शेगाव: शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात पोलिसांनी छापा मारून 6150 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त केला आहे.
याबाबत शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव शहर पोलिसांना गुप्त व खात्रीशिर माहिती मिळाली की दसरा नगर भागामध्ये प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत आहे.
या माहितीवरून पोलिसांनी उपरोक्त ठिकाणी छापा मारला असता सुगंधी युक्त प्रतिबंधित बहार खानदानी पान मसाला असे लिहिलेले 39 प्लास्टिक पाकीट, तसेच बिएचआर तंबाखू असा एकूण सहा हजार 150 रुपयाचा माल जप्त केला आहे.
Crimenews :याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन वाघमारे बकल नंबर 742 यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वैभव सुकडा तळोकार वय 24 राहणार दसरा नगर शेगाव विरुद्ध 128/24 कलम 328, 188 ,272, 273, सह कलम 26 (2) (1) 26 (2) (आय व्ही )59 सुरक्षा मानके कायदा सन 2006 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पीएसआय काटकाडे साहेब करीत आहेत
किरण राव ही सध्या तिच्या “लापता लेडीज” या चित्रपटामुळे प्रसिद्धीत आहे. तिने आपला एक्स पती आमीर खान याच्यासोबत या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
“लापता लेडीज” च्या प्रमोशन दरम्यान किरण व आमीर हे दोघेजण बरेचदा एकमेकांसोबत दिसले. यादरम्यान किरण आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना दिसली. आमीर खानने आपली पहिली पत्नी रिना दत्ता हिला २००२ मध्ये घटस्फोट दिला.Amirkhankiranrao
या घटस्फोटावर काहींचे म्हणणे होते की, किरण राव त्यांच्या या घटस्फोटाला जबाबदार होती. परंतु नुकत्याच झालेल्या मुलाखतीत किरण रावने स्वतः स्पष्टपणे सांगितले की, माझ्यामुळे आमीरने घटस्फोट घेतला, असे लोकांचे म्हणणे आहे.
मात्र हे पूर्णपणे खोटे आहे.”लगान” चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आम्ही दोघे एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. याच काळात आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आम्ही फक्त २-३ वेळाच बोललो, यावर तर कुणाचा विश्वास सुद्धा बसणार नाही. २००४ मध्ये आम्ही एकमेकांसोबत बाहेर जायला सुरुवात केली.
Amirkhankiranrao:तेव्हा आमीर मंगल पांडे चे शूटिंग करत होता.किरण राव आणि आमीर खान हे २००४ मध्ये विवाहबंधनात अडकले.
त्यांना आझाद नावाचा मुलगा देखील आहे. त्यानंतर २०२१ मध्ये आमीर व किरण एकमेकांच्या परवानगीने वेगळे झाले. किरण म्हणते की, माझ्यासाठी माझा मुलगा सर्वात महत्वाचा आहे, त्याला कोणत्याही गोष्टीमुळे त्रास होणार नाही, याची मी सर्व प्रथम काळजी घेते.
बिग बी अमिताभ बच्चन यांची ॲंजिओप्लास्टी करण्यात आली आहे. मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार ८१ वर्षीय अमिताभजींना खांद्याच्या समस्येमुळे शुक्रवारी सकाळी ११ च्या दरम्यान मुंबईतील नामांकित कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अमिताभ बच्चन व त्यांच्या आप्तेष्टांकडून याबाबत अजून कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही.
अलीकडे अमिताभ बच्चन यांची तब्येत फारशी ठीक नसल्याने ते सतत चर्चेत असतात. हल्लीच त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे आज त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले गेले.amitabh bachchan
यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवरून एक ट्विट सुद्धा केले आहे. “आपणां सर्वांचे मन:पूर्वक आभार” असे त्यांनी या ट्विट मध्ये लिहिले आहे.
