Home Blog

Hingnghatnews / CET परीक्षा केंद्रावर गोंधळ; पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश

0

 

हिंगणघाटच्या विद्यार्थ्यांसाठी स्थानिक केंद्राची मागणी; पालकांसाठी सुविधांचा अभाव

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा :आष्टी येथील न्यू मॉन्टफोर्ट औषध निर्माणशास्त्र संस्था येथे बुधवारी आयोजित CET (सामाईक प्रवेश परीक्षा) दरम्यान मोठा गोंधळ उडाला. बाहेरगावाहून आलेले विद्यार्थी व पालक सकाळी ७ वाजल्यापासून परीक्षाकेंद्रावर पोहोचले होते. मात्र, केंद्रावर विद्यार्थ्यांना व पालकांना प्रवेश नाकारण्यात आल्याने संतप्त वातावरण निर्माण झाले. Wardhanews

उपस्थित कर्मचाऱ्यांनी “CET विभागाकडून पैसे मिळाले नसल्यामुळे प्रवेश देता येणार नाही,” अशी माहिती दिल्याचा आरोप विद्यार्थी व पालकांनी केला. त्यामुळे काही वेळातच परीक्षाकेंद्राबाहेर मोठी गर्दी झाली. वर्षभर CET परीक्षेची तयारी केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसला असून काही विद्यार्थी रडू लागल्याचेही पाहायला मिळाले. पालकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून 112 क्रमांकावर कॉल करण्यात आला. त्यानंतर काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित विभागाशी संपर्क साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी खासदार अमर काळे यांचे पीए जितेंद्र शेट्टे देखील घटनास्थळी उपस्थित होते. Cet/

काही वेळाच्या चर्चेनंतर प्रश्न मार्गी लागला व विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रात प्रवेश देण्यात आला. मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती व मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Hingnghatnews /दरम्यान, हिंगणघाट तालुक्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हिंगणघाट येथे स्वतंत्र CET परीक्षा केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या पालकांसाठी कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यानेही संताप व्यक्त करण्यात आला.
संतप्त पालकांनी संबंधित परीक्षा केंद्राची चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Yavalnews /यावल पंचायत समितीला मिळाले नवे नेतृत्व ; दीपक कदम यांची सहाय्यक गट विकास अधिकारी पदावर नियुक्ती

0

 

यावल प्रतिनिधी, विकी वानखेडे

यावल पंचायत समितीमध्ये दीपक कदम यांची सहाय्यक गट विकास अधिकारी पदावर नियुक्ती
Yawal : यावल पंचायत समितीमध्ये दीपक कदम यांची सहाय्यक गट विकास अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याने तालुक्यातील प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या नियुक्तीमुळे पंचायत समितीच्या कामकाजाला अधिक वेग मिळून ग्रामीण भागातील विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दीपक कदम यांनी यापूर्वी विविध प्रशासकीय विभागांमध्ये जबाबदारी सांभाळताना आपल्या कार्यक्षम व लोकाभिमुख कामकाजाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडविणे, विकासकामांमध्ये पारदर्शकता राखणे तसेच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करणे, ही त्यांची कार्यशैली असल्याचे बोलले जात आहे.
यावल तालुका हा ग्रामीण व आदिवासी भागांचा समावेश असलेला महत्त्वाचा तालुका मानला जातो. पंचायत समितीमार्फत शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, ग्रामीण रस्ते, महिला व बालकल्याण तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जाते. अशा परिस्थितीत सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून दीपक कदम यांच्या अनुभवाचा व प्रशासनिक कौशल्याचा फायदा तालुक्यातील विकासकामांना होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

विशेषतः ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि प्रशासन अधिक गतिमान करण्यावर त्यांच्या माध्यमातून भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पंचायत समितीच्या विविध विभागांमध्ये समन्वय निर्माण करून विकासकामांना गती देण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे.
दरम्यान, त्यांच्या नियुक्तीनंतर पंचायत समिती कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Yavalnews /दीपक कदम यांच्या नियुक्तीमुळे यावल तालुक्यातील ग्रामीण विकासाच्या कामांना नवी दिशा मिळेल तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासन अधिक सक्रिय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Hingnghatnews /बुलडोजर कारवाईची चौकशी करा; नागरिकांची नगराध्यक्षांकडे मागणी

0

 

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : शहरातील यशवंत नगर परिसरातील कथित अतिक्रमण हटविण्याच्या प्रकरणाने आता गंभीर वादाचे स्वरूप धारण केले असून, बिल्डर आशिष जाणा यांच्या बुलडोजर कारवाईविरोधात झोपडपट्टीधारकांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केला आहे.

