Home Blog

Farmernews /चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे यांच्या नावाशी जोडलेले दावे; कोट्यवधी कर्जावर प्रश्नचिन्ह

0

 

विदर्भ प्रतिनिधी सचिन वाघे

नागपूर : “सामान्य शेतकऱ्यांसाठी एक नियम आणि सत्ताधाऱ्यांसाठी दुसरा?” असा संतप्त सवाल उपस्थित करत कामठी तालुक्यातील सुरादेवी येथील जमीन प्रकरणाने राज्यातील राजकारण तापवले आहे.

सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे यांच्या नावाशी संबंधित ७/१२ उताऱ्यावर तब्बल ८०.०० हेक्टर (सुमारे २०० एकर) अकृषक जमीन नोंद असल्याचा दावा करण्यात येत आहे.

मात्र, स्थानिक पातळीवरून धक्कादायक दावा पुढे येत आहे — प्रत्यक्षात ही जमीन केवळ २ एकर असल्याचे सांगितले जात आहे! जर हे खरे असेल, तर उरलेले “१९८ एकर” कागदावर कुठून आले? असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत.chandrashekharbawankule

याहून गंभीर बाब म्हणजे, या नोंदीच्या आधारे सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांचे बँक कर्ज मंजूर झाल्याचा आरोपही समोर येत आहे. त्यामुळे बँकिंग प्रणालीवरही संशयाची सुई वळली आहे.

“सामान्य शेतकरी २ एकर जमीन अकृषक करून बँकेकडे गेला, तर त्याला एवढे मोठे कर्ज मिळेल का?” हा प्रश्न आता गावागावात चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, ७/१२ उताऱ्यात इतका मोठा फरक कसा काय झाला?farmernews

Chandrashekharbawankule /ही केवळ तलाठी स्तरावरील चूक आहे का?
की यामागे मोठा गैरव्यवहार दडलेला आहे?
आणि जर चूक असेल, तर जबाबदार कोण?
या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत.

Farmernews /महसूलमंत्री बावनकुळे अडचणीत? जमीन प्रकरणावरून व्हिडिओ व्हायरल; संपादक दरेकरांची पोलखोल

0

 

विदर्भ प्रतिनिधी सचिन वाघे

कामठी : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संबंधित जमीन व्यवहाराबाबत एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.chandrashekharbawankule

संबंधित जमिनीवर मंत्री बावनकुळे, त्यांच्या पत्नी ज्योती, मुलगा संकेत व मुलगी पायल यांच्या नावाचा उल्लेख असल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात आला आहे.

दरम्यान, “ज्यांच्याकडे गाडी-बंगला आहे, त्यांना कर्जमाफी मिळणार नाही,” असे विधान केल्यामुळे आधीच चर्चेत असलेल्या बावनकुळे यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे.

याच पार्श्वभूमीवर शेतकरी प्रश्नावर आवाज उठवणारे संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी “बोल बिंदास बोल” या माध्यमातून या प्रकरणाची पोलखोल केल्याचा दावा केला आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी शेतकरी विषयावर व्हिडिओ केल्याप्रकरणी दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता त्यांनीच मंत्री बावनकुळे यांच्या कथित जमीन प्रकरणाचा मुद्दा उचलून धरला असून, “शेतकरी पुत्र घाबरत नाही, तो लढतो,” असा संदेश त्यांनी दिला आहे.

Devendrafadnsvis /या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही लक्ष वेधण्यात आले असून, संबंधित व्हिडिओ पुरावा म्हणून पुढे आणण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.

