Home Blog

Devendrafadnsvis /एसटी बसच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लोकार्पण

0

 

[ शहरी विभागासाठी सुविधा ग्रामीण भाग दुर्लक्षित.]
संग्रामपूर (सूर्या मराठी न्यूज ब्युरो )ः- महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेला आधुनिकतेची सुवर्ण किनार लाभली, तो क्षण आज विधानभवन प्रांगणात साकारला. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या लयबद्ध तालावर आणि उत्साहाच्या उधाणलेल्या लाटांमध्ये ‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचे भव्य लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. जणू इतिहास आणि वर्तमानाचा संगम घडवत या सोहळ्याने सार्वजनिक परिवहनाच्या नव्या युगाची पहाट उजळवली.

या दिमाखदार सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांसह विधीमंडळ सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने या ऐतिहासिक क्षणाची शोभा अधिकच खुलली.

St‘राजमाता जिजाऊ’ हे नाव उच्चारताच मातृत्व, संस्कार आणि स्वराज्याची प्रेरणा मनात जागृत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेच्या माध्यमातून केवळ प्रवास नव्हे, तर इतिहासाची प्रेरणादायी परंपरा प्रत्येक प्रवाशाच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.busnews

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा सुमारे तीन हजार बसचा ताफा टप्प्याटप्प्याने राज्यभर धावणार असून, सुरक्षितता, आराम आणि विश्वास यांचे त्रिवेणी संगम प्रवाशांना अनुभवता येणार आहे. ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘हिरकणी’ आणि ‘यशवंती’ या गौरवशाली सेवांच्या परंपरेत ‘राजमाता जिजाऊ’ ही आणखी एक तेजस्वी कडी ठरणार आहे. पूजन, फीत कापून झालेल्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि परिवहन मंत्री सरनाईक यांनी या बसमधून प्रवास करत नव्या युगाची सुरुवात प्रत्यक्ष अनुभवली. बसच्या अग्रभागी घोड्यावर आरूढ झालेल्या राजमाता जिजाऊंचा देखावा जणू इतिहासाला सजीव करत होता—त्या दृश्याने संपूर्ण सोहळ्याला एक अद्भुत, प्रेरणादायी आणि आयाम प्राप्त झाला.

[ ग्रामीण भागातील अश्या एस टी बस आगारामध्ये बस केव्हा येणार ? फक्त शहरी विभागासाठीच सर्व सुविधा असतात.मात्र ग्रामीण खेडेविभागात आमचे बुलडाडाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद), शेगाव ,खामगाव,बसआगाराला पाहिजे त्या नवीन बस पहावयास मिळत नाही.आशी खंत ग्रामीण भागातील प्रवाश्यांनी केली आहे.

Devendrafadnsvis /नेहमी भांगार व रस्त्यावर बंद पडणाऱ्या बासेस मिळतात.ही शोकांतिका आहे.
रामेश्वर गायकी सह अनेक सामाजिक कार्यकर्ते. संग्रामपूर तालुका]

Nivdnuknews /संग्रामपूर तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर

0

 

बुलढाणा : राज्य निवडणूक आयोगाकडून घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील 59 ग्रामपंचायतींच्या रिक्त थेट सरपंच व सदस्यांच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.dham panchayat

यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील चार रिक्त पद, चिखली तालुक्यातील सहा पदे तर मेहकर तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या रिक्त थेट सरपंच व सदस्यांच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू असून निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन तहसिलदार तथा ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.nivdnuknews

संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच/सदस्य रिक्त पदांचे गावे : मारोडा ग्रामपंचायत प्रभाग क्र.3(अनुसूचित जमाती), धामनगांव ग्रामपंचायत प्रभाग क्र.2(ना.मा.प्र.प्रवर्ग),वकाणा ग्रामपंचायत प्रभाग क्र.2( ना.मा.प्र.प्रवर्ग महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील) असे चार रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागासाठी निवडणूक होणार आह.SangrampurNews

मेहकर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच/सदस्य रिक्त पदांचे गावे :* ग्रामपंचायत पारडा, ग्रामपंचायत पेनटाकळी, ग्रामपंचायत वाग्देव व ग्रामपंचायत दुर्गबोरी असे चार रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागासाठी निवडणूक होणार आहे.

