Home Blog

Hingnghatnews /शारीरिक शिक्षणाचा बोजवारा; काम शून्य तरी लाखोंचा पगार!

0

 

अनेक शाळांमध्ये ‘नामधारी’ शारीरिक शिक्षक, विद्यार्थ्यांच्या क्रीडा भवितव्याशी खेळ

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : राज्यातील अनेक खासगी व अनुदानित शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकांची पदे केवळ कागदोपत्री असल्याचे चित्र समोर येत आहे.

अनेक ठिकाणी संबंधित शिक्षक कोणतेही प्रत्यक्ष क्रीडा प्रशिक्षण देत नसतानाही त्यांना दरमहा लाखो रुपयांचा पगार मिळत असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे ही पदे अनेक संस्थाचालकांच्या नातेवाईकांनी किंवा कमेटीतील सदस्यांनी व्यापल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात रंगली आहे.wardhanews

विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी शाळांमध्ये क्रीडा शिक्षणाला महत्त्व दिले जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक शाळांमध्ये मैदान, क्रीडा साहित्य आणि नियमित प्रशिक्षणाचा अभाव असल्याचे दिसून येते. परिणामी ग्रामीण व सामान्य कुटुंबातील अनेक गुणवान विद्यार्थी खेळ क्षेत्रात पुढे येण्यापासून वंचित राहत आहेत.hingnghatnews

पालक व नागरिकांचा आरोप आहे की, अनेक शाळांमध्ये शारीरिक शिक्षक केवळ उपस्थितीपुरते मर्यादित असून विद्यार्थ्यांना कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात नाही. जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांची कामगिरीही अत्यंत कमी असल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.school

Hingnghatnews /विशेष म्हणजे शिक्षण विभागाकडून या प्रकाराकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. संबंधित शाळांची तपासणी करून प्रत्यक्ष कार्यरत शिक्षकांची चौकशी करावी, विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे आणि गैरप्रकार करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

Mahatmaphule /महात्मा फुले द्विशताब्दी जयंती निमित्त विशेष चित्ररथाचे १३ मे रोजी हिंगणघाटात आगमन

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने विशेष चित्ररथाचे आयोजन करण्यात आले असून, हा चित्ररथ १३ मे रोजी वर्धा जिल्ह्यात दाखल होणार आहे. हिंगणघाट येथे सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे चित्ररथाचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. Hingnghatnews

या विशेष चित्ररथामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे साहित्य, भिडे वाड्याची प्रतिकृती तसेच सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचा समावेश करण्यात आला आहे. समाज प्रबोधन, सामाजिक सलोखा व जागृतीचा संदेश देणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.wardhanews

या उपक्रमाला सर्व शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारांचे प्रेमी नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शहरात चित्ररथाचे मोठ्या उत्साहात स्वागत करावे,

Mahatmaphule /असे आवाहन वर्धा जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष विशाल हजारे, जिल्हा संघटक विनय डहाके, महिला जिल्हाध्यक्ष कविता मुंगळे, शहराध्यक्ष ऋषीकेश मेश्राम, समाजसेवक अनिल भोगाडे, केशव तितारे, जयंता मानकर तसेच महिला शहराध्यक्ष दीपाली रंगारी यांनी केले आहे.

Sscbord/जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर श्रावणीची भरारी

0

 

97.80 टक्के गुणांसह हिंगणघाट तालुक्यात प्रथम; वैज्ञानिक बनण्याच्या स्वप्नाला आमदार समीरभाऊ कुनावर यांची साथ

 

प्रतिनिधी सचिन वाघे

 

हिंगणघाट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होताच हिंगणघाट शहरातील नगरपरिषदद्वारा संचालित जी.बी.एम.एम. हायस्कूलच्या विद्यार्थिनी कु. श्रावणी रूपेश पराते हिने 97.80 टक्के गुण मिळवत हिंगणघाट तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर तिने हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.schoolnews

 

