Home Blog

Congressnews /बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस जिल्हाध्यक्षाची भाजपाशी जवळीकता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना मान्य होईल का.??

0

 

नुकताच जिल्हा केंद्रीय सहकारी बँक बुलढाणाच्या संचालक मंडळ निवड़णुकीला सुरुवात झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यासह जळगाव जामोद तालुक्यातील सहकार क्षेत्राच राजकारण तापल आहे. 24 जुलै 2026 या अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसा पर्यंत जळगाव जामोद तालुका सोसायटी मतदारसंघातुन एकूण 5 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.bjpnews

त्यामधे सहाकार नेते राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटिल, भाजपाचे परीक्षित ठाकरे आणि कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटिल, ज्योतीताई ढोकणे, जुबेर पटेल या तिघानी अर्ज दाखल केले. कॉंग्रेस पक्षाचे 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले असले तरी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटिल व ज्योतीताई ढोकणे यांच्या अर्जावर भाजपा कार्यकर्ते असलेल्या बँक प्रतिनिधीच्या अनुमोदक म्हणून सह्या असल्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात तो चर्चेचा विषय ठरत आहे.

यापूर्वी सुद्धा जळगाव जामोद कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकी मध्ये कॉंग्रेस पक्षाने प्रसेनजीत पाटिल यांच्या विरोधात भाजपाला साथ देत निवडणुक लढ़विली तेव्हा सर्वसामान्य कॉंग्रेसी विचारधारेच्या जनतेचा मोठा रोष पक्षावर आल्याचे दिसून आले होते.

कॉंग्रेस, भाजपा कट्टर वैचारिक वाद असलेले पक्षातील नेते स्थानिक पातळीवर असे जुळवुन घेत असतील तर त्यावर राज्य पातळीवरील नेत्याची भूमिका काय असा प्रश्न जनतेला पडलेला आहे.harshvardhansapkal

Prakashpatil/कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष भाजपाच्या मदतीने निवडणुक रिंगनात उतरण्याच्या चर्चा राजकीय क्षेत्रासह सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा रंगू लागल्याने त्यावर जिल्हातीलच असलेले कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तथा कॉंग्रेस पक्षाचे अन्य नेते काय भूमिका घेतात याकड़े सर्वाचे लक्ष लागलेले आहे.

SangrampurNews /अवैध रेती साठ्यावर महसूल विभागाची मोठी कारवाई; जप्त रेती २० घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप

0

 

संग्रामपूर | प्रतिनिधी

संग्रामपूर तालुक्यातील सावळी, पेसोडा, खिरोडा व देऊळगाव घाट परिसरातून अवैधरित्या उपसा करून शासकीय जागेवर साठवून ठेवण्यात आलेली रेती महसूल विभागाने जप्त केली. तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई करत जप्त केलेली रेती शासनाच्या नियमानुसार घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप केली.

तसेच तहसील कार्यालयातील सुरू असलेल्या शासकीय बांधकामासाठी आवश्यक रेती नियमाप्रमाणे रॉयल्टी भरून उपलब्ध करून देण्यात आली.
मागील महिनाभरात संग्रामपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये अचानक धाडी टाकून पूर्णा नदीपात्रातून अवैध उपसा करून ई-क्लास शासकीय जागेवर साठवून ठेवलेली रेती महसूल विभागाने जप्त केली.

या कारवाईत तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार विकास शिंदे, मंडळ अधिकारी तांबारे, ग्राम महसूल अधिकारी भोसले, नायब तहसीलदार राहुल वसावे तसेच महसूल विभागातील इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

जप्त करण्यात आलेली रेती कवठळ, मारोड, चांगेफळ आणि सावळा येथील २० घरकुल लाभार्थ्यांना महा-खनिज प्रणालीद्वारे मोबाईलवर प्राप्त झालेल्या ओटीपी पडताळणीनंतर शासनाच्या नियमांनुसार मोफत देण्यात आली. या लाभार्थ्यांना एकूण १०० ब्रास रेतीचे वितरण करण्यात आले.

