Home Blog

ShegaonNews/शेगाव बसस्थानकात मोठी दुर्घटना! स्लॅब कोसळून तीन महिला, चिमुकला जखमी

शेगाव बसस्थानकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; स्लॅब कोसळून चौघे जखमी

शेगाव बस स्थानकात बसची प्रतीक्षा करणाऱ्या तीन महिला आणि तीन वर्षीय चिमुकल्याचा अंगावर अचानक छताचे प्लास्टर कोसळण्याची घटना शेगाव बस स्थानकावर घडल्याने एकच धांदल उडाली.

या घटनेत चौघेही जखमी झाले असून त्यांना सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णाल उपचार हे दाखल करण्यात आले आहे.

कोमल गणेश बावस्कर रेखा रामदास बावस्कर तीन वर्षे रुद्र गणेश बावस्कर व विमलाबाई भिकाजी पवार हे शेगाव बस स्थानकावरून प्रवासाकरता आले होते.

बसची प्रतीक्षा करीत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि छताचे प्लास्टर त्यांच्या अंगावर कोसळले त्यामुळे बस स्थानकात एकच खळबळ उडाली.

एकंदरीत शेगाव बस स्थानकाच्या इमारतीची अवस्था चिरणे झाली असून यापूर्वी तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला होता छताचे प्लास्टर थेट प्रवासाचे अंगावर कोसळल्याने बस स्थानकातील प्रवासांच्या सुरक्षितता प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे .

ShegaonNews/बस स्थानकाच्या इमारतीची तातडीने पाहणी करून धोकादायक भागाची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासांकडून होत आहे.

मराठीच्या मुद्द्यावरून महायुतीत मतभेद? शिंदेसेनेचे मंत्री नाराज

मराठीच्या मुद्द्यावरून महायुतीत मतभेद? शिंदेसेनेचे मंत्री नाराज

संपादक : अनिलसिंग चव्हाण

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये पुन्हा एकदा मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने शिंदेसेनेचे मंत्री नाराज असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, २७ ऑगस्ट रोजी रिक्षा-टॅक्सीचालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ जाहीर केली.
या निर्णयापूर्वी परिवहन मंत्रालयाला विश्वासात घेतले नसल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दोन दिवस आधी परिवहन मंत्र्यांची वेगळी भूमिका आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा निर्णय यामुळे भाजप-शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.
आता या मुद्द्यावर महायुतीतील नेत्यांची भूमिका काय राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

MarathiNews / रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठीवरून महायुतीत खळबळ; मंत्री नाराज?

 

संपादक : अनिलसिंग चव्हाण

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये पुन्हा एकदा मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने शिंदेसेनेचे मंत्री नाराज असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.eknathshinde

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याची भूमिका घेतली होती.

मात्र, २७ ऑगस्ट रोजी रिक्षा-टॅक्सीचालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ जाहीर केली.

या निर्णयापूर्वी परिवहन मंत्रालयाला विश्वासात घेतले नसल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. Devendrafadnvis

दोन दिवस आधी परिवहन मंत्र्यांची वेगळी भूमिका आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा निर्णय यामुळे भाजप-शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.

MaharashtraPolitics/आता या मुद्द्यावर महायुतीतील नेत्यांची भूमिका काय राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.political

AccidentNews/रक्षाबंधनासाठी आले अन् काळाने हिरावले! संग्रामपूर तालुक्यात भीषण अपघात

 

रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीला आणि तिच्या तीन मुलांना घेऊन आपल्या गावी परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. संग्रामपूर तालुक्यातील टुणकी–लाडनापूर मार्गावर दूध डेअरीजवळ भीषण अपघात झाला.

या अपघातात एका चिमुकल्याचा आणि त्याच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तेल्हारा तालुक्यातील बुरवा येथील दुचाकीस्वार रक्षाबंधनानिमित्त मध्य प्रदेशातील जसौंदी येथे आपल्या बहिणीच्या घरी गेला होता. Brekingnews

बहिणीला आणि तिच्या तीन मुलांना सोबत घेऊन तो बुरवा गावाकडे परतत असताना संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर दूध डेअरीजवळ हा भीषण अपघात घडला. accidentnews

याचवेळी रेल्वे विभागाची महिंद्रा बोलेरो टुणकीकडून जळगावच्या दिशेने भरधाव वेगाने जात असल्याचे सांगण्यात येत आहे. बोलेरो आणि दुचाकीची जोरदार धडक झाली.

