनोद चौधरी, अनंता बहादे, महेश मुक्के, डोमाजी वानखेडे, श्रीधर तग्रवार, शिवम भारती, विजय ठाकरे, नितीन काळे, अशोक नागभीडकर, शंकर मिसाळा, वसंत भोंगळे,विनोद जंजर्ला, झिन्नु कामतवार, अरूण साठे, पियुष भोंगळे, रूक्मिदेवी यादव, तिरुपती कोंडागुर्ला, ज्योती बट्टे, सोनी कैथवास, अनिता श्रीवास, लैजा ठाकरे, सुमार सरोज, आदींसह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते, लाभार्थी तसेच नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

राज्यातील कोरोना परस्थिती पुन्हा ढसळण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनची वाढणारी रुग्णसंख्या पाहता राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आली आहे.

0

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच टास्क फोर्सची बैठक घेतली. त्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आलाय. (Night Curfew in Maharashtra) यासंदर्भात अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होणार आहे.

राज्यातल्या कोविड (Covid19) रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर आज टास्क फोर्स (Covid19 Task Force) सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Thackeray) यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष (New Year) स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत आज 24 रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले.

ओमिक्रॉनची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर बैठका घेतल्या. या आढावा बैठकांमधून येणाऱ्या 15 दिवसांचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती मिळते. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ओमिक्रॉनचा पीक पिरेड असण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. त्या अनुषंगाने पावलं उचलण्यात येत आहेत.

नक्की काय घडलं टास्क फोर्सच्या बैठकीत?

राज्यभरात रात्रीची जमावबंदी लागू होणार

५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत

आज दुपारपर्यंत राज्यशासन नवी नियमावली जाहीर करणार

३१ जिसेंबरच्या पार्श्वभूमीवर चौपाट्यांवर रात्रीची जमावबंदी

फटाके फोडता येणार नाहीत, आतषबाजी नाही

लग्नसमारंभ, कार्यक्रम यांवरही निर्बंध

१०० जणांनाच परवानगी, आधी ही मर्यादा २०० होती.

बंदिस्त जागेतील कार्यक्रम

समारंभ , लग्न, इतर कार्यक्रम यांसाठी 100 लोकांनाच परवानगी

२५% किंवा १०० यामध्ये जी कमी ती मर्यादा लागू

ओपन ५०% किंवा १०० यामध्ये जी कमी ती मर्यादा लागू100 लोकांनाच परवानगी

रेस्टरंट- 50% क्षमतेनच सुरु राहणार

प्रशासनाचं आता हॉटेल ,रेस्टॉरंटकडे बारकाईनं लक्ष असेल

मुंबईची स्थिती काय?

३ महिन्यांनंतर मुंबईत अचानक स्पाईक

ऑक्टोबरमध्ये मुंबईतील दरदिवशी वाढणारी रुग्णसंख्या ५५० -६०० होती…

३ महिन्यांनंतर रुग्णसंख्यावाढ बघायला मिळतेय

मुंबईत दरदिवसाला 45 हजार टेस्टींग होत आहेत

काल बैठकीत टास्क फोर्सचा भर कशावर होता?

जलद लसीकरण मोहीम

बुस्टर डोस बाबत केंद्राकजे पाठपुरावा करणे, किमान हेल्थ/फ्रंटलाईन वर्कर्सला बुस्टर डोस मिळावा

केंद्राकडे लहानमुलांच्या लसिकरणासाठी पाठपुरावा करावा

लॉईड्स मेटल कंपनी मधून होणाऱ्या जड वाहनांची वाहतूक घुग्घूस शहरातील मुख्य मार्गावरून बंद करण्याची मागणी आम आदमी पार्टी घुग्घूस द्वारा करण्यात आली….

0

 

