Home Blog

cockroach janata party news काक्रोच जनता पार्टी तर्फे हिंगणघाट येथे राष्ट्रपतींना निवेदन

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : काक्रोच जनता पार्टी, हिंगणघाटच्या वतीने वैद्यकीय, अभियांत्रिकी, सामाईक प्रवेश व शिक्षक पात्रता परीक्षांतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा कराव्यात तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना हिंगणघाट उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत निवेदन सादर करण्यात आले.cockroach janata party news

निवेदनात पद्मश्री सन्मानित शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे.

 

तसेच, देशातील विद्यार्थी व पालकांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कायम राखण्यासाठी प्रवेश व पात्रता परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष व उत्तरदायी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Wardhanews /शिक्षण व्यवस्था अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने आवश्यक पावले उचलावीत.

Sangitraobhongal/आठ वर्ग, तीनच वर्गखोल्या; काकणवाडा बु येथील शाळेवरील अन्याय दूर करा – संगीतराव भोंगळ

0

 

संग्रामपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील काकणवाडा बु. येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेस तातडीने दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करून विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी जिल्हा परिषद बुलढाणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांच्याकडे भेट घेऊन केली.sangitraobhongal

काकणवाडा बु. येथील ग्रामस्थांनी शाळेच्या विविध समस्यांबाबत संगीतराव भोंगळ यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्याची तात्काळ दखल घेत भोंगळ यांनी ग्रामस्थांसह जिल्हा परिषद गाठून मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर केले.

काकणवाडा बु. येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेत सध्या १२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या आठ वर्गांसाठी केवळ तीनच वर्गखोल्या उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना अत्यंत गैरसोयीच्या परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे. जागेअभावी काही वर्गांना व्हरांड्यात बसून शिक्षण घ्यावे लागते. त्यामुळे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसेच आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे.oanchaysamiti

अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अध्यापनात अडथळे निर्माण होत असून शिक्षणाचा दर्जाही खालावत आहे. शिक्षकांनाही अध्यापन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, काकणवाडा येथील उर्दू भाषिक शाळेची स्थापना संगीतराव भोंगळ हे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती असताना त्यांच्या पुढाकारातून झाली होती. त्यामुळे या शाळेच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्यांची तात्काळ दखल घेत पुन्हा एकदा प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा सुरू केला आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून काकणवाडा बु. येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेस तातडीने दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करून शाळेवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी संगीतराव भोंगळ (राजू पाटील) यांनी केली.

Sangitraobhongal यावेळी गावातील प्रमुख नागरिक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. या निवेदनाची प्रत शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांनाही सादर करण्यात आली.

PWDnews/एकलारा–बावनबीर मार्गावरील सुकलेल्या वृक्षांची चौकशी करा; दोषींवर कारवाईची मागणी

0

 

एकलारा–बावनबीर मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या वृक्षारोपण योजनेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक पिच्छडा वर्ग संघटनेचे विदर्भ अध्यक्ष शेख कदीर भाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, खामगाव येथील अधिकारी एकनाथ तळेल यांच्याकडे सविस्तर तक्रार निवेदन सादर केले.


(वरवट बकाल परिसरातील सुकलेल्या वृक्षांचे छायाचित्र)

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतून या मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र संबंधित विभागाच्या निष्काळजीपणामुळे तसेच योग्य देखभाल व संरक्षणाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष सुकून नष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय झाला असून पर्यावरणीय हानीदेखील झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शेख कदीर भाई यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. तसेच वृक्षारोपणासाठी खर्च झालेल्या निधीचे लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे, सुकलेल्या वृक्षांची तात्काळ पुनर्लागवड करावी आणि दोषींवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. Fda farmernews

 

याशिवाय करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल लेखी स्वरूपात संघटनेला देण्याची मागणीही करण्यात आली आहे. संबंधित विभागाकडून समाधानकारक कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल.

Warvatnews /तसेच माहितीचा अधिकार अधिनियम, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, लोकायुक्त, पर्यावरण विभाग आणि न्यायालयीन स्तरावर दाद मागितली जाईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

Rudhananews/रूधाना/वकाना गावातील नाल्यांची साफसफाई रखडली; नागरिकांमध्ये संताप समाजकार्यकर्त्या मंदाताई कट्यारमल यांनी सोशल मीडियाद्वारे प्रशासनाचे वेधले लक्ष

0

 

संग्रामपूर (प्रतिनिधी) : संग्रामपूर तालुक्यातील रूधाना/वकाना गावामध्ये अनेक महिन्यांपासून नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नसल्याने गावकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि सांडपाणी साचल्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावातील अनेक भागांमध्ये नाल्यांचे पाणी साचून राहत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या तोंडावरही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजकार्यकर्त्या मंदाताई कट्यारमल यांनी गावातील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रसारित केला. सदर व्हिडिओ अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नागरिकांकडून प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे. SangrampurNews

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी जोर धरत आहे.

