Home Blog

Policenews /“तू पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोलीस कशाला पाठविले?” म्हणत पत्रकारावर प्राणघातक हल्ला !

0

 

अज्ञात तीन इसमांविरोधात तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार!

संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल परिसरात एका पत्रकारावर अज्ञात तीन इसमांनी हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे.

या प्रकरणी संबंधित पत्रकाराने तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी अज्ञात आहेत.

Buldhanaurbanbank/कोट्यवधी रुपयाच्या शेकडो क्विंटल धान्य अफरातफरीचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न !

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वरवट बकाल येथील रहिवासी व दैनिक सेवा शक्ती या वृत्तपत्राचे उपसंपादक शेख कदीर (वय ४२) हे २२ डिसेंबर २०२५ रोजी दिवसभर न्यायालयात शासकीय जाहिरात संदर्भातील कामासाठी उपस्थित होते.

सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास ते आपल्या मोटारसायकल ने संग्रामपूरहून वरवट बकाल येथे घरी जात असताना मधुकर बकाल यांच्या शेताजवळील हनुमान मंदिर परिसरात विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून तीन अज्ञात इसम त्यांच्या जवळ आले.

त्यांनी “ओ पत्रकार” असे म्हणत शेख कदीर यांना थांबवले. त्यानंतर त्यांच्यावर शिवीगाळ करत “तू पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोलीस कशाला पाठविले?” असा जाब विचारत जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी एका इसमाने हातातील फावड्याने पत्रकारांच्या डोक्यात हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

हा घाव चुकवताना फावडा त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला लागून दुखापत झाली.

घटनेनंतर शेख कदीर यांनी आरडाओरड केल्याने तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पलायन झाले. सुरुवातीला उपचार न घेतल्याने दुसऱ्या दिवशी हाताला सूज आल्यावर त्यांनी वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले.

या घटनेमुळे संबंधित पत्रकाराच्या जीवितास संबंधितांकडून धोका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली असून, आरोपी समोर आल्यास ओळख पटवू शकतो असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

Tahsilnews/सदर घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, तामगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास पीएसआय बोपटे करीत आहेत

Tahsildarnews/विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच शिक्षणाचा मुख्य हेतू आहे.तहसीलदार प्रशांत पाटील

0

 

संग्रामपूर (अनिलसिंग चव्हाण)ः- शिक्षण ,कवायती व विविध खेळ व्यायामाचे महत्त्व म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त गुण असतात ते ह्या माध्यमातून उघड मिळून चालना मिळते. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी विविध खेळ खेळून दररोज कवायत करावी आणि व्यायाम करावा.sangrampur

त्यामुळे शरीर तंदुरुस्त निरोगी राहून मन मन शांत रहाते. व अभ्यासात लक्ष लागते. त्यामुळे व्यायाम कवायत करणे आवश्यक असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच शिक्षणाचा मुख्य हेतू असल्याचे प्रतिपादन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी तालुका स्तरीय देशभक्ती व सांघिक कवायत प्रसंगी केले आहे.

शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त,प्रियता व देशभक्ती निर्माण व्हावी व निरोगी रहावे ह्या उद्देशाने तालुक्यातून पीएमश्री जि.प. हायस्कूल संग्रामपूर शाळेच्या वतीने भव्य प्रांगणात दि. २६ / जानेवारी प्रजासत्ताक दिनी सामूहिक कवायत व देशभक्तीपर गीतांचे आयोजन करण्यात आले होते.

ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रशांत पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी माधव पायघन ,प्र.गटशिक्षणाधिकारी तथा सहा.ग.वि.अ. दिपक टाले, तालुका शिक्षण गट समन्वयक मिलिंद सोनोने, नगराध्यक्ष सौ. उषाताई सोनोने, शाळा समिती अध्यक्ष पुरुषोत्तम मिटकरी, नगरसेविका सौ पंचफुलाबाई वानखडे, ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी ,भाऊ भोजने, प्रल्हाद सावतकार(जेष्ठ छायाचित्रकार), आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम दिपप्रज्वलन करण्यात येऊन जि.प,हायस्कुलचे वतीने सर्व प्रमुख अतिथींतीचे स्वागत करण्यात येवून प्र.मुख्याध्यापक योगेश कुकडे यांनी प्रास्तविकातून ह्या मुख्य कार्यक्रमाचा उद्देश व महत्त्व सांगितले. त्यानंतर पिएमश्री जि.प.हायस्कूल संग्रामपूरचे विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करून सामूहिक कवायत व लेझीम सह कार्यक्रम सादर केलेत. सदर कार्यक्रम अत्यंत उत्कृष्टरित्या सादर केल्यामुळे अधिकारी व इतरांनी समाधान व्यक्त केले.