Farmernews /सदर प्रकरणाची अधिकृत चौकशी होणार का, तसेच प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

gas cylinder/हिंगणघाटमध्ये गॅस सिलेंडर टंचाईचा प्रश्न तीव्र; प्रशासन म्हणते पुरवठा सुरळीत, नागरिक त्रस्त

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : शहरात गॅस सिलेंडरच्या टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पुरवठा विभागाचे अधिकारी शहरात कोणतीही टंचाई नसल्याचे सांगत असताना, दुसरीकडे ग्राहकांना 18-20 दिवस उलटूनही सिलेंडर मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

माहितीनुसार, शहरी भागातील ग्राहकांनी 25 दिवसांनंतरच नवीन सिलेंडरसाठी बुकिंग करावे, असे नियम सांगितले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात बुकिंग केल्यानंतरही वेळेत सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अनेक ग्राहकांना बुकिंग करून तीन आठवडे उलटूनही सिलेंडर न मिळाल्याने घरगुती कामकाज विस्कळीत झाले आहे.

 

दरम्यान, गॅस एजन्सी चालकांकडून “वरूनच माल येत नाही” अशी कारणे दिली जात आहेत. यामुळे प्रशासन आणि एजन्सी यांच्यातील विसंगती स्पष्ट होत असून नागरिक मात्र या दोघांच्या मध्ये अडकले आहेत.

शहरातील गृहिणींना याचा सर्वाधिक फटका बसत असून पर्यायी इंधनाचा वापर करण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. वाढत्या समस्येमुळे नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे.

gas cylinder/एकीकडे “टंचाई नाही” असा प्रशासनाचा दावा आणि दुसरीकडे नागरिकांचा अनुभव यामुळे नेमकी वस्तुस्थिती काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता या समस्येवर प्रशासन काय उपाययोजना करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Hingnghatnews /ठाकरे विरुद्ध सावरकर नावाचा संघर्ष; हिंगणघाट पालिकेत बहुमताने निर्णय

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट : नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नव्या सभागृहाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळाले. सभागृहाला कोणाचे नाव द्यावे यावरून विविध पक्षांमध्ये मतभेद उफाळून आले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहास हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करत अधिकृत पत्र सादर केले.wardhanews

या निर्णयावर सर्वानुमते शिक्कामोर्तब व्हावे, अशी त्यांची अपेक्षा होती.मात्र, चर्चेदरम्यान भाजपच्या काही नगरसेवकांनी स्वतंत्रवीर स्व. विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे आणला.hingnghatnews

ही बाब पूर्वनियोजित असल्याचे सभागृहातील घडामोडींवरून जाणवले, तर काही सदस्यांना याची पूर्वकल्पना नसल्याचेही स्पष्ट झाले.
यावेळी शिवसेनेच्या नगरसेविका सारिका प्रकाश अनासाने यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या महाराष्ट्र व मराठी समाजासाठीच्या योगदानावर प्रकाश टाकत त्यांच्या नावाचा आग्रह धरला. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.wardhanews

सभागृहात एकमताने निर्णय होण्याची शक्यता असतानाच अचानक सावरकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि मतदान घेण्यात आले. या प्रक्रियेमुळे काही सदस्यांमध्ये नाराजी व्यक्त झाली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते सुधीर कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या शीतल अमोल बोरकर तसेच प्रहार संघटनेचे सूरज कुबडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला समर्थन देत एकमताचा आग्रह धरला. मात्र, त्यांनी सावरकर यांच्या नावाबाबत तटस्थ भूमिका घेतली.breaking

अखेर भाजप सदस्यांनी बहुमताच्या आधारे सावरकर यांच्या नावाला मंजुरी दिली. या मतदानात 34 मते सावरकर यांच्या बाजूने पडली, तर 11 सदस्य तटस्थ राहिले.

Hingnghatnews /या निर्णयानंतर सभागृहातील घडामोडींवरून विविध पक्षांच्या राजकीय भूमिका व विरोधाभास स्पष्ट झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

check bounce case/धनादेश अनादर प्रकरणी एकास २ महिने शिक्षा व ८५ हजार रु.दंड. [ शेवटी फिर्यादी मयताचे वारसास अखेर न्याय मिळाला.]

