Home Blog Page 36

न्यायाची प्रतीक्षा दिव्यांग शाळा अधीक्षक समान वेतनश्रेणी पासून वंचित अजब अधिकाऱ्यांची गजब भूमिका (buldhana )

0

 

 

लोणार प्रतिनिधी सय्यद जहीर

दिव्यांगाच्या कल्यानार्थ समाज सेवि संस्थान मार्फत दिव्यांगाच्या विशेष निवासी शाळा, निवासी कर्मशाळा कार्यरत आहेत. यात दिव्यांग मुलांची वसतिगृहावर सर्व प्रकारची अत्यंत महत्वाची जबाबदारी हि वसतिगृह अधीक्षक / गृहपाल यांची असते यात 24 तास त्यांना शाळा स्तरावर मुख्यालयी हजर राहणे व आपल्या सामान्य मुलांपेक्षा या विशेष मुलांची काळजी घ्यावी लागते. असे करित असतांना या वसतिगृह अधीक्षक व गृहपाल यांनी शासनाकडे जेव्हा आम्ही विशेष पदवीका धारक आहोत तसेच आम्हच्या जबाबदारी चा कालावधी व जोखीम याच शाळेत कार्यरत विशेष शिक्षकांच्या तुलनेत जास्त असल्याने विशेष शिक्षकांना मिळणाऱ्या वेतन श्रेणीनुसार वेतन मिळावे याची मागणी होऊ लागली. अनेक वेळा दिव्यांग कल्याण, आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत वसतिगृह अधीक्षक व गृहपाल या पदाची वेतन श्रेणी सुधारणा करणे योग्य आहे.

जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यास त्याची जागा दाखवून देऊ डॉ. गोपाल बछिरे(lonarnews )

असे मत व्यक्त करण्यात आले आहे. परंतु वेळोवेळी पाठविलेल्या अहवाल त्रोतक स्वरूपाचे असल्याने परिपूर्ण प्रस्ताव वेतन त्रुटी निवारन समिती 2024 अन्वये गठीत समितीने पाठवावा असे दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय मुंबई यांनी मा. उच्च न्यायालय यांच्या आदेशानव्ये सादर करावयाच्या पत्रात नमूद केले.

सदर अहवाल पाठविण्यास दिरंगाई चीं परिसिमा ओलांडून झाल्यानंतर पण अहवाल शासनास प्राप्त होतं नसल्याने वेळोवेळी शासन स्तरावरून एकूण 12 स्मरण पत्र आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांना या प्रकरणी देण्यात आल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थिती मध्ये या कार्यरत वसतिगृह अधीक्षक व गृहपाल यांनी आपल्याला न्याय मिळावा व त्रुटी निवारण समितीचा अहवाल तात्काळ शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावा याकरिता मा. राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांच्याकडे मागणी धरून लावली त्यांनी पण या विषयावर सतत पाठपुरवठा केल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांनां दप्ततर दिरंगाई करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कठोर कार्यवाही व्हावी या करिता मा. मुख्यसचिव महाराष्ट्र राज्य यांना पत्र दिले. तसेच या प्रकरणी श्रीमती संगीता डावखरे सहाय्यक आयुक्त तथा अतिरिक्त कार्यभार

उपायुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालंय पुणे यांनी मिळालेल्या अतिरिक्त कार्यभार चे सोने करत तसेच गठीत त्रुटी निवारण समिती अध्यक्ष असल्या कारणाने कोणत्याही समिती सदस्यांचे मत विचारात न घेता व अहवालावर स्वाक्षरी न घेता आपली मनमानी करत अहवाल आयुक्त दिव्यांग कल्याण यांची साथ घेत शासनाकडे पाठविला. हा अहवाल पाठवितांनी सामान्य मुलांच्या विविध विभागाच्या वसतिगृहावर काम करणाऱ्या अधीक्षकांपेक्षा दिव्यांग शाळेतील अधीक्षकांची जबाबदारी कामे कमी आहेत असे स्पष्टीकरण करून अहवाल असकारात्मक पाठविला.

मग काय? खरंच दिव्यांग शाळेतील वसतिगृहावर कार्यरत अधीक्षक व गृहपाल यांच्या जबाबदारी कमी? असा प्रश्न पडला… कदाचित श्रीमती डावखरं वेगळ्या विचारांनी ग्रस्त असेल त्यामुळे दिव्यांग मुलांची तुलना सामान्य मुलांप्रमाणे केली.?