याशिवाय तहसील कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर सुरू असलेल्या बहुउद्देशीय हॉलच्या शासकीय बांधकामासाठी ठेकेदार श्री. परळीकर यांना सुमारे १० ब्रास रेती नियमानुसार स्वामित्वधन (रॉयल्टी) भरून देण्यात आली.

Prashant patil /महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन व साठवणुकीवर आळा बसण्यास मदत होणार असून, जप्त रेतीचा उपयोग गरजू घरकुल लाभार्थ्यांना आणि शासकीय कामांसाठी करण्यात आल्याने या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

Court News/जळगाव जामोदला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची मंजुरी

0

 

मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
आमदार संजय कुटे यांनी वकील संघासोबत घेतला आढावा

जळगाव जामोद : न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेत मा. मुंबई उच्च न्यायालयाने जळगाव जामोद येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापनेस मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे लवकरच जळगाव जामोदमध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय कार्यरत होणार असून, परिसरातील नागरिकांसाठी न्यायप्रक्रिया अधिक जलद व सुलभ होणार आहे.drsanjaykute

या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर जळगाव जामोद येथील वकील संघाच्या कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत आमदार डॉ.संजय कुटे यांनी वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांशी व सदस्यांशी सविस्तर संवाद साधत न्यायालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या पुढील प्रशासकीय कार्यवाहीचा आढावा घेतला.court news

न्यायालयाच्या इमारतीची उपलब्धता, आवश्यक पायाभूत सुविधा, कर्मचारी नियुक्ती तसेच न्यायालयाचे कामकाज सुरळीत सुरू होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदार संजय कुटे यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू झाल्यानंतर जळगाव जामोद तसेच परिसरातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयापर्यंत वारंवार जावे लागणार नाही. वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठी बचत होणार असून न्यायदानाची प्रक्रिया अधिक प्रभावी आणि गतिमान होईल. Jalgaonjamod

या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक, वकील आणि न्यायालयीन कामकाजाशी संबंधित घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बैठकीस वकील संघाचे अध्यक्ष ॲड. रुपेश विश्वेकर, सचिव ॲड. अभिमन्यू वाघ, ज्येष्ठ सदस्य ॲड.मनोहर माहेश्वरी, ॲड. करीम खान, ॲड.शशिकांत गुप्ता, ॲड.बाळासाहेब खिरोडकर, ॲड. विजय वानखेडे, ॲड. राहुल इंगळे, ॲड. दत्ता खेर्डेकर, ॲड. मनसुटे, ॲड. धर्म, ॲड.अमर पाचपोर, ॲड. तोगळकर, ॲड. रतन इंगळे, ॲड. दीपक इंगळे, ॲड. गजेंद्र सातव, ॲड. रवी उमरकर यांच्यासह वकील संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

न्यायालय स्थापनेच्या मंजुरीमुळे जळगाव जामोदच्या न्यायव्यवस्थेच्या विकासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला असून, नागरिकांना स्थानिक पातळीवर अधिक प्रभावी न्यायसेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

cockroach janata party news काक्रोच जनता पार्टी तर्फे हिंगणघाट येथे राष्ट्रपतींना निवेदन

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : काक्रोच जनता पार्टी, हिंगणघाटच्या वतीने वैद्यकीय, अभियांत्रिकी, सामाईक प्रवेश व शिक्षक पात्रता परीक्षांतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा कराव्यात तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना हिंगणघाट उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत निवेदन सादर करण्यात आले.cockroach janata party news

निवेदनात पद्मश्री सन्मानित शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे.

 

तसेच, देशातील विद्यार्थी व पालकांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कायम राखण्यासाठी प्रवेश व पात्रता परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष व उत्तरदायी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Wardhanews /शिक्षण व्यवस्था अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने आवश्यक पावले उचलावीत.