अमिताभजींचे ट्विट वाचून सर्वांना बरं वाटत आहे. थोडक्यात म्हणजे, अमिताभ बच्चन यांना ऑपरेशन नंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याचे वाटत असेल, म्हणूनच त्यांनी ट्विट च्या माध्यमातून सांगितले.amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांचे चित्रपट तर सुपर डुपर असतात, हे तर आपल्याला ठाऊक आहेच. मात्र कित्येकदा ते चित्रपटांच्या सेटवर जखमी झालेले आहेत.
amitabh bachchan:सर्वात पहिल्यांदा “कुली” या चित्रपटाच्या सेटवर त्यांना गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांना खांदेदुखीचा त्रास असल्याचे म्हटले जाते. अमिताभजींच्या कुटुंबियांपासून ते अगदी चाहत्यांपर्यंत सर्वांनाच त्यांच्या तब्येतीची काळजी लागलेली असते.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्या पातुर्डा बु.येथील सर्व साधारण घरातील आॕटो रिक्षा चालवून आपल्या सह आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या चालकास आपसी वादावरून पोलिसांनी तामगावं पोलीस स्टेशन ला बोलावून बेदम मारहाण केली.
अश्या मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचा-यास अटक करुन सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी आबु आझमी यांनी दि.५ / मार्च रोजी जळगाव (जा.)येथे झालेल्या सभेत सांगितले .
गेल्या काही दिवसांपूर्वी संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बु.येथील सर्व सामान्य घरातून अॕटोरिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारे चालक शेख मतीन शेख मोबीन यांचेत आपसी वाद झाला. याबाबात पोलीस स्टेशन तामगावं येथे तक्रारही दाखल करण्यात आली होती.
या वरून दि.2 /मार्च 2024 रोजी सदर प्रकरण आपसात घेण्याकरिता पोलीस कॉ नंदकिशोर तिवारी यांनी तामगाव पोलीस स्टेशन ला बोलावून दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून शेख मतीन शेख मोबीन यांस बाजीराव पट्याने जबर मारहाण केली.abu asim azmi
याबाबत पो.काॕ.तिवारी व मारहाण करतांनाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांनी सदर पोलीस कर्मचा-यास त्वरीत निलंबीत करुन दोघावर गुन्हा दाखल केला आहे.
पो,हे.काॕ.तिवारी यास बडतर्फ करण्याची मागणी अबु आझमी यांनी केली.परंतु कोठे माशी शिंकली व आतून काय झाले?एकदम मारहाण झालेल्याचे बाबतीत बाजू पलटल्याचे समजते.
[शेख सईद शेख कदीर यांच म्हणणं आहे कि या प्रकरण मध्ये संबंधित पोलीस बिट जमादार तिवारी याला निलंबित केले.पण तिवारीला आदेश कोणी दिला. ठाणेदार पवार यांच्या बोलण्यावर या शेख मतीन ला मारहाण केली.त्याची चौकशी करून बडतर्फ करा.]
शेगाव: शेगाव तालुक्यातील त्रितव गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल एका १४ वर्षीय मुलाला मुलीचा विनयभंग झाल्याची तक्रार शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.
तक्रारीवरून वैभव हिंगणे या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे, ज्या मुलीचा विनयभंग झाल्याची तक्रार देण्यात आली होती.
त्या मुलीच्या वडिलांनी वैभवच्या वडिलांना प्रकरण आपसात करण्यासाठी १० लाख रुपये मागितले, त्यामुळे वैभवच्या वडिलांनी आत्महत्या केली.crimenews
आज १४ मार्चला ही घटना घडली. विठ्ठल शालिग्राम हिंगणे (५२) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.
यासंदर्भात मृतक विठ्ठल हिंगणे यांची पत्नी शारदा हिंगणे यांनी आज शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून “त्या” १४ वर्षीय मुलीच्या वडिलांसह मुलीच्या कुटुंबातील ५ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल, १३ मार्चला मृतक विठ्ठल हिंगणे यांचा मुलगा वैभव विरुद्ध गावातीलच एका मुलीने तक्रार दिली होती. “शेतात जात असताना आपल्याला वैभवने अडवले, माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुला मारून टाकतो, माझ्या जीवाचे बरेवाईट करतो” अशी धमकी वैभवने दिल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले होते,शिवाय त्याने वाईट उद्देशाने हात धरल्याचा दावाही मुलीने तक्रारीत केला होता.