0

 

संग्रामपूर(सूर्या मराठी न्यूज ब्युरो )ः- तालुक्यातील एका शेतकऱ्यांस कांदा पिकाचे नुकसान भरपाई प्रकरणी धनादेश देवून तो न वटवल्याने अनादर झाल्याने संग्रामपूर दिवाणी फौजदारी न्यायालयाचे न्यायाधिष एस.एल.रामटेके यांनी एका ईसमास २ महिने शिक्षा व ८५ हजार रु.दंड ठोठावल्याचा निकाल दिला आहे.civil court

ह्या प्ररकरणी अॕड.एस.आर गायकी यांनी काम पाहिले आहे.
ह्याबाबत प्राप्त माहिती अशी की,तालुक्यातील मौजे जस्तगाव येथील तेजराव रामचंद्र डोसे यांचे कांदा पिकाचे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई झाल्याने ह्यासाठी वरवट (खंडेराव) येथील मारोती ,नामदेव बाजीराव बोरनारे ह्यांनी ५० हजाराचा धनादेश दिला होता.SangrampurNews

तो अनादरीत झाल्याने शेतकरी तेजरव डोसे ह्यांनी .एस.आर.गायकी यांचे मार्फत निगोशियल इन्कृमेंट अॕक्टचे कलम१३८ नुसार सा.फौ,गु.न.३४१/२०१८नुसार दि,५/ ७ /२०१८ रोजी संग्रामपूर दिवाणी फौजदारी न्यायालयात प्रकरण दाखल केले.

check bounce case/त्यामध्ये फि.चे विधीतज्ञ अॕड. गायकी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावा आढळून आल्याने संग्रामपूर दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधिश एस.एल.रामटेके ह्यांनी आरोपी नामदेव बाजीराव बोरनारे ह्यास गुन्हा सिद्ध झाल्याने २ महिने साधा कारावास व ८५ हजार रु.दंडाची शिक्षा सुनावली आहे.

check bounce case/सदर प्रकरणात मुख्य बाब अशी की मुळ फिर्यादी तेजराव डोसे प्रकरण प्रलंबित मयत झाल्याने कायदेशीर तरतुदीचा तंतोतंत वापर करुन त्यांचे विधीतज्ञांनी (वकिलाने) मुळ फिर्यादीचे वारसास अभिलेखावर घेवून प्रकरण चालविले.

check bounce case/त्यामुळे तेजराव डोसे यांचा मुलगा अनिल डोसे व इतर वारस यांनी न्यायदेवता व अॕड,एस,आर,गायकी ह्यांचे मुळे न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त करुन अश्याच प्रकारे कोणत्याही सत्य प्रकरणात गरजूंना न्याय मिळावा.अशी अपेक्षा करुन समाधान व्यक्त केले.

Yavalnews /चुंचाळे येथे क्रीडा शिक्षक युवराज पाटील सरांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उद्या जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त; 32 वर्षांच्या सेवेला मानाचा मुजरा

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

चुंचाळे येथील श्री समर्थ रघुनाथ बाबा व उच्च माध्यमिक विद्यालय, चुंचाळे येथे क्रीडा शिक्षक माननीय श्री युवराज यशवंत पाटील सर यांच्या सेवापूर्ती निमित्त भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन सोमवार, दिनांक 30 मार्च 2026 रोजी करण्यात आले आहे. तब्बल 32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.jalgaon

पाटील सरांनी आपल्या सेवाकाळात क्रीडा शिक्षक म्हणून उल्लेखनीय कार्य करत हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडवले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये केवळ क्रीडा कौशल्य विकसित केले नाही, तर शिस्त, वेळेचे भान, प्रामाणिकपणा, संघभावना आणि परिश्रमाची जाणीव यांसारख्या मूल्यांचीही रुजवण केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.breakingnews

विशेष म्हणजे, त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांच्या कार्याची पावती ठरला असून, विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्राबद्दलची प्रेरणा जागवण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

या गौरव सोहळ्यासाठी शाळेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात पाटील सरांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवर आपल्या मनोगतातून पाटील सरांच्या सेवाभावी वृत्तीचा आणि विद्यार्थ्यांवरील प्रेमाचा गौरव करणार आहेत. यावेळी पाटील सरांच्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थीही आपल्या भावना व्यक्त करणार आहेत.

