Home Blog

निसर्गासाठी नारी शक्तीचा जागर! विदर्भ वि.प्र. नारी शक्ती सेवाद्वारे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न!(MurtijapurNews )

0

 

प्रतिनिधी मूर्तिजापूर तालुका विलास सावळे

MurtijapurNews:मूर्तिजापूर शहरात विदर्भ वि.प्र. नारी शक्ती सेवा महिला मंडळ मूर्तिजापूरच्या उत्साही सदस्यांनी एकत्र येऊन पर्यावरणाची काळजी घेण्याचा एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. नुकताच, हरियाणा नगरमधील डॉक्टर विक्रम शर्मा हॉस्पिटलच्या परिसरातील मोकळ्या जागेत या मंडळाच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

या उपक्रमात केवळ वृक्षारोपणच नव्हे, तर पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आणि इतरांनाही प्रेरणा देण्याचा उद्देश होता.

या कार्यक्रमात विविध प्रकारच्या स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली, ज्यात वड, पिंपळ, लिंब आणि इतर सावली देणाऱ्या तसेच औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पतींचा समावेश होता. मोठ्या संख्येने महिलांनी एकत्र येऊन अत्यंत आनंदाच्या वातावरणात वृक्षारोपणाचे काम केले.

प्रत्येकीने आपल्या परीने योगदान देत या उपक्रमाला यशस्वी बनवले.या प्रेरणादायी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर रश्मी शर्मा होत्या, ज्यांनी पर्यावरणाचे महत्त्व विशद केले आणि महिलांच्या या योगदानाला गौरवले. तसेच, उपाध्यक्ष संतोषजी खंडेलवाल यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व आणि त्याचे दूरगामी फायदे सांगितले. सहउपाध्यक्ष किरण जोशी, सचिव बरकाजी तिवारी आणि कोषाध्यक्ष कल्पना तिवारी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय भूमिका घेतली.

याव्यतिरिक्त, मंडळाच्या सदस्य मीना नागवान, सुनिता नागवान, शितल जोशी, रेखा उपाध्याय, काजल तिवारी आणि शशी नागवान यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने या उपक्रमात सहभाग घेतला.

MurtijapurNews:विदर्भ वि.प्र. नारी शक्ती सेवा महिला मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महिलांनी एकत्र येऊन केवळ वृक्षारोपण केले नाही, तर त्यांनी समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे की पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे. त्यांच्या या कृतीने इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि भविष्यात असे अनेक उपक्रम राबवले जातील, अशी आशा व्यक्त होत आहे.आपल्या परिसरातील पर्यावरण रक्षणासाठी तुम्ही काय योगदान देऊ शकता?

गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अनधिकृतपणे गृहप्रवेश,घरफोडीचा प्रयत्न व संभाव्य जीविताला धोका असल्याने निवेदन कर्त्याचे रक्षण होण्याबाबत.(crimenews )

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

बुलढाणा:-गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अनधिकृतपणे गृहप्रवेश,घरफोडीचा प्रयत्न व संभाव्य जीविताला धोका असल्याने निवेदन कर्त्याचे रक्षण होण्याबाबत.
तक्रार जितेंद्र देवचंद कायस्थ पत्ताः शिव शॉपिंग कॉम्प्लेक्स, कारंजा चौक, बुलढाणा,व्यवसायः केबल नेटवर्क व पत्रकार यांनी शहर पोलिस निरीक्षक बुलढाणा यांना सादर केले आहे.
तक्रार करताना निवेदनात म्हटले आहे.

की,मी खालीलप्रमाणे तक्रार दाखल करीत आहे की,मी शिव शॉपिंग कॉम्प्लेक्स, कारंजा चौक,बुलढाणा येथे माझ्या परिवारासह राहतो. माझे दोन फ्लॅट असून मी दुसऱ्या मजल्यावर राहतो. पहिल्या मजल्यावर संजय कुलकर्णी राहतात व त्यांच्या फ्लॅटसमोर व्यापारी मीटिंग हॉल आहे.
दिनांक 26 मे 2025 रोजी दुपारी अंदाजे 1.00 ते 1.30 दरम्यान चार अज्ञात गुंड प्रवृत्तीचे इसम परिसरात आले.त्यातील एक इसम शर्मा आरो सेंटर येथे थांबून पार्किंगमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली.

