Home Blog Page 162

Crimenews / फटाके पाहुन फोड असे म्हटल्याने शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील चौघांनी मिळून महिलेला केली लोखंडी पाईप ने मारहाण

0

 

इस्माईल शेख.बुलढाणा जि.प्र

शेगांव:फटाके पाहुन फोड असे म्हटल्याने शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील चौघांनी मिळून महिलेला केली लोखंडी पाईप ने मारहाण केल्याची घटना इंदिरा नगर येथे घडली या बाबत शेगांव शहर पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसारराजकन्या अमरदीप रेवसकर वय ३७ वर्ष धंदा घरकाम रा इंदिरा नगर शेगाव या महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

की ती घरासमोर मुलासोबत दिवाळी निमित्त फटाके फोडत असताना फी चे शेजारी राहणारा देविदास बावस्कार व त्याचा मुलगा हरी ओम बावस्कार हा सुध्दा फटाके फोडत होता. देविदास बावस्कार याचा मुलगा हरीओम बावस्कार यांने फटाका फोडला व तो माझे अंगावर उडाला त्यावरून फी ने हरीओम बावस्कार याला म्हटले की तु पाहुन फटाके फोड असे त्यास म्हटले असता हरीओम व त्याचा भाउ डिगु बावस्कार यानी फी ला शिवीगाळ केली

व त्यानंतर त्याचे वडील देविदास बावस्कार, हे आले व त्याने त्याच्या हातमधील लोखंडी पाईप फीच्या डोक्यात मारून जखमी केले त्यामुळे फीच्या डोक्यात जखम होवुन रक्त निघाले व डाव्या डोळ्याचे भुवई वर तसेच उजव्या हाताला तसेच पाठीवर मारून जखमी केले. देविदास बावस्कार हयाची पत्नी मिराबाई बायस्कार ही आली.

व तिने फीचे केस ओढुन खाली पाडले व चापटा बुक्यांनी मारहान केली व तु आमचे नादाला लागून नको नाही तर तुला एखादया दिवशी जीवाने मारून टाकेन अशी धमकी दिली .

अशा तोंडी रिपोर्ट वरून व मेडीसर्टी वरून देविदास बावस्कार , मिराबाई बावस्कार ,. डिगु बावस्कार , हरीओम बावस्कार सर्व रा. इंदीरा नगर शेगाव ता शेगाव विरुद्ध अप क्र- 580 / 2023 कलम 324, 323, 506, 504, 34 भादवी अन्वये दाखल करून तपास शेगांव शहर पोलीस स्टेशन चे पोनी सुनील आंबुलकर साहेब यांचे आदेशाने पोहेका विनायक सरोदे ब नं 745 यांच्याकडे देण्यात आलाआहे crimenews

Sandeep Kshirsagar : माझं घरावर हल्ल्याबाबत आ.संदीप क्षीरसागरांचे मोठे विधान ; म्हणाले,”तो हल्ला

0

 

Sandeep Kshirsagar : राज्यात काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी दुसऱ्यांदा उपोषण सुरु केले परंतु त्यावेळी त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले होते. त्यात बीडमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा उफाळून दिसून आली होती.Sandeep Kshirsagar

आ.संदीप क्षीरसागर यांच्या कार्यालयाची त्यावेळेस तोडफोड करण्यात आलं होती. मात्र एवढंच नाही तर त्यांच्या घरावर देखील हल्ला करण्यात आला होता.

क्षीरसागर यांच्या घर आणि कार्यालयावर झालेला हल्ला हा मराठा आंदोलकांनी केल्याचा आरोप काहींनी राजकीय लोकांनी केला होता. परंतु, हा आरोप स्वतः आमदार संदीप क्षीरसागर यांनी आता फेटाळला आहे.

आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी या आरोपांना फेटाळून लावले आहे. याविषयी बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाला , तो हल्ला काही समाजकंटकांनी केला होता.

मराठा समाजाचा या हल्ल्याशी काही संबंध नाही. हा प्रकार चुकीचा आहे. माझं घर बीड शहरात आहे. शहरात इतर नेत्यांचीदेखील घरं आहेत. त्यामध्ये बीडमध्ये अनेक व्यापाऱ्यांची दुकानांची तोडफोड केले.

मात्र त्या व्यापाऱ्यांनी आणि सगळ्याच नेत्यांनी सांगितलं की, या हल्ल्याशी मराठा आंदोलकांचा काही संबंध नाही. मी देखील प्रामाणिकपणे हेच सांगेन की त्या हल्याशी मराठा आंदोलकांचा संबंध नाही.

