हिंगणघाट : शहरातील प्रभाग क्रमांक १९ परिसरात रेल्वे गेट बंद झाल्यामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला असून, सुरक्षित अंडरपास किंवा पर्यायी मार्गाची मागणी आता तीव्र झाली आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.wardhanews
सुमारे १६-१७ वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले रेल्वे गेट फ्लायओव्हरच्या बांधकामानंतर बंद करण्यात आले. मात्र, त्या बदल्यात कोणतीही सुरक्षित व्यवस्था न केल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे.
परिसरात शाळा, रुग्णालय आणि एपीएमसी मार्केट असल्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी आणि व्यापाऱ्यांची सतत वर्दळ असते. त्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.
विशेषतः वृद्ध नागरिकांना फ्लायओव्हरवर चढणे-उतरणे अत्यंत कठीण जात असून, त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ जवळ असल्याने वाहतुकीचा ताण प्रचंड वाढतो आणि परिस्थिती अधिक धोकादायक बनते.
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रेल्वे गेट पुन्हा सुरू करावे किंवा सुरक्षित अंडरपास उभारावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.ajitpawar
Hingnghatnews /सदर निवेदन युवक विधानसभा अध्यक्ष अविनाश नवरखेले (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) यांनी विविध शासकीय स्तरांवर सादर केले असून, आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उमरगा (आनंदीपूर ) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त उमरगा शहरात प्रमुख नागरिक संगोष्ठीचे आयोजन करण्यात आले. शहरातील डिग्गी रोडवरील कन्हैया मंगल कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.dharashivnews
या संगोष्ठीत पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया यांनी मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन केले, तर जिल्हा कार्यवाह अजय जानराव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
डॉ. भाडेसिया यांनी आपल्या भाषणात संघाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकताना सांगितले की, “संघाचे कार्य हे संपूर्ण विश्व अधिक श्रेष्ठ करण्याच्या भावनेतून चालते. ‘इदं न मम’ म्हणजेच ‘हे माझे नाही’ हा भारतीय संस्कृतीचा मूलमंत्र असून त्यातून निस्वार्थ भाव, त्याग आणि समर्पणाची शिकवण मिळते.” त्यांनी पुढे नमूद केले की, संघाचे कार्य आपल्या भारत देशाला विश्वगुरू बनवण्यासाठीच आहे आणि शिस्त व कार्यपद्धतीमुळेच संघाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी संघाच्या विचारधारेत एकात्मतेला महत्त्व असल्याचेही स्पष्ट केले. Umrganews
व्यक्ती निर्माण हा संघाच्या कार्याचा गाभा असल्याचे सांगत त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या विचारांचा उल्लेख केला. “संघाचे कार्य बाहेरून जितके साधे दिसते, त्यामागील गूढ आणि गहराई तितकीच विशाल आहे. ज्ञान, आध्यात्म, सेवा आणि साधना यांसारखी मूल्ये संघात रुजवली जातात. नियमित शाखेत सहभागी झाल्यास स्वयंसेवकाचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडते,” असे ते म्हणाले.
संघाच्या प्रार्थनेचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, प्रार्थनेत भारतमातेप्रती समर्पणाचा भाव आहे आणि भगवा ध्वज हा संघाचा गुरु मानला जातो. “संघाचा स्वयंसेवक प्रसिद्धीपेक्षा समाजातील अडचणी दूर करण्यावर भर देतो.
तो स्वतःसाठी नव्हे, तर समाज आणि राष्ट्रासाठी कार्य करतो,” असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. उपस्थित नागरिकांनीही संघाच्या कार्याबाबत उत्सुकता व्यक्त करत चर्चेत सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्यरीत्या पार पडले असून, उमरगा शहरात संघाच्या विचारांचा प्रसार आणि समाजजागृतीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
हिंगणघाट/वर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी 2026 च्या उच्च माध्यमिक (HSC) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून वर्धा जिल्ह्यातील महेश ज्ञानपीठची विद्यार्थिनी समीक्षा भाग्यश्री विनोद जणबंधू हिने वाणिज्य शाखेत 560 गुण मिळवत 93.33 टक्के गुणांसह उज्ज्वल यश संपादन केले आहे.bordnews
समीक्षाने सर्व विषयांत उल्लेखनीय गुणवत्ता दर्शवित इंग्रजी विषयात 89 गुण, अर्थशास्त्रात 94 गुण, बुक कीपिंग व अकाउंटन्सीमध्ये 95 गुण, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये 87 गुण, गणित व सांख्यिकीमध्ये 96 गुण, तसेच माहिती तंत्रज्ञान विषयात तब्बल 99 गुण मिळवले. तिच्या या सर्वांगीण यशामुळे शाळेच्या गुणवत्तेची परंपरा अधिक बळकट झाली आहे.