प्रभाग 12 (राम मंदिर/मुजुमदार वार्ड ) मध्ये लाखों रुपये खर्च केलेली व्यायाम शाळा केव्हा सुरु होणार !(rammandir)

त्याला केमेरा दिसताच तो तेथून निघून गेला.त्या आलेल्या अज्ञात इसमान पैकी बाजूलाच असलेल्या बंद श्रीराम हॉटेलच्या पायऱ्यांवर चढला, व उरलेले दोन इसम माझ्या घराकडे येणाऱ्या पायऱ्यांकडे वळले.त्यापैकी एकाच्या हातात नायलॉनची मोठी पिशवी होती.

ते दोघे वर जाऊन संजय कुलकर्णी यांच्या घरासमोरील मीटिंग हॉलचे कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला.या आवाजामुळे कुलकर्णी यांच्या घरातील आजारी वृद्ध पालकांनी आरडाओरड केली. त्यांचा नातू चिन्मय धावत हॉलजवळ गेला असता त्याने कुलूप तोडलेले पाहिले.त्याने दरवाजा उघडताच आत लपलेला एक अज्ञात इसम बाहेर येऊन त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने चिन्मय हल्ल्यात बचावला.
दरम्यान, या अज्ञात इसमांपैकी एक इसम माझ्या मी माझ्या परिवारा सह राहत असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटकडे आला होता. माझा नातू त्याच वेळी माझ्या समोरील फ्लॅटमध्ये जेवण करत असलेल्या आई व आत्याला पोळी देऊन परत आला. त्याला पाहून तो अज्ञात इसम तात्काळ खाली उत्तरला.
ही संपूर्ण घटना माझ्या सीसीटीव्ही केमेरा मध्ये कैद झाली आहे.

संबंधित फुटेज मी शहर पोलीस स्टेशनमध्ये सादर केले आहे.मी पत्रकार असून मी वारंवार समाजातील भ्रष्टाचार व अवैध धंद्यांबाबत माझ्या माध्यमातून सत्य उघडकीस आणतो. याआधीही या जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली होती. याबाबत मी दिनांक 29/01/2023 रोजी शहर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दिली होती.त्या मागील कालावधीत माझ्या चार चाकी आरामदायी गाडीला आग लावण्याचा प्रयत्न झाला होता.

crimenews:वरील घटना पाहता, दिनांक 26/05/2025 रोजी आलेल्या या अज्ञात इसमांचा सटे गंभीर व घातपातपूर्ण होता, असा माझा ठाम संशय आहे. त्यामुळे, या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, ही विनंती. मला व माझ्या परिवारातील सदस्यांच्या जिवीतास धोका असल्याने रक्षण करावे व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना चांगला झोप देऊन भविष्यातील होणारा अनर्थ टाळावा असे निवेदन सादर करण्यात येत आहे.

प्रभाग 12 (राम मंदिर/मुजुमदार वार्ड ) मध्ये लाखों रुपये खर्च केलेली व्यायाम शाळा केव्हा सुरु होणार !(rammandir)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

rammandir:हिंगणघाट :- शहरात अनेक योजनेतून शहरात समाज मंदिर, ,व्यायाम शाळा बांधकाम करण्यात आले उद्देश हा लोकहितार्थ आज लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे. आज अनेक ठिकाणी लोकहितार्थ इमारत बांधकाम करण्यात आले आहे. याचा उपयोग होताना दिसत नाही?

हिंगणघाट शहरात प्रभाग 12 ( राम मंदिर/ मुजुमदार वार्ड मध्ये व्यायाम शाळा चे नावाने इमारत बांधकाम करण्यात आले परंतु आजही याचा उपयोग प्रभागातील युवा वर्गाला झाला नाही.

मागेल त्याला कर्जमाफी द्या आणि मागेल त्याला पिक विमा द्या किसान ब्रिगेड,आणि शेतकरी योद्धा कृती समितीचा भव्य मोर्चाचे आयोजन लोणार तहसील कार्यालयावर ( morcha)

उलट सगळीकडे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची बदली झाल्यामुळे प्रभागात सगळीकडे दारू, सट्टा, व्यवसाय मोठया प्रमाणात वाडले त्यामुळे प्रभागातील युवा पिडी ही गैरमार्गांवर जाताना दिसत आहे.

rammandir:त्यामुळे प्रभागातील व्यायाम शाळा सुरु होणे आवश्यक आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन व्यायाम शाळा ही लवकरात लवकर सुरु करावी अशी प्रभागातील जनतेची मागणी आहे.