नोटीसविना संडास, बाथरूम, पक्के शेड आणि इतर बांधकामे पाडण्यात आल्याचा आरोप होत असून, या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया, प्रशासनाची भूमिका आणि बिल्डरांकडून कथित दबावतंत्राचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.wardhanews

गेल्या ५५ ते ६० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांना निवेदन देत बुलडोजर कारवाईमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, पुनर्वसन आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

 

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागा खरेदी केल्यानंतर कोणतेही अधिकृत मोजमाप, लेखी नोटीस किंवा अंतिम प्रशासकीय परवानगी न घेता कारवाई करण्यात आली. Hingnghatnews

झोपडपट्टीधारकांनी महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम १९७१ तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा उल्लेख करत, कोणतीही तोडफोड करण्यापूर्वी ३० दिवसांची लेखी नोटीस देणे बंधनकारक असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या कारवाईमुळे महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेक कुटुंबांवर उघड्यावर शौचास जाण्याची वेळ आल्याचे नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, परिसरातील सुमारे ५० ते ७० झाडे तोडण्यात आल्याचाही आरोप समोर आला आहे. वृक्षतोडीसाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली होती का, याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

आशिष जाणा बिल्डर यांची प्रतिक्रिया
“मी माझी जागा लेव्हल केली. त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढले. विषय तसा आला नाही त्यामुळे कायदेशीर कागदपत्रांचा विषय झाला नाही,” अशी भूमिका बिल्डर आशिष जाणा यांनी मांडली. मात्र त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे प्रकरण आणखी चर्चेत आले असून, नागरिकांनी या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नगरसेवक विक्की वाघमारे यांची प्रतिक्रिया
स्थानिक नगरसेवक विक्की वाघमारे यांनी सांगितले की, “अतिक्रमण धारक आणि आशिष जाणा यांच्यात वाद सुरू होता. यावर मोजणी करून निर्णय घेण्यात येईल, असे ठरले होते. मात्र त्यानंतरही अतिक्रमण हटविण्यात आले. त्यांनी शब्द पाळला नाही आणि विश्वासघात केला.”

माजी नगरसेवक मनिष देवडे यांची प्रतिक्रिया
माजी नगरसेवक मनिष देवडे यांनी “अतिक्रमणावरून वाद असला तरी मोजणी आणि प्रशासनाचा अंतिम निर्णय झाल्यानंतरच पुढील कारवाई होणे अपेक्षित होते.

आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.”
दरम्यान, शहरात काही बिल्डर विवादित किंवा मौल्यवान जागा कमी किमतीत खरेदी करून नंतर अतिक्रमण हटवून त्या जागांचे बाजारमूल्य वाढवत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भूमाफिया, विवादित जागांचे व्यवहार आणि अतिक्रमण हटविण्याच्या पद्धती पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

Wardhanews /नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत स्वतः मौका चौकशी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. आता प्रशासन या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Nagpurnews/नागपूर विभागातील औद्योगिक भूखंडांवर पोटभाडेकरूंचे जाळे?कारखाने बंद, गाळे सुरू; शासन महसुलाला कोट्यवधींचा फटका ?

0

 

विदर्भ प्रतिनिधी सचिन वाघे

नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत नागपूर विभागातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक भूखंडांचा गैरवापर होत असल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत.

उद्योग सुरू करण्यासाठी अल्प दरात देण्यात आलेले अनेक भूखंड आता व्यावसायिक गाळे, दुकाने व पोटभाडेकरूंसाठी वापरले जात असल्याने शासनाच्या मूळ औद्योगिक धोरणालाच तडा गेल्याची चर्चा आहे.
माहितीनुसार, अनेक उद्योजकांनी कारखाने बंद केले किंवा व्यवसाय इतरत्र हलविले. मात्र, भूखंड शासनाकडे परत न करता त्यावर विविध व्यावसायिक आस्थापना उभारून भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचा आरोप होत आहे.

 

औद्योगिक वापराऐवजी केवळ आर्थिक नफा कमविण्यासाठी भूखंडांचा वापर सुरू असल्याचे चित्र नागपूर विभागातील अनेक औद्योगिक वसाहतींमध्ये दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, काही ठिकाणी महामंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र नसतानाही महसूल विभागाच्या माध्यमातून दस्त नोंदणी व पोटभाडेकरूंच्या नोंदी झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

माहिती अधिकारातून मागविण्यात आलेल्या माहितीतही गंभीर विसंगती समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. अर्जदाराला फक्त पोटभाडेकरूंची यादी देण्यात आली; मात्र प्रत्यक्ष कारखाने सुरू आहेत का, तपासणी अहवाल काय आहे, नियमभंग करणाऱ्यांवर कोणती कारवाई झाली याबाबत माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप आहे.