या यशाबद्दल भावना व्यक्त करताना समीक्षा म्हणाली, “माझ्या आईच्या अथक परिश्रमांमुळे आणि शाळेतील शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळेच मला हे यश मिळाले. त्यांच्या पाठिंब्यामुळे मी आत्मविश्वासाने अभ्यास करून हे यश संपादन करू शकले.”
समीक्षाच्या या उल्लेखनीय यशामुळे कुटुंबात, शाळेत तसेच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक, नातेवाईक आणि नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.HSCNews
HSCNews/महेश ज्ञानपीठसाठीही ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली असून समीक्षा जणबंधूच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.
यावल तालुक्यातील वाघझिरा येथे “राज बांधू सप्लायर्स” यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी क्रिकेट प्रीमियर लीग 2026 (सीजन 2) स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. दिनांक 2 मे 2026 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले असून परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.jalgaon
या स्पर्धेत स्थानिक तसेच परिसरातील अनेक संघांनी सहभाग नोंदवला असून खेळाडूंमध्ये जिंकण्याची चुरस दिसून येत आहे. प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा होत असून प्रेक्षकांचा उत्साहही तितकाच वाढलेला दिसत आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या स्पर्धा होत असल्याने नवोदित खेळाडूंना आपली कला दाखवण्याची सुवर्णसंधी मिळत आहे.
स्पर्धेसाठी आयोजकांनी आकर्षक बक्षिसांची घोषणा केली आहे—प्रथम पारितोषिक: ₹21,000 व चषक
द्वितीय पारितोषिक: ₹11,000 व चषक
तृतीय पारितोषिक: ₹5,000 व चषक उद्घाटन सोहळ्यावेळी गावातील मान्यवर व सामाजिक कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती होती. यामध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गोपाळ चौधरी, बालसिंग बारेला (उपसभापती), मालेद ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच रमाबाई बारेला, सामाजिक कार्यकर्ते सचिन तडवी, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडेमुळे एकता व शिस्त वाढते, असे मत व्यक्त केले. Yavalnews
कार्यक्रमस्थळी रंगीत मंडप, आकर्षक बॅनर आणि चकाकणाऱ्या ट्रॉफींची मांडणी यामुळे संपूर्ण वातावरण क्रीडामय व उत्साही झाले होते. प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
या स्पर्धेचे प्रमुख आयोजक रणजीतभाऊ बारेला यांनी सांगितले की, ग्रामीण व आदिवासी भागातील तरुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील क्रीडागुणांना वाव मिळावा आणि गावपातळीवर क्रीडा संस्कृती रुजावी, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.cricket
Yavalnews स्पर्धेदरम्यान खेळाडूंना आवश्यक सुविधा, पाणी, बसण्याची व्यवस्था तसेच शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेमुळे वाघझिरा परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून पुढील काही दिवस प्रेक्षकांना रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत.
१ मे… महाराष्ट्राच्या स्थापनेचा सुवर्णदिन. याच दिवशी जन्माला आलेले एक धाडसी, निर्भीड आणि सत्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी ठेवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे दैनिक सेवा शक्तीचे उपसंपादक शेख कदीर भाई. Happy birthday friends
पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसते, तर ती समाजाच्या मनात जागृती निर्माण करणारी शक्ती असते—याच विचारांचा वारसा कदीर भाई यांनी आपल्या लेखणीतून जपला आहे. अन्याय, भ्रष्टाचार आणि खोटेपणाच्या विरोधात उभे राहत त्यांनी अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घातला, पण सत्याचा मार्ग कधीही सोडला नाही.happy Happy birthday
त्यांची लेखणी ही तलवारीसारखी तीक्ष्ण, आणि आवाज हा अन्यायाविरुद्ध उभा राहणारा बुलंद नारा आहे. अनेक संवेदनशील प्रकरणे उघडकीस आणत त्यांनी समाजात नवा विश्वास निर्माण केला. “भीतीला शरण जाणे” हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही—हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. Media
महाराष्ट्र दिनी जन्म झाल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच जिद्द आणि महाराष्ट्राच्या मातीतली ज्वाला दिसून येते. समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ, आणि सत्यासाठी लढण्याची वृत्ती हीच त्यांची खरी ओळख बनली आहे.midea
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांना केवळ शुभेच्छाच नाही, तर त्यांच्या कार्याला सलाम करण्याचा दिवस आहे. त्यांनी सुरू केलेली सत्याची लढाई अशीच अखंड चालू राहो, आणि त्यांच्या लेखणीतून समाजाला नवी दिशा मिळत राहो—हीच सर्वांची मनापासून इच्छा.