या निमित्ताने पाटील सरांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात येणार असून, त्यांनी घडवलेल्या पिढ्यांचा सन्मान केला जाणार आहे. हा सोहळा केवळ एक सत्कार समारंभ नसून, एका समर्पित शिक्षकाच्या कार्याला दिलेला मानाचा मुजरा ठरणार आहे.

Yavalnews /एकूणच, हा सेवापूर्ती गौरव सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, पाटील सरांच्या कार्याची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला जाणार आहे

Policenews /देऊळगाव राजाच्या तरूणाचा पोलिस भरती दरम्यान मृत्यू

0

 

बुलढाणा: पोलीस भरती दरम्यान मैदानी चाचणीत धावताना एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शिवाजीनगर पोलीस मुख्यालायतील मैदानावर शनिवारी सकाळी घडली. सोळाशे मीटर धावण्याची चाचणी देत असताना अचानक त्याला ‘फिट’ आली. मैदानात बेशुद्ध होऊन कोसळल्यानंतर त्याला तातडीने रुग्णलयात दाखल करण्यात आले.

उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

पुरुषोत्तम बारकुल (वय २३, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे शहर दलातील भरती प्रक्रिया गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील मैदानावर मैदानी चाचणी घेण्यात येत आहे.breakingnews

शनिवारी सकाळी मैदानी चाचणी सुरू झाली. पुरुषोत्तम बारकुल हा मैदानी चाचणीत सहभागी झाला. भरती प्रक्रियेतील १६०० मीटर धावण्याची चाचणी ही कठीण मानली जाते. पुरुषोत्तम याने मैदानाला दोन फेऱ्या मारल्या, तिसऱ्या फेरीत अचानक त्याला अपस्माराचा झटका (फिट) आली. तो धावताना मैदानावरच कोसळला. त्यच्याबरोबर असलेल्या उमेदावारांच्या लक्षात हा प्रकार आला.

Buldhana /भरती प्रक्रियेतीली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. मैदानावर उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने त्याची प्राथमिक तपासणी केली. त्याच्या हृदयाचे ठोके मंद झाल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने ससून रुग्णलयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावल्याचे ससूनमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.सूर्या मराठी न्यूज ब्युरो बुलढाणा

prataprao jadhav/एल.टी.टी. बल्लारशहा रेल्वेला शेगांव येथे थांबा मंजुर… खामगांव-जालना रेल्वे मार्गाचीही गोड बातमी लवकरच मिळणार-केंद्रिय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली आज भेट…

0

 

बुलढाणा ( संपादक) अनिलसिंग चव्हाण

संतनगरी शेगांव रेल्वे मार्गाने नियमीत धावणाऱ्या परंतु थांबा नसणाऱ्या एल.टी.टी. बल्लारशहा एक्स्प्रेसला शेगांव रेल्वे स्थानकावर थांबा मंजुरी केल्याप्रकरणी केंद्रिय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची आज केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आभार व्यक्त केले. तर खामगांव-जालना रेल्वे मार्गा संदर्भात गोड बातमी लवकरच देऊ असे सुचक वक्तव्य केंद्रिय रेल्वे मंत्र्यांनी चर्चेदरम्यान केले.prataprao jadhav

त्यामुळे खामगांव-जालना रेल्वे मार्गाबद्दल केंद्र सरकारची सकारात्मकता दिसुन आली. या रेल्वे मार्गासंदर्भात अंतिम मंजुरातीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