नागपूर विभागातील अनेक औद्योगिक वसाहतींमध्ये तब्बल ८० टक्के भूखंडांवर पोटभाडेकरू असल्याचा दावा करण्यात येत असून, यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे. तसेच, स्थानिक बेरोजगार युवकांना उद्योगाच्या माध्यमातून रोजगार देण्याचा उद्देशही अपूर्ण राहत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.hingnghatnews

दरम्यान, औद्योगिक भूखंडांवर प्रत्यक्ष कोणते कारखाने सुरू आहेत याची पाहणी करण्यासाठी विशेष तपासणी पथक नेमावे, नियमबाह्य पद्धतीने भूखंडांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि शासनाची फसवणूक झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे.

Wardhanews /औद्योगिक विकासासाठी निर्माण करण्यात आलेल्या वसाहती आता भाडे व्यवसायाचे केंद्र बनत असल्याची चर्चा असून, शासनाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी नागरिक व उद्योग क्षेत्रातून पुढे येत आहे.

Hingnghatnews /शारीरिक शिक्षणाचा बोजवारा; काम शून्य तरी लाखोंचा पगार!

0

 

अनेक शाळांमध्ये ‘नामधारी’ शारीरिक शिक्षक, विद्यार्थ्यांच्या क्रीडा भवितव्याशी खेळ

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : राज्यातील अनेक खासगी व अनुदानित शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकांची पदे केवळ कागदोपत्री असल्याचे चित्र समोर येत आहे.

अनेक ठिकाणी संबंधित शिक्षक कोणतेही प्रत्यक्ष क्रीडा प्रशिक्षण देत नसतानाही त्यांना दरमहा लाखो रुपयांचा पगार मिळत असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे ही पदे अनेक संस्थाचालकांच्या नातेवाईकांनी किंवा कमेटीतील सदस्यांनी व्यापल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात रंगली आहे.wardhanews

विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी शाळांमध्ये क्रीडा शिक्षणाला महत्त्व दिले जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक शाळांमध्ये मैदान, क्रीडा साहित्य आणि नियमित प्रशिक्षणाचा अभाव असल्याचे दिसून येते. परिणामी ग्रामीण व सामान्य कुटुंबातील अनेक गुणवान विद्यार्थी खेळ क्षेत्रात पुढे येण्यापासून वंचित राहत आहेत.hingnghatnews

पालक व नागरिकांचा आरोप आहे की, अनेक शाळांमध्ये शारीरिक शिक्षक केवळ उपस्थितीपुरते मर्यादित असून विद्यार्थ्यांना कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात नाही. जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांची कामगिरीही अत्यंत कमी असल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.school

Hingnghatnews /विशेष म्हणजे शिक्षण विभागाकडून या प्रकाराकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. संबंधित शाळांची तपासणी करून प्रत्यक्ष कार्यरत शिक्षकांची चौकशी करावी, विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे आणि गैरप्रकार करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

Mahatmaphule /महात्मा फुले द्विशताब्दी जयंती निमित्त विशेष चित्ररथाचे १३ मे रोजी हिंगणघाटात आगमन

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने विशेष चित्ररथाचे आयोजन करण्यात आले असून, हा चित्ररथ १३ मे रोजी वर्धा जिल्ह्यात दाखल होणार आहे. हिंगणघाट येथे सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे चित्ररथाचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. Hingnghatnews

या विशेष चित्ररथामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे साहित्य, भिडे वाड्याची प्रतिकृती तसेच सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचा समावेश करण्यात आला आहे. समाज प्रबोधन, सामाजिक सलोखा व जागृतीचा संदेश देणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.wardhanews

या उपक्रमाला सर्व शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारांचे प्रेमी नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शहरात चित्ररथाचे मोठ्या उत्साहात स्वागत करावे,

Mahatmaphule /असे आवाहन वर्धा जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष विशाल हजारे, जिल्हा संघटक विनय डहाके, महिला जिल्हाध्यक्ष कविता मुंगळे, शहराध्यक्ष ऋषीकेश मेश्राम, समाजसेवक अनिल भोगाडे, केशव तितारे, जयंता मानकर तसेच महिला शहराध्यक्ष दीपाली रंगारी यांनी केले आहे.