उमरगा: उमरगा ते औसा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ वरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण स्वामी यांनी या महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले आहे. Dharashivnews
या मार्गावर खड्ड्यांमुळे लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक वाहनचालकांना गंभीर दुखापती झाल्या असून काहींचे मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत होता.
यामुळे परिसरात संतापाची लाट निर्माण झाली होती.
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आमदार प्रवीण स्वामी यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी केली. यावेळी रस्त्याची चाळण झालेली पाहून त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.umrganews
“नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून मार्ग सुस्थितीत करावा, अन्यथा संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला. या पाहणी दौऱ्यावेळी युवा नेते अजिंक्य पाटील उपस्थित होते.
हिंगणघाट :मातोश्री आशाताई कुणावार कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, हिंगणघाट येथे महिला सक्षमीकरण कक्ष, अंतर्गत तक्रार निवारण समिती (ICC) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान तसेच सायबर गुन्हे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. उमेश तुळसकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलिस अधीक्षक डी. वाय. अनिल राऊत, पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम, सुनीता महाजन, सायबर विभागातील अधिकारी, उपप्राचार्य डॉ. सपना जयस्वाल, प्राचार्य डॉ. राजविलास कारमोरे (TIST) आणि प्राचार्य डॉ. महेंद्र गुंडे (तुळसकर ग्रुप ऑफ फार्मसी) यांची विशेष उपस्थिती लाभली.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रास्ताविकामध्ये डॉ. सपना जयस्वाल यांनी उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. पोलिस अधीक्षक डी. वाय. अनिल राऊत यांनी विद्यार्थिनींना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन करत व्यसनमुक्त जीवनाचा संदेश दिला.
सायबर विभागातील अधिकारी सुनीता महाजन आणि पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम यांनी ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे आणि त्यापासून बचावासाठी आवश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.
Wardhanews /“ऑनलाईन जगात सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने सायबर सजगता बाळगणे अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन डॉ. उमेश तुळसकर यांनी केले.
School news/कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी नरवडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मिनाक्षी पवाडे यांनी केले. या उपक्रमाला प्राध्यापकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
मुंबई, ( विशेष प्रतिनिधी ): श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या अखत्यारित पंढरपूर नगरपालिका हद्दीतील यमाई तलाव परिसरात गोशाळा कार्यरत आहे. या गोशाळेच्या विस्तारासह त्या ठिकाणी पिकनिक स्पॉट विकसित करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिले. Mahsulnews
मंदिर समितीने गोशाळेला लागून असलेली अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. यासंदर्भात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके प्रत्यक्ष तर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज ऑनलाईन उपस्थित होते. Pandrpurnews
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या अखत्यारीतील गोशाळेत सध्या सुमारे २२५ लहान-मोठ्या गौर जातीच्या गायी आहेत. या गोशाळेतील गाईंच्या दुधाचा उपयोग श्री विठ्ठल-रूक्मिणीच्या नित्योपचार व महानैवेद्यासाठी केला जातो. गायींसाठी आवश्यक चारा, पशुखाद्य तसेच इतर सुविधा मंदिर समितीमार्फत उपलब्ध करून दिल्या जातात.
तथापि, विद्यमान गोशाळेसाठी जागा अपुरी पडत असल्याने गोशाळा विस्ताराची आवश्यकता निर्माण झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मंदिर समितीमार्फत पंढरपूर येथील गट क्रमांक १६१ मधील ३ हेक्टर १२ आर क्षेत्राची मागणी करण्यात आली आहे. प्रस्तावित क्षेत्रापैकी सध्या गोशाळेसाठी वापरात असलेल्या मोकळ्या १.२० हेक्टर क्षेत्र आरक्षणातून वगळण्याबाबत पंढरपूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी.