तक्रारीवरून वैभव विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान हेच प्रकरण आपसात करण्यासाठी मुलीच्या वडिलांनी वैभवच्या वडिलांना १० लाख रुपये मागितले, पैशाचा तगादा लावल्याने वैभवचे वडील विठ्ठल हिंगणे यांनी आज शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. गळफास घेण्याआधी विठ्ठल हिंगणे यांनी पुतण्या सागर हिंगणे याला फोन केला.
मुलीच्या वडिलांसह ५ जणांची नावे घेत “ते” आपल्याला प्रकरण आपसात करण्यासाठी १० लाख मागत आहेत, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, तू आता माझ्या मुलाला व बायकोला सांभाळून घे ” असे सांगितले.
लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Crimenews:पुतण्या सागर हिंगणे याने घडला प्रकार विठ्ठल हिंगणे यांच्या पत्नी तक्रारदार शारदा हिंगणे यांना सांगितला. शारदा हिंगणे यांच्या तक्रारीवरून “त्या” मुलीच्या वडिलांसह तिच्या कुटुंबातील पाच जणांविरुद्ध आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.
घोट:-गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्या अंतर्गत घोट केंद्रातील गरजूवंत विद्यार्थांना आज दिनांक 14/03/2024 रोज गुरुवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेटतळा (माल)येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान प्रणित,” शिक्षक व समाज सामुहिक दत्तक पालक योजने” अंतर्गत किसन सोनटक्के मुख्याध्यापक यांनी कु. प्रणाली देविदास गेडाम वर्ग ६ वा या हुशार व गरजु विद्यार्थिनीची निवड केली.
मान्यवरांच्या हस्ते NMMS & MTSE चे स्पर्धा परीक्षा तयारी पुस्तक व निवडपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर विद्यार्थिनीला सत्र 2023 – 24 ची जीवन प्रेरणा शिष्यवृत्ती बहाल करण्यात आली.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश तोकलवार,घोट केंद्राचे केंद्रप्रमुख भगवान मेश्राम, महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान चे राज्य कार्याध्यक्ष बापु भोयर,पेटतळा शाळेचे मुख्याध्यापक किसन सोनटक्के,प्राथमिक शिक्षक,सुरेश झाडे व पुरुषोत्तम किरमे व पालक, विद्यार्थी मोठ्या सख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान प्रणित “शिक्षक व समाज सामुहिक दत्तक पालक योजने अंतर्गत जास्तीत जास्त समाज घटक तथा शिक्षक बंधु भगिनींनी “गरीब,गरजू, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्यासाठी याजनेमध्ये सहभागी व्हावे,
Voternews:बुलढाणा : यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी ( मतदारांसाठी) काढण्यात आलेल्या आदेशात सुधारणा करण्यात आली असून आता ८० ऐवजी ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना घरपोच मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २३ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मतदार यादीमध्ये ८० ते ११० वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. जिल्ह्यातील या वयोगटातील मतदारांची संख्या ५९ हजार ६२५ आहे. यापैकी काही जण चक्क शतायुषी आहेत. यातही विशेष म्हणजे ज्येष्ठा मध्ये महिलांची संख्या जास्त म्हणजे ६१ टक्के आहे.
Voternews:बुलढाणा : यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी ( मतदारांसाठी) काढण्यात आलेल्या आदेशात सुधारणा करण्यात आली असून आता ८० ऐवजी ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना घरपोच मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २३ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे..
मतदार यादीमध्ये ८० ते ११० वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. जिल्ह्यातील या वयोगटातील मतदारांची संख्या ५९ हजार ६२५ आहे. यापैकी काही जण चक्क शतायुषी आहेत.
