Home Blog

Accident news /हिंगणघाटमध्ये उड्डाण पुलाजवळ भीषण अपघात; सुरक्षा व्यवस्थेवर नागरिकांचा सवाल

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : शहरातील कलोडे चौक परिसरात सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या बांधकामादरम्यान आज शनिवारी (२4 मे) सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला.

कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकाचा पाय तुटून वेगळा झाल्याची धक्कादायक घटना घडली.

 

या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून उड्डाण पुलाच्या कामादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांवर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

जखमींमध्ये विजय उत्तम सादा (वय २६), व्यवसाय – हमाली, रा. बिहार तसेच लल्लन सिहाहारण यादव (वय ४५), व्यवसाय – ठेकेदार, रा. बिहार यांचा समावेश आहे. दोघेही साई कृपा दालमिल परिसरात काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे कलोडे चौक परिसरातील रस्ता अत्यंत अरुंद झाला असून वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत आहे. सकाळच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी कंटेनरखाली ओढली गेल्याने दोघांचेही पाय गंभीररीत्या चिरडले गेले. अपघात इतका भीषण होता की, एका जखमीचा पाय पूर्णपणे तुटून वेगळा झाल्याची माहिती समोर आली आहे.breakingnews

अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमी अवस्थेतील दोघांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.hingnghatnews

दरम्यान, उड्डाण पुलाच्या बांधकामादरम्यान योग्य वाहतूक नियोजन, इशारा फलक, सुरक्षा बॅरिकेड्स व वाहतूक नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बांधकाम सुरू असताना जड वाहनांची वाहतूक नियंत्रणाशिवाय सुरू असल्याने मोठा धोका निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.wardhanews

शहरात मोठ्या प्रमाणावर बाहेर राज्यातील हमाल व मजूर कामासाठी आलेले आहेत. मात्र अशा गंभीर दुर्घटनांमध्ये त्यांच्या वैद्यकीय मदतीपासून अपघात भरपाईपर्यंतच्या हक्कांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. जखमी कामगारांना शासन नियमांनुसार आर्थिक मदत, उपचार खर्च व योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Accident news /या घटनेनंतर प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, कामगार विभाग आणि संबंधित कंत्राटदार यांची जबाबदारी निश्चित करून उड्डाण पुलाच्या कामादरम्यान कडक सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Farmernews /वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची राष्ट्रवादीची मागणी

0

मा.मुख्यमंत्री ,जिल्हाधिकारी यांना तहसीलदारा मार्फत दिलेले निवेदन
– – – – – – – –
उमरगा : उमरगा तालुक्यात दि .२१ रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी मोठ्या पावसामुळे काळ लिंबाळा, कोराळ, कलदेव लिंबाळा, दाळिंब व नळवाडी आणि तालुक्यातील इतर परिसरात घरांचे ,विद्युत पोल तारा ,फळझाडे , जनावरे यांचे मोठे नुकसान झाले आहे.

.शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष बाबा जाफरी ,रमेश बिराजदार , भीमा स्वामी, शमशोद्दीन जमादार ,सुभाष गायकवाड , नेताजी कवठे यांनी नुकसान झालेल्या गावांची पाहणी करून मुख्यमंत्री तथा जिल्हाधिकारी यांना तहसीलदार यांच्यामार्फत दि.२२ रोजी निवेदन दिले आहे .

देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की ,उमरगा तालुक्यात दिनांक २१ रोजी काळ लिंबाळा, कोराळ, कलदेव लिंबाळा, डाळिंब व नळवाडी आणि तालुक्यातील इतर परिसरात अचानक जोराचे वादळी वारे व मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील मोठेमोठी झाडे उन्मळून पडल्याने अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच बहुतांश घरांवरील पत्रे उडून गेली आहेत.

वादळामुळे ठिकठिकाणी विद्युत पोल कोसळल्याने संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावांना जोडणाऱ्या मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर झाडे पडल्यामुळे वाहतूक व दळणवळणाचे रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत.

यासोबतच, शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून प्रामुख्याने आंब्याच्या बागा, पपई व इतर पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. शेतातील जनावरांच्या चाऱ्याच्या कडब्याच्या बनीमी, शेतकऱ्यांचे शेड यांचेही मोठे नुकसान झाले असून, यामध्ये काही जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. या अचानक आलेल्या संकटामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाचे अतोनात आर्थिक नुकसान झाले.

