Home Blog

Gharkulyojna/घरकुल योजनेतील अनियमिततेविरोधात डॉ बच्छिरे यांचा एल्गार

0

 

घरकुल योजनेतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; १५ दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा जिल्हा संघटक डॉ. गोपालसिंह बछिरे यांनी दिला

​लोणार:नगरपरिषद हद्दीमध्ये रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत झालेल्या कामांमध्ये पारदर्शकता राहावी आणि लाभार्थ्यांना मिळालेल्या अनुदानाची सविस्तर माहिती समोर यावी, यासाठी शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या वतीने लोणार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना कडक इशारा देणारे निवेदन सादर करण्यात आले.

All Sikh sikhaligar/ ऑल सिख-सिकलीगर असोसिएशन (आसा)ची महाराष्ट्र स्तरीय बैठक बडनेरा येथे उत्साहात संपन्न

​निवेदनात नमूद केल्यानुसार, सन २०२१ ते सन २०२५ या कालावधीत रमाई आवास योजना आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सर्व घरकुलांची सविस्तर व साक्षांकित (Attested) माहिती मागवण्यात आली आहे. यामध्ये सर्व घरकुलधारकांचे स्थळ निरीक्षण अहवाल त्यासोबत जोडलेली छायाचित्रे, लाभार्थ्यांनी सादर केलेली कागदपत्रे आणि आजपर्यंत कोणत्या लाभार्थ्याला किती अनुदान मिळाले, याच्या धनादेशाच्या तारखांसह संपूर्ण माहितीचा समावेश आहे.panchayatsamiti

​पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, येत्या १५ दिवसांच्या आत ही सर्व माहिती साक्षांकित करून नगरपरिषदेने उपलब्ध करून द्यावी. ठरलेल्या मुदतीत माहिती न मिळाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लोणार नगरपरिषदेच्या प्रांगणात तीव्र ठिय्या आंदोलन छेडले जाईल. एवढेच नव्हे तर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना मुख्य द्वारातून आत प्रवेश करू दिला जाणार नाही, असा थेट इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.lonarnews

Gharkulyojna/​या निवेदनावर जिल्हा संघटक डॉ. गोपालसिंह बछिरे, शहर प्रमुख गजानन जाधव सर, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे सर, युवा शहराधिकारी श्रीकांत मादनकर, शहर संघटक तानाजी मापारी, विभाग प्रमुख तानाजी आंभोरे, इक्बाल कुरेशी, अश्पाक खान, योगेश भूक्कन, गोपाल मापारी, शे. सादेक शे. जमीर, शेख इक्बाल, ओवेस कुरेशी, ज्ञानेश्वर दुधामोगरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नगरपरिषद प्रशासन आता यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

All Sikh sikhaligar/ ऑल सिख-सिकलीगर असोसिएशन (आसा)ची महाराष्ट्र स्तरीय बैठक बडनेरा येथे उत्साहात संपन्न

0

 

नानकसिंगजी बावरी यांची विदर्भ अध्यक्षपदी, तर अनिलसिंग चव्हाण यांची विदर्भ उपाध्यक्षपदी नियुक्ती

बुलढाणा | प्रतिनिधी

ऑल सिख-सिकलीगर असोसिएशन (आसा)च्या वतीने महाराष्ट्र स्तरीय महत्त्वपूर्ण बैठक बडनेरा येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली. या बैठकीत संघटनेच्या आगामी वाटचालीसह समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजाच्या हितासाठी संघटितपणे कार्य करण्यासोबतच सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

बैठकीदरम्यान संघटनेच्या महाराष्ट्रातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. तळेगाव, तालुका आष्टी, जिल्हा वर्धा येथील श्री. दास अर्थात नानकसिंगजी बावरी यांची विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा येथील सूर्या मराठी न्यूजचे संपादक श्री. अनिलसिंग चव्हाण यांची विदर्भ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्त्यांमुळे विदर्भातील संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळणार असून, संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवर, संघटनेचे पदाधिकारी तसेच समाजबांधवांकडून अभिनंदन करण्यात आले.