मागेल त्याला कर्जमाफी द्या आणि मागेल त्याला पिक विमा द्या किसान ब्रिगेड,आणि शेतकरी योद्धा कृती समितीचा भव्य मोर्चाचे आयोजन लोणार तहसील कार्यालयावर ( morcha)

0

 

सय्यद जहीर लोणार /बुलढाणा

morcha:दिनांक २६/५/२०२५ रोजी लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळण्याकरिता व ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पिक विमा मिळाला नसल्यामुळे आक्रोश मोर्चाचे आयोजन केले

असून पंचायत समिती लोणार येथून दुपारी १२.०० वा. या संदर्भात मा. तहसील कार्यालय लोणार यांना निवेदन देण्या करीता मोर्चाचे आयोजन केलेले आहे. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी उपस्थित राहून राज्य सरकारकडे प्रत्येक शेतकरी कर्जमाफीचे निवेदन देणार असून ग्रामीण भागामध्ये

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन (sameerkunawar)

कर्जमाफीचे फॉर्म भरण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली असून स्वतः शेतकरी फॉर्म भरून घेत आहे, तसेच किसान ब्रिगेडचे सर्वेसर्वा श्री प्रकाश पोहरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मागील त्याला पिक विमा द्या शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा दोन्ही संघटनेच्या नेतृत्वाखाली वरील दोन्ही मागण्या संदर्भात मोर्चाचे आयोजन केले आहे.

प्रत्यक्ष शेतकरी स्वतः निवेदन देणार आहे याची संपूर्ण माहिती दिनांक 22 मे रोजी तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन लोणार यांना निवेदनाद्वारे दिली आहे , निवेदन आपण आपल्या स्तरावर स्वीकारावे प्रत्येक शेतकऱ्याला त्याची पोच देण्यात यावी याकरिता आपण या मोर्चामध्ये सामील झालेल्या शेतकऱ्यांना कुठे अडथळा येऊ नये म्हणून आपण आपल्या स्तरावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी व तसेच आमच्या या मोर्चामध्ये सामील झालेल्या शेतकऱ्यांना सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे फक्त पिण्याचे पाणी आपल्या कार्यालामार्फत उपलब्ध करून देण्यात यावी अशी निवेदनामध्ये मागणी केली.

या मोर्चाचे आयोजन शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा यांनी केले असून यांनी संबंधित संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले आहे.

morcha:की पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यासाठी या मोर्चात सामील व्हा असे आव्हान शेतकरी योद्धा श्री बालाजी सोसे, श्री दिलीप चौधरी, श्री गजानन जायभाये व इतर शेतकऱ्यांनी केली आहे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन (sameerkunawar)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- शहराच्या हृदयस्थानी उभा असलेला विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अधिक भव्य, आकर्षक आणि देखणे व्हावा, तसेच परिसराचा सर्वांगीण विकास घडावा, यासाठी जिल्हा वार्षिक योजना (नाविन्यपूर्ण योजना) २०२४-२५ अंतर्गत १ कोटी रुपयांच्या निधीतून सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन शुभारंभ आमदार समीर कुणावार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

या उपक्रमासाठी आमदार समीर कुणावार यांनी स्वतः पुढाकार घेत जिल्हाधिकारी वर्धा यांच्याशी बैठक घेऊन नागपूर येथील VNIT संस्थेच्या तज्ज्ञ पथकाची पाहणी आयोजित केली. या पाहणी अहवालात पुतळ्याच्या तातडीच्या दुरुस्तीची शिफारस करण्यात आली.

वना नदीतून अवैध रेती उपसा वर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक.(hingnghat)

त्यानंतर आमदार कुणावार यांनी माजी पालकमंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्याने प्रस्ताव शासनाकडे सादर केला आणि निधी मंजुरीसाठी प्रभावी पाठपुरावा केला. शासनस्तरावर मंजुरी मिळवून हा प्रस्ताव यशस्वीरीत्या मार्गी लावण्यात आला.