Sscbord/जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर श्रावणीची भरारी

0

 

97.80 टक्के गुणांसह हिंगणघाट तालुक्यात प्रथम; वैज्ञानिक बनण्याच्या स्वप्नाला आमदार समीरभाऊ कुनावर यांची साथ

 

प्रतिनिधी सचिन वाघे

 

हिंगणघाट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होताच हिंगणघाट शहरातील नगरपरिषदद्वारा संचालित जी.बी.एम.एम. हायस्कूलच्या विद्यार्थिनी कु. श्रावणी रूपेश पराते हिने 97.80 टक्के गुण मिळवत हिंगणघाट तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर तिने हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.schoolnews

 

श्रावणीचे वडील कपड्याच्या दुकानात काम करतात, तर आई गृहिणी आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही अभ्यासावरील निष्ठा, सातत्यपूर्ण परिश्रम आणि मोठे स्वप्न पाहण्याची जिद्द यांच्या बळावर श्रावणीने यशाचा हा मानाचा टप्पा गाठला. तिच्या यशामुळे संपूर्ण हिंगणघाट शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.hingnghatnews

आपल्या यशाचे श्रेय देताना श्रावणीने जी.बी.एम.एम. हायस्कूलचे मुख्याध्यापक फुटाणे सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे मनःपूर्वक आभार मानले. शिक्षकांचे मार्गदर्शन, शाळेचे शैक्षणिक वातावरण आणि पालकांचे मोलाचे पाठबळ यामुळेच हे यश शक्य झाल्याचे तिने सांगितले.

भविष्यात वैज्ञानिक बनून संशोधन क्षेत्रात कार्य करण्याची श्रावणीची इच्छा असून देशासाठी नवे संशोधन आणि समाजोपयोगी कार्य करण्याचे तिचे स्वप्न आहे. तिच्या या ध्येयाने प्रभावित होत हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. तसेच तिच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी पालकत्व स्वीकारत तिला दत्तक घेण्याचा संवेदनशील निर्णय त्यांनी जाहीर केला.

श्रावणीच्या यशाबद्दल तिचा विशेष सत्कार आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेच्या शिक्षण सभापती पल्लवी सुशांत बाराहाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

Renevenews /प्रलंबित रेती घाटांतून अवैध उत्खनन; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रेती माफियांचे मनोबल वाढले?

 

सत्कार कार्यक्रमास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, उमेश तुळस्कर, माजी खासदार सुरेश वाघमारे, शिक्षण समिती सदस्य अंकुश ठाकूर, सोनू गवळी, सुनील मोहता, अतुल नंदागवळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी श्रावणीचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Sscbord /श्रावणी पराते हिच्या या यशामुळे जी.बी.एम.एम. हायस्कूल तसेच संपूर्ण हिंगणघाट शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून तिची यशोगाथा अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Renevenews /प्रलंबित रेती घाटांतून अवैध उत्खनन; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रेती माफियांचे मनोबल वाढले?

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : तालुक्यातील अनेक रेती घाटांचे लिलाव अद्याप प्रलंबित असतानाही काही घाटांमधून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. विशेषतः चिंचोलीघाट, पारडीघाट, कवडघाट, शहालगडी परिसर, नांदगावघाट आदी भागांत रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रेती उपसा व वाहतूक होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.crimenews

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित महसूल, खनिकर्म विभाग, तसेच स्थानिक प्रशासनाकडून या प्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याने अवैध उत्खनन करणाऱ्यांचे मनोबल वाढल्याचे बोलले जात आहे.hingnghatnews

नागरिकांचा आरोप आहे की, काही ठिकाणी पटवारी, मंडळ अधिकारी, ग्रामपंचायत स्तरावरील संबंधित घटक, महसूल अधिकारी तसेच पोलीस प्रशासनातील काही घटक यांच्याकडून आर्थिक व्यवहारातून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा परिसरात रंगत आहे.wardhanews

मात्र,दरम्यान, रेती घाटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण नसताना सुरू असलेला अवैध रेती उपसा शासनाच्या महसुलाला मोठा फटका देणारा ठरत असून नदीपात्राच्या पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण होत आहे.