Sangitraobhongal/आठ वर्ग, तीनच वर्गखोल्या; काकणवाडा बु येथील शाळेवरील अन्याय दूर करा – संगीतराव भोंगळ

0

 

संग्रामपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील काकणवाडा बु. येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेस तातडीने दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करून विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी जिल्हा परिषद बुलढाणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांच्याकडे भेट घेऊन केली.sangitraobhongal

काकणवाडा बु. येथील ग्रामस्थांनी शाळेच्या विविध समस्यांबाबत संगीतराव भोंगळ यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्याची तात्काळ दखल घेत भोंगळ यांनी ग्रामस्थांसह जिल्हा परिषद गाठून मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर केले.

काकणवाडा बु. येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेत सध्या १२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या आठ वर्गांसाठी केवळ तीनच वर्गखोल्या उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना अत्यंत गैरसोयीच्या परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे. जागेअभावी काही वर्गांना व्हरांड्यात बसून शिक्षण घ्यावे लागते. त्यामुळे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसेच आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे.oanchaysamiti

अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अध्यापनात अडथळे निर्माण होत असून शिक्षणाचा दर्जाही खालावत आहे. शिक्षकांनाही अध्यापन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, काकणवाडा येथील उर्दू भाषिक शाळेची स्थापना संगीतराव भोंगळ हे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती असताना त्यांच्या पुढाकारातून झाली होती. त्यामुळे या शाळेच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्यांची तात्काळ दखल घेत पुन्हा एकदा प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा सुरू केला आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून काकणवाडा बु. येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेस तातडीने दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करून शाळेवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी संगीतराव भोंगळ (राजू पाटील) यांनी केली.

Sangitraobhongal यावेळी गावातील प्रमुख नागरिक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. या निवेदनाची प्रत शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांनाही सादर करण्यात आली.

PWDnews/एकलारा–बावनबीर मार्गावरील सुकलेल्या वृक्षांची चौकशी करा; दोषींवर कारवाईची मागणी

0

 

एकलारा–बावनबीर मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या वृक्षारोपण योजनेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक पिच्छडा वर्ग संघटनेचे विदर्भ अध्यक्ष शेख कदीर भाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, खामगाव येथील अधिकारी एकनाथ तळेल यांच्याकडे सविस्तर तक्रार निवेदन सादर केले.


(वरवट बकाल परिसरातील सुकलेल्या वृक्षांचे छायाचित्र)

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतून या मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र संबंधित विभागाच्या निष्काळजीपणामुळे तसेच योग्य देखभाल व संरक्षणाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष सुकून नष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय झाला असून पर्यावरणीय हानीदेखील झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शेख कदीर भाई यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. तसेच वृक्षारोपणासाठी खर्च झालेल्या निधीचे लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे, सुकलेल्या वृक्षांची तात्काळ पुनर्लागवड करावी आणि दोषींवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. Fda farmernews

 

याशिवाय करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल लेखी स्वरूपात संघटनेला देण्याची मागणीही करण्यात आली आहे. संबंधित विभागाकडून समाधानकारक कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल.

Warvatnews /तसेच माहितीचा अधिकार अधिनियम, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, लोकायुक्त, पर्यावरण विभाग आणि न्यायालयीन स्तरावर दाद मागितली जाईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

Rudhananews/रूधाना/वकाना गावातील नाल्यांची साफसफाई रखडली; नागरिकांमध्ये संताप समाजकार्यकर्त्या मंदाताई कट्यारमल यांनी सोशल मीडियाद्वारे प्रशासनाचे वेधले लक्ष

0

 

संग्रामपूर (प्रतिनिधी) : संग्रामपूर तालुक्यातील रूधाना/वकाना गावामध्ये अनेक महिन्यांपासून नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नसल्याने गावकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि सांडपाणी साचल्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावातील अनेक भागांमध्ये नाल्यांचे पाणी साचून राहत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या तोंडावरही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजकार्यकर्त्या मंदाताई कट्यारमल यांनी गावातील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रसारित केला. सदर व्हिडिओ अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नागरिकांकडून प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे. SangrampurNews

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी जोर धरत आहे.