श्रावणीचे वडील कपड्याच्या दुकानात काम करतात, तर आई गृहिणी आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही अभ्यासावरील निष्ठा, सातत्यपूर्ण परिश्रम आणि मोठे स्वप्न पाहण्याची जिद्द यांच्या बळावर श्रावणीने यशाचा हा मानाचा टप्पा गाठला. तिच्या यशामुळे संपूर्ण हिंगणघाट शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.hingnghatnews

आपल्या यशाचे श्रेय देताना श्रावणीने जी.बी.एम.एम. हायस्कूलचे मुख्याध्यापक फुटाणे सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे मनःपूर्वक आभार मानले. शिक्षकांचे मार्गदर्शन, शाळेचे शैक्षणिक वातावरण आणि पालकांचे मोलाचे पाठबळ यामुळेच हे यश शक्य झाल्याचे तिने सांगितले.

भविष्यात वैज्ञानिक बनून संशोधन क्षेत्रात कार्य करण्याची श्रावणीची इच्छा असून देशासाठी नवे संशोधन आणि समाजोपयोगी कार्य करण्याचे तिचे स्वप्न आहे. तिच्या या ध्येयाने प्रभावित होत हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. तसेच तिच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी पालकत्व स्वीकारत तिला दत्तक घेण्याचा संवेदनशील निर्णय त्यांनी जाहीर केला.

श्रावणीच्या यशाबद्दल तिचा विशेष सत्कार आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेच्या शिक्षण सभापती पल्लवी सुशांत बाराहाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

Renevenews /प्रलंबित रेती घाटांतून अवैध उत्खनन; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रेती माफियांचे मनोबल वाढले?

 

सत्कार कार्यक्रमास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, उमेश तुळस्कर, माजी खासदार सुरेश वाघमारे, शिक्षण समिती सदस्य अंकुश ठाकूर, सोनू गवळी, सुनील मोहता, अतुल नंदागवळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी श्रावणीचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Sscbord /श्रावणी पराते हिच्या या यशामुळे जी.बी.एम.एम. हायस्कूल तसेच संपूर्ण हिंगणघाट शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून तिची यशोगाथा अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Renevenews /प्रलंबित रेती घाटांतून अवैध उत्खनन; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रेती माफियांचे मनोबल वाढले?

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : तालुक्यातील अनेक रेती घाटांचे लिलाव अद्याप प्रलंबित असतानाही काही घाटांमधून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. विशेषतः चिंचोलीघाट, पारडीघाट, कवडघाट, शहालगडी परिसर, नांदगावघाट आदी भागांत रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रेती उपसा व वाहतूक होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.crimenews

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित महसूल, खनिकर्म विभाग, तसेच स्थानिक प्रशासनाकडून या प्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याने अवैध उत्खनन करणाऱ्यांचे मनोबल वाढल्याचे बोलले जात आहे.hingnghatnews

नागरिकांचा आरोप आहे की, काही ठिकाणी पटवारी, मंडळ अधिकारी, ग्रामपंचायत स्तरावरील संबंधित घटक, महसूल अधिकारी तसेच पोलीस प्रशासनातील काही घटक यांच्याकडून आर्थिक व्यवहारातून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा परिसरात रंगत आहे.wardhanews

मात्र,दरम्यान, रेती घाटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण नसताना सुरू असलेला अवैध रेती उपसा शासनाच्या महसुलाला मोठा फटका देणारा ठरत असून नदीपात्राच्या पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण होत आहे.