संदीप क्षीरसागर काका-पुतण्यांच्या घर आणि कार्यालयावर झालेल्या हल्ल्यापाठोपाठ माजलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावरही दगडफेक झाली होती. मात्र तसेच त्यांच्या घराबाहेरील गाड्यांची जाळपोळ झाली होती. या हल्ला मराठा आंदोलकांनी केल्याचा आरोप सुरुवातीला करण्यात आला.Sandeep Kshirsagar

मात्र , पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी ८ जण हे मराठा नाहीत, अशी माहिती स्वतः आमदार प्रकाश सोळंके यानी दिली. तसेच सोळंके म्हणाले, माझ्या राजकीय विरोधकांनी आणि काही समाजकंटकांनी हा हल्ला केला. असे माध्यमांशी बोलताना सांगितलं. www.suryamarathinews.com

 

Diwali /भोई समाजा तर्फे शेगावातील निराधार महिलेला दिवाळी निमित्त साळी चोळी भेट

0

 

इस्माईल शेख बुलढाणा. जि.प्र.

शेगाव शहर .भोई समाज शेगाव शहरच्या वतीने दिवाळी निमित्त भोई समाजातील निराधार सोनाबाई बावणे यां जेष्ट महिलेला साळीचोळी ,चप्पल, फराळ देण्यात आले. उपस्थित समाज सेवक सेवक श्री भास्करराव नंदाने, राजेशजी राजगुरे,प्रभुदास सोनोने, किशोरजी मोरे, योगेशजी नळेकर,श्री उमेश राजगुरे. विजयजी साटोटे,अंबादासजी मेसरे हरिदासजी नंदाने,गजाननजी ढोके,आदी समाज सेवक उपस्थित होते.

समाजसेवक श्री उमेश राजगुरे हे नेहमी गरजु नागरिकांना नेहमी मदत करतांना चर्चेत असतात. प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांची नगरसेवक उमेदवारी करिता जनतेतून मागणी होतांना दिसत आहे. Diwali

india post    /  पोस्टात काम करण्यासाठी सुवर्णसंधी 10वी उत्तीर्णना सरकारी नोकरीची संधी

0

 

india post  / भारतीय पोस्टात विविध रिक्त पदाचे भरती करिता अधिसूचना जारी केले आहे भारतीय पोस्टद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले अधिसूचनेनुसार विविध रिक्त पदावर 10 वी उत्तीर्ण पासून ते बारावी पास उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार कडून अर्ज घेण्यात येत आहे

भारतीय पोस्टद्वारे करण्यात येणारे भरती करिता पोस्टर असिस्टंट / शॉर्टिंग असिस्टंट पोस्टमन मेलगार्ड मल्टी स्टार्टिंग स्टॉप हे पदे भरल्या जाणार आहेत तरी या भरतीसाठी उमेदवारांना अंतिम मुद्दत निश्चित करण्यात आली असून दिनांक 9 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज असणार आहे.

येथे क्लिक करावं👇👇👇👇

https://www.suryamarathinews.com/buldhana-accident-news/

 

याकरिता तसेच उमेदवारांसाठी वय मर्यदा निश्चित करण्यात आली असून. वय किमान 19ते 27 वर्षापर्यंत असणार. अर्जदाराचे अर्जाची फी 100 रुपये एवढे असेल व त्याचबरोबर या भरतीकरिता अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

ह्या दरम्यान मध्ये पोस्टर असिस्टंट या पदासाठी पदवीधर तसेच पोस्टमन व मेलघाट या पदासाठी बारावी पास असणे स्टार्टिंग स्टॉप दहावी पास असणे बंधनकारक आहे. तसेच भारतीय पोस्ट अंतर्गत होणारे भरती विषयक तपशील जमीन घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावे  india post

असेच बातमी पाहण्यासाठी सूर्या मराठी न्यूज वेबसाईटला लाईक फॉलो करायला विसरू नका

Buldhana Accident News:- भिकाऱ्याच्या मरणानंतर लाखोंचे घबाड! ‘ती’ गोधडी दिवसभर रस्त्यावर होती रस्त्यावर?

0

 

Buldhana Accident News

बुलढाणा अपघातात मरण पावलेल्या भिकाऱ्याच्या गोधडीमध्ये लाखोची रक्कम, व विविध बँकांचे पासबुक, एटीम कार्ड मिळाले. त्या पोलिसांनी प्रामाणिकपणे ती रक्कम मृत भिकाऱ्याच्या परिवाराला देण्यात आले .

दीपक बाबुराव मोरे (वय ४८) असे मृताचे नाव आहे.