समाजकार्यकर्त्या मंदाताई कट्यारमल यांनी प्रशासनाने त्वरित दखल घेऊन नाल्यांची साफसफाई करावी तसेच गावात स्वच्छतेच्या आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या प्रकरणानंतर वरिष्ठ अधिकारी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करणार का, याकडे संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. Rudhananews

📸 छायाचित्र: रूधाना/वकाना गावातील अस्वच्छ व गाळाने भरलेला नाला; अनेक महिन्यांपासून साफसफाई न झाल्याने नागरिक त्रस्त.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Ravikanttupkar /सरकार झुकले, पाच दिवसांचा संघर्ष थांबला; रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित!

0

 

गिरीश महाजनांची शिष्टाई; सरकारने मागितला ४ दिवसांचा अवधी, मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक,
सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर पुन्हा संघर्षाचा इशारा

बुलढाणा (प्रतिनिधी) : सरसकट, विना अट-विना शर्त कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर शुक्रवारी, १९ जून रोजी तूर्त स्थगित करण्यात आले. राज्यभर उग्र होत चाललेल्या आंदोलनाची दखल घेत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी थेट आंदोलनस्थळी येऊन तुपकर यांच्याशी चर्चा केली.

सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यासाठी चार दिवसांचा वेळ मागण्यात आला. अखेर उपस्थित शेतकऱ्यांच्या आग्रहाचा आणि मुख्यमंत्री व मंत्री गिरीश महाजन यांच्या विनंतीचा मान राखत रविकांत तुपकर यांनी आईच्या हस्ते ज्युस घेऊन अन्नत्याग आंदोलन स्थगित केले.girishmahajan

मात्र हा संघर्ष संपलेला नसून केवळ स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट करत, “चार-पाच दिवसांत ठोस आणि सकारात्मक मार्ग निघाला नाही तर राज्यभरातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतील आणि आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असा थेट इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, सलग पाच दिवस अन्नत्याग केल्यामुळे प्रचंड प्रकृती खालावलेल्या तुपकर यांना पुढील वैद्यकीय जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाच दिवसांत आंदोलनाने घेतले राज्यव्यापी स्वरूप

१५ जून रोजी बुलढाण्यात सुरू झालेले हे अन्नत्याग आंदोलनाने राज्यव्यापी स्वरूप धारण केले होते. तुपकर यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस बिघाड होत असताना शासनाकडून कोणतीही ठोस भूमिका समोर येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती.गावोगावी रास्तारोको, निदर्शने, टायर जाळून आंदोलन, तहसील कार्यालयांवरील मोर्चे, शासकीय कार्यालयाची कार्यालय जाळपोळ , जिल्हाधिकारी कार्यालयात फटाके फोडणे, एसटी बस पेटवणे, तलाठी कार्यालय जाळणे,व्यापारी बंद आणि विविध प्रकारच्या आक्रमक आंदोलनांनी राज्यातील अनेक भाग दणाणून गेले.Ravikanttupkar

अकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गापासून ते समृद्धी महामार्गापर्यंत शेतकरी रस्त्यावर उतरले. देऊळगाव मही येथे आंदोलनाच्या पाचव्या दिवशी शंभर टक्के बंद पाळण्यात आला चिखली तालुक्यातील मेरा खु येथे रास्तारोको करण्यात आला तर सिंदखेडराजा तालुक्यातील कंडारी भंडारी येथे संतप्त शेतकऱ्यांनी थेट समृद्धी महामार्ग रोखून शासनाविरोधात जोरदार आंदोलन छेडले.