(चंद्रपूर घुग्घूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

मागील काही वर्षा पासून घुग्घूस शहराला प्रदूषणा मध्ये अव्वल दर्जाचे स्थान मिळवून देण्याचे काम घुग्घूस येथील लॉईड्स मेटल & एनर्जी लिमिटेड कंपनी द्वारा करण्यात आले सोबतच घुग्घूस शहराला बिमाऱ्यांचे माहेर घर बनविण्याचे काम या कंपनी द्वारा करण्यात आले.ज्यामुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये दमा, कॅन्सर, अटॅक, त्वचारोग, गर्भामधून च बाळ बिमार होणे, २-३ वर्षाच्या नवजात शिशूना ५००-६०० शुगर सारख्या आजाराना तोंड द्यावे लागत आहे सोबतच ऑक्सिजनचा कमतरतेमुळे झोपेतच मृत्यू होणे यासारख्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.इतकं सर्व असून सुद्धा या कंपनी मधून मोठ्या प्रमाणामध्ये अवैध्य रित्या जड वाहनांची वाहतूक घुग्घूस शहरातील मुख्य मार्गावरून करण्यात येत आहे. ज्यामुळे शहरातील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या वाहतुकीमुळे ट्रॅफिक जाम सारखी समस्या सोबतच अपघाताचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे. हे सर्व पाहता आम आदमी पार्टी घुग्घूस द्वारा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर, लॉईड्स मेटल & एनर्जी लिमिटेड घुग्घूस, नगरपरिषद कार्यालय घुग्घूस यांना ही वाहतूक गावातून बंद करून नियमाप्रमाणे देण्यात आलेल्या मार्गाने वाहतूक करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली व ही वाहतूक शहरातून बंद झाली नाही तर येत्या काही दिवसांमध्ये आम आदमी पार्टी द्वारा याचा तीव्र विरोध करण्यात येईल. यावेळी शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी म्हटले की येणाऱ्या २०२२ मध्ये घुग्घूस शहराला पूर्णपणे प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प आम आदमी पार्टी ने केलेला आहे.
त्यावेळी शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, विकास खाडे, आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, सागर बिऱ्हाडे, सारंग पिदुरकर, निखिल कामतवार, दिनेश पिंपळकर, सोनू शेत्तीयार,स्वप्नील आवळे, अभिषेक तालापेल्ली, संतोष सलामे, अंकुश उइके, प्रशांत पाझारे, सद्दाम शेख, अनुप नळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

अवैध बायोडिझेल तयार करत असलेल्या कंपनी वर पोलीस प्रशासन व तहसील प्रशासनाच्या वतीने छापा

0

 

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)

मलकापूर येथिल MIDC परिसरात मागील कित्येक महिन्यापासून केमिकल युक्त पदार्थ पासून बायोडिझेल तयार करण्यात येत असुन त्याची सरास पणे अवैध रित्या कुठलाही परवाना नसताना विक्री होत होती परंतु प्रशासन ने त्याबद्दल कुठलीही ठोस अशी कारवाई अद्याप पर्यंत केली न्हवती परंतु DYSP अभिनव त्यागी यांना या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी तहसील प्रशासनाला सोबत घेऊन या अवैध डिझेल कम्पनी वर काल रात्री च्या सुमारास छापा टाकला असता इथे अवैध तयार करण्यात आलेले 60000 लिटर बायोडिझेल च्या नावावर तयार करण्यात आलेले केमिकल सापडले तिथे टँकर मध्ये या केमिकल युक्त डिझेल टँकर मध्ये भरत असतांना आढळले त्या संदर्भात त्या केमिकल युक्त डीझेल चे नमुने घेण्यात आले असुन ते पेट्रोलियम लॅब इथे तपासणीसाठी पाठवण्यात आले व पुढील तपास मलकापूर तहसील प्रशासन करीत असल्याची माहिती DYSP अभिनव त्यागी यांनी दिली .
जिल्हा प्रशासनाने या अवैध बायोडिझेल ला आळा बसावा याकरीता मागील काही महिण्याआधी एका विशिष्ट टीमची नेमणूक केली असुन या टीमने कुठलीही ठोस अशी कारवाई केली नसल्याचे दिसुन येत आहे
परंतु या मोठ्या व धाडसी कारवाईमुळे आता अवैध डिझेल बनवणारे व विक्री वाल्यांचे धाबे दणाणले ते दिसून येत आहे

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ येथे थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी

0

 

डी. एस. पिंगळे

निलंगा तालुका प्रतिनिधी
येथे थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री संजीव कदम सर.प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यालयाचे सहशिक्षक श्री एस के जाधव सर व श्री के एच मंदे सर हे होते यावेळी मंचावर उपस्थित श्री.पाटील सर गणित शिक्षक श्रीकुन्हाळे सर, श्री एम एस धुमाळ सर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पाटील सर यांनी केले श्री जाधव सर यांनी रामानुजन यांचा जीवन परिचय करून दिला. व त्यांनी केलेले कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले व श्री मंदे सर यांनी विद्यार्थी व गणित यांचे सहसंबंध व जीवनामध्ये गणिताची आवश्यकता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य श्री कदम सर यांनी जन्मापासून माणवाच्या प्रत्येक कार्यामध्ये गणिताची किती आवश्यकता आहे, व गणिताच्या माध्यमातून जीवन किती सुखमय, सुखकर होऊ शकतं याचे सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे संचालन श्री काळे सर तर आभार प्रदर्शन श्री मुजावर सर यांनी केले……..