८ नोव्हेंबर रोजी एक व्यक्ती सायकलवर जात होती. दुचाकीने धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची थैली रस्त्यावर तशीच पडून होती. त्या थैलीत लाखो रुपये होते. परंतु ते पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णाला पुढील उपचारासाठी अकोल्याला पाठविले.Buldhana Accident News

आला त्यानंतर सोबतच्या वस्तूंमध्ये गोधडीत आणखी मोठी रक्कम, बँकांची पासबुके, एटीएम कार्ड आणि चिल्लर भरलेली थैली होती. त्यात १ लाख ६३ हजार रोख मिळाले. एका बँकेत २६ हजार, दुसऱ्या बँकेत एक लाख नऊ हजार २८४ रुपये, इतर बँक खात्यात मोठ्या रक्कम होती . परंतु पोलिसांनी मृताची पत्नी चंदा मोरे, मुलगा धम्मपाल यांच्याकडे रक्कम सोपुन दिलं. परंतु पोलिसांना जय मल्हारीला रक्कम मृतकाचे नातेवाईकांनी दिले पोलिसांचा कौतुक होत आहे .

https://www.suryamarathinews.com/maharashtra-police-news/

सूर्या मराठी न्यूज वेबसाईटला लाईक करा फॉलो करा शेअर करा. www.suryamarathinews.com

Maharashtra police News | पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा , या घटनेमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ

0

 

Maharashtra Crime News | धुळे जिल्हातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यावर रात्री उशिरा देवपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात

या घटनेत एकच खळबळ उडाली आहे. रक्षकच भक्षक झाल्याचे कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आणि ज्यांचे शोषण झाले त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी आहे, तोच रक्षक भक्षक झाल्याची चर्चा पोलीस दलासह जिल्ह्यात होत आहे.

धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची नुकतीच धुळे जिल्हातील सायबर सेल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांची नंदुरबार जिल्ह्यात बदली करण्यात आले.

मागील काही दिवसांपासून त्यांचा एक अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यामुळे अचानक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी एका महिलेने देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

इथे क्लिक करा

https://www.suryamarathinews.com/animals/

त्यानुसार हेमंत पाटील यांच्यावर IPC 354 A, 354 B, 354 D, 509, 506, 34 तसेच
आयटी अॅक्ट कलम 67, 67 A नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे जिल्हातील पोलीस दलातील अधिकाऱ्यावर अशा प्रकारे गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे पूर्ण महाराष्ट्र मध्ये पोलिसाला सर्मशार केले.Maharashtra Crime News)

animals /बऱ्याच प्राणी पैकी हा प्राणी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत झोपतच नाही तो कोणता प्राणी आहे नाव जाणून घ्या?

0

 

सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी सर्वांना असणे गरजेचे आहे कारण त्यामुळे तुम्हाला एखादी जर बातमी जाणून घ्यायची आहेत तर त्यांचे फायदे काय आहे ते माहिती मिळेल व त्यांचे शिवाय तुमच्याकडे माहितीचा भंडार असल्यामुळे मित्र मध्ये तुमचे चर्चा कायमच राहील

कारण आज आम्ही तुमच्यासाठी असे काही प्रश्न घेऊन आलो त्याबद्दल तुम्ही या आधी कधीच ऐकले नसेल

 

प्रश्न 1 – मोराचे आयुष्य किती वर्षे असते माहिती आहे का ?
उत्तर 1 – वास्तविक, मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे, ज्याचे आयुष्य तब्बल 15 वर्षे एवढे आहे.

प्रश्न 2 – असं कोणतं फळ आहे ज्याला पिकायला कमीत कमी २ वर्षे लागतात?
उत्तर 2 – अननस हे एकमेव फळ आहे जे पिकण्यासाठी सुमारे किमान 2 वर्षे लागतात.

प्रश्न 3 – ताजमहाल कोणत्या मुघल शासकाने बांधला आहे ?
उत्तर 3 – ताजमहाल मुघल सम्राट शाहजहानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधला गेला होता.

प्रश्न 4 – दुर्बिणीचा शोध कोणी लावला हे तुम्हाला माहीत आहे का?
उत्तर 4 – आम्ही तुम्हाला सांगतो की दुर्बिणीचा शोध गॅलिलिओने लावला होता.

प्रश्न 5 – भारताचा राष्ट्रीय जलचर कोणता आहे हे तुम्ही सांगू शकाल?

प्रश्न 5 – भारताचा राष्ट्रीय जलचर कोणता आहे हे तुम्ही सांगू शकाल?
उत्तर 5 – डॉल्फिन मासा हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे.