विदर्भाची पंढरी म्हणुन ओळख असलेल्या बुलढाणा जिल्हयातील संत नगरी शेगांव येथे दररोज देशभरातुन लाखो भाविक येत असतात. शेगांव रेल्वे मार्गावरील नियमीत धावणाऱ्या एल.टी.टी. बल्लारशहा एक्स्प्रेस सह इतर 3 सुपर फास्ट एक्स्प्रेसला शेगांव रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी केंद्रिय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी गेल्या महिन्यामध्ये केंद्रिय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन केली होती.shegaonnews

त्यातील एल.टी.टी. बल्लारशहा एक्स्प्रेसला रेल्वे मंत्रालयाच्या वतीने थांबा मंजुर करण्यात आला आहे. आज 27 मार्च ला केंद्रिय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेऊन बल्लारशहा एक्स्प्रेसला थांबा दिल्याबद्दल केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आभार व्यक्त केले याचवेळी खामगांव-जालना रेल्वे मार्गासंदर्भात रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चा करत असतांनाच त्यांनी रेल्वे मंत्रालय या रेल्वे मार्गासंदर्भात वेगाने काम करत असुन लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी देऊ असे सुचक विधान त्यांनी केले.

खामगांव-जालना रेल्वे मार्गासंदर्भात रेल्वे मंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक भुमिका दर्शविल्याने खामगांव-जालना रेल्वे मार्गासंदर्भात केंद्र सरकारच्या वतीने लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रिय रेल्वे मंत्र्यांनी खामगांव-जालना रेल्वे मार्गाबद्दल विस्तृत चर्चाही यावेळी मंत्रीमहोदयांसोबत केली.

इंग्रज काळापासुन हा रेल्वे महामार्ग प्रलंबित असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामगांव येथे झालेल्या जाहीर सभेत हारेल्वे मार्ग करण्याचे आश्वासन बुलढाणा जिल्हयातील जनतेला दिले असल्याचे सांगुन या रेल्वे मार्गामुळे मध्य रेल्वे व दक्षिण रेल्वे जोडल्या जाणार आहे.

prataprao jadhav/हा रेल्वे मार्ग व्हावा हि जिल्हयातील नागरीकांची जनभावना आहे. असेही त्यांनी रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चेत सांगीतले. केंद्रिय रेल्वे मंत्र्यांनी दर्शविलेल्या सकारात्म भुमिकेमुळे या रेल्वे मार्गाला अंतिम मंजुरात मिळण्याची शक्यता आहे.

Devendrafadnsvis /एसटी बसच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लोकार्पण

0

 

[ शहरी विभागासाठी सुविधा ग्रामीण भाग दुर्लक्षित.]
संग्रामपूर (सूर्या मराठी न्यूज ब्युरो )ः- महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेला आधुनिकतेची सुवर्ण किनार लाभली, तो क्षण आज विधानभवन प्रांगणात साकारला. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या लयबद्ध तालावर आणि उत्साहाच्या उधाणलेल्या लाटांमध्ये ‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचे भव्य लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. जणू इतिहास आणि वर्तमानाचा संगम घडवत या सोहळ्याने सार्वजनिक परिवहनाच्या नव्या युगाची पहाट उजळवली.

या दिमाखदार सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांसह विधीमंडळ सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने या ऐतिहासिक क्षणाची शोभा अधिकच खुलली.

St‘राजमाता जिजाऊ’ हे नाव उच्चारताच मातृत्व, संस्कार आणि स्वराज्याची प्रेरणा मनात जागृत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेच्या माध्यमातून केवळ प्रवास नव्हे, तर इतिहासाची प्रेरणादायी परंपरा प्रत्येक प्रवाशाच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.busnews