HSCNews/आईच्या जिद्दीने घडवली गुणवंत कन्या; समीक्षा जणबंधूचे सर्वत्र कौतुक

 

अधिकृत लिलाव घेणाऱ्या कंत्राटदारांपेक्षा अवैध घाटांमधून स्वस्त दरात रेती उपलब्ध होत असल्याने भविष्यात अधिकृत रेती घाट घेण्यास कोणीही पुढे येणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Renevenews/या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संयुक्त तपास पथक स्थापन करावे, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि अवैध उत्खनन त्वरित बंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Hingnghatnews /हिंगणघाटात जीव धोक्यात; रेल्वे गेट बंद, अंडरपासची मागणी तीव्र — आंदोलनाचा इशारा

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : शहरातील प्रभाग क्रमांक १९ परिसरात रेल्वे गेट बंद झाल्यामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला असून, सुरक्षित अंडरपास किंवा पर्यायी मार्गाची मागणी आता तीव्र झाली आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.wardhanews

सुमारे १६-१७ वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले रेल्वे गेट फ्लायओव्हरच्या बांधकामानंतर बंद करण्यात आले. मात्र, त्या बदल्यात कोणतीही सुरक्षित व्यवस्था न केल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे.

परिसरात शाळा, रुग्णालय आणि एपीएमसी मार्केट असल्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी आणि व्यापाऱ्यांची सतत वर्दळ असते. त्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.

विशेषतः वृद्ध नागरिकांना फ्लायओव्हरवर चढणे-उतरणे अत्यंत कठीण जात असून, त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ जवळ असल्याने वाहतुकीचा ताण प्रचंड वाढतो आणि परिस्थिती अधिक धोकादायक बनते.

या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रेल्वे गेट पुन्हा सुरू करावे किंवा सुरक्षित अंडरपास उभारावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.ajitpawar

Hingnghatnews /सदर निवेदन युवक विधानसभा अध्यक्ष अविनाश नवरखेले (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) यांनी विविध शासकीय स्तरांवर सादर केले असून, आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Umrganews /उमरगा (आनंदीपूर) शहरात संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रमुख नागरिक संगोष्ठी उत्साहात संपन्न

0

 

उमरगा (आनंदीपूर ) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त उमरगा शहरात प्रमुख नागरिक संगोष्ठीचे आयोजन करण्यात आले. शहरातील डिग्गी रोडवरील कन्हैया मंगल कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.dharashivnews

या संगोष्ठीत पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया यांनी मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन केले, तर जिल्हा कार्यवाह अजय जानराव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

डॉ. भाडेसिया यांनी आपल्या भाषणात संघाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकताना सांगितले की, “संघाचे कार्य हे संपूर्ण विश्व अधिक श्रेष्ठ करण्याच्या भावनेतून चालते. ‘इदं न मम’ म्हणजेच ‘हे माझे नाही’ हा भारतीय संस्कृतीचा मूलमंत्र असून त्यातून निस्वार्थ भाव, त्याग आणि समर्पणाची शिकवण मिळते.” त्यांनी पुढे नमूद केले की, संघाचे कार्य आपल्या भारत देशाला विश्वगुरू बनवण्यासाठीच आहे आणि शिस्त व कार्यपद्धतीमुळेच संघाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी संघाच्या विचारधारेत एकात्मतेला महत्त्व असल्याचेही स्पष्ट केले. Umrganews

व्यक्ती निर्माण हा संघाच्या कार्याचा गाभा असल्याचे सांगत त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या विचारांचा उल्लेख केला. “संघाचे कार्य बाहेरून जितके साधे दिसते, त्यामागील गूढ आणि गहराई तितकीच विशाल आहे. ज्ञान, आध्यात्म, सेवा आणि साधना यांसारखी मूल्ये संघात रुजवली जातात. नियमित शाखेत सहभागी झाल्यास स्वयंसेवकाचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडते,” असे ते म्हणाले.

संघाच्या प्रार्थनेचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, प्रार्थनेत भारतमातेप्रती समर्पणाचा भाव आहे आणि भगवा ध्वज हा संघाचा गुरु मानला जातो. “संघाचा स्वयंसेवक प्रसिद्धीपेक्षा समाजातील अडचणी दूर करण्यावर भर देतो.