Prashantpatil/यावेळी सकाळी देशभक्तीपर भाषण केल्याबद्दल कु. पूजा राठोड ह्या विद्यार्थ्यांनीस तहसीलदार प्रशांत पाटील यांनी स्वतः रोख बक्षीस दिले. ह्या कार्यक्रमासाठी क्रीडा शिक्षक, कलाशिक्षक व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतलेत. ह्या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी ,माजी नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक ,पालक व सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एस. एस. सुरतकर यांनी केले तर आभार प्रदर्शन राठोड सर यांनी केले.

Hingnghatnews /एकता युवा मंडळ कडून प्रजासत्ताक दिनानिमीत्त बिस्कीट व पिण्याच्या पाण्याचे वाटप

0

 

प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी

सिंदी (रेल्वे) :प्रजासत्ताक दिनानिमीत्त येथील एकता युवा मंडळ सिंदी रेल्वे कडून शालेय विद्यार्थ्यांना बिस्कीट व पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले.

२६ जानेवारी 2026 ला सर्व शाळेचे विद्यार्थी बाजार चौकात एकत्र येतात शालेय विद्यार्थ्यांना व हा सोहळा पाहण्यास एकत्र आलेल्या सिंदीवासियांना 3000 बिस्कीट पॉकेट व पिण्याच्या पाण्याचे वाटप एकता युवा मंडळ सिंदी रेल्वे कडून करण्यात आले.

यावेळी मंडळाचे नरेंद्र पेटकर, राजु तेलरांधे, रविंद्र ढोबळे, नरेंद्र पटेल,जमिल खान, सुभाष तळवेकर, नरेंद्र कठाणे, रमाकांत बोकडे, आशिष पालीवाल, ललित बेताला, हेमंत सोनटक्के, ललित बेताला,तुषार ठोंबरे, महेश राऊत, भूपेश देवतळे, सचिन मोरस्कर, आनंद

Wardhanews /बिस्वास, शकील शेख, देवा पडवे, सुनील रेवतकर, रोशन तडस पिंटू टेंभरे, संजय मुडे, कवडू म्हैसकर, वसंता सिरसे, अजीम शाह, मंगेश मुंदडा,दिनेश दुम्पलवार ,अनील ढोबळे ,पुरुषोत्तम व्यास, रवी मुंदडा, रूपेश सारवान, संदिप दुम्पलवार, रविंद्र सागरकर, सतीश ढोक,प्रविण जुमडे, गजु ढेकण, राजु उरकुडकर, गणेश मोरस्कर, शालीक उरकुडे आदींची उपस्थिती होती.

Yavalnews /ग्रामपंचायत कार्यालय बोराडे येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0

 

यावल( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

बोराळे, दि. २६ जानेवारी :येथील बोराळे ग्रामपंचायत कार्यालयात देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक ७.३० वाजता ग्रामपंचायत सदस्य सौ. गौतमबाई भीमराव वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी तिरंग्याला मानवंदना देत राष्ट्रध्वजास वंदन केले.
या प्रसंगी

विद्यार्थ्यांनी अत्यंत भावपूर्ण रीतीने राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर केले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीमय वातावरणाने भारावून गेला.

भारतीय संविधानाची निर्मिती, त्यातील मूल्ये, स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे महत्त्व प्रभावी शब्दांत मांडले. वक्त्यांनी आपल्या भारतीय संविधान हे देशाच्या एकतेचे व लोकशाहीचे मजबूत आधारस्तंभ असल्याचे सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी शिस्त, जबाबदारी व कर्तव्यभावनेने वागून चांगले नागरिक बनावे, असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चुंचाळे येथील वाय. वाय. पाटील सर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. डी. बी. मोरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Yavalnews /या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सौ. संध्याबाई उज्जैनसिंग राजपूत, बाजार समिती सभापती श्री. उज्जैनसिंग राजपूत, ग्रामपंचायत उपसरपंच सौ. मायाबाई राजपूत, ग्रामपंचायत सदस्य श्री. भरत राजपूत, श्री. भारतीय राजपूत, सौ. दिपाली चौधरी, श्री. पितांबर चौधरी, पोलीस पाटील सौ. माधुरी राजपूत, अंगणवाडी सेविका सौ. रेणुका वानखेडे, आशा वर्कर सौ. सुनेना राजपूत, अंगणवाडी मदतनीस सौ. सुवर्णा राजपूत, तसेच श्री. नितीन राजपूत, श्री. संजय सिंग राजपूत, श्री. कैलास सिंग राजपूत, श्री. प्रदीप वानखेडे, श्री. विशाल राजपूत, श्री. खिचन चौधरी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत राष्ट्रीय सणाचा आनंद साजरा करून देशप्रेमाची भावना अधिक दृढ केली.