सामान्य मुले अनेक कार्य स्वतः करतात तर दिव्यांग मुलांना हे करता येत नाही.. यावर जास्त सांगायचे झाले तर ज्या घरात दिव्यांग मुलं जन्माला येते त्या घरात किती मुलांचा सांभाळ करण्याच्या अडचणी येतात हे जावे त्यांच्या वंसा तेव्हाच कळे…! यावरून समजविणे चुकीचे होणार नाही. मुळात जर

दिव्यांग शाळाची आवश्यकता नसती तर एवढ्या कमी शाळांकरिता स्वतंत्र दिव्यांग कल्याण आयुक्तालंय वं त्यात श्रीमती डावखर यांच्या सारख्या अधिकारी यांना पण शिक्षण विभागात जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या शाळा दिव्यांग कल्याण ला नसल्यामुळे यांची राज्यस्तरावर जबाबदारी कमी आहे.

त्यामुळे यांचा बेसिक इतर सहाय्यक आयुक्त च्या तुलनेत कमी व्हावा हे उचित होईल अशी दिव्यांग शाळा वसतिगृह अधीक्षक व कार्यरत गृहपाल यांची धारणा आहे. राज्य शासनाने दिव्यांग कल्याण विभाग वेगळं करून काहीही तिर मारलेला नसून या विभागाची प्रगती व विस्तारिकरणं करण्यात अशाच लालची वं सूडबुद्धीने काम करणाऱ्या लोकांमुळे राज्यात खालच्या स्तराला नेवून ठेवलेले आहे.

या विभागाला स्वतंत्र मंत्री वं राज्यमंत्री पण नाही अनेक वर्षांपासून या विभागाला मुख्यमंत्री महोदय स्वतःकडे ठेवतात या विभागाला न्याय देण्यासाठी वं अडचण दूर करण्याच्या दृष्टीने सतत पत्रव्यवहार हा कचऱ्याच्या ढीगाऱ्यात पडलेला दिसतो… मग न्याय कसे मिळणार…

महाराष्ट्र राज्य दिव्याग शाळा / कर्मशाळा संलग्न वसतिगृह अधिक्षक महासंघ.प्रवीण अवसरमोल महाराष्ट्र राज्य अपंग शाळा कर्मशाळा व अधीक्षक संघटना जिल्हा प्रतिनिधी..

जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यास त्याची जागा दाखवून देऊ डॉ. गोपाल बछिरे(lonarnews )

0

 

जनसामान्यांच्या तोंडाचा पाण्याचा घोट हिरावुन घेनार्यास सोडणार नाही

जनसामान्यस पिण्याच्या पाण्यापासुन वंचित ठेवणार्यास धडा शिकवणार :-डॉ.गोपाल बछिरे

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonarnews:जनसामान्यांच्या हक्काच्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या व त्यांच्या तोंडाचा घोट हिरावून घेणाऱ्या भ्रष्टाचारी ठेकेदार व त्यांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यास त्यांची जागा दाखविन्या करिता शिवसेना उबाठा चे जिल्हा संघटक डॉ.गोपाल बछिरे यांनी पंचायत समिती लोणार येथे आंदोलन करून निवेदन दिले.

Ravikant tupkar Car Accdent/शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला मध्यरात्री वाशीजवळ अपघात – मद्यधुंद ट्रक चालकाकडून गंभीर धडक, सुदैवाने तुपकरांसहित सर्वजण सुखरूप

केंद्र सरकारने घर घर नल, नल मे जल, ही जल जीवन मिशन नावाची योजना प्रत्येक गावोगावी पूर्ण करण्यासाठी 2023 ची मुदत देण्यात आली होती आज 2025 हे वर्ष अर्ध्यावर आले परंतु ही योजना एकाही गावात पूर्णत्वास गेलेली नाही या योजनेत कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालेला आहे, एकही काम पूर्ण झालेली नाही तरीपण त्या योजनेचे 70 ते 90% बिल काढून घेण्यात आलेले आहे.

