अपुऱ्या बस फेऱ्यामुळे ग्रामीण भागातील महिला प्रवाशी त्रस्त, बस फेऱ्या वाढविण्याची. राष्ट्रीय महिला बस प्रवासी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी..(Busnews)

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: ग्रामीण भागासाठी अपुऱ्या बस फेऱ्या सोडण्यात येत असल्याने ग्रामीण क्षेत्रातील शाळा कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींसह महिला प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

राज्य परिवहन महामंडळाने या बाबीची दखल घेऊन ग्रामीण भागामध्ये बस फेऱ्या मध्ये वाढ करावी अशी मागणी राष्ट्रीय महिला प्रवासी संघटनेच्या वतीने विभागीय नियंत्रक अकोला यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

याबाबत विभागीय नियंत्रकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की अकोला ते पिंपळगाव खुटा गावासाठी केवळ तीनच बसलेल्या सुटत असल्याने प्रत्येक बस फेरीमध्ये जवळपास 120 ते 150 प्रवासी यांना जातीवादी उभे राहून प्रवास करावेलागते.

पांढऱ्या केसांना काळेभोर कसे करावे बुवा…. खोबरेल तेलात एकदा हे वापरूनच बघा. ( black hair )

त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील विशेषता विद्यार्थिनी व महिलांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झालेला दिसत आहे याचप्रमाणे गायगाव भारत येथून अकोल्या येण्यासाठी बस फेरी नसल्याने विद्यार्थिनी महिला यांना ऑटो रिक्षा काळी पिवळी या खाजगी वाहनाने येणे जाणे करावे लागते

बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यामुळे वेळ पैसा खर्च होतो या बाबीची गंभीरतेने दखल घेऊन ग्रामीण भागातील बस फेऱ्या वाढवून जिथे बसलेली उपलब्ध नाही तिथे बसलेल्या सुरू कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत

Busnews :या निवेदनावर राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संगीता नानोटे, महाराष्ट्र प्रदेश सचिव व माधुरी क्षीरसागर, महाराष्ट्र प्रदेश संघटक सौ. पुष्पा काळे, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अकोला जिल्हा सचिव ज्योती मानकर, जिल्हा उपाध्यक्ष सौ सुनीता दळवी यांच्या सह्या आहेत

Leave a Comment