संग्रामपूर, दि. ६ जून – जळगाव जामोद मतदारसंघातील वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी सर्व प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार डॉ. संजय कुटे यांनी प्रशासनाला दिले आहेत.drsanjaykute
१ जून रोजी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मतदारसंघातील अनेक गावांमध्ये केळी, संत्रा तसेच इतर फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेक बागा जमीनदोस्त झाल्या आहेत.farmernews

घटनेनंतर तत्काळ संबंधित विभागांना पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार करण्यात आलेल्या पंचनाम्यांचा व उपाययोजनांचा आढावा आमदार डॉ. संजय कुटे यांनी ६ जून रोजी घेतला. Jalgaonjamod
यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्क साधून नुकसानीची माहिती घेतल्याचे सांगितले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांअंतर्गत आर्थिक मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
तसेच पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबतही अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.drsanjaykute
येत्या आठवडाभरात संपूर्ण नुकसान अहवाल तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. विमाधारक शेतकऱ्यांनी देखील आपल्या नुकसानीची माहिती आणि तक्रारी संबंधित यंत्रणेकडे तातडीने नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी आमदार डॉ. संजय कुटे म्हणाले की, “मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल.”
farmernews /दरम्यान, प्रशासनाकडून पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली आहे.