नानकसिंगजी बावरी यांच्यावर विदर्भ अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. समाजहितासाठी सातत्याने कार्य करण्याच्या त्यांच्या भूमिकेची दखल घेत ही जबाबदारी देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

त्याचप्रमाणे पत्रकारिता आणि सामाजिक विषयांवर सातत्याने आवाज उठविणारे सूर्या मराठी न्यूजचे संपादक अनिलसिंग चव्हाण यांची विदर्भ उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने समाजबांधव आणि त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील सामाजिक आणि संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. वाहेगुरू जींच्या असीम कृपेने संघटनेचे कार्य अधिक मजबूत व्हावे, समाजातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य व्हावे आणि समाजसेवेचे कार्य अधिक व्यापक व्हावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनीही संघटनेने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला. समाजातील एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

बडनेरा येथे पार पडलेल्या या महाराष्ट्र स्तरीय बैठकीमुळे ऑल सिख-सिकलीगर असोसिएशन (आसा)च्या विदर्भातील संघटनात्मक विस्ताराला नवी ऊर्जा मिळणार असल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात समाजाच्या विविध प्रश्नांवर काम करण्यासोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने संघटनेची वाटचाल अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवनियुक्त पदाधिकारी

श्री. नानकसिंगजी बावरी
विदर्भ अध्यक्ष – ऑल सिख-सिकलीगर असोसिएशन (आसा)

श्री. अनिलसिंग चव्हाण
विदर्भ उपाध्यक्ष – ऑल सिख-सिकलीगर असोसिएशन (आसा)
संपादक – सूर्या मराठी न्यूज

नवनियुक्त विदर्भ अध्यक्ष श्री. नानकसिंगजी बावरी आणि विदर्भ उपाध्यक्ष श्री. अनिलसिंग चव्हाण यांचे सूर्या मराठी न्यूज परिवाराकडून हार्दिक अभिनंदन आणि पुढील सामाजिक वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा!

FourBabies/चारबन येथे एका महिलेने दिला चार बाळांना जन्म; माता व चारही नवजात बाळ सुरक्षित!

0

 

जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल ‘चारबन’ या गावातून एक अत्यंत दुर्मिळ आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे.

गावातील रहिवासी पंशिराम सस्त्या यांची २७ वर्षीय पत्नी रियानी यांनी कोणत्याही वैद्यकीय सुविधेविना अत्यंत कठीण परिस्थितीत घरीच प्रसूतीदरम्यान तीन मुले आणि एका मुलीला जन्म दिला. SuryaMarathiNews

प्रसूतीनंतर माता आणि चारही नवजात बालकांना तातडीने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत आई रियानी आणि चारही बाळांची प्रकृती सुदैवाने स्थिर असल्याचे आढळले.

बालकांचे वजन ९०० ग्रॅम ते १ किलोदरम्यान असल्याने पुढील विशेष वैद्यकीय उपचारासाठी त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, लाखो किंवा करोडो प्रसूतींमागे घडणारी ही अत्यंत दुर्मिळ घटना असून, अशा प्रकरणात मुदतीपूर्व प्रसूतीमुळे बाळांचे वजन कमी असणे स्वाभाविक असते. GoodNews

सध्या खामगाव येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली माता व बालकांवर उपचार सुरू असून संपूर्ण परिसरात या घटनेची मोठी चर्चा आहे. सूर्या मराठी न्यूज साठी अनिलसिंग चव्हाण बुलडाणा

Congressnews /बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस जिल्हाध्यक्षाची भाजपाशी जवळीकता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना मान्य होईल का.??