HSCNews/आईच्या जिद्दीने घडवली गुणवंत कन्या; समीक्षा जणबंधूचे सर्वत्र कौतुक

 

अधिकृत लिलाव घेणाऱ्या कंत्राटदारांपेक्षा अवैध घाटांमधून स्वस्त दरात रेती उपलब्ध होत असल्याने भविष्यात अधिकृत रेती घाट घेण्यास कोणीही पुढे येणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Renevenews/या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संयुक्त तपास पथक स्थापन करावे, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि अवैध उत्खनन त्वरित बंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Hingnghatnews /हिंगणघाटात जीव धोक्यात; रेल्वे गेट बंद, अंडरपासची मागणी तीव्र — आंदोलनाचा इशारा

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : शहरातील प्रभाग क्रमांक १९ परिसरात रेल्वे गेट बंद झाल्यामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला असून, सुरक्षित अंडरपास किंवा पर्यायी मार्गाची मागणी आता तीव्र झाली आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.wardhanews

सुमारे १६-१७ वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले रेल्वे गेट फ्लायओव्हरच्या बांधकामानंतर बंद करण्यात आले. मात्र, त्या बदल्यात कोणतीही सुरक्षित व्यवस्था न केल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे.

परिसरात शाळा, रुग्णालय आणि एपीएमसी मार्केट असल्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी आणि व्यापाऱ्यांची सतत वर्दळ असते. त्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.

विशेषतः वृद्ध नागरिकांना फ्लायओव्हरवर चढणे-उतरणे अत्यंत कठीण जात असून, त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ जवळ असल्याने वाहतुकीचा ताण प्रचंड वाढतो आणि परिस्थिती अधिक धोकादायक बनते.

या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रेल्वे गेट पुन्हा सुरू करावे किंवा सुरक्षित अंडरपास उभारावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.ajitpawar

Hingnghatnews /सदर निवेदन युवक विधानसभा अध्यक्ष अविनाश नवरखेले (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) यांनी विविध शासकीय स्तरांवर सादर केले असून, आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Umrganews /उमरगा (आनंदीपूर) शहरात संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रमुख नागरिक संगोष्ठी उत्साहात संपन्न

0

 

उमरगा (आनंदीपूर ) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त उमरगा शहरात प्रमुख नागरिक संगोष्ठीचे आयोजन करण्यात आले. शहरातील डिग्गी रोडवरील कन्हैया मंगल कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.dharashivnews

या संगोष्ठीत पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया यांनी मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन केले, तर जिल्हा कार्यवाह अजय जानराव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

डॉ. भाडेसिया यांनी आपल्या भाषणात संघाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकताना सांगितले की, “संघाचे कार्य हे संपूर्ण विश्व अधिक श्रेष्ठ करण्याच्या भावनेतून चालते. ‘इदं न मम’ म्हणजेच ‘हे माझे नाही’ हा भारतीय संस्कृतीचा मूलमंत्र असून त्यातून निस्वार्थ भाव, त्याग आणि समर्पणाची शिकवण मिळते.” त्यांनी पुढे नमूद केले की, संघाचे कार्य आपल्या भारत देशाला विश्वगुरू बनवण्यासाठीच आहे आणि शिस्त व कार्यपद्धतीमुळेच संघाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी संघाच्या विचारधारेत एकात्मतेला महत्त्व असल्याचेही स्पष्ट केले. Umrganews

व्यक्ती निर्माण हा संघाच्या कार्याचा गाभा असल्याचे सांगत त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या विचारांचा उल्लेख केला. “संघाचे कार्य बाहेरून जितके साधे दिसते, त्यामागील गूढ आणि गहराई तितकीच विशाल आहे. ज्ञान, आध्यात्म, सेवा आणि साधना यांसारखी मूल्ये संघात रुजवली जातात. नियमित शाखेत सहभागी झाल्यास स्वयंसेवकाचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडते,” असे ते म्हणाले.

संघाच्या प्रार्थनेचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, प्रार्थनेत भारतमातेप्रती समर्पणाचा भाव आहे आणि भगवा ध्वज हा संघाचा गुरु मानला जातो. “संघाचा स्वयंसेवक प्रसिद्धीपेक्षा समाजातील अडचणी दूर करण्यावर भर देतो.

Umrganews /उमरगा-औसा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था; आमदार प्रवीण स्वामींकडून प्रत्यक्ष पाहणी, अधिकाऱ्यांना तात्काळ दुरुस्तीचे आदेश

 

तो स्वतःसाठी नव्हे, तर समाज आणि राष्ट्रासाठी कार्य करतो,” असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. उपस्थित नागरिकांनीही संघाच्या कार्याबाबत उत्सुकता व्यक्त करत चर्चेत सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्यरीत्या पार पडले असून, उमरगा शहरात संघाच्या विचारांचा प्रसार आणि समाजजागृतीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.