यानंतर नवीन DPDC समितीच्या बैठकीत विद्यमान पालकमंत्री मा. पंकज भोयर यांनी या विकासकामाला गती देत निधीच्या अंमलबजावणीत सकारात्मक भूमिका बजावली. त्यांच्या सहकार्याबद्दल आमदार कुणावार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.sameerkunawar

या भूमिपूजन कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, हिंगणघाट यांच्यावतीने आमदार कुणावार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सांस्कृतिक रंगत वाढवण्यासाठी सुप्रसिद्ध ‘जाधव सिस्टर्स’ – विनया, विजया, वैभव जाधव आणि त्यांच्या संगीतमय संचाने “भीमगीतांचा सुफी नजराणा” सादर केला, ज्यामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला.

sameerkunawar:या भव्य कार्यक्रमाला हिंगणघाट नगरपालिकेचे मुख्याधिकारी, विविध शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

वना नदीतून अवैध रेती उपसा वर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक.(hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट:- हिंगणघाट शहरातील डंकीन येथील बंधारा बांधकामासाठी वणा नदी पात्रातून करण्यात आलेल्या अवैध रेती उपशावर कार्यवाही करून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी रा.कॉ.पक्ष शरदचंद्र पवार आक्रमक असून आज तहसिल कार्यालयात प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

शहरातील डंकीन परिसरात सध्या सुरू असलेल्या बंधारा बांधकामासाठी औरंगाबाद येथील एका कंपनीला ठेका देण्यात आलेला आहे. परंतु, या बांधकामासाठी वापरण्यात येणारी रेती ही वणा नदीच्या पात्रातून बेकायदेशीररित्या आणि कोणतीही वैध परवानगी न घेता उपसली गेली आहे,

लोकलेखा समितीवर समीर कुणावार(आमदार) यांची नियुक्ती (samirkunavar)

हे धक्कादायक वास्तव नुकतेच समोर आले आहे. पियुष इन्फ्रा कंपनी नावाच्या ठेकेदाराने मोठ्या प्रमाणावर रेती उपसा करून साठा केला असून, यासंदर्भात महसूल विभागाचे नायब तहसीलदार श्री. सागर कांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन रेती साठ्यावर जप्तीची कारवाई केली आहे. आम्ही महसूल विभागाच्या या तत्परतेचे स्वागत करतो.

मात्र, वणा नदी ही आमच्या जीवनरेषेसारखी असून तिचे संरक्षण हे आमचे कर्तव्य आहे. या प्रकारामुळे नदीपात्रातील पर्यावरणीय समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. नदीवरील बेकायदेशीर रेती उपसा केवळ कायद्याचे उल्लंघन नाही, तर भविष्यातील जलसंकटाचे बीज आहे. त्या अनुषगाने आम्ही खालील मागण्या करीत आहोतः

या प्रकरणाची सखोल व स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.दोषी ठेकेदार व नागपूर पाटबंधारे विभागाच्या (दक्षिण) कार्यकारी अभियंता प्रांजली टोंगसे तसेच पाटबंधारे विभागीयनाचे हिंगणघाटचे उपविभागीय अभियंता अशोक घुमडे या जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा पूर्वीच्या बंधाऱ्याप्रमाणेच याही बंधाऱ्याच्या कामात गडबड होऊन शासनाचा पैसा वाया जाईल.जिल्ह्यातील सर्व बांधकाम प्रकल्पांवर नदी पात्रातील रेती उपशावर नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्यात यावी.वणा नदीच्या संपूर्ण परिसरात नदी संवर्धनासाठी स्पष्ट मार्गदर्शक नियमावली तयार करून अंमलात आणण्यात यावी.

सदर बंधाऱ्याचे काम यापूर्वी मुख्य अभियंता जलसंपदा विभाग नागपूर याचे द्वारा वर्धा पाटबंधारे विभाग वर्धा यांचेकडे देण्यात आले होते. परंतु नंतर हा निर्णय बदलून नागपूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) यांच्याकडे देण्यात आले. या मागचा काय उद्देश असावा? याची चौकशी करण्यात यावी. तरी सदर काम पूर्ववत वर्धा पाटबंधारे विभागाकडे देण्यात यावे कारण वर्धा येथून हिंगणघाटचे अंतर नागपूर पेक्षा जवळ असून त्यांना सदर कामावर लक्ष देणे सोयीचे आहे.असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा द्वारे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.