यामध्ये ठेकेदार तथा त्यांची पाठ राखण करणारे अधिकारी सामील आहेत जनसामान्यांच्या हक्काच्या पाण्याचा घोट या लोकांनी हिरावून घेतला आहे व जन सामान्यांना जल जीवन मिशनच्या अंतर्गत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी व त्या कामातील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी पंचायत समिती लोणार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे तालुकाप्रमुख ऍड दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी शहर संघटक तानाजी मापारी, विभाग प्रमुख अशोक

Lonarnews / सरदार, वार्ड प्रमुख अमोल पसरटे, विभाग प्रमुख रामा मोरे विभाग प्रमुख तानाजी अंभोरे अशफाक खान यांनी आंदोलन करून जल जीवन मिशनची आजपर्यंतच्या संपूर्ण कामाची माहिती द्या, जलजीवन मिशनचे काम पूर्ण का झाले नाही याचे कारण द्या, अशा प्रकारची मागणी जिल्हा परिषद पाणीपुरवठा अभियंता लोणार यांना निवेदन देऊन करण्यात आली

Ravikant tupkar Car Accdent/शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला मध्यरात्री वाशीजवळ अपघात – मद्यधुंद ट्रक चालकाकडून गंभीर धडक, सुदैवाने तुपकरांसहित सर्वजण सुखरूप

0

 

लातूरवरून जालन्याकडे निघाले होते तुपकर..

अपघात की घातपाताचा प्रयत्न..??पोलिसांकडून दोन्ही बाजूने तपास सुरु..

Ravikant tupkar Car Accdent:वाशी (धाराशिव) – सध्या कर्जमुक्तीच्या मागणीवर राज्यभरात आक्रमक आंदोलन सुरू केलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला रविवारी (दि. १८ मे) रात्री १२.३० -१ वाजेच्या दरम्यान वाशी तालुक्यातील पारगाव टोलनाक्यावर अपघात झाला.मद्यधुंद अवस्थेतील ट्रक ड्राइव्हर ने भरधाव ट्रकची इनोव्हा ला मागून धडक दिली. सुदैवाने यात कुणाला जीवितहानी व गंभीर दुखापत झाली नाही.गाडीतील दोघांना किरकोळ मार लागला आहे.

रविकांत तुपकर यांना लोकवर्गणी तुन लोकांनी दिलेली ‘लोकरथ’ नामक इनोव्हा (क्रमांक MH 28 BQ 9999) पारगाव टोल नाक्यावर थांबलेली असताना मागून भरधाव वेगात आलेल्या साखरेने भरलेल्या ट्रकने (MH 44 U 1444) गाडीला जोरदार धडक दिली. ट्रक चालक अत्यंत मद्यधुंद अवस्थेत होता. या धडकेचा आवाज इतका जबरदस्त होता की स्फोट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. गाडीतील मागील सीटवर बसलेले लोक अक्षरशः समोर फेकले गेले.

Devendrafadnvis / माझ्या वाढदिवसाच्या निमीत्ताने लावलेल्या संञाची फळ खाण्यास मी नक्की येईल मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं आश्वासन

या अपघातात सुदैवाने रविकांत तुपकर यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते पूर्णतः सुरक्षित आहेत. मात्र गाडीत त्यांच्यासोबत असलेले पीए कार्तिक सवडतकर व राजाराम जाधव यांना सौम्य मार लागला आहे. तर चालक अजय मालगे व तुपकरांचे सहकारी गजानन नाईकवाडे यांना कोणतीही दुखापत नाही.Ravikant tupkar Car Accdent

ट्रक चालक हा दारूच्या नशेत होता, अपघातानंतर तो सारखे खोटे बोलत होता व माहिती लपवण्याचा प्रयत्न करत होता.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, परिस्थिती चे गांभीर्य ओळखून चालकासह ट्रकमधील किनर ला पोलिसांनी ताब्यात घेतले असून साखरेने भरलेला ट्रकही जप्त करण्यात आला आहे.

हा अपघात होता की घातपाताचा प्रयत्न, याबाबत अनेक शंका उपस्थित होत असून पोलिसांकडून दोन्ही बाजूंनी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

रविकांत तुपकर हे राज्यात कर्जमुक्तीच्या प्रश्नावर दौऱ्यावर आहेत. नुकतेच त्यांनी नाशिक, परभणी, बीड येथील दौरे पूर्ण केले असून आज अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे ‘कर्जमुक्ती एल्गार सभेला संबोधित केले. सभा आटोपून त्यांनी लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथे कार्यकर्त्यांसोबत स्नेहभोजन घेतले व त्यानंतर रात्री ११ वाजता जालन्याच्या ते दिशेने मार्गस्थ झाले असताना वाशी जवळ हा अपघात घडला.