धडक एवढी भीषण होती की दुचाकी तब्बल २५ फूट अंतरावर फेकली गेल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की एका बालकाचे शरीर आणि शीर रस्त्यापासून अनुक्रमे सुमारे ३०० आणि ४०० फूट अंतरावर फेकले गेल्याची माहिती समोर आली आहे.

या भीषण अपघातात एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या आईचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कुटुंबातील इतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.boloroapghat

रक्षाबंधनाच्या आनंदाच्या दिवशी बहिणीला घेऊन घरी परतणाऱ्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.baikaccdent

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, बोलेरोचा वेग किती होता आणि या घटनेला कोण जबाबदार आहे, याचा तपास संबंधित पोलीस करत आहेत.

AccidentNews/संग्रामपूर तालुक्यातील टुणकी–लाडनापूर मार्गावरील या भीषण अपघातामुळे पुन्हा एकदा भरधाव वाहनांच्या वेगाचा आणि रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

RoadAccident/टुणकी–लाडनापूर रोडवर भीषण अपघात; चिमुकल्याचा जागीच मृत्यू, आई गंभीर जखमी

 

संग्रामपूर तालुक्यातील टुणकी–लाडनापूर रोडवर बोलेरो आणि मोटरसायकलची भीषण धडक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या अपघातात मोटरसायकलवरील एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून, त्याची आई गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.BreakingNews

मिळालेल्या माहितीनुसार, टुणकी–लाडनापूर मार्गावर बोलेरो वाहन आणि मोटरसायकल यांच्यात जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की मोटरसायकलवरील चिमुकल्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघातात चिमुकल्याची आई देखील गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे.#LatestNews

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला?

बोलेरो चालकाचा वेग किती होता? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. संबंधित पोलीस प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू असून, अपघाताची संपूर्ण परिस्थिती तपासल्यानंतरच कारण स्पष्ट होणार आहे.

टुणकी–लाडनापूर रोडवरील या भीषण अपघातामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील रस्त्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

RoadAccident/या अपघातातील मृत चिमुकल्याला भावपूर्ण श्रद्धांजली, तर गंभीर जखमी आईच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Marathakunbi/जरांगेंची भीती खरी ठरली? कुणबी वैधता नाकारल्याने विद्यार्थिनी अडचणीत!

 

मराठा-कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा पुन्हा चर्चेत!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बाधणी येथील सोनवणे कुटुंबाने जात वैधता प्रमाणपत्राबाबत गंभीर दावा केला आहे.manojjarange

कुटुंबातील आजोबांच्या नोंदीमध्ये कुणबी उल्लेख असल्याचे सांगितले जात असतानाही, त्यापूर्वीच्या पिढीतील मराठा नोंदीचा आधार घेत जात वैधता प्रमाणपत्र नाकारण्यात आल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.shitalsonvane

शीतल सोनवणे हिचा नाशिकमधील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश झाला आहे. मात्र वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यास शैक्षणिक सवलत आणि शिष्यवृत्तीवर परिणाम होण्याची भीती कुटुंबाने व्यक्त केली आहे.

२६ डिसेंबर २०२५ रोजी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता, अशी माहिती तिचे वडील उदय सोनवणे यांनी दिली.

प्रश्न सुटला नाही तर टोकाचा निर्णय घेण्याचा इशारा कुटुंबाने दिला आहे. दरम्यान, जात प्रमाणपत्राच्या प्रश्नामुळे मुलांचे शिक्षण आणि नोकरी धोक्यात येऊ शकते, अशी भीती मनोज जरांगे यांनी यापूर्वी व्यक्त केली होती.marathaarkshan

Marathakunbi/आता या प्रकरणात शासन आणि जात पडताळणी समिती काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Grampanchayatnews /१५ ऑगस्टची ग्रामसभा रखडली; 8 दिवसात ग्रामसभा न घेतल्यास सोनाळा ग्रामपचायतला ताला ठोक आंदोलन इशारा…

 

सोनाळा ( प्रतिनिधी )ग्रामपंचायत सोनाळा येथे दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणारी ग्रामसभा दिनांक २० ऑगस्ट रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, निश्चित केलेल्या दिवशीही ग्रामसभा न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामसभा तातडीने घेण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सोनाळा येथील सरपंच यांना निवेदन देण्यात आले असून, 8 दिवसात ग्रामसभा घेण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.