Umrganews /उमरगा-औसा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था; आमदार प्रवीण स्वामींकडून प्रत्यक्ष पाहणी, अधिकाऱ्यांना तात्काळ दुरुस्तीचे आदेश

 

तो स्वतःसाठी नव्हे, तर समाज आणि राष्ट्रासाठी कार्य करतो,” असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. उपस्थित नागरिकांनीही संघाच्या कार्याबाबत उत्सुकता व्यक्त करत चर्चेत सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्यरीत्या पार पडले असून, उमरगा शहरात संघाच्या विचारांचा प्रसार आणि समाजजागृतीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

HSCNews/आईच्या जिद्दीने घडवली गुणवंत कन्या; समीक्षा जणबंधूचे सर्वत्र कौतुक

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट/वर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी 2026 च्या उच्च माध्यमिक (HSC) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून वर्धा जिल्ह्यातील महेश ज्ञानपीठची विद्यार्थिनी समीक्षा भाग्यश्री विनोद जणबंधू हिने वाणिज्य शाखेत 560 गुण मिळवत 93.33 टक्के गुणांसह उज्ज्वल यश संपादन केले आहे.bordnews

समीक्षाने सर्व विषयांत उल्लेखनीय गुणवत्ता दर्शवित इंग्रजी विषयात 89 गुण, अर्थशास्त्रात 94 गुण, बुक कीपिंग व अकाउंटन्सीमध्ये 95 गुण, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये 87 गुण, गणित व सांख्यिकीमध्ये 96 गुण, तसेच माहिती तंत्रज्ञान विषयात तब्बल 99 गुण मिळवले. तिच्या या सर्वांगीण यशामुळे शाळेच्या गुणवत्तेची परंपरा अधिक बळकट झाली आहे.

या यशाबद्दल भावना व्यक्त करताना समीक्षा म्हणाली, “माझ्या आईच्या अथक परिश्रमांमुळे आणि शाळेतील शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळेच मला हे यश मिळाले. त्यांच्या पाठिंब्यामुळे मी आत्मविश्वासाने अभ्यास करून हे यश संपादन करू शकले.”

समीक्षाच्या या उल्लेखनीय यशामुळे कुटुंबात, शाळेत तसेच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक, नातेवाईक आणि नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.HSCNews

HSCNews/महेश ज्ञानपीठसाठीही ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली असून समीक्षा जणबंधूच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

Cricket news/क्रिकेटचा जल्लोष सुरू!वाघझिरा येथे आदिवासी प्रीमियर लीग 2026 ची ग्रँड ओपनिंग

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

यावल तालुक्यातील वाघझिरा येथे “राज बांधू सप्लायर्स” यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी क्रिकेट प्रीमियर लीग 2026 (सीजन 2) स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. दिनांक 2 मे 2026 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले असून परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.jalgaon

या स्पर्धेत स्थानिक तसेच परिसरातील अनेक संघांनी सहभाग नोंदवला असून खेळाडूंमध्ये जिंकण्याची चुरस दिसून येत आहे. प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा होत असून प्रेक्षकांचा उत्साहही तितकाच वाढलेला दिसत आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या स्पर्धा होत असल्याने नवोदित खेळाडूंना आपली कला दाखवण्याची सुवर्णसंधी मिळत आहे.

स्पर्धेसाठी आयोजकांनी आकर्षक बक्षिसांची घोषणा केली आहे—प्रथम पारितोषिक: ₹21,000 व चषक
द्वितीय पारितोषिक: ₹11,000 व चषक
तृतीय पारितोषिक: ₹5,000 व चषक उद्घाटन सोहळ्यावेळी गावातील मान्यवर व सामाजिक कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती होती. यामध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गोपाळ चौधरी, बालसिंग बारेला (उपसभापती), मालेद ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच रमाबाई बारेला, सामाजिक कार्यकर्ते सचिन तडवी, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडेमुळे एकता व शिस्त वाढते, असे मत व्यक्त केले. Yavalnews