Grampanchayat चिखली तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच/सदस्य रिक्त पदांचे गावे :थेट सरपंच पदासाठी कव्हळा ग्रामपंचायत(ना.मा.प्र), कोनड ग्रामपंचायत(ना.मा.प्र./स्त्री), किन्ही सवडत ग्रामपंचायत(अनुसूचित जमाती) तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी किन्हीनाईक ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 1 व 3 (अ.ज. स्त्री), बोरगाव वसु ग्रामपंचायत (अ.जा.) असे सहा रिक्त ग्रामपंचायत थेट सरपंच व सदस्य पदाच्या जागासाठी निवडणूक होणार आहे.

*निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे :* निवडणूकीची अधिसूचना सोमवार दि. 30 मार्च 2026 रोजी संबधित तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमानुसार निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र दि. 7 ते 13 एप्रिल 2026 पर्यंत सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेदरम्यान स्वीकारले जाणार आहे. नामनिर्देशन पत्र छाननी बुधवार दि. 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजूपासून छाननी संपेपर्यंत. दि. 17 एप्रिल 2026 रोजी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. या निवडणूकीचे मतदान मंगळवार दि. 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी बुधवार दि. 29 एप्रिल 2026 रोजी करण्यात येणार आहे.

MIDC मधील पोटभाडे घोटाळा : उद्योग विकासाला लागलेला काळा डाग (midcnews)

0

 

विदर्भ प्रतिनिधी सचिन वाघे

नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) हे राज्यातील औद्योगिक प्रगतीचे मुख्य केंद्र मानले जाते. उद्योगांना प्रोत्साहन देणे, रोजगार निर्मिती करणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. मात्र नागपूर विभागातील काही MIDC क्षेत्रांमध्ये समोर आलेल्या पोटभाडे प्रकरणांनी या संपूर्ण यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.midc

माहिती अधिकारातून उघड झालेल्या माहितीनुसार, अनेक कंपन्या केवळ कागदोपत्री अस्तित्वात आहेत. प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणतीही औद्योगिक हालचाल नसताना देखील कागदावर उद्योग सुरू असल्याचे दाखवण्यात आले आहे. ही बाब केवळ प्रशासकीय त्रुटी नसून, एक संघटित गैरव्यवहार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.midc

अशा कंपन्यांच्या माध्यमातून बँकांकडून कर्ज उचलणे, शासनाच्या योजनांचा लाभ घेणे आणि नंतर कंपन्या बंद करणे हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. यामुळे शासनाचा महसूल तर बुडतोच, पण खऱ्या उद्योजकांनाही नुकसान सहन करावे लागते.nagpurnews

अधिक चिंतेची बाब म्हणजे या सर्व प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. चौकशीचा अभाव आणि कारवाई न होणे हे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे आहे.

Wardhanews /आता गरज आहे ती पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशीची. दोषींवर कठोर कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा ‘उद्योग विकास’ या संकल्पनेलाच गालबोट लागेल.

Palshijhashi/पळशी झाशी तिर्थ स्थळाला दोन कोटी रुपये मंजुर … संस्थांच्या वतीने करण्यात आला केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्कार ..

0

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)

Palshijhashi/बुलडाणा ( प्रतिनिधी )पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील पळशी झाशी या तीर्थस्थळाला दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे संस्थांच्या वतीने केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्कार नुकताच सत्कार करण्यात आला .

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातर्गत येणारे पळशी झाशी शंकरगिरी महाराज संस्थांन हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे .

या संस्थांला सरकारच्यावतीने ब दर्जा तीर्थस्थळाचा दर्जाही देण्यात आला आहे . तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव व या विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या वतीने या संस्थांना निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता.

या पाठपुराव्याला यश आले असून 13 मार्च रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला आहे त्यामुळे या तीर्थस्थळाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Palshijhashi/या निधी अंतर्गत भव्य सभागृह प्रसादालय इतर विकसित कामे केल्या जाणार आहे दिलेला शब्द पाळला आणि भरीव अशी मदत पळशी झाशी संस्थांना केल्याबद्दल संस्थांचे विश्वस्त अरुण पाटील मोरोडे यांनी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन सत्कार केला .