0

 

नुकताच जिल्हा केंद्रीय सहकारी बँक बुलढाणाच्या संचालक मंडळ निवड़णुकीला सुरुवात झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यासह जळगाव जामोद तालुक्यातील सहकार क्षेत्राच राजकारण तापल आहे. 24 जुलै 2026 या अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसा पर्यंत जळगाव जामोद तालुका सोसायटी मतदारसंघातुन एकूण 5 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.bjpnews

त्यामधे सहाकार नेते राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटिल, भाजपाचे परीक्षित ठाकरे आणि कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटिल, ज्योतीताई ढोकणे, जुबेर पटेल या तिघानी अर्ज दाखल केले. कॉंग्रेस पक्षाचे 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले असले तरी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटिल व ज्योतीताई ढोकणे यांच्या अर्जावर भाजपा कार्यकर्ते असलेल्या बँक प्रतिनिधीच्या अनुमोदक म्हणून सह्या असल्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात तो चर्चेचा विषय ठरत आहे.

यापूर्वी सुद्धा जळगाव जामोद कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकी मध्ये कॉंग्रेस पक्षाने प्रसेनजीत पाटिल यांच्या विरोधात भाजपाला साथ देत निवडणुक लढ़विली तेव्हा सर्वसामान्य कॉंग्रेसी विचारधारेच्या जनतेचा मोठा रोष पक्षावर आल्याचे दिसून आले होते.

कॉंग्रेस, भाजपा कट्टर वैचारिक वाद असलेले पक्षातील नेते स्थानिक पातळीवर असे जुळवुन घेत असतील तर त्यावर राज्य पातळीवरील नेत्याची भूमिका काय असा प्रश्न जनतेला पडलेला आहे.harshvardhansapkal

Prakashpatil/कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष भाजपाच्या मदतीने निवडणुक रिंगनात उतरण्याच्या चर्चा राजकीय क्षेत्रासह सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा रंगू लागल्याने त्यावर जिल्हातीलच असलेले कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तथा कॉंग्रेस पक्षाचे अन्य नेते काय भूमिका घेतात याकड़े सर्वाचे लक्ष लागलेले आहे.

SangrampurNews /अवैध रेती साठ्यावर महसूल विभागाची मोठी कारवाई; जप्त रेती २० घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप

0

 

संग्रामपूर | प्रतिनिधी

संग्रामपूर तालुक्यातील सावळी, पेसोडा, खिरोडा व देऊळगाव घाट परिसरातून अवैधरित्या उपसा करून शासकीय जागेवर साठवून ठेवण्यात आलेली रेती महसूल विभागाने जप्त केली. तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई करत जप्त केलेली रेती शासनाच्या नियमानुसार घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप केली.

तसेच तहसील कार्यालयातील सुरू असलेल्या शासकीय बांधकामासाठी आवश्यक रेती नियमाप्रमाणे रॉयल्टी भरून उपलब्ध करून देण्यात आली.
मागील महिनाभरात संग्रामपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये अचानक धाडी टाकून पूर्णा नदीपात्रातून अवैध उपसा करून ई-क्लास शासकीय जागेवर साठवून ठेवलेली रेती महसूल विभागाने जप्त केली.

या कारवाईत तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार विकास शिंदे, मंडळ अधिकारी तांबारे, ग्राम महसूल अधिकारी भोसले, नायब तहसीलदार राहुल वसावे तसेच महसूल विभागातील इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

जप्त करण्यात आलेली रेती कवठळ, मारोड, चांगेफळ आणि सावळा येथील २० घरकुल लाभार्थ्यांना महा-खनिज प्रणालीद्वारे मोबाईलवर प्राप्त झालेल्या ओटीपी पडताळणीनंतर शासनाच्या नियमांनुसार मोफत देण्यात आली. या लाभार्थ्यांना एकूण १०० ब्रास रेतीचे वितरण करण्यात आले.

याशिवाय तहसील कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर सुरू असलेल्या बहुउद्देशीय हॉलच्या शासकीय बांधकामासाठी ठेकेदार श्री. परळीकर यांना सुमारे १० ब्रास रेती नियमानुसार स्वामित्वधन (रॉयल्टी) भरून देण्यात आली.