प्रश्न 6 – असा कोणता जीव आहे जो जन्मापासून मरेपर्यंत झोपत नाही?
उत्तर 6 – कारण हा जीव म्हणजे एक मुंगी आहे, जी जन्मापासून चे मरेपर्यंत झोपत नाही. ते खूप मेहनती असतात आणि सतत काम करत असतात. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी / animals

सूर्या मराठी न्यूज वेबसाईटला लाईक फॉलो करायला विसरू नका

MurderNews :- विहिरीत बुडून नाही तर मुलाने केला बापाचा मृत्यू सत्य चार दिवसांनी समोर.

0

 

CrimeNews
वर्धा वडिलांच्या खुनशी वृतीय व व्यसना धीनता त्रस्त होऊन मुलांनीच केला बापाचा खून फोन केल्याची रस्ते चार दिवसांनी आला पुढे आजनसरा येथील घटना

अरुण गुलाबराव काचोळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

सात नोव्हेंबर ला पडले असे तक्रार विनोदने पोलिसाकडे नोंदवली आहे

दारूचा अंमल असतानाच त्यांचा तोल विहिरीत गेला
विनोदने असे पोलिसाकडे सांगितले मात्र हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय आला शेवटी पोलिसांना हा तपास सुरू केला.

या तपासात सत्य आला समोर अखेर मुलगा विनोद यांच्याशी तपास थांबला काचोड हे नसेल होते त्या दिवशी विनोद व त्यांचा मित्र नितेश मनोहर चाफळे मात्र हे दोघे दुपारी शेतात पोहोचले

या विहिरीजवळ असणाऱ्या काचोळे यांचे डोक्यात बाईकने वार केले होते त्यात ते ठार झाल्यावर मृत्यू देवून दिला काचोड हे नसत सर्वांना शिवीगाळ करायचे मात्र शेतीचे पैसे घरी देत नव्हते म्हणून मुलाने स्वतः कबुली दिली murderNews

Gram panchayat /सात पैकी पाच् ग्रामपंचायतीनवर विजय मिळवित समुद्रपूर तालुक्यात महाविकास आघाडी अव्वल

0

 

प्रमोद जुमडे /वर्धा

समुद्रपूर:- समुद्रपूर तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सात पैकी पाच ग्रामपंचायतीवर विजय संपदिती करित महाविकास आघाडीची सत्ता स्थापित झाली असून येणाऱ्या पुढच्या निवडणुकित जनतेचे मत महाविकास आघाडीच्या बाजूने दिसत आहे.

आत्ताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या फरकाने भाजपाला महाविकास आघाडीने पराभूत केले आहे. उब्दा येथे सरपंचाची अतिथीटीची लढत होती तिथे भाजपाचे दिग्गज नेत्यांना पराभूत करून राष्ट्रवादीला यश मिळाले आहे

. त्याच पद्धतीने जाम ला यश मिळाले आहे. जाम ला भाजपाचे मोठे मोठे नेते ग्रामपंचायत रिंगणात उतरले होते पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला कारण की जनतेच्या कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. सिलेंडर, पेट्रोल महागाई विरोधात समस्त जनता चिडलेली आहे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात चिडलेला आहे.

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव हा कमी असून त्यामुळे शेतकरी चिडलेला आहे. समुद्रपुर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शेतकरी जन आक्रोश मोर्चा चार महिण्याआधी निघाला होता या मोर्चाचे नेतृत्व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते त्याचे परिवर्तन आज जनतेच्या मताने ग्रामपंचायत निवडणुकीत मिळाले आहे.

आगामी येणाऱ्या निवडणुका लोकसभा असो की विधानसभा जो जनतेच्या कौल राहणार आहे तो आमच्याच महाविकास आघाडीच्या बाजूने राहणार आहे. कारण की भारतीय जनता पार्टी पासून जनता त्रस्त झालेली आहे सर्वसाधारण शेतकऱ्यावर सुद्धा हा सत्तेदारी पक्ष अन्याय करीत आहे.शेतकऱ्यांच्या मालाला भाव वाढ देत नसून येणाऱ्या निवडणुकीत जनतेच्या कौल महाविकास आघाडीच्या बाजूला राहणार आहे.