कार्यक्रमस्थळी रंगीत मंडप, आकर्षक बॅनर आणि चकाकणाऱ्या ट्रॉफींची मांडणी यामुळे संपूर्ण वातावरण क्रीडामय व उत्साही झाले होते. प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
या स्पर्धेचे प्रमुख आयोजक रणजीतभाऊ बारेला यांनी सांगितले की, ग्रामीण व आदिवासी भागातील तरुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील क्रीडागुणांना वाव मिळावा आणि गावपातळीवर क्रीडा संस्कृती रुजावी, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.cricket

Yavalnews स्पर्धेदरम्यान खेळाडूंना आवश्यक सुविधा, पाणी, बसण्याची व्यवस्था तसेच शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेमुळे वाघझिरा परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून पुढील काही दिवस प्रेक्षकांना रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत.

Happy birthday /महाराष्ट्र दिनाचा अभिमान आणि निर्भीड पत्रकारितेचा जाज्वल्य दीप — शेख कदीर भाई

0

 

१ मे… महाराष्ट्राच्या स्थापनेचा सुवर्णदिन. याच दिवशी जन्माला आलेले एक धाडसी, निर्भीड आणि सत्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी ठेवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे दैनिक सेवा शक्तीचे उपसंपादक शेख कदीर भाई. Happy birthday friends

पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसते, तर ती समाजाच्या मनात जागृती निर्माण करणारी शक्ती असते—याच विचारांचा वारसा कदीर भाई यांनी आपल्या लेखणीतून जपला आहे. अन्याय, भ्रष्टाचार आणि खोटेपणाच्या विरोधात उभे राहत त्यांनी अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घातला, पण सत्याचा मार्ग कधीही सोडला नाही.happy Happy birthday

त्यांची लेखणी ही तलवारीसारखी तीक्ष्ण, आणि आवाज हा अन्यायाविरुद्ध उभा राहणारा बुलंद नारा आहे. अनेक संवेदनशील प्रकरणे उघडकीस आणत त्यांनी समाजात नवा विश्वास निर्माण केला. “भीतीला शरण जाणे” हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही—हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. Media

महाराष्ट्र दिनी जन्म झाल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच जिद्द आणि महाराष्ट्राच्या मातीतली ज्वाला दिसून येते. समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ, आणि सत्यासाठी लढण्याची वृत्ती हीच त्यांची खरी ओळख बनली आहे.midea

 

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांना केवळ शुभेच्छाच नाही, तर त्यांच्या कार्याला सलाम करण्याचा दिवस आहे. त्यांनी सुरू केलेली सत्याची लढाई अशीच अखंड चालू राहो, आणि त्यांच्या लेखणीतून समाजाला नवी दिशा मिळत राहो—हीच सर्वांची मनापासून इच्छा.

🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, कदीर भाई! 🎉
तुमची निर्भीडता आणि सत्यासाठीची जिद्द अशीच कायम राहो… महाराष्ट्राला तुमच्यासारख्या पत्रकारांचा अभिमान आहे! 💐🔥

वाढदिवसाच्या हार्दिक  मना पासून शुभेच्छा 🌹🌹🌹

शुभेच्छुक :- अनिलसिंग चव्हाण (सूर्या मराठी न्यूज )

Umrganews /उमरगा-औसा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था; आमदार प्रवीण स्वामींकडून प्रत्यक्ष पाहणी, अधिकाऱ्यांना तात्काळ दुरुस्तीचे आदेश

0

उमरगा: उमरगा ते औसा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ वरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण स्वामी यांनी या महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले आहे. Dharashivnews

या मार्गावर खड्ड्यांमुळे लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक वाहनचालकांना गंभीर दुखापती झाल्या असून काहींचे मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत होता.

यामुळे परिसरात संतापाची लाट निर्माण झाली होती.
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आमदार प्रवीण स्वामी यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी केली. यावेळी रस्त्याची चाळण झालेली पाहून त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.umrganews

“नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून मार्ग सुस्थितीत करावा, अन्यथा संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला. या पाहणी दौऱ्यावेळी युवा नेते अजिंक्य पाटील उपस्थित होते.

सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा, धाराशिव