Ravikant tupkar Car Accdent / या अपघातामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राज्यभर मोठी खळबळ उडाली होती. मात्र तुपकर हे पूर्णतः सुरक्षित असल्याचे समजताच सर्व कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित यंत्रणांकडून सखोल व सर्व बाजुनी चौकशी व्हावी अशी मागणी क्रांतिकारी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. ट्रक चालक संभाजी डोंगरे (पंढरपूर )याचेवर वाशी पोलीस स्टेशन ला कलम 281,कलम 185 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कायदेशीर प्रक्रिया सकाळी 5 वाजेपर्यंत चालू होती.

युवकाच्या अंगावर वीज पडून मृत्यू (brekingnews )

0

 

प्रतिनिधी सय्यद जहीर

brekingnews:लोणार तालुक्यातील हिवराखंड येथे दिनांक 17 .5 .2025 रोजी संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान युवक शंकर प्रभू खंड वय पंधरा वर्षे याच्यावर वीज पडून मृत्यू झाला याबाबत सविस्तर असे की बिबि परिसरामध्ये संध्याकाळी पाच वाजल्यापासून सुसाट हवा,पाऊस आणि विजाचा करकाडात होत होता त्यादरम्यान हिवराखंड येथील शंकर खंड व त्याच्या मामाचा मुलगा शेतामध्ये दूध काढण्यासाठी गेला होता.

Devendrafadnvis / माझ्या वाढदिवसाच्या निमीत्ताने लावलेल्या संञाची फळ खाण्यास मी नक्की येईल मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं आश्वासन

परंतु गोट्याजवळच वीज पडल्यामुळे त्या विजेमध्ये शंकर प्रभू खंड हा जागीच ठार झाला व त्यांचा मामाचा मुलगा ओम अंबादास लबडे राहणार लेंडी पिंपळगाव वय सोळा वर्ष तालुका सिंदखेडराजा याच्या हाताला किरकोळ दुखापत झाल्याचे समजते.

brekingnews:हि घटना घडली त्या वेळी बाजुला युवकाचे वडील प्रभुराव खंड होते एकुलत्या एका पोराचा बापिने डोळयात देखत पाहीला मुत्यु

Devendrafadnvis / माझ्या वाढदिवसाच्या निमीत्ताने लावलेल्या संञाची फळ खाण्यास मी नक्की येईल मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं आश्वासन

0

 

असं म्हणताच कार्यकर्त्यांच्या चेहर्यावर पाहायला मिळाले स्मितहाश्य

प्रतिनिधी सय्यद जहीर

Devendrafadnvis:लोणार तालुक्यातील युवा शेतकरी तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष देवानंदजी सानप यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 2022 साली त्यांच्याच शेतात 700 संत्र्याच्या झाडांची लागवड केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनातर्फे स्वागत ( Devendrafadnvis )

त्यावेळी बर्याच वर्तमान पत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती
सदर वर्तमान पत्र घेऊन देवानंदजी सानप यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेन्द्रजी फडणवीस यांना आठवण करून दिली की साहेब तुम्ही महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना आवाहन केले होते.

की वाढदिवसानिमित्त बॅनर बाजी न करता सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करावा हे तुमचं वाक्य ऐकून मी पाच एकर क्षेत्रावर संत्रा लागवड केली होती आता आमच्या शेतात संञा खाण्यासाठी आमंञण देतोय असं म्हटल्यावर देवा भाऊंनी तात्काळ होकार दिला व मी तुमच्या शेतावर नक्की येईल असे अश्वस्त केले.

Devendrafadnvis:त्यामुळे सोबतच्या कार्यकर्त्यांनी आंनद व्यक्त केला यामुळे गोपाल काबरा, प्रविण धाईत,सागर मुर्तडकर,सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनातर्फे स्वागत ( Devendrafadnvis )

0

 

अनिलसिंग चव्हाण  (मुख्य संपादक )

बुलढाणा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास बुलढाणा शहरात आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनातर्फे स्वागत करण्यात आले.Pratapraojadhav

FarmerNews / शिवरस्ता मोकळा करा अन्यथा आमरण उपोषण समाजसेविका सुनिता भांड

बुलढाणा येथे आज भारतीय जनता पार्टीच्यानियोजित जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. यानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांचे आज बुलढाण्यात आगमन झाले.यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर, भाजपचे नेते, पदाधिकारी, हजर होते.Devendrafadnvis

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचा सातबारा वैद्यकीय विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे समीर कुणावार (आमदार ) यांनी केला सुपूर्द (Sameerkumawar)

मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगर येथून हेलिकॉप्टर ने बुलढाण्यात आगमन झाले. बुलढाणा मलकापूर राज्य m
राज्य परिवहन महामंडळ कार्यशाळा, कऱ्हाळे ले आऊट येथे तयार करण्यात आलेल्या हेलिपॅड येथे आगमन झाले. यावेळी प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.