Warvatnews/तरुण पिढीने निर्भयपणे मतदान करून लोकशाही सशक्त करावी. प्राचार्य डॉ श्रीराम येरणकर

0

 

संग्रामपूर (रामेश्वर गायकी)ः- लोकशाही केवळ शासन पद्धती नसून नागरिकांच्या सक्रिय सहभागावर आधारित जीवन पद्धती आहे. प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे हे आपले कर्तव्य असून तरुण युवक पिढीने निर्भय व प्रामाणिकपणे आणि सद्विवेक बुद्धीने मतदान करून लोकशाही सशक्त करावी. लोकशाहीचे महत्त्व विषद करतांना वरवट (बकाल )येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.श्रीराम येरणकर यांनी सांगितले.

लोकशाही व्यवस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी मतदार जागृती अत्यंत आवश्यक असून विशेषतः युवक, युवतीमध्ये मतदानाबाबत जाणीव निर्माण व्हावी. ह्या उद्देशाने तालुक्यातील वरवट( बकाल) येथील कला व वाणिज्य महाविद्यालय राज्यशास्त्र विभागाचे वतीने आज दि.२५ / जानेवारी रोजी मतदार जागृती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.श्रीराम एरणकर होते. तर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डाॕ.राजेंद्र कोरडे तसेच गुणवत्ता हमी कक्ष(आयक्युएस) समन्वयक डॉ.संजय टाले यांची प्रमुख उपस्थिती होती.

ह्यावेळी डाॕ. राजेंद्र कोरडे यांनी मतदान प्रक्रियेचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करतांना सांगितले की मतदानाच्या माध्यमातून सामान्य नागरिक आपले मत, विचार व अपेक्षा शासनापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मतदानाकडे दुर्लक्ष न करता जबाबदारीने मतदान करणे गरजेचे आहे.

तर डाॕ.संजय टाले यांनी संविधानाने मूल्य लोकशाही आणि मतदारांची भूमिका यांचा परस्पर संबंध स्पष्ट केला. शिक्षण संस्था ह्या मतदार जागृतीचे प्रभावी माध्यम असून अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरिकांमध्ये नागरिकत्वाची जाणीव अधिक दृढ होते. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मतदानाबाबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सहभाग नोंदविला व मतदार नोंदणी मतदार प्रक्रियेतील पारदर्शकता व जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदार जागृती दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक जागृती निर्माण झाल्याचे यावेळी स्पष्ट दिसून आले.

Warvatnews /कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन एनएस चे समन्वयक प्रा.नागेश इंगळे यांनी केले. यावेळी त्यांनी लोकशाही मूल्य जपण्यासाठी महाविद्यालय सातत्याने व सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवित असल्याचे सांगितले.

SangrampurNews /राष्ट्रध्वज तिरंग्याचा सन्मान राखण्यासाठी व विटंबना होऊ नये याची दक्षता घ्यावी. तहसीलदार प्रशांत पाटील

0

 

संग्रामपूर( अनिलसिंग चव्हाण)ः- प्रजासत्ताक दिनानिमित्त आज २६ / जानेवारी रोजी तालुक्यात विविध शासकीय,निमशासकीय कार्यालय, सहकारी संस्था, शाळा, विद्यालय,महाविद्यालये व इतर ठिकाणी मोठ्या उत्साहाने प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण व ध्वजवंदन करुन साजरा होणार आहे. ह्याकरता राष्ट्रध्वज तिरंग्याचा सन्मान राखण्यासाठी ध्वजाची विटंबना होवू नये. याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे. तालुक्यात आज प्रजासत्ताक दिनी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, जि. प. शाळा तसेच खाजगी विद्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती ,विविध सह. संस्थांमध्ये ध्वजारोहण होऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रमात व शालेय प्रभात फेरीत राष्ट्रीय ध्वजाचे सन्मान चिन्ह, तिरंगा टी-शर्ट, पताका, तसेच प्लास्टिक व कागदी तिरंगा ध्वजाचा उपयोग या राष्ट्रीय उत्सवात केला जातो. राष्ट्रध्वज ही राष्ट्राची ओळख नसून ती अस्मिता आहे.