Umrganews /स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पगार, पीएफ अनियमिततेची चौकशी करा

0

ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
—————

सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे

उमरगा : उमरगा नगर परिषदेसाठी काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पगार, PF कपात आणि देयक प्रक्रियेमध्ये गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित महिला कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने निवेदन द्वारे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन नगर परिषद उमरगा येथील मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, उमरगा शहराची स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी दररोज कठोर परिश्रम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी केवळ रु.६२९०/- इतकाच मोबदला दिला जात असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे हा पगार बँक खात्यात न देता रोखीने (बाय हँड) दिला जात असल्याचेही सांगण्यात आले आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे या महिला कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा अंदाजे रु. १४०० ते १७०० पर्यंत भविष्यनिर्वाह निधी (PF) कपात केली जाते. मात्र हा PF संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर नियमितपणे जमा होत आहे की नाही, याबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच या महिला कर्मचाऱ्यांसाठी बँकेत खाती उघडण्यात आली असली, तरी त्यांची पासबुक त्यांच्या ताब्यात देण्यात आलेली नाहीत, अशीही तक्रार करण्यात आली आहे. काही ठिकाणी वर्षभरातील सह्या एकत्रितपणे पे-स्लिपवर घेऊन काही त्रयस्थ व्यक्ती पगार उचलतात आणि त्यातील केवळ रु.६२९०/- इतकीच रक्कम महिला कर्मचाऱ्यांना दिली जाते, अशीही गंभीर बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
या प्रकरणाबाबत आवाज उठवला किंवा तक्रार केली तर नोकरीवरून काढून टाकण्याची भीती दाखवली जाते, अशा दबावाखाली या महिला काम करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने पुढील बाबींची तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे :

(1) महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पगार व PF कपातीची सखोल चौकशी करावी.

(2) कपात करण्यात आलेला PF संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे की नाही याची खात्री करून त्याची लेखी माहिती द्यावी.

(3) सर्व कर्मचाऱ्यांचे पगार थेट त्यांच्या बँक खात्यात (DBT) जमा करण्याची व्यवस्था करावी.

(4) संबंधित महिला कर्मचाऱ्यांना त्यांची बँक पासबुक व कागदपत्रे त्यांच्या ताब्यात द्यावीत.

(5) आर्थिक अनियमितता आढळल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी.
उमरगा शहर स्वच्छ ठेवण्यासाठी परिश्रम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना न्याय्य मोबदला, पारदर्शक पगार प्रणाली आणि सुरक्षित कामाचे वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Dharashivnews /या निवेदनावर सत्यनारायण जाधव, व्यंकट भालेराव, राजू बटगिरे, करीम शेख, ज्योती माने, संतोष चव्हाण, बबिता मदने, शबाना उडचणे, किशोर बसगुंडे, ऍड. ख्वाजा शेख, ऍड. अर्चना जाधव, कविता साळी, सीमा कांबळे, विमल वजनमकर, छबाबाई सुरवसे, ठकूबाई कांबळे, अश्विनी सौंदर्गे, मीना येरसन, लक्ष्मी कांबळे, किरण भोसले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Policenews /खामगावात घरफोडीचा गुन्हा उघड; अमरावतीतील महिलेला अटक, २ लाख १६ हजार रुपयांचे दागिने जप्त

0

 

अनिलसिंग चव्हाण ( संपादक )

खामगाव : शहरातील केला नगर परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात खामगाव शहर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी अमरावती येथील एका महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकडून अंदाजे २ लाख १६ हजार ३२० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Crimenews /याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी साकेत संजय दशोत्तर रा. केला नगर, देशमुख मंगल कार्यालयाच्या मागे, खामगाव यांनी २६ फेब्रुवारी रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० ते ५.३० दरम्यान ते कामानिमित्त बाहेर गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

घरातील लोखंडी कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण अंदाजे १ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार करण्यात आली होती.
या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(३), ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान सुरुवातीला कोणताही ठोस धागादोरा मिळत नसल्याने पोलिसांसमोर गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान होते. मात्र परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सिमा परवीन नसीम शेख रा. साजिया नगर, हेदरपुरा, अमरावती हिला निष्पन्न करून ताब्यात घेतले.

तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. यात सोन्याची अंगठी, कानातील झुमके, मंगळसूत्र पोत, नथ तसेच सोन्याच्या टिकल्या असा अंदाजे २ लाख १६ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. तपासात आरोपी महिलेने शेगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतही तत्सम गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून त्या अनुषंगाने तेथील कलम ३३१(१), ३०५ भारतीय न्याय संहिता २०२३ मधील गुन्हाही उघडकीस आला आहे.

Policenews /ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर. एन. पवार यांच्या आदेशाने पोहेकॉ सागर भगत, पोका अंकुश गुरुदेव, पोका राहुल धारकर, मपोका दिव्या काळे, योका राम धामोडे, पोहेकॉ प्रदीप मोठे, भिमराव वानखेडे, पोका गणेश कोल्हे, पोका निशांत कळसकर व रविंद्र कन्नर यांनी केली.

Murdernews /रेती घाटाच्या ९८ लाखांच्या व्यवहारातून थरारक खून; रंगपंचमीला पाच आरोपी गजाआड

0

Go back

Your message has been sent

Warning
Warning
Warning
Warning

Warning.

विदर्भ प्रतिनिधी सचिन वाघे

Breakingnews /वर्धा : वर्धा नदीतील बामर्डा रेती घाटाच्या कोट्यवधींच्या व्यवहारातून उफाळलेला वाद अखेर रक्तरंजित शेवटाला पोहोचला. ९८ लाख रुपयांच्या आर्थिक देवाणघेवाणीवरून पेटलेल्या संघर्षात भरत दयानंद नागपाल यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रंगपंचमीच्या दिवशी पोलिसांनी धडक कारवाई करत पाच आरोपींना अटक केली. नाशिक येथून अक्षय खडसे, सौरभ ठाकूर आणि अमोल कामडी यांना वर्धा गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेतले. तर नितीन कामडी व शेखर वांदीले यांना वरोरा पोलिसांनी अटक केली.

यापूर्वी सुनील झोरे, प्रफुल उमाटे आणि अतुल मोटघरे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

तपासानुसार, नागपाल यांच्यावर तलवारीने वार करून अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना गंभीर जखमी अवस्थेत नदीपात्रात फेकून देण्यात आल्याचा आरोप आहे.

Murdernews /या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल असून तपासाला वेग देण्यात आला आहे.

Murdernews/”होळीपूर्वी वाळूमाफियाच्या वादात बामर्डा घाटावर पुलगावच्या भरत नागपाल यांची हत्या, हिंसक हाणामारीत अनेक जण जखमी”

0

 

विदर्भ प्रतिनिधी सचिन वाघे

Chandrapur /वरोरा :चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बामर्डा घाट परिसरात १ मार्च रोजी रात्री सुमारे १०:३० वाजता उघडकीस आलेल्या हिंसक हाणामारीत पुलगाव येथील भरत नागपाल यांची हत्या झाली.breakingnews

उत्खननाच्या सीमांकनावरून दोन गटांमध्ये वाद झाला, आणि त्यातून ही हिंसा घडली.

घटनेदरम्यान पाचपेक्षा अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली, आग लावली गेली आणि या संघर्षात अनेक लोक जखमी झाले.policenews

Breakingnews /ही घटना होळीच्या एका दिवसाआधी घडल्याने परिसरात अधिक तणाव वाढला आहे. वाळूमाफिया आणि उत्खननातील वादामुळे या हिंसाचाराची शक्यता आहे.

Policenews /हिंगणघाट पोलिसांची होळीपूर्व धडक कारवाई; १ लाख ३ हजारांचा अवैध दारू साठा जप्त

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :

Wardhanews /होळी सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री व वाहतूक रोखण्यासाठी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाने धडक कारवाई करत तब्बल १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दारू साठा जप्त करून आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या कारवाईत मूखबीरकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार नागरी रोडवर नाकाबंदी करण्यात आली. त्या वेळी दुचाकी मोपेड क्रमांक MH 32 AW 2465 थांबवून तपासणी केली असता चालक सुजल विनोद कडू (वय १८, रा. तहसील वॉर्ड, हिंगणघाट) याच्या ताब्यातून प्रीमियम कंपनीच्या देशी दारूच्या १५० प्लास्टिक शिश्या (किंमत १५,००० रुपये) व डेस्टिनी प्राईम कंपनीची मोपेड (किंमत ७०,००० रुपये) असा एकूण ८५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत सोनू उर्फ प्रवीण ज्ञानेश्वर भांगे (वय ३३, रा. डांगरी वॉर्ड, हिंगणघाट) याच्या घरझडतीत रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारूचे दोन लिटर क्षमतेचे पाच बंपर (किंमत १५,००० रुपये) जप्त करण्यात आले.
तिसऱ्या कारवाईत संत चोखोबा वॉर्ड येथील ओम सुपारे याच्याकडून देशी दारूच्या रॉकेट कंपनीच्या ३० शिश्या (किंमत ३,००० रुपये) जप्त करण्यात आल्या.

तीन्ही कारवायांमध्ये एकूण १,०३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Hingnghatnews /ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक व पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डि.बी. पथकाचे इन्चार्ज सपोनि पद्माकर मुंडे, पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, राजेश शेंडे, आशिष नेवारे, मंगेश वाघमारे व रोहित साठे यांनी पार पाडली.

Hingnghatnews /“रेती माफियांना अभय कोणाचे?” — नदीपात्र लुटले जात असताना प्रशासन गप्प का?

0

 

हिंगणघाट/समुद्रपूर : प्रतिनिधी सचिन वाघे

Tahsilnews /तालुक्यातील लिलाव न झालेल्या नदी घाटांमधून सुरू असलेल्या कथित अवैध रेती उत्खननाने आता गंभीर वळण घेतले आहे. दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात नदीपात्रातून रेती उपसली जाते, डंपर-ट्रॅक्टर रस्त्यांवरून सर्रास फिरतात; तरीही कारवाई मात्र शून्य. प्रश्न उपस्थित होतो — या सगळ्याला अभय कोणाचे?

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, निष्पक्ष चौकशी झाली तर पुरावे आपोआप समोर येतील. रेती चोरी करणाऱ्या मुख्य सूत्रधारांमध्ये प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्याची चर्चा रंगली आहे. काही वाहनांवर नंबर प्लेट नसणे, तर काहींचे कागद दुसऱ्याच नावावर असणे, हे प्रकार उघडपणे सुरू असल्याचा आरोप आहे.
यामुळे वाहतूक यंत्रणा, परवाना प्रक्रिया आणि तपासणी प्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

वन विभाग, पोलीस प्रशासन, महसूल यंत्रणा तसेच RTO विभागातील काही संबंधितांवर कथित “हप्ते” सुरू असल्याची चर्चा परिसरात होत आहे.
पर्यावरणीय दृष्टीने पाहता, अनियंत्रित उत्खननामुळे नदीपात्राची खोली वाढते, काठांची धूप होते, भूजल पातळी घटते आणि भविष्यात पूरस्थितीचा धोका वाढतो.

Wardhanews /नदी ही फक्त रेतीचा साठा नसून संपूर्ण परिसंस्थेचा आधार आहे — हे प्रशासन विसरले आहे का? नागरिकांचा सवाल स्पष्ट आहे —
लिलाव नसताना उत्खनन कसे?
नंबर प्लेट नसलेली वाहने रस्त्यावर कशी?
संबंधित विभाग कारवाई का करत नाहीत?

जर सर्व काही कायदेशीर असेल तर प्रशासनाने तातडीने अधिकृत आकडेवारी जाहीर करावी. अन्यथा स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) नेमून संपूर्ण साखळीची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Hingnghatnews /नदी लुटली जात असताना यंत्रणा मौन बाळगणार का, की आता तरी कठोर कारवाई होणार? जनतेच्या नजरा प्रशासनाकडे लागल्या आहेत.