Prashant patil /महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन व साठवणुकीवर आळा बसण्यास मदत होणार असून, जप्त रेतीचा उपयोग गरजू घरकुल लाभार्थ्यांना आणि शासकीय कामांसाठी करण्यात आल्याने या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

Court News/जळगाव जामोदला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची मंजुरी

0

 

मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
आमदार संजय कुटे यांनी वकील संघासोबत घेतला आढावा

जळगाव जामोद : न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेत मा. मुंबई उच्च न्यायालयाने जळगाव जामोद येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापनेस मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे लवकरच जळगाव जामोदमध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय कार्यरत होणार असून, परिसरातील नागरिकांसाठी न्यायप्रक्रिया अधिक जलद व सुलभ होणार आहे.drsanjaykute

या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर जळगाव जामोद येथील वकील संघाच्या कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत आमदार डॉ.संजय कुटे यांनी वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांशी व सदस्यांशी सविस्तर संवाद साधत न्यायालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या पुढील प्रशासकीय कार्यवाहीचा आढावा घेतला.court news

न्यायालयाच्या इमारतीची उपलब्धता, आवश्यक पायाभूत सुविधा, कर्मचारी नियुक्ती तसेच न्यायालयाचे कामकाज सुरळीत सुरू होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदार संजय कुटे यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू झाल्यानंतर जळगाव जामोद तसेच परिसरातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयापर्यंत वारंवार जावे लागणार नाही. वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठी बचत होणार असून न्यायदानाची प्रक्रिया अधिक प्रभावी आणि गतिमान होईल. Jalgaonjamod

या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक, वकील आणि न्यायालयीन कामकाजाशी संबंधित घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बैठकीस वकील संघाचे अध्यक्ष ॲड. रुपेश विश्वेकर, सचिव ॲड. अभिमन्यू वाघ, ज्येष्ठ सदस्य ॲड.मनोहर माहेश्वरी, ॲड. करीम खान, ॲड.शशिकांत गुप्ता, ॲड.बाळासाहेब खिरोडकर, ॲड. विजय वानखेडे, ॲड. राहुल इंगळे, ॲड. दत्ता खेर्डेकर, ॲड. मनसुटे, ॲड. धर्म, ॲड.अमर पाचपोर, ॲड. तोगळकर, ॲड. रतन इंगळे, ॲड. दीपक इंगळे, ॲड. गजेंद्र सातव, ॲड. रवी उमरकर यांच्यासह वकील संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

न्यायालय स्थापनेच्या मंजुरीमुळे जळगाव जामोदच्या न्यायव्यवस्थेच्या विकासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला असून, नागरिकांना स्थानिक पातळीवर अधिक प्रभावी न्यायसेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

cockroach janata party news काक्रोच जनता पार्टी तर्फे हिंगणघाट येथे राष्ट्रपतींना निवेदन

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : काक्रोच जनता पार्टी, हिंगणघाटच्या वतीने वैद्यकीय, अभियांत्रिकी, सामाईक प्रवेश व शिक्षक पात्रता परीक्षांतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा कराव्यात तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना हिंगणघाट उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत निवेदन सादर करण्यात आले.cockroach janata party news

निवेदनात पद्मश्री सन्मानित शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे.

 

तसेच, देशातील विद्यार्थी व पालकांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कायम राखण्यासाठी प्रवेश व पात्रता परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष व उत्तरदायी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Wardhanews /शिक्षण व्यवस्था अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने आवश्यक पावले उचलावीत.

Sangitraobhongal/आठ वर्ग, तीनच वर्गखोल्या; काकणवाडा बु येथील शाळेवरील अन्याय दूर करा – संगीतराव भोंगळ

0

 

संग्रामपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील काकणवाडा बु. येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेस तातडीने दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करून विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी जिल्हा परिषद बुलढाणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांच्याकडे भेट घेऊन केली.sangitraobhongal

काकणवाडा बु. येथील ग्रामस्थांनी शाळेच्या विविध समस्यांबाबत संगीतराव भोंगळ यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्याची तात्काळ दखल घेत भोंगळ यांनी ग्रामस्थांसह जिल्हा परिषद गाठून मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर केले.