ग्रामसभा ही गावातील विकासकामे, विविध समस्या, शासकीय योजना तसेच ग्रामस्थांच्या मागण्यांवर चर्चा करून निर्णय घेण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याने तिचे आयोजन वेळेत होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच ग्रामसभेची अधिकृत नोटीस, अजेंडा आणि आवश्यक पूर्वसूचना ग्रामस्थांना देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ग्रामसभा वारंवार रखडल्याने ग्रामस्थांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

8 दिवसात ग्रामसभा घेण्यात आली नाही, तर ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात ‘ताल ठोक’ आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आंदोलन शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने करण्यात येणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामसभा न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन तसेच पुढील तीव्र आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन 8 दिवसात ग्रामसभा आयोजित करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. प्रतिक्रिया :
सोनाळा ग्रामपंचायत अंतर्गत अद्याप १५ ऑगस्टची ग्रामसभा घेण्यात आलेली नाही.

Ravikanttupakar/मंत्र्यांचे बंगले आणि गाड्या लिलाव आंदोलन; रविकांत तुपकरांसह शेतकऱ्यांना अटक! नियमित कर्जदारांना २ लाखांचे प्रोत्साहन अनुदान आणि वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या कक्षेत घेण्याची मागणी

ग्रामसभा ही गावातील विकासकामे व नागरिकांच्या प्रश्नांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवक यांनी तत्काळ ग्रामसभा आयोजित करावी.ग्रामस्थांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

Grampanchayatnews/ग्रामसभा तातडीने न घेतल्यास ग्रामस्थांच्या वतीने ‘कुलूप ठोको’ आंदोलन करण्यात येईल. सतीश व्ही. वानखडे, सामाजिक कार्यकर्ते, सोनाळा

Ravikanttupakar/मंत्र्यांचे बंगले आणि गाड्या लिलाव आंदोलन; रविकांत तुपकरांसह शेतकऱ्यांना अटक! नियमित कर्जदारांना २ लाखांचे प्रोत्साहन अनुदान आणि वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या कक्षेत घेण्याची मागणी

 

बुलढाणा | प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत करण्यात आलेल्या आंदोलनाला आक्रमक स्वरूप आले. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, तसेच यापूर्वीच्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफीच्या कक्षेत समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान सरकारचा निषेध करत मंत्र्यांचे बंगले आणि सरकारी गाड्यांचा लिलाव करण्याचा इशारा देण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
आंदोलनासाठी मुंबईत दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. “२०१९ पूर्वीच्या वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या” तसेच नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत द्यावी, अशा मागण्या फलकांवर करण्यात आल्या. Farmernews

दरम्यान, आंदोलनाचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई केली. येलो गेट पोलीस ठाणे, मुंबई येथे रविकांत तुपकर यांच्यासह अक्षय पाटील आणि शेकडो शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आंदोलनाच्या ठिकाणाहून समोर आली.

शेतकऱ्यांचा सवाल — नियमित कर्ज फेडणाऱ्यांना प्रोत्साहन कधी?

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयांमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा मुद्दा आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. संकटाच्या काळातही कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रोत्साहनपर २ लाख रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

तसेच काही शेतकरी मागील कर्जमाफीच्या निकषांमुळे लाभापासून वंचित राहिले आहेत. अशा शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश करून त्यांना दिलासा देण्याची मागणीही करण्यात आली.

सरकारने मागण्या गांभीर्याने घ्याव्यात शेतकऱ्यांच्या मागण्या केवळ आश्वासनांपुरत्या मर्यादित न ठेवता त्यावर ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.

मुंबईतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. रविकांत तुपकर, अक्षय पाटील यांच्यासह शेतकऱ्यांना येलो गेट पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याने आंदोलनाच्या पुढील भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.