यातही विशेष म्हणजे ज्येष्ठा मध्ये महिलांची संख्या जास्त म्हणजे ६१ टक्के आहे. ज्येष्ठ मतदारांमध्ये २३ हजार ६१३ पुरूष तर ३६ हजार १३ महिला मतदारांचा समावेश आहे.
यातील ८५ वर्षावरील मतदारांना घरपोच मतदानाची सुविधा देण्यात येणार आहे.
waternews: बुलढाणा: मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यातच जिल्ह्यातील पाणी टंचाईची दाहकता वाढली असून एक लाखावर ग्रामस्थांना याची झळ पोहोचत आहे.
लोकसभेच्या निवडणुकीचा माहौल असल्याने पाणी टंचाईची समस्या आणि ग्रामस्थांचे होणारे बेहाल याकडे लक्ष द्यायला नेतेमंडळींना सवड नाही. मार्चच्या पूर्वार्धातच टँकरची संख्या दुहेरी झाली आहे.
सध्या ४ तालुक्यातील १३ गावांना टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठयावर तहान भागविण्याची वेळ आली आहे. यामध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील कुंभारी, पिंपळगाव चिलमखा, सुरा,चिखली मधील हातनी, कोलारा, सातगाव भुसारी, डोंगरशेवली, धोडप, पळसखेड, बुलढाणा मधील वरवंड, पिंपरखेड,
या गावांतील एकूण ३५ ,३४६ गावकऱ्यांचे बेहाल होत आहे. टँकरद्वारे होणारा पुरवठा तोकडा पडत असल्याने गावकरी प्रामुख्याने आया बहिणींना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
दुसरीकडे ७ तालुक्यातील ६४ गावांची तहान अधिग्रहित खाजगी विहिरीद्वारे भागविली जात आहे. यासाठी ८१ विहिरी अधिग्रहित करण्यात आली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील १९ गावांना तब्बल ३१ विहिरीद्वारे पुरवठा होत आहे.
waternews: चिखलीत १४ गावांना १९ तर मेहकर तालुक्यातील १९ गावांना १९ विहिरीद्वारे पुरवठा करण्यात येत आहे.
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. सलमान खान हा साजिद नाडियालवालाच्या मेगा बजेट ॲक्शन चित्रपटात दिसणार आहे.
ज्याचे दिग्दर्शन ए मुरुगादास करणार आहेत. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. नाडियालवाला यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली.
या पोस्टच्या कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिले आहे की, “सलमान खान सोबतचे आमचे दीर्घकालीन कामकाज पूढे नेण्यासाठी उत्सुक आहोत. सलमान सोबतचा आमचा हा चित्रपट महत्त्वकांक्षी चित्रपटांपैकी एक आहे.
जो २०२५ च्या ईद ला प्रदर्शित होणार आहे. परंतु त्याचे नाव मात्र अजूनही उघड केले गेले नाही.”
या चित्रपटाची बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये कित्येक दिवसांपासून चर्चा सुरू होती.salmankhannewmovie
मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा साजिद नाडियालवालाने दिग्दर्शक ए आर मुरुगादास यांसोबत चित्रपटाची चर्चा केली, तेव्हा त्यांच्या मनात सर्वात पहिल्यांदा सलमान खानचे नाव आले.
पुढे साजिद यांनी सलमान खान सोबत चित्रपटाविषयी चर्चा केली व त्यानंतर सलमानने या चित्रपटासाठी होकार दिला.
या चित्रपटाचे शूटिंग भारतात तसेच पोर्तुगाल आणि इतर युरोपीय देशांमध्ये करण्यात येईल.
salmankhannewmovie: या चित्रपटाच्या बजेटविषयी म्हणायचे झाले, तर सुमारे ४०० कोटी बजेटमध्ये हा चित्रपट होणार आहे. परंतु या चित्रपटाच्या शूटिंग शेड्युल्ड आणि बजेटविषयी पुरेशी माहिती समोर आली नाही. एकंदरीत १० वर्षांनंतर साजिद नाडियालवाला आणि सलमान खान हे एकत्र काम करणार आहेत.