Devendrafadnvis:याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार चैनसुख संचेती, श्वेता महाले, संजय गायकवाड, विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे उपस्थित होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचा सातबारा वैद्यकीय विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे समीर कुणावार (आमदार ) यांनी केला सुपूर्द (Sameerkumawar)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- मुंबई येथे आमदार समीर कुणावार यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांची भेट घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाम च्या जागेचा सातबारा त सुपूर्द केला.

FarmerNews / शिवरस्ता मोकळा करा अन्यथा आमरण उपोषण समाजसेविका सुनिता भांड

वैद्यकीय महाविद्यालयाची जाम येथील जागा हि कृषी विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाला हस्तांतरीत करण्याकरीता आमदार कुणावार यांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता त्याचं अनुषंगाने मागील महिन्यात जाम येथील कृषी विभागाची जागा वैद्यकीय शिक्षण विभागाला हस्तांतरीत करण्याचा शासन निर्णय पारित झाला होता.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचा सातबारा वैद्यकीय विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे समीर कुणावार (आमदार ) यांनी केला सुपूर्द (Sameerkumawar)

व मा.जिल्हाधिकारी वर्धा यांनी जागेचा फेरफार करून सदर जागा अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट यांच्या नावाने करण्याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या सदर जागेची फेरफार नोंद झाली असून त्याची प्रत आज आमदार कुणावार यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे सुपूर्द केली आहे.

Sameerkumawar / शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाम च्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून महत्वाचा आणि निर्णायक टप्पा पार पडला आहे आता लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीचा मार्ग मोकळा होणार आहे अशी माहिती आमदार समीर कुणावार यांनी दिली आहे

FarmerNews / शिवरस्ता मोकळा करा अन्यथा आमरण उपोषण समाजसेविका सुनिता भांड

0

 

प्रतिनिधी सय्यद जहीर

FarmerNews:लोणार तहसील अंतर्गत बीबी व मांडवा या शिवरस्ता शंभर दिवसाच्या कृती आराखडा मधून रस्ता मोकळा करावा अन्यथा दिनांक 20 मे रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा येथील समाजसेविका सुनिता भांड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती असे की निवेदनात नमूद असे की मौजे बीबी आणि मांडवा येथील 20 ते 25 शेतकऱ्यासह वरिष्ठांना या शिव रस्ता व शिव सरळ करण्यासाठी निवेदना वर साक्ष दिले असून या निवेदनामध्ये मांडवा बीबी असा शिव रस्ता आहे हा रस्ता नागमोडी सारखा झालेला आहे.

तहसीलदारांवर शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी: वाळू माफियाची दादागिरी (revenue)

शासनाने नियमानुसार हा रस्ता 33 फूट रुंदीचा आहे परंतु त्या रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रम केल्यामुळे अवघा सात फुटाचा रस्ता शेतकऱ्यांच्या वहिवाटी साठी बाकी आहे शेतकरी गेल्या पन्नास वर्षापासून हा रस्ता शासनाच्या रेकॉर्डवर आहे तेवढा खुला करून घेण्यासाठी झटत आहेत.

परंतु काही शेतकरी याला विरोध करून वाद घडून आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि रस्ता खुला करण्यास अडथळा निर्माण करत आहे या अगोदर लोणार तहसील कार्यालय यांना शिव रस्ता खुला करून देण्यासाठी विनंती अर्ज सादर केला होता आमच्या अर्ज ची दखल घेऊन दिनांक नऊ चार 2025 रोजी आणि नऊ पाच 2025 रोजी तहसील कार्यालयाचे संबंधित सर्व अधिकारी शिव रस्त्यावर रस्ता खुल्ला व दुरुस्त करण्यासाठी आले होते.

परंतु भूमी अभिलेख चे संबंधित अधिकारी गैरहजर असल्यामुळे आम्हाला रस्ता खुल्ला करून देण्यात आला नाही कारण काहि शेतकऱ्यानी वाद घातल्यामुळे हा रस्ता खुल्ला करण्यासाठी भूमी अभिलेख आल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही असे तहसील व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले भूमी अभिलेख वाल्यांनी तहसील कार्यालयाचे दोन वेळेस पत्र व्यवहार करून सुद्धा जाणून बुजून हेतूपूर्वक भूमि अभिलेख कर्मचारी हजर राहिले नाही.