Farmernews /असून ते पूर्णपणे अडचणीत सापडले आहेत. तरी प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची त्वरित दखल घेऊन, झालेल्या सर्व नुकसानीचे शासकीय स्तरावर त्वरित व वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि बाधित ग्रामस्थ व शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक नुकसान भरपाई लवकरात लवकर मंजूर करावे असे निवेदनात म्हटले आहे . यावेळी अशोक जाधव ,मनोज देशपांडे व्यंकट बिराजदार ,आनंद नागणे ,फैयाज पठाण ,कलेश्वर जाधव ,रमेश राठोड आदी सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

Accident news /हिंगणघाटजवळ भीषण अपघात; टिपरच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

0

 

हिंगणघाट : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर हॉटेल तनवीर-सगुना कंपनी परिसरात शुक्रवारी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात घडला. भरधाव टिपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती-पत्नी आणि चिमुकली मुलगी अशा एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.breakingnews

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन मधुकरराव वानखेडे (वय ४५), पल्लवी वानखेडे (वय ३८) आणि आरोही वानखेडे (वय ६) हे दुचाकी क्रमांक एमएच ३२ एएम १६९४ ने कपडे खरेदीसाठी हिंगणघाटकडे येत होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या टिपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिस, ११२ पथक, महामार्ग सुरक्षा पथक आणि मदतकार्य करणारे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले.wardhanews

मृत वानखेडे कुटुंब हे समुद्रपूर तालुक्यातील वायगाव गोंड-कुर्ला येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, मृत झालेली आरोही ही जुळी बहीण असून तिच्या पश्चात आणखी एक बहीण आहे.hingnghatnews

Accident news /अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले असून संबंधित टिपर चालकाचा शोध सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.

Hingnghatnews / CET परीक्षा केंद्रावर गोंधळ; पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश

0

 

हिंगणघाटच्या विद्यार्थ्यांसाठी स्थानिक केंद्राची मागणी; पालकांसाठी सुविधांचा अभाव

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा :आष्टी येथील न्यू मॉन्टफोर्ट औषध निर्माणशास्त्र संस्था येथे बुधवारी आयोजित CET (सामाईक प्रवेश परीक्षा) दरम्यान मोठा गोंधळ उडाला. बाहेरगावाहून आलेले विद्यार्थी व पालक सकाळी ७ वाजल्यापासून परीक्षाकेंद्रावर पोहोचले होते. मात्र, केंद्रावर विद्यार्थ्यांना व पालकांना प्रवेश नाकारण्यात आल्याने संतप्त वातावरण निर्माण झाले. Wardhanews

उपस्थित कर्मचाऱ्यांनी “CET विभागाकडून पैसे मिळाले नसल्यामुळे प्रवेश देता येणार नाही,” अशी माहिती दिल्याचा आरोप विद्यार्थी व पालकांनी केला. त्यामुळे काही वेळातच परीक्षाकेंद्राबाहेर मोठी गर्दी झाली. वर्षभर CET परीक्षेची तयारी केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसला असून काही विद्यार्थी रडू लागल्याचेही पाहायला मिळाले. पालकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून 112 क्रमांकावर कॉल करण्यात आला. त्यानंतर काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित विभागाशी संपर्क साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी खासदार अमर काळे यांचे पीए जितेंद्र शेट्टे देखील घटनास्थळी उपस्थित होते. Cet/

काही वेळाच्या चर्चेनंतर प्रश्न मार्गी लागला व विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रात प्रवेश देण्यात आला. मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती व मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Hingnghatnews /दरम्यान, हिंगणघाट तालुक्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हिंगणघाट येथे स्वतंत्र CET परीक्षा केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या पालकांसाठी कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यानेही संताप व्यक्त करण्यात आला.
संतप्त पालकांनी संबंधित परीक्षा केंद्राची चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Yavalnews /यावल पंचायत समितीला मिळाले नवे नेतृत्व ; दीपक कदम यांची सहाय्यक गट विकास अधिकारी पदावर नियुक्ती

0

 