सदर ध्वज कोठेही फेकून न देता काळजीपूर्वक वापरून तिरंग्याचा सन्मान करावा त्याची विटंबना होऊ नये. यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची सुद्धा दक्षता घेऊन काळजी घ्यावी.

Tahsildar news /असे आवाहन विद्यार्थी,सर्व कर्मचारी , नागरिक व तरुण युवकांना संग्रामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी जाहीर आवाहन केले आहे.

Buldhanaurbanbank/कोट्यवधी रुपयाच्या शेकडो क्विंटल धान्य अफरातफरीचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न !

0

 

[नामांकित व बहुचर्चित असलेल्या बुलडाणा अर्बन बँकेचा प्रताप]

[न्यायालयाने नुकसान भरपाईचे आदेश देऊनही प्रशासनाकडून बँकेच्या पदाधिकाऱ्यांना वाचविण्याचे प्रयत्न ] स्थानिक व्यापाऱ्याचा आरोप!

[कोर्टाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश देवूनही पोलीस प्रशासनाची चुप्पी.]

बुलडाणा/वाशिम -वाशीम जिल्ह्यातील मानोरा शहरासह राज्यातील जवळपास प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्याच्या ठिकाणी बँकेच्या शाखा व धान्य गोदामे वेअरहाऊस असलेल्या बुलढाणा अर्बन बँक (शाखा मानोरा) मधील तारण ठेवलेल्या शेकडो क्विंटल सोयाबीन व तूरीचे धान्य अफरातफर केल्याप्रकरणी तक्रारदार फसवणूक झालेले व्यापारी तथा शेतकरी गणेश राठोड यांच्या तक्रारीकडे प्रशासनाकडून हेतूपुरस्पर दुर्लक्ष केल्या जात असल्याने संबंधित व्यापाऱ्याला या शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी केली होती.buldhanaurban

त्यांचे देणे देण्याबाबत मोठा आर्थिक दबाव निर्माण झाल्याची आपबीती हवालदिल झालेल्या व्यापाऱ्या बाबत निर्माण झालेली आहे.manoranews

ह्याबाबत प्राप्त माहिती अशी की
कोट्यावधीची गुंतवणूक असणाऱ्या व नामांकित परंतु बहुचर्चित अनेक गैरप्रकाराने गाजलेल्या बुलढाणा अर्बन च्या इथली रस्त्यावरील धान्य गोदामात शेकडो किंटल सोयाबीन व तूर ठेवलेल्या बुलडाणा तक्रारदार व्यापाराच्या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाकडून नुकसान भरपाई देण्याचे आदेश संबंधितांना दिले होते.

परंतु व्यापारी व शेतकऱ्यांना सोयाबीन आणि तूर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बुलढाणा अर्बनच्या सर्वेसर्वा असणारे अध्यक्ष राधेश्याम चांडक आणि सुकेश झंवर (अर्बन वेअर हाऊस) यांच्यावरील कारवाईच्या मागणीसाठी सहाय्यक निबंधक व आयुक्त यांच्याकडे बुलढाणा अर्बनच्या गोदामामध्ये धान्य ठेवलेल्या मानोरा येथील व्यापाऱ्याने तक्रार केली होती.

Buldhanaurbannews /परंतु शासकीय कार्यालयाकडून कुठलीही कारवाई न झाल्याने शेवटी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना बाजार भावा प्रमाणे ९५० पोते तूर व ४६ किंटल सोयाबीन ची रक्कम गणेश लक्ष्मण राठोड ह्यांना द्यावी. असे आदेश देऊनही अद्याप पर्यंत कोणतीही भरपाई मिळाली नसल्याचा दावा व्यापारी राठोड यांनी केला आहे.kiritsomya

नुकसानग्रस्त व्यापारी गणेश लक्ष्मण राठोड यांना प्रशासनाकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने शेवटी कोर्टात धाव घेतली असता कोर्टाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. परंतु त्या आदेशाचे पालन पोलीस प्रशासनाकडून होत नसल्याची व्यथा व्यापारी गणेश राठोड यांनी बोलून दाखविली. माझ्याकडे होती.