Chandrashekharbawankule /तसेच गोशाळेचा विस्तार करताना त्या परिसरात भाविकांसाठी आकर्षक व उपयुक्त पिकनिक स्पॉट विकसित करण्याचाही समावेश असलेला सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी या बैठकीत दिले
मुंबई, ( विशेष प्रतिनिधी )- शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देत, चेंबूर येथील अणुशक्तीनगर परिसरात अल्पसंख्याक मुलींसाठीच्या प्रस्तावित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.sunetrapawar
सह्याद्री अतिथीगृह येथे अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध योजनांचा व जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास व अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सना मलिक-शेख, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव योगेश म्हसे, जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष मितेश नाहटा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. Ajitpawar
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी राज्य सरकार विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असून या प्रयत्नांना अधिक गती देण्यात येणार आहे. विशेषतः मुलींच्या उच्च तांत्रिक शिक्षणासाठी दर्जेदार सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.ajitpawar
बैठकीत ‘मार्टी’ संस्थेशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थेसाठी स्वतंत्र लेखा उघडणे, कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी मंजूर पदे तात्काळ भरणे, तसेच तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर कार्यालय सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली.
अल्पसंख्याक समाजातील तरुणांना आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही विचारविनिमय झाला. कौशल्य विकास, तंत्रज्ञानाधारित शिक्षण आणि रोजगाराभिमुख उपक्रमांद्वारे युवकांना सक्षम करण्यावर सरकारचा विशेष भर राहील, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.
जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाला गती देणार
जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे काम अधिक वेगाने व परिणामकारक करण्यासाठी पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक (एमडी) नेमण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावांचे तातडीने परीक्षण करून पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
Sunetrapawar महामंडळाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देत, जैन समाजाच्या सर्व घटकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. जैन तसेच अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध मंडळावर प्रलंबित अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची ग्वाही देत, महामंडळाच्या कामासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उमरगा: उन्हाळ्याच्या सुट्टीतील मनोरंजनाचे साधन म्हणून सापशिडी,लुडो तीन पत्ती, या खेळाकडे पाहिले जात होते. मात्र, इंटरनेटच्या युगात या खेळांना आता जुगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील तरूणाई या ऑनलाईन जुगाराकडे आकर्षित झाली असून यामध्ये किशोरवयीन मुलांचेही प्रमाण लक्षणीय आहे. विशेष म्हणजे, स्किल गेमच्या नावाखाली हे प्रकार सुरू असून, यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. या ऑनलाइन गेम मुळे अनेकांच्या आयुष्याचा खेळ होत आहे. इंटरनेटच्या अनेक साइटवर हे ॲप उपलब्ध आहेत.
त्यावरून हे गेम डाऊनलोड करण्यात येतात. ॲपवर आपला स्वतःचा आयडी तयार करावा लागतो.
यासाठी दोन प्रकार आहेत, पहिल्या प्रकारात पूर्वी पासून त्यावर आयडी असलेली मंडळी नवीन युजर्सचे नाव आणि मोबाईल क्रमांक ॲप ॲडमीनला पाठवतात. त्यानंतर ॲडमीन यूजशी संपर्क साधून त्याचा आयडी तयार करतो. दुसऱ्या प्रकारात जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यास समोरील व्यक्ती आयडी तयार करून देतो. आपल्या आयडीवर लॉगिंग केल्यानंतर यूजर्स पाहिजे त्या खेळाला जुगार खेळण्यासाठी निवडू शकतो.ludogame
यामध्ये त्याने जितकी रक्कम आयडीवर डिपॉझिट केली असेल, त्या प्रमाणात तो खेळू शकतो. जितकी रक्कम लावली, त्याच्या दुप्पट रकमेचे आमिष खेळाडूला दाखविण्यात येते. यदाकदाचित जिंकल्यास जिंकलेली रक्कम युजर्स विड्रॉल करून घेवू शकतो. यासाठी ॲपची दुसरी टीम विड्रॉलचे काम करते.crimenews
या टीमच्या व्हाट्सअप ॲप क्रमांकावर युजर्सचा आयडी क्रमांक आणि बँक खात्याची माहिती पाठवावी लागते. त्यानंतर काही वेळात त्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. हरल्यास लावलेली रक्कम गमवावी लागते. यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते.
तरुणांना जाहिरातीतून भुरळ
सोशल मीडियाचे फेसबुक, इंस्टाग्राम, तसेच विविध चैनलवर सध्या नियमित ऑनलाइन जुगाराच्या जाहिराती दिसून येत आहेत.games
Gamenews/यामध्ये एव्हिएटर, तीन पत्ती, जंगली रमी, लुडो, तसेच क्रिकेटशी संबंधित खेळाच्या जाहिरातींचाही समावेश आहे. जाहिरातीच्या माध्यमातून या जुगारांच्या खेळाकडे आकर्षित करून तरुणाईला भुरळ घालण्यात येत आहे.