यावल प्रतिनिधी, विकी वानखेडे

यावल पंचायत समितीमध्ये दीपक कदम यांची सहाय्यक गट विकास अधिकारी पदावर नियुक्ती
Yawal : यावल पंचायत समितीमध्ये दीपक कदम यांची सहाय्यक गट विकास अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याने तालुक्यातील प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या नियुक्तीमुळे पंचायत समितीच्या कामकाजाला अधिक वेग मिळून ग्रामीण भागातील विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दीपक कदम यांनी यापूर्वी विविध प्रशासकीय विभागांमध्ये जबाबदारी सांभाळताना आपल्या कार्यक्षम व लोकाभिमुख कामकाजाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडविणे, विकासकामांमध्ये पारदर्शकता राखणे तसेच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करणे, ही त्यांची कार्यशैली असल्याचे बोलले जात आहे.
यावल तालुका हा ग्रामीण व आदिवासी भागांचा समावेश असलेला महत्त्वाचा तालुका मानला जातो. पंचायत समितीमार्फत शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, ग्रामीण रस्ते, महिला व बालकल्याण तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जाते. अशा परिस्थितीत सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून दीपक कदम यांच्या अनुभवाचा व प्रशासनिक कौशल्याचा फायदा तालुक्यातील विकासकामांना होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

विशेषतः ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि प्रशासन अधिक गतिमान करण्यावर त्यांच्या माध्यमातून भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पंचायत समितीच्या विविध विभागांमध्ये समन्वय निर्माण करून विकासकामांना गती देण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे.
दरम्यान, त्यांच्या नियुक्तीनंतर पंचायत समिती कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Yavalnews /दीपक कदम यांच्या नियुक्तीमुळे यावल तालुक्यातील ग्रामीण विकासाच्या कामांना नवी दिशा मिळेल तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासन अधिक सक्रिय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Hingnghatnews /बुलडोजर कारवाईची चौकशी करा; नागरिकांची नगराध्यक्षांकडे मागणी

0

 

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : शहरातील यशवंत नगर परिसरातील कथित अतिक्रमण हटविण्याच्या प्रकरणाने आता गंभीर वादाचे स्वरूप धारण केले असून, बिल्डर आशिष जाणा यांच्या बुलडोजर कारवाईविरोधात झोपडपट्टीधारकांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केला आहे.

नोटीसविना संडास, बाथरूम, पक्के शेड आणि इतर बांधकामे पाडण्यात आल्याचा आरोप होत असून, या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया, प्रशासनाची भूमिका आणि बिल्डरांकडून कथित दबावतंत्राचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.wardhanews

गेल्या ५५ ते ६० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांना निवेदन देत बुलडोजर कारवाईमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, पुनर्वसन आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

 

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागा खरेदी केल्यानंतर कोणतेही अधिकृत मोजमाप, लेखी नोटीस किंवा अंतिम प्रशासकीय परवानगी न घेता कारवाई करण्यात आली. Hingnghatnews

झोपडपट्टीधारकांनी महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम १९७१ तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा उल्लेख करत, कोणतीही तोडफोड करण्यापूर्वी ३० दिवसांची लेखी नोटीस देणे बंधनकारक असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या कारवाईमुळे महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेक कुटुंबांवर उघड्यावर शौचास जाण्याची वेळ आल्याचे नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, परिसरातील सुमारे ५० ते ७० झाडे तोडण्यात आल्याचाही आरोप समोर आला आहे. वृक्षतोडीसाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली होती का, याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

आशिष जाणा बिल्डर यांची प्रतिक्रिया
“मी माझी जागा लेव्हल केली. त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढले. विषय तसा आला नाही त्यामुळे कायदेशीर कागदपत्रांचा विषय झाला नाही,” अशी भूमिका बिल्डर आशिष जाणा यांनी मांडली. मात्र त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे प्रकरण आणखी चर्चेत आले असून, नागरिकांनी या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नगरसेवक विक्की वाघमारे यांची प्रतिक्रिया
स्थानिक नगरसेवक विक्की वाघमारे यांनी सांगितले की, “अतिक्रमण धारक आणि आशिष जाणा यांच्यात वाद सुरू होता. यावर मोजणी करून निर्णय घेण्यात येईल, असे ठरले होते. मात्र त्यानंतरही अतिक्रमण हटविण्यात आले. त्यांनी शब्द पाळला नाही आणि विश्वासघात केला.”

माजी नगरसेवक मनिष देवडे यांची प्रतिक्रिया
माजी नगरसेवक मनिष देवडे यांनी “अतिक्रमणावरून वाद असला तरी मोजणी आणि प्रशासनाचा अंतिम निर्णय झाल्यानंतरच पुढील कारवाई होणे अपेक्षित होते.

आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.”
दरम्यान, शहरात काही बिल्डर विवादित किंवा मौल्यवान जागा कमी किमतीत खरेदी करून नंतर अतिक्रमण हटवून त्या जागांचे बाजारमूल्य वाढवत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भूमाफिया, विवादित जागांचे व्यवहार आणि अतिक्रमण हटविण्याच्या पद्धती पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

Wardhanews /नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत स्वतः मौका चौकशी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. आता प्रशासन या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Nagpurnews/नागपूर विभागातील औद्योगिक भूखंडांवर पोटभाडेकरूंचे जाळे?कारखाने बंद, गाळे सुरू; शासन महसुलाला कोट्यवधींचा फटका ?