समाजकार्यकर्त्या मंदाताई कट्यारमल यांनी प्रशासनाने त्वरित दखल घेऊन नाल्यांची साफसफाई करावी तसेच गावात स्वच्छतेच्या आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या प्रकरणानंतर वरिष्ठ अधिकारी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करणार का, याकडे संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. Rudhananews

📸 छायाचित्र: रूधाना/वकाना गावातील अस्वच्छ व गाळाने भरलेला नाला; अनेक महिन्यांपासून साफसफाई न झाल्याने नागरिक त्रस्त.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Ravikanttupkar /सरकार झुकले, पाच दिवसांचा संघर्ष थांबला; रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित!

0

 

गिरीश महाजनांची शिष्टाई; सरकारने मागितला ४ दिवसांचा अवधी, मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक,
सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर पुन्हा संघर्षाचा इशारा

बुलढाणा (प्रतिनिधी) : सरसकट, विना अट-विना शर्त कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर शुक्रवारी, १९ जून रोजी तूर्त स्थगित करण्यात आले. राज्यभर उग्र होत चाललेल्या आंदोलनाची दखल घेत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी थेट आंदोलनस्थळी येऊन तुपकर यांच्याशी चर्चा केली.

सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यासाठी चार दिवसांचा वेळ मागण्यात आला. अखेर उपस्थित शेतकऱ्यांच्या आग्रहाचा आणि मुख्यमंत्री व मंत्री गिरीश महाजन यांच्या विनंतीचा मान राखत रविकांत तुपकर यांनी आईच्या हस्ते ज्युस घेऊन अन्नत्याग आंदोलन स्थगित केले.girishmahajan

मात्र हा संघर्ष संपलेला नसून केवळ स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट करत, “चार-पाच दिवसांत ठोस आणि सकारात्मक मार्ग निघाला नाही तर राज्यभरातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतील आणि आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असा थेट इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, सलग पाच दिवस अन्नत्याग केल्यामुळे प्रचंड प्रकृती खालावलेल्या तुपकर यांना पुढील वैद्यकीय जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाच दिवसांत आंदोलनाने घेतले राज्यव्यापी स्वरूप

१५ जून रोजी बुलढाण्यात सुरू झालेले हे अन्नत्याग आंदोलनाने राज्यव्यापी स्वरूप धारण केले होते. तुपकर यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस बिघाड होत असताना शासनाकडून कोणतीही ठोस भूमिका समोर येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती.गावोगावी रास्तारोको, निदर्शने, टायर जाळून आंदोलन, तहसील कार्यालयांवरील मोर्चे, शासकीय कार्यालयाची कार्यालय जाळपोळ , जिल्हाधिकारी कार्यालयात फटाके फोडणे, एसटी बस पेटवणे, तलाठी कार्यालय जाळणे,व्यापारी बंद आणि विविध प्रकारच्या आक्रमक आंदोलनांनी राज्यातील अनेक भाग दणाणून गेले.Ravikanttupkar

अकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गापासून ते समृद्धी महामार्गापर्यंत शेतकरी रस्त्यावर उतरले. देऊळगाव मही येथे आंदोलनाच्या पाचव्या दिवशी शंभर टक्के बंद पाळण्यात आला चिखली तालुक्यातील मेरा खु येथे रास्तारोको करण्यात आला तर सिंदखेडराजा तालुक्यातील कंडारी भंडारी येथे संतप्त शेतकऱ्यांनी थेट समृद्धी महामार्ग रोखून शासनाविरोधात जोरदार आंदोलन छेडले.

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिस्थितीचे गांभीर्य आणखी वाढले होते. राज्यभरातून उफाळून येणारा हा संताप आणि तुपकर यांच्या ढासळणाऱ्या प्रकृतीमुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता.

“मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आलो”

आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी रविकांत तुपकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. भविष्यात तुम्हाला शेतकऱ्यांसाठी मोठे काम करायचे आहे, त्यामुळे अन्नत्याग आंदोलन सोडा,” अशी विनंती महाजन यांनी केली.