hingnghat:यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, रफिक पत्रकार, समाजसेवक सुनिल डोंगरे, माजी नगरसेवक अशोक पराते, माजी नगरसेवक राजेश भाईमारे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालु वानखेडे,दिव्यांग सेलचे प्रदेश सचिव मारोती महाकाळकर, अमोल बोरकर, अल्पसंख्याक सेल प्रदेश सरचिटणीस हिमायू मिर्झा बेग,वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, जगदीश वांदिले,पुरुषोत्तम कांबळे,किशोर चांभारे, समीर बाळसराफ,उमेश नेवारे,नितीन भुते, सुनिल भुते,अमित रंगारी, सुशील घोडे,सुनिल ठाकरे, हुकेश ढोकपांडे,रवी मेसेकर,आकाश हुरले आदी उपस्थित होते.

लोकलेखा समितीवर समीर कुणावार(आमदार) यांची नियुक्ती (samirkunavar)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

samirkunavar:हिंगणघाट :-महाराष्ट्रजनतेच्या हिशोबावर वचक ठेवणाऱ्या महाराष्ट्र विधानमंडळातील अत्यंत महत्त्वाच्या लोकलेखा समितीवर वरिष्ठ आमदार समीर कुणावार यांची प्रभावी नियुक्ती!महाराष्ट्र विधानमंडळाच्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लोकलेखा समितीवर आमदार समीर कुणावार यांची प्रतिष्ठेची नामनियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा नियम २०६ व विधानपरिषद नियम २०७ नुसार सन २०२४-२५ या वर्षासाठी समितीचे नवे सदस्य निश्चित करण्यात आले. या समितीचे अध्यक्षपद काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी विरोधी पक्षनेते मा. विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपवण्यात आले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली हिंगणघाट-समुद्रपूर-सिंदी (रेल्वे) विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व अभ्यासू आमदार समीर कुणावार यांची समिती सदस्य म्हणून नियुक्ती ही त्यांच्या कारभारातील पारदर्शकता, अभ्यासू दृष्टिकोन आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीची पावती आहे.

छगन भुजबळ यांची मंत्री पदी नियुक्ती हिंगणघाट मध्ये जल्लोष (chhaganbhujbal)

विधानमंडळाच्या लोकलेखा समितीला “जनतेच्या पैशाचा पहारेकरी” म्हणून ओळखले जाते. हि समिती शासकीय खर्चावर बारकाईने लक्ष ठेवते, नियंत्रक व महालेखापाल (CAG) यांच्या अहवालांवर चर्चा करते व शासकीय यंत्रणांची जबाबदारी निश्चित करते व अनियमितता उघड करते. २५ सदस्यांची ही समिती (२० विधानसभा व ५ विधानपरिषद सदस्य) ही अर्थसंकल्पानंतरची एक अत्यंत प्रभावशाली

संसदीय यंत्रणा मानली जाते.समीर कुणावार हे गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघात सातत्याने विकासकामे राबवणारे, नियोजनबद्ध, तळमळीने काम करणारे व पारदर्शकतेवर विश्वास असलेले आमदार म्हणून परिचित आहेत. विकासाभिमुख दृष्टिकोन, मजबूत जनसंपर्क, आणि शिस्तबद्ध नेतृत्वशैली यांच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

samirkunavar:या नियुक्तीद्वारे विधानमंडळात त्यांच्या वरिष्ठतेला, निःपक्ष अभ्यासाला आणि प्रामाणिक कार्यक्षमतेला शासनाने दिलेली मान्यता स्पष्ट होते. लोकशाहीतील वित्तीय शिस्त व उत्तरदायित्वासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात असून, लोकलेखा समितीच्या कामकाजात आमदार कुणावार यांचा अनुभव व दृष्टीकोन निश्चितच मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास राजकीय व प्रशासकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

छगन भुजबळ यांची मंत्री पदी नियुक्ती हिंगणघाट मध्ये जल्लोष (chhaganbhujbal)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे संस्थापक. छगन भुजबळ यांची अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल वर्धा जिल्हा हिंगणघाट येथे टिळक चौक महात्मा फुले पुतळ्या जवळ पेढे वाटून फटाके फोडून उत्साह साजरा करण्यात आला.