काकणवाडा बु. येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेत सध्या १२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या आठ वर्गांसाठी केवळ तीनच वर्गखोल्या उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना अत्यंत गैरसोयीच्या परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे. जागेअभावी काही वर्गांना व्हरांड्यात बसून शिक्षण घ्यावे लागते. त्यामुळे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसेच आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे.oanchaysamiti

अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अध्यापनात अडथळे निर्माण होत असून शिक्षणाचा दर्जाही खालावत आहे. शिक्षकांनाही अध्यापन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, काकणवाडा येथील उर्दू भाषिक शाळेची स्थापना संगीतराव भोंगळ हे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती असताना त्यांच्या पुढाकारातून झाली होती. त्यामुळे या शाळेच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्यांची तात्काळ दखल घेत पुन्हा एकदा प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा सुरू केला आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून काकणवाडा बु. येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेस तातडीने दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करून शाळेवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी संगीतराव भोंगळ (राजू पाटील) यांनी केली.

Sangitraobhongal यावेळी गावातील प्रमुख नागरिक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. या निवेदनाची प्रत शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांनाही सादर करण्यात आली.

PWDnews/एकलारा–बावनबीर मार्गावरील सुकलेल्या वृक्षांची चौकशी करा; दोषींवर कारवाईची मागणी

0

 

एकलारा–बावनबीर मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या वृक्षारोपण योजनेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक पिच्छडा वर्ग संघटनेचे विदर्भ अध्यक्ष शेख कदीर भाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, खामगाव येथील अधिकारी एकनाथ तळेल यांच्याकडे सविस्तर तक्रार निवेदन सादर केले.


(वरवट बकाल परिसरातील सुकलेल्या वृक्षांचे छायाचित्र)

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतून या मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र संबंधित विभागाच्या निष्काळजीपणामुळे तसेच योग्य देखभाल व संरक्षणाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष सुकून नष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय झाला असून पर्यावरणीय हानीदेखील झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शेख कदीर भाई यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. तसेच वृक्षारोपणासाठी खर्च झालेल्या निधीचे लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे, सुकलेल्या वृक्षांची तात्काळ पुनर्लागवड करावी आणि दोषींवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. Fda farmernews

 

याशिवाय करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल लेखी स्वरूपात संघटनेला देण्याची मागणीही करण्यात आली आहे. संबंधित विभागाकडून समाधानकारक कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल.

Warvatnews /तसेच माहितीचा अधिकार अधिनियम, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, लोकायुक्त, पर्यावरण विभाग आणि न्यायालयीन स्तरावर दाद मागितली जाईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

Rudhananews/रूधाना/वकाना गावातील नाल्यांची साफसफाई रखडली; नागरिकांमध्ये संताप समाजकार्यकर्त्या मंदाताई कट्यारमल यांनी सोशल मीडियाद्वारे प्रशासनाचे वेधले लक्ष

0

 

संग्रामपूर (प्रतिनिधी) : संग्रामपूर तालुक्यातील रूधाना/वकाना गावामध्ये अनेक महिन्यांपासून नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नसल्याने गावकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि सांडपाणी साचल्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावातील अनेक भागांमध्ये नाल्यांचे पाणी साचून राहत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या तोंडावरही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजकार्यकर्त्या मंदाताई कट्यारमल यांनी गावातील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रसारित केला. सदर व्हिडिओ अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नागरिकांकडून प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे. SangrampurNews

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी जोर धरत आहे.

समाजकार्यकर्त्या मंदाताई कट्यारमल यांनी प्रशासनाने त्वरित दखल घेऊन नाल्यांची साफसफाई करावी तसेच गावात स्वच्छतेच्या आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या प्रकरणानंतर वरिष्ठ अधिकारी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करणार का, याकडे संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. Rudhananews

📸 छायाचित्र: रूधाना/वकाना गावातील अस्वच्छ व गाळाने भरलेला नाला; अनेक महिन्यांपासून साफसफाई न झाल्याने नागरिक त्रस्त.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━