Farmernews/शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न, नियमित कर्जदारांना २ लाखांचे प्रोत्साहन अनुदान आणि वंचित शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश — या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

#RavikantTupkar #AkshayPatil #FarmerProtest #FarmersProtest #ShetkariAndolan #KarjMafi #KisanAndolan #FarmerLoanWaiver #MaharashtraFarmers #MumbaiProtest #YellowGatePoliceStation #Shetkari #Kisan #MaharashtraNews #MumbaiNews #SuryaMarathiNews #शेतकरीआंदोलन #कर्जमाफी #रविकांततुपकर #मुंबईआंदोलन #शेतकरी #सूर्यामराठीन्यूज

Adharlink/आधार सीलिंग अंगणवाडीत विविध उपक्रमांतून कार्यक्रम उत्साहात

 

यावला (प्रतिनिधी : विकी वानखेडे)

– बोराळे येथील आधार सीलिंग अंगणवाडीमध्ये अंगणवाडीतील बालकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. बालकांचा सर्वांगीण विकास, आरोग्य, स्वच्छता तसेच शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने कार्यक्रम घेण्यात आला. Adhar

यावेळी अंगणवाडी सेविका रेणुका वानखेडे तसेच मदर्सनीस सुवर्णा राजपूत यांनी बालकांना विविध शैक्षणिक व मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले. बालकांसोबत खेळ, गाणी, कविता, बडबडगीते तसेच विविध शैक्षणिक कृती घेण्यात आल्या.adharlink

कार्यक्रमादरम्यान बालकांच्या आरोग्य, पोषण व स्वच्छतेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना मिळणारे पूर्वप्राथमिक शिक्षण आणि पोषण आहार याबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

अंगणवाडी सेविका रेणुका वानखेडे व मदर्सनीस सुवर्णा राजपूत यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला. बालकांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने अंगणवाडी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.yavalnews

Morchanews/अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात यावलमध्ये विराट एल्गार मोर्चा; “आरक्षण वाचवा, संविधान वाचवा”चा बुलंद नारा

 

यावल (प्रतिनिधी : विकी वानखडे) –

अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात तसेच आरक्षणाचे संरक्षण आणि भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी यावल शहरात तालुक्यातील समाज बांधवांच्या वतीने विराट एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात यावल तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले. मोर्चामध्ये तब्बल दहा हजारांहून अधिक समाज बांधव सहभागी झाल्याचा आयोजकांचा दावा करण्यात आला.

“आरक्षण वाचवा, संविधान वाचवा”, “अनुसूचित जातींचे आरक्षण अबाधित ठेवा”, “सामाजिक न्यायाचा विजय असो” अशा घोषणांनी यावल शहराचा परिसर दुमदुमून गेला. हातात फलक, बॅनर आणि संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश घेऊन समाज बांधवांनी मोर्चामध्ये सहभाग नोंदवला.

या विराट मोर्चाचा मुख्य उद्देश अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये करण्यात येणाऱ्या वर्गीकरणाला विरोध दर्शविणे, आरक्षणाच्या घटनात्मक संरक्षणाची मागणी करणे तसेच सामाजिक न्यायाची भूमिका ठामपणे मांडणे हा होता. मोर्चादरम्यान वक्त्यांनी अनुसूचित जातींच्या हक्कांवर कोणत्याही प्रकारे गदा येऊ नये आणि आरक्षणाच्या मूळ उद्देशाला धक्का पोहोचू नये, अशी भूमिका मांडली.suryamarathinews

मोर्चामध्ये यावल तालुक्यातील विविध गावांमधून नागरिक, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोठ्या जनसमुदायामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर गर्दीचे चित्र पाहायला मिळाले.

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून शासनापर्यंत आपल्या मागण्या पोहोचविण्याची मागणी केली. अनुसूचित जातींच्या आरक्षणासंदर्भातील कोणताही निर्णय घेताना संबंधित समाजाच्या हिताचा आणि सामाजिक न्यायाचा विचार करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.jalgaonnews

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी आयोजकांनीही समाज बांधवांना सहकार्याचे आवाहन केले.

Yavalnews/यावल तालुक्यातील या विराट एल्गार मोर्चामुळे अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या प्रश्नावर समाजाची एकजूट आणि नाराजी ठळकपणे समोर आली असून, आता शासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.