काँग्रेसच्या तिरंगा रॅली साठी मोठ्यप्रमाणावर उपस्थित रहा मा. नगर सेवक शेख करामत (Congressnews )

 

यावेळी कविता मुगले, वर्धा महिला महिला जिल्हाध्यक्ष
केशव तितरे,जयंत मानकर, आर्यन मुगले, ऋषिकेश मेश्राम, सुनीता

chhaganbhujbal:तळवेकर , विद्या बहेकार नागपूर जिल्हाध्यक्ष , साधना आंबुलकर नागपूर कार्याध्यक्ष इत्यादी समता सैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसच्या तिरंगा रॅली साठी मोठ्यप्रमाणावर उपस्थित रहा मा. नगर सेवक शेख करामत (Congressnews )

0

 

सय्यद जहीर लोणार /बुलढाणा

Congressnews:ऑपरेशन सिंदूरद्वारे पेहेलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याला भारताच्या तिन्ही सैन्य दलानी जश्यास तसे उत्तर देऊन पाकिस्तानी अतिरेक्यांचे अड्डे उध्वस्त केले व मोठा धडा शिकवला.

भारतीय सैन्य दलाने केलेल्या कारवाईचा समस्त भारतीयांना अभिमान आहे, या ऑपरेशन सिंदूर मध्ये आपल्या जीविताची आहुती देणाऱ्या व मोठी झुंज देणाऱ्या भारतीय सैन्याप्रती अभिमान व्यक्त करण्यासाठी, त्यांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल मानवंदना देण्यासाठी,त्यांचे कौतुक करण्यासाठी 21मे 2025

दाभाडीत चोरी लाखोंचे ऐवज लंपास (Crimenews)

ला सकाळी 10 वाजता काँग्रेस प्रदेश अध्यक्ष मा.आमदार हर्षवर्धन सपकाळ( बंटी दादा) यांच्या आदेशान्वये जिल्हा अध्यक्ष (कार्यवाहक) प्रकाश पाटील यांच्या सूचनेनुसार प्रदेश सरचिटणीस श्याम ऊमाळकर, माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव

घुमरे, पक्ष निरीक्षक वसंत देशमुख तालुका अध्यक्ष राजेश मापारी, गट नेते भुषान मापारी, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मो.तोफिक कुरेशी, इतर सर्व काँग्रेस पद अधिकारी यांच्या नेतृत्वात लोणार शहरातून भव्य तिरंगा रॅली बुधवार दि 21 मे 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता स्थळ:- लोणार बस स्टॅन्ड ला सुरवात ते हुतात्मा स्मारक, पंचायत समिती लोणार पर्यंत काढण्यात येत आहे.

Congressnews:तरी तिरंगा रॅली मध्ये माजी सैनिक, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील ,पक्षातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत राहावे अशी विनंती..

दाभाडीत चोरी लाखोंचे ऐवज लंपास (Crimenews)

0

 

मोताळा तालुक्यातील असलेल्या बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दाभाडी गावामध्ये काल रात्रीच्या सुमारास मलकापूर ते दाभाडी रस्त्यावरती असल्या दोन घरामध्ये चोरट्यांनी चोरी केली असून त्यामध्ये लाखो रुपयाचे मौल्यवान दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे

मोताळा तालुक्यातील दाभाडी येथील विष्णू पांडुरंग टेकाळे हे आपल्या पत्नीसह राहतात मलकापूर ते दाभाडी रस्तावर त्यांचे घर असून काल रात्रीच्या सुमारास ते आपल्या घराच्या अंगणातच झोपले होते.

Ravikant tupkar Car Accdent/शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला मध्यरात्री वाशीजवळ अपघात – मद्यधुंद ट्रक चालकाकडून गंभीर धडक, सुदैवाने तुपकरांसहित सर्वजण सुखरूप

सकाळी उठून पाहता तर त्यांच्या घरातील सर्वसामान अस्ताव्यस्त पडलेले होते व घरातील असलेले सोन्याचे मौल्यवान दागिने चोरले त्यांना निदर्शनास आले तर दुसरीकडे त्याच घरापासून काही अंतरावर असलेले किशोर पंढरी तळोले त्यांच्या घरात सुद्धा या ठिकाणी चोरी झाली.

Crimenews /असून त्यांच्या घरातील असलेले रोख रक्कम अंदाजे 50 ते 60 हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले आहे या घटनेमुळे दाभाडी परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी बोरखेळी पोलीस दाखल झाले आहे