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिस्थितीचे गांभीर्य आणखी वाढले होते. राज्यभरातून उफाळून येणारा हा संताप आणि तुपकर यांच्या ढासळणाऱ्या प्रकृतीमुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता.

“मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आलो”

आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी रविकांत तुपकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. भविष्यात तुम्हाला शेतकऱ्यांसाठी मोठे काम करायचे आहे, त्यामुळे अन्नत्याग आंदोलन सोडा,” अशी विनंती महाजन यांनी केली.

यावेळी तुपकर यांनी अंतिम निर्णय उपस्थित शेतकऱ्यांवर सोपवला. आंदोलनस्थळी जमलेल्या शेतकऱ्यांनी एकमुखाने उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर सरकारला चार दिवसांचा अवधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

*संघर्ष स्थगित; लढा कायम*

आईच्या हस्ते ज्युस स्वीकारून रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित केले असले तरी शेतकऱ्यांच्या मागण्यांवरील लढा कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये होणाऱ्या बैठकीकडे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Girishmahajanपाच दिवसांच्या संघर्षानंतर सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारला असला तरी कर्जमुक्ती आणि पीकविम्याच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष निर्णय होतो की नाही, यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे पुढील चार -पाच दिवस हे राज्यातील शेतकरी आंदोलनाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक मानले जात आहेत.

Tukarammundhe/”कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे यंत्रणा सक्रिय; चांगले अधिकारी प्रत्येक विभागात आवश्यक”

0

 

वर्धा प्रतिनिधी : सचिन वाघे

Tukarammundhe/राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा, पानमसाला आणि भेसळीविरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांमध्ये अशी भावना व्यक्त होत आहे की, अधिकारी सक्षम व प्रामाणिक असेल तर संपूर्ण यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्यरत होते.

वर्धा जिल्ह्यातही यापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या कार्यकाळात अवैध दारू व्यवसायावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. त्या काळात अनेक ठिकाणी अवैध व्यवसायांना आळा बसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांच्या बदलीनंतर पुन्हा काही भागांमध्ये अवैध व्यवसाय वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ कारवाई नव्हे, तर सातत्यपूर्ण आणि प्रभावी नेतृत्व आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे

पोलीस, महसूल, अन्न व औषध प्रशासन यांसारख्या विविध विभागांमध्ये कर्तव्यदक्ष आणि निर्भीड अधिकारी कार्यरत असल्यास शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन सर्वसामान्य नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होऊ शकतो.

Tukarammundhe /दरम्यान, अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी सातत्याने तपासणी मोहीम राबवावी आणि नागरिकांनीही बेकायदेशीर प्रकारांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Jalgaonnews/वकील संघ, जळगाव जामोद – नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड :-.अध्यक्षपदी अॅड. आर. पी. विश्वेकर,

0

 

दि. 11 जून 2026 रोजी वकील संघ, जळगाव जामोद येथे सन 2026-27 या कालावधीसाठी वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

यामध्ये अध्यक्षपदी अॅड. आर. पी. विश्वेकर, उपाध्यक्षपदी अॅड. एस. व्ही. खूपसे तसेच सचिवपदी अॅड. ए. बी. वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सदर निवड सभेच्या अध्यक्षस्थानी वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. माहेश्वरी होते. यावेळी अॅड. खिरोडकर, अॅड. जी. एस. गावंडे तसेच वकील संघाचे सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अॅड. रविभाऊ उंबरकर, अॅड. मुकुंदा टोंगलकर आणि अॅड. विनोद मुंडोकार यांनी केले.

सदर ठरावाचे अनुमोदक म्हणून अॅड. आर. एस. काकडे यांनी तर सूचक म्हणून अॅड. डी. बी. ईगळे यांनी काम पाहिले.

 

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सदस्यांनी अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Jalgaonjamod /वकील संघाच्या प्रगतीसाठी व सदस्यांच्या हितासाठी नव्या कार्यकारिणीकडून उल्लेखनीय कार्य होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.