Manoranews/ती जमा पुंजी मी सोयाबीन व तूर साठवणूक करून ठेवलेली होती, बुलढाणा अर्बन मध्ये साठवून ठेवलेली व ते धान्य मला न मिळाल्याने आता माझ्याकडे आर्थिक तंगी असून अनेक शेतकऱ्यांचे माझ्याकडे देणे बाकी आहे. तेव्हा मला न्याय मिळावा व शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे डुबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वर कायदेशीर कारवाई व्हावी. अशी मागणी व्यापारी गणेश लक्ष्मण राठोड यांच्या वतीने करण्यात आली आहे.manoranews

Policenews /‘ऑपरेशन निशाणा’ अंतर्गत अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई; 7.08 लाखांचा मुद्देमाल जप्त.

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वडनेर :- पोलीस स्टेशन हद्दीत ऑपरेशन निशाणा अंतर्गत प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे अवैध चोरटी रेती वाहतुकीवर यशस्वी रेड कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत विना क्रमांकाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेण्यात आला.

कारवाईदरम्यान ट्रॉलीमध्ये सव्वा ब्रास अवैध रेती आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सोनालिका ट्रॅक्टर ट्रॉली किंमत अंदाजे रुपये 7,00,000/- तसेच सव्वा ब्रास रेती किंमत रुपये 8,000/- असा एकूण रुपये 7,08,000/- चा मुद्देमाल समाविष्ट आहे.

Hingnghatnews /सदर प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस स्टेशन वडनेर मार्फत करण्यात येत आहे.

Wardhanews /हिंगणघाटवर रेल्वे प्रशासनाचा अन्याय!सुपरफास्ट गाड्यांचे थांबे पूर्ववत न केल्यास 19 जानेवारीपासून बेमुदत आंदोलन – श्याम ईडपवार यांचा थेट इशारा

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :कोरोना काळापूर्वी हिंगणघाट रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या सर्व सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचे थांबे अद्यापही पूर्णतः पूर्ववत न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या गंभीर प्रश्नावर आंदोलन सम्राट श्याम भास्करराव ईडपवार यांनी थेट केंद्र सरकार व रेल्वे प्रशासनाला इशारा दिला आहे.

कोरोना महामारीपूर्वी हिंगणघाट रेल्वे स्थानकावर तब्बल २० सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचे थांबे होते. मात्र सध्या केवळ १० गाड्यांचेच थांबे सुरू असून, त्यातील फक्त ४ गाड्या दररोज थांबतात तर उर्वरित ६ गाड्या साप्ताहिक स्वरूपाच्या आहेत. यामुळे हिंगणघाट व परिसरातील विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी, शेतकरी तसेच रुग्णांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

या संदर्भात श्याम ईडपवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन पाठवून उर्वरित १० सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचे थांबे तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची ठाम मागणी केली आहे. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हा अन्याय आता सहन केला जाणार नाही.”

जर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर दिनांक 19 जानेवारी 2026 पासून उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगणघाट येथे बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, अ

Hingnghatnews /सा कडक इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासन व शासनावर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घोषणेमुळे हिंगणघाट शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमधून आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Forestnews/खुर्सापार जंगलात आणखी एक वाघ जेरबंद प्रतिनिधी

0

 

हिंगणघाट सचिन वाघे

समुद्रपूर :-हिंगणघाट, समुद्रपूर व सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील खुर्सापार जंगल परिसरात वावरत असलेला आणखी एक वाघ आज यशस्वीरीत्या जेरबंद करण्यात वन विभाग व प्रशासनाला मोठे यश मिळाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाघाच्या सततच्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आज झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वन अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे व प्रशासनाच्या समन्वयातून ही कारवाई यशस्वी ठरली. जेरबंद करण्यात आलेल्या वाघाला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पेंच व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसह वाघाच्या नैसर्गिक अधिवासाचाही विचार करून ही कार्यवाही करण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली.

या गंभीर विषयाबाबत हिंगणघाट–समुद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र राज्याचे माननीय वनमंत्री गणेशजी नाईक यांच्यासोबत यासंदर्भात सविस्तर बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत परिसरातील पाचही वाघांना जेरबंद करण्याचे ठोस निर्देश वन विभागाला देण्यात आले होते. राज्यात प्रथमच अशा प्रकारचे स्पष्ट आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी एका वाघाला जेरबंद करण्यात आले होते, तर आज आणखी एका वाघाला पकडण्यात यश आले आहे. उर्वरित वाघांबाबतही हिंगणघाट, समुद्रपूर व सिंधी रेल्वे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Hingnghatnews /वन विभाग, प्रशासन व स्थानिक यंत्रणांच्या समन्वयामुळे ही महत्त्वपूर्ण कारवाई शक्य झाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.