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा सुमारे तीन हजार बसचा ताफा टप्प्याटप्प्याने राज्यभर धावणार असून, सुरक्षितता, आराम आणि विश्वास यांचे त्रिवेणी संगम प्रवाशांना अनुभवता येणार आहे. ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘हिरकणी’ आणि ‘यशवंती’ या गौरवशाली सेवांच्या परंपरेत ‘राजमाता जिजाऊ’ ही आणखी एक तेजस्वी कडी ठरणार आहे. पूजन, फीत कापून झालेल्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि परिवहन मंत्री सरनाईक यांनी या बसमधून प्रवास करत नव्या युगाची सुरुवात प्रत्यक्ष अनुभवली. बसच्या अग्रभागी घोड्यावर आरूढ झालेल्या राजमाता जिजाऊंचा देखावा जणू इतिहासाला सजीव करत होता—त्या दृश्याने संपूर्ण सोहळ्याला एक अद्भुत, प्रेरणादायी आणि आयाम प्राप्त झाला.

[ ग्रामीण भागातील अश्या एस टी बस आगारामध्ये बस केव्हा येणार ? फक्त शहरी विभागासाठीच सर्व सुविधा असतात.मात्र ग्रामीण खेडेविभागात आमचे बुलडाडाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद), शेगाव ,खामगाव,बसआगाराला पाहिजे त्या नवीन बस पहावयास मिळत नाही.आशी खंत ग्रामीण भागातील प्रवाश्यांनी केली आहे.

Devendrafadnsvis /नेहमी भांगार व रस्त्यावर बंद पडणाऱ्या बासेस मिळतात.ही शोकांतिका आहे.
रामेश्वर गायकी सह अनेक सामाजिक कार्यकर्ते. संग्रामपूर तालुका]

Nivdnuknews /संग्रामपूर तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर

0

 

बुलढाणा : राज्य निवडणूक आयोगाकडून घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील 59 ग्रामपंचायतींच्या रिक्त थेट सरपंच व सदस्यांच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.dham panchayat

यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील चार रिक्त पद, चिखली तालुक्यातील सहा पदे तर मेहकर तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या रिक्त थेट सरपंच व सदस्यांच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू असून निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन तहसिलदार तथा ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.nivdnuknews

संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच/सदस्य रिक्त पदांचे गावे : मारोडा ग्रामपंचायत प्रभाग क्र.3(अनुसूचित जमाती), धामनगांव ग्रामपंचायत प्रभाग क्र.2(ना.मा.प्र.प्रवर्ग),वकाणा ग्रामपंचायत प्रभाग क्र.2( ना.मा.प्र.प्रवर्ग महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील) असे चार रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागासाठी निवडणूक होणार आह.SangrampurNews

मेहकर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच/सदस्य रिक्त पदांचे गावे :* ग्रामपंचायत पारडा, ग्रामपंचायत पेनटाकळी, ग्रामपंचायत वाग्देव व ग्रामपंचायत दुर्गबोरी असे चार रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागासाठी निवडणूक होणार आहे.

Grampanchayat चिखली तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच/सदस्य रिक्त पदांचे गावे :थेट सरपंच पदासाठी कव्हळा ग्रामपंचायत(ना.मा.प्र), कोनड ग्रामपंचायत(ना.मा.प्र./स्त्री), किन्ही सवडत ग्रामपंचायत(अनुसूचित जमाती) तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी किन्हीनाईक ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 1 व 3 (अ.ज. स्त्री), बोरगाव वसु ग्रामपंचायत (अ.जा.) असे सहा रिक्त ग्रामपंचायत थेट सरपंच व सदस्य पदाच्या जागासाठी निवडणूक होणार आहे.

*निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे :* निवडणूकीची अधिसूचना सोमवार दि. 30 मार्च 2026 रोजी संबधित तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमानुसार निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र दि. 7 ते 13 एप्रिल 2026 पर्यंत सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेदरम्यान स्वीकारले जाणार आहे. नामनिर्देशन पत्र छाननी बुधवार दि. 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजूपासून छाननी संपेपर्यंत. दि. 17 एप्रिल 2026 रोजी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. या निवडणूकीचे मतदान मंगळवार दि. 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी बुधवार दि. 29 एप्रिल 2026 रोजी करण्यात येणार आहे.