यावेळी तुपकर यांनी अंतिम निर्णय उपस्थित शेतकऱ्यांवर सोपवला. आंदोलनस्थळी जमलेल्या शेतकऱ्यांनी एकमुखाने उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर सरकारला चार दिवसांचा अवधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

*संघर्ष स्थगित; लढा कायम*

आईच्या हस्ते ज्युस स्वीकारून रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित केले असले तरी शेतकऱ्यांच्या मागण्यांवरील लढा कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये होणाऱ्या बैठकीकडे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Girishmahajanपाच दिवसांच्या संघर्षानंतर सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारला असला तरी कर्जमुक्ती आणि पीकविम्याच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष निर्णय होतो की नाही, यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे पुढील चार -पाच दिवस हे राज्यातील शेतकरी आंदोलनाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक मानले जात आहेत.

Tukarammundhe/”कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे यंत्रणा सक्रिय; चांगले अधिकारी प्रत्येक विभागात आवश्यक”

0

 

वर्धा प्रतिनिधी : सचिन वाघे

Tukarammundhe/राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा, पानमसाला आणि भेसळीविरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांमध्ये अशी भावना व्यक्त होत आहे की, अधिकारी सक्षम व प्रामाणिक असेल तर संपूर्ण यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्यरत होते.

वर्धा जिल्ह्यातही यापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या कार्यकाळात अवैध दारू व्यवसायावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. त्या काळात अनेक ठिकाणी अवैध व्यवसायांना आळा बसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांच्या बदलीनंतर पुन्हा काही भागांमध्ये अवैध व्यवसाय वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ कारवाई नव्हे, तर सातत्यपूर्ण आणि प्रभावी नेतृत्व आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे

पोलीस, महसूल, अन्न व औषध प्रशासन यांसारख्या विविध विभागांमध्ये कर्तव्यदक्ष आणि निर्भीड अधिकारी कार्यरत असल्यास शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन सर्वसामान्य नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होऊ शकतो.

Tukarammundhe /दरम्यान, अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी सातत्याने तपासणी मोहीम राबवावी आणि नागरिकांनीही बेकायदेशीर प्रकारांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Jalgaonnews/वकील संघ, जळगाव जामोद – नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड :-.अध्यक्षपदी अॅड. आर. पी. विश्वेकर,

0

 

दि. 11 जून 2026 रोजी वकील संघ, जळगाव जामोद येथे सन 2026-27 या कालावधीसाठी वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

यामध्ये अध्यक्षपदी अॅड. आर. पी. विश्वेकर, उपाध्यक्षपदी अॅड. एस. व्ही. खूपसे तसेच सचिवपदी अॅड. ए. बी. वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सदर निवड सभेच्या अध्यक्षस्थानी वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. माहेश्वरी होते. यावेळी अॅड. खिरोडकर, अॅड. जी. एस. गावंडे तसेच वकील संघाचे सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अॅड. रविभाऊ उंबरकर, अॅड. मुकुंदा टोंगलकर आणि अॅड. विनोद मुंडोकार यांनी केले.

सदर ठरावाचे अनुमोदक म्हणून अॅड. आर. एस. काकडे यांनी तर सूचक म्हणून अॅड. डी. बी. ईगळे यांनी काम पाहिले.

 

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सदस्यांनी अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Jalgaonjamod /वकील संघाच्या प्रगतीसाठी व सदस्यांच्या हितासाठी नव्या कार्यकारिणीकडून उल्लेखनीय कार्य होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

farmernews /शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळण्यासाठी सर्व प्रक्रिया गतीने पूर्ण करा – आ. डॉ. संजय कुटे

0

 

संग्रामपूर, दि. ६ जून – जळगाव जामोद मतदारसंघातील वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी सर्व प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार डॉ. संजय कुटे यांनी प्रशासनाला दिले आहेत.drsanjaykute

१ जून रोजी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मतदारसंघातील अनेक गावांमध्ये केळी, संत्रा तसेच इतर फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेक बागा जमीनदोस्त झाल्या आहेत.farmernews

घटनेनंतर तत्काळ संबंधित विभागांना पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार करण्यात आलेल्या पंचनाम्यांचा व उपाययोजनांचा आढावा आमदार डॉ. संजय कुटे यांनी ६ जून रोजी घेतला. Jalgaonjamod

यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्क साधून नुकसानीची माहिती घेतल्याचे सांगितले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांअंतर्गत आर्थिक मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

 

तसेच पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबतही अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.drsanjaykute

