दि. 11 जून 2026 रोजी वकील संघ, जळगाव जामोद येथे सन 2026-27 या कालावधीसाठी वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
यामध्ये अध्यक्षपदी अॅड. आर. पी. विश्वेकर, उपाध्यक्षपदी अॅड. एस. व्ही. खूपसे तसेच सचिवपदी अॅड. ए. बी. वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सदर निवड सभेच्या अध्यक्षस्थानी वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. माहेश्वरी होते. यावेळी अॅड. खिरोडकर, अॅड. जी. एस. गावंडे तसेच वकील संघाचे सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अॅड. रविभाऊ उंबरकर, अॅड. मुकुंदा टोंगलकर आणि अॅड. विनोद मुंडोकार यांनी केले.
सदर ठरावाचे अनुमोदक म्हणून अॅड. आर. एस. काकडे यांनी तर सूचक म्हणून अॅड. डी. बी. ईगळे यांनी काम पाहिले.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सदस्यांनी अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
Jalgaonjamod /वकील संघाच्या प्रगतीसाठी व सदस्यांच्या हितासाठी नव्या कार्यकारिणीकडून उल्लेखनीय कार्य होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
संग्रामपूर, दि. ६ जून – जळगाव जामोद मतदारसंघातील वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी सर्व प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार डॉ. संजय कुटे यांनी प्रशासनाला दिले आहेत.drsanjaykute
१ जून रोजी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मतदारसंघातील अनेक गावांमध्ये केळी, संत्रा तसेच इतर फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेक बागा जमीनदोस्त झाल्या आहेत.farmernews
घटनेनंतर तत्काळ संबंधित विभागांना पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार करण्यात आलेल्या पंचनाम्यांचा व उपाययोजनांचा आढावा आमदार डॉ. संजय कुटे यांनी ६