FarmerNews:परंतु या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये आम्हाला जर शिव रस्ता दिनांक 19 5 2025 पर्यंत खुला करून दिला नाही तर आम्ही दिनांक 20. 5. 2025 पासून जिल्हाधिकारी बुलढाणा येथे अमरन उपोषण करण्यात येईल असा इशारा सौ भांडताई यांनी वरिष्ठांना निवेदनद्वारे देण्यात आला प्रतिलिपी मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महसूल राज्यमंत्री महाराष्ट्र जिल्हाधिकारी बुलढाणा पोलीस अधीक्षक बुलढाणा व लोणार तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले

board exam result / सहकार विद्या मंदिर बीबी शाळेची 100% निकालाची परंपरा कायम

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

board exam result:एसएससी परीक्षा फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल 13 मे 2025 रोजी जाहीर झाला असून ही परीक्षा म्हणजेच शालेय जीवनाचा महत्त्वाचा टप्पा पार करून महाविद्यालयीन शिक्षणाकडे वाटचाल करण्याचा प्रारंभ आहे.

तहसीलदारांवर शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी: वाळू माफियाची दादागिरी (revenue)

यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा निकाल हा 95.62% लागला असून निकालाच्या बाबतीत जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे त्याचप्रमाणे लोणार तालुक्यातील येणारे गाव बीबी येथील सहकार विद्या मंदिर वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाचे मार्गदर्शन.सततचा सराव व परिश्रमाच्या जोरावर मागील काही वर्षापासून ची परंपरा कायम ठेवत याही वर्षी शंभर टक्के निकाल ठेवून जिल्हाभरात नाव चमकवले आहे.

 

शैक्षणिक सत्र 2024 25 मध्ये 109 विद्यार्थी परीक्षेला बसले होते 90% च्या वरती 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे त्यामध्ये तनुश्री हजबे,राज खंदारे यांनी 96% गुण मिळवून संयुक्त प्रथम क्रमांक मिळवला आहे द्वितीय क्रमांक सुवर्णा सोळंके 95.20% व तृतीय क्रमांक आकांक्षा देशमुख 94.20% घेऊन प्राविण्य मिळवले आहे.

board exam result:सहकार विद्या मंदिर बीबी शाळेचे यशाबद्दल सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे सहकार विद्या मंदिर बीबी शाळेची यश म्हणजे विद्यार्थ्यांची चिकाटी कर्मचारी वर्गाची मेहनत पालकांचा शाळेवरती असलेला विश्वास या त्रिसूत्रीचे फलित असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश इंगळे उपमुख्याध्यापक आर जी राठोड सर यांनी मत व्यक्त केले आहे

तहसीलदारांवर शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी: वाळू माफियाची दादागिरी (revenue)

0

 

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक )

वाळू माफियाला थांबवण्याचा प्रयत्न, तहसीलदारांवर शिवीगाळ व धमकी

महाराष्ट्रातील संग्रामपूर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वातील महसूल पथकाने नदी पात्रात धाव घेतली. त्यांना एक ट्रॅक्टर पळून जाण्यात यशस्वी झाला,

अंबाबरवा अभयारण्यात बौद्ध पौर्णिमेनिमित्त प्राणी गणनेत ४६१ वन्यजीवांचे दर्शन; दोन वाघांचीही नोंद (ambabarwa buldhana)

पण त्या ठिकाणी तीन ईसम संशयास्पद रित्या वाळुच्या ढिगाऱ्या आढळून आल्या. त्यांपैकी दोघांनी नाव सागर उमाळे व नामदेव थारकर हे पहुरपुर्णा येथील निवासी असल्याचे सांगितले, तर तिसऱ्याने नाव लपवले.

या घटनेत, सागर उमाळे याने अश्लील शिवीगाळ करून नदी काय तुमच्या बापाची आहे काय? असे सांगितले, तर नामदेव थारकर याने दम असेल तर १० मिनिट येथेच थांबा, तुम्हाला विना नंबरच्या वाहनांनी चिरडतो.

आणि खोटे विनयभंगाचे आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करतो असी धमकी दिली. त्यानंतर ते दोघेही दोनचाकी गाडीवर निघून गेले.

revenue:या प्रकरणी तामगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.