येत्या आठवडाभरात संपूर्ण नुकसान अहवाल तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. विमाधारक शेतकऱ्यांनी देखील आपल्या नुकसानीची माहिती आणि तक्रारी संबंधित यंत्रणेकडे तातडीने नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी आमदार डॉ. संजय कुटे म्हणाले की, “मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल.”

farmernews /दरम्यान, प्रशासनाकडून पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

HSCAdmission/बारावीच्या री ऍडमिशन पासून अनेक विद्यार्थी वंचित

0

 

री ऍडमिशन घेण्याकरिता ऑनलाईन ऑफलाइन पोर्टलची सुविधाच नाही

बारावी नापास झालेल्या विद्यार्थ्याचि री ऍडमिशन साठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पोर्टल चालू करण्याची मागणी

तळेगाव प्रतिनिधी..महाराष्ट्र मध्ये 2026 मध्ये बारावीचा निकाल लागला काही विद्यार्थी पास झाले तर काही विद्यार्थी नापास झाले पण नापास झालेलें जे विद्यार्थी आहे हे आपल्या कॉलेजमध्ये री ऍडमिशन करिता गेले असतात त्यांना कॉलेज मध्ये माहिती दिली की सध्या ऑनलाईन किंवा ऑफलाइन रिया ऍडमिशन करिता सुविधा उपलब्ध नाही.#OfflineAdmission

 

महाराष्ट्रातील किंवा वर्धा जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी री ऍडमिशन पासून वंचित आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिली की बारावीत नापास झालेले विद्यार्थी म्हणत आहे की आम्ही नापास झालो.#OnlineAdmission

त्याची आम्हाला खंत आहे पण आता चूक करायची नाही म्हणून आम्हाला री ऍडमिशन साठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पोर्टल चालू करून द्यावे जेणेकरून आम्ही ऍडमिशन झाल्यावर चांगल्या पद्धतीने अभ्यास करून पास होऊ व आम्ही शिक्षण विभागाला व पुणे शिक्षण आयुक्त यांना विनंती करतो.#StudentIssues

 

#StudentVoice/की आमच्याकडे लक्ष केंद्रित करून ऑनलाईन किंवा ऑफलाइन बारावी नापासची री ऍडमिशन पोर्टल आम्हाला उपलब्ध करून द्यावे जेणेकरून आमच्या शिक्षणाला गती मिळेल अशी मागणी बारावी नापास झालेले विद्यार्थी करीत आहे

Crimenews /मी जिवंतच माझ्या वडील व भावाला निर्दोष सोडा_ शिवानी कळमेकर

0

 

राजुरा खून प्रकरणाला वेगळे वळण

जळगाव जामोद _तालुक्यातील राजुरा धरण परिसरात दिनांक 26 एप्रिल रोजी एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता

 

मृतदेहापासून काही फुटावर महिलेचा शिरही होतं या प्रकरणी तात्काळ माहिती मिळाल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक लोढा, डीवायएसपी महाजन, स्थानिक गुन्हे शाखा पथक,ठाणेदार नितीन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली व फॉरेन्सिक विभागाची टीम बोलावून या सर्व प्रकरणाचा तपास एलसीबी पथकाने केला व मध्य प्रदेशातील खडकी गावातील शिवानी बापूराव कळमेकर ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार मध्य प्रदेश पोलिसात दाखल झाली होती,policenews

एलसीबी पथकाने तिच्या वडील व भाऊ यांची चौकशी केली असता तिच्या वडिलांनी व भावाने तिची हत्या करून मृतदेह महाराष्ट्रातील जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजुरा धरणातआणून टाकला होता अशी कबुली दिली होती याप्रकरणी आपल्या मुलीच्या हत्येचा आरोप ठेवत बुलढाणा पोलिसांनी शिवानी कळमेकर चे वडील बापूराव कळमेकर व भाऊ यांना अटक करून कारागृह मध्ये ठेवले आहे ,मात्र शिवानी कळमेकर हिने बुऱ्हाणपूर पोलीस स्टेशन गाठत थेट मी जिवंत असून माझ्या हत्येच्या गुन्ह्यात माझ्या वडिलांना भावाला पोलिसांनी जेलमध्ये ठेवलं असल्याचा कबुली जबाब दिला आहे.breakingnews

त्यांना निर्दोष सोडून देण्यात यावे अशी मागणी केली आहे, शिवानी कळमेकर ही जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे, व जळगाव जामोद पोलिसांकडून सुद्धा तिची चौकशी चालू आहे,मात्र ज्या महिलेचा मृतदेह सापडला होता ती नेमकी कोण हा प्रश्न उपस्थित राहत आहे.