ग्रामपंचायत निवडणूकित समुद्रपूर तालुक्यात सात पैकी पाच ग्रामपंचायतीवर जनतेने आम्हाला स्वीकारले आहे. बर्फा, वाघेडा, उब्दा, जाम व नन्दंपुर येथे महाविकास आघाडीची सत्ता स्थापित झाली आहे / Gram panchayat

Wardha / गिमाटेक्स इंडस्ट्रीज कामगार/कर्मचारी पतसंस्थेवर कोठारी-तिमांडे-आफताब खान गटाच्या कामगार आघाडीचा दणदणीत विजय १५पैकी १२ जागा जिंकत एकहाती सत्ता

0

 

हिंगणघाट :- काल दिनांक १० नोव्हेंबर २०२३ला पार पडलेल्या गिमाटेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कामगार/कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित हिंगणघाट व वणी युनिट या पतसंस्थेवर कामगार नेते अँड. सुधिरबाबु कोठारी-राजुभाऊ तिमांडे-आफताब खान यांचे गटाच्या कामगार आघाडीने दणदणीत विजय संपादन केला. आणि एकुण १३२५ सभासद असलेल्या पतसंस्थेमधील १५ जागेपैकी १२ जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली.

विजयी उमेदवारांमध्ये सर्वसाधारण मतदार संघातील आशिष हरबुडे ५६६ मते, दिगांबर नवघरे ४५७ मते,बंडु काटवले ४६२ मते, संजय भोयर ४८१ मते, योगेश बुरीले ४१५ मते,विनोद गोटे ४७७ मते,मोहन रघाटाटे ४२० मते , सचिन शेंडे ४२९ मते, आरक्षित मतदारसंघातील संतोष माथनकर ६७४ मते, महेंद्र चहाणकर ६३१मते, व महिला

मतदार संघातील रेश्मा बेले ६५८ मते,विद्या राऊत ५९२ मते व अपक्ष उमेदवार शाकीरखान सुबेदारखान पठाण यांनी ५२२ मते घेत विजय संपादन केला. या पतसंस्थेने मार्च २०२३पर्यत ०४ करोड ५६ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले असुन या पतसंस्थेद्वारा सर्वात कमी व्याजदरावर म्हणजे ८% व्याजदराने एक लाख रुपयांपर्यत सभासदांना कर्जपुरवठा करण्यात येतो.

तसेच सभासदांना ९,% दराने वार्षिक लाभांश देण्यात येते. या पतसंस्थेद्वारा सभासदाचे निधन झाल्यास घरच्यांना १०,०००/-रुपये सानुग्रह देणे यासारख्या विविध योजना राबविण्यात येत आहे.

निवडणूक निकालानंतर झालेल्या विजयी सभेत बोलतांना अँड सुधिरबाबु कोठारी, राजुभाऊ तिमांडे व आफताबभाई खान यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले व ह्या पतसंस्थेला उत्तरोत्तर प्रगतीपथावर नेण्यासाठी, कामगारांच्या सर्वंकष विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

पतसंस्थेच्या निवडणुकीत विजय संपादन करण्यात प्रामुख्याने राहुल जाधव,जीवन दलाल,दिपक जाधव, दिनेश चौधरी, अविनाश महाकाळकर, सिद्धार्थ खोब्रागडे, उमेश इंगोले,पुर्निश चंदनखेडे, राकेश देवगिरीकर, धनराज जिकार, आनंद थुल, दीपक भोंडे, देविदास धोटे, पुंडलिक जवादे,अरुण धोटे, संजय उचकलवार, मारोती घुसे,विनोद ताजणे, देविदास कुबडे,शरद कोडापे,उपाली तेलंग, प्रविण पुरी,

मेघश्याम खोड, गजानन चामचोर,वसंता तुमडे, शंकर डंभारे, प्रविण शंभरकर, संदिप नेव्हारे, संदिप नगराळे, मनोज नगराळे, राजेश डफ, स्वप्नील कोठेवार,मनोज तांबे,अल्पेश बेहरे, विठ्ठल माळोदे, संगीता रामटेके, संगीता बोरेकर,विनोद महाजन, हेमंत मडावी,भारत खेकडे, प्रभाकर देवतळे,गजु धोटे,चंदु गुरनुले, सुनील बलखंडे, दिवाकर

घावटकर, अविनाश थुल, शशिकांत पाटील, दिवाकर घोटेकर, संदिप भजभुजे, अनिल फुसाटे, कमलाकर भजभुजे,अतुल गाठे, सचिन चिंचोलकर, प्रशांत फुसे, प्रशांत इचवे,कैलास वैरागडे, महेश बोकारे,संदिप वडतकर, धनराज भुजाडे, सुभाष बानमारे, राजेंद्र गाठे, प्रशांत ठाकरे, अरविंद ठाकरे, योगेश टेंभुरकर, अतुल फुसे, सुरेंद्र वानखेडे,बबलु माळवी,हरी रोगे, योगेश काळे, विलास भुते, दिनेश कुडे इत्यादी कामगार सदस्यांनी अत्यंत परिश्रम घेतले. Wardha