0

 

विदर्भ प्रतिनिधी सचिन वाघे

नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत नागपूर विभागातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक भूखंडांचा गैरवापर होत असल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत.

उद्योग सुरू करण्यासाठी अल्प दरात देण्यात आलेले अनेक भूखंड आता व्यावसायिक गाळे, दुकाने व पोटभाडेकरूंसाठी वापरले जात असल्याने शासनाच्या मूळ औद्योगिक धोरणालाच तडा गेल्याची चर्चा आहे.
माहितीनुसार, अनेक उद्योजकांनी कारखाने बंद केले किंवा व्यवसाय इतरत्र हलविले. मात्र, भूखंड शासनाकडे परत न करता त्यावर विविध व्यावसायिक आस्थापना उभारून भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचा आरोप होत आहे.

 

औद्योगिक वापराऐवजी केवळ आर्थिक नफा कमविण्यासाठी भूखंडांचा वापर सुरू असल्याचे चित्र नागपूर विभागातील अनेक औद्योगिक वसाहतींमध्ये दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, काही ठिकाणी महामंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र नसतानाही महसूल विभागाच्या माध्यमातून दस्त नोंदणी व पोटभाडेकरूंच्या नोंदी झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

माहिती अधिकारातून मागविण्यात आलेल्या माहितीतही गंभीर विसंगती समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. अर्जदाराला फक्त पोटभाडेकरूंची यादी देण्यात आली; मात्र प्रत्यक्ष कारखाने सुरू आहेत का, तपासणी अहवाल काय आहे, नियमभंग करणाऱ्यांवर कोणती कारवाई झाली याबाबत माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप आहे.

नागपूर विभागातील अनेक औद्योगिक वसाहतींमध्ये तब्बल ८० टक्के भूखंडांवर पोटभाडेकरू असल्याचा दावा करण्यात येत असून, यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे. तसेच, स्थानिक बेरोजगार युवकांना उद्योगाच्या माध्यमातून रोजगार देण्याचा उद्देशही अपूर्ण राहत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.hingnghatnews

दरम्यान, औद्योगिक भूखंडांवर प्रत्यक्ष कोणते कारखाने सुरू आहेत याची पाहणी करण्यासाठी विशेष तपासणी पथक नेमावे, नियमबाह्य पद्धतीने भूखंडांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि शासनाची फसवणूक झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे.

Wardhanews /औद्योगिक विकासासाठी निर्माण करण्यात आलेल्या वसाहती आता भाडे व्यवसायाचे केंद्र बनत असल्याची चर्चा असून, शासनाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी नागरिक व उद्योग क्षेत्रातून पुढे येत आहे.

Hingnghatnews /शारीरिक शिक्षणाचा बोजवारा; काम शून्य तरी लाखोंचा पगार!

0

 

अनेक शाळांमध्ये ‘नामधारी’ शारीरिक शिक्षक, विद्यार्थ्यांच्या क्रीडा भवितव्याशी खेळ

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : राज्यातील अनेक खासगी व अनुदानित शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकांची पदे केवळ कागदोपत्री असल्याचे चित्र समोर येत आहे.

अनेक ठिकाणी संबंधित शिक्षक कोणतेही प्रत्यक्ष क्रीडा प्रशिक्षण देत नसतानाही त्यांना दरमहा लाखो रुपयांचा पगार मिळत असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे ही पदे अनेक संस्थाचालकांच्या नातेवाईकांनी किंवा कमेटीतील सदस्यांनी व्यापल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात रंगली आहे.wardhanews

विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी शाळांमध्ये क्रीडा शिक्षणाला महत्त्व दिले जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक शाळांमध्ये मैदान, क्रीडा साहित्य आणि नियमित प्रशिक्षणाचा अभाव असल्याचे दिसून येते. परिणामी ग्रामीण व सामान्य कुटुंबातील अनेक गुणवान विद्यार्थी खेळ क्षेत्रात पुढे येण्यापासून वंचित राहत आहेत.hingnghatnews

पालक व नागरिकांचा आरोप आहे की, अनेक शाळांमध्ये शारीरिक शिक्षक केवळ उपस्थितीपुरते मर्यादित असून विद्यार्थ्यांना कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात नाही. जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांची कामगिरीही अत्यंत कमी असल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.school

Hingnghatnews /विशेष म्हणजे शिक्षण विभागाकडून या प्रकाराकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. संबंधित शाळांची तपासणी करून प्रत्यक्ष कार्यरत शिक्षकांची चौकशी करावी, विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे आणि गैरप्रकार करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

Mahatmaphule /महात्मा फुले द्विशताब्दी जयंती निमित्त विशेष चित्ररथाचे १३ मे रोजी हिंगणघाटात आगमन

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने विशेष चित्ररथाचे आयोजन करण्यात आले असून, हा चित्ररथ १३ मे रोजी वर्धा जिल्ह्यात दाखल होणार आहे. हिंगणघाट येथे सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे चित्ररथाचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. Hingnghatnews

या विशेष चित्ररथामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे साहित्य, भिडे वाड्याची प्रतिकृती तसेच सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचा समावेश करण्यात आला आहे. समाज प्रबोधन, सामाजिक सलोखा व जागृतीचा संदेश देणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.wardhanews

या उपक्रमाला सर्व शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारांचे प्रेमी नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शहरात चित्ररथाचे मोठ्या उत्साहात स्वागत करावे,

Mahatmaphule /असे आवाहन वर्धा जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष विशाल हजारे, जिल्हा संघटक विनय डहाके, महिला जिल्हाध्यक्ष कविता मुंगळे, शहराध्यक्ष ऋषीकेश मेश्राम, समाजसेवक अनिल भोगाडे, केशव तितारे, जयंता मानकर तसेच महिला शहराध्यक्ष दीपाली रंगारी यांनी केले आहे.

Sscbord/जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर श्रावणीची भरारी

0

 

97.80 टक्के गुणांसह हिंगणघाट तालुक्यात प्रथम; वैज्ञानिक बनण्याच्या स्वप्नाला आमदार समीरभाऊ कुनावर यांची साथ

 

प्रतिनिधी सचिन वाघे

 

हिंगणघाट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होताच हिंगणघाट शहरातील नगरपरिषदद्वारा संचालित जी.बी.एम.एम. हायस्कूलच्या विद्यार्थिनी कु. श्रावणी रूपेश पराते हिने 97.80 टक्के गुण मिळवत हिंगणघाट तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर तिने हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.schoolnews

 

श्रावणीचे वडील कपड्याच्या दुकानात काम करतात, तर आई गृहिणी आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही अभ्यासावरील निष्ठा, सातत्यपूर्ण परिश्रम आणि मोठे स्वप्न पाहण्याची जिद्द यांच्या बळावर श्रावणीने यशाचा हा मानाचा टप्पा गाठला. तिच्या यशामुळे संपूर्ण हिंगणघाट शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.hingnghatnews

आपल्या यशाचे श्रेय देताना श्रावणीने जी.बी.एम.एम. हायस्कूलचे मुख्याध्यापक फुटाणे सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे मनःपूर्वक आभार मानले. शिक्षकांचे मार्गदर्शन, शाळेचे शैक्षणिक वातावरण आणि पालकांचे मोलाचे पाठबळ यामुळेच हे यश शक्य झाल्याचे तिने सांगितले.

भविष्यात वैज्ञानिक बनून संशोधन क्षेत्रात कार्य करण्याची श्रावणीची इच्छा असून देशासाठी नवे संशोधन आणि समाजोपयोगी कार्य करण्याचे तिचे स्वप्न आहे. तिच्या या ध्येयाने प्रभावित होत हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. तसेच तिच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी पालकत्व स्वीकारत तिला दत्तक घेण्याचा संवेदनशील निर्णय त्यांनी जाहीर केला.

श्रावणीच्या यशाबद्दल तिचा विशेष सत्कार आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेच्या शिक्षण सभापती पल्लवी सुशांत बाराहाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

Renevenews /प्रलंबित रेती घाटांतून अवैध उत्खनन; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रेती माफियांचे मनोबल वाढले?

 

सत्कार कार्यक्रमास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, उमेश तुळस्कर, माजी खासदार सुरेश वाघमारे, शिक्षण समिती सदस्य अंकुश ठाकूर, सोनू गवळी, सुनील मोहता, अतुल नंदागवळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी श्रावणीचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Sscbord /श्रावणी पराते हिच्या या यशामुळे जी.बी.एम.एम. हायस्कूल तसेच संपूर्ण हिंगणघाट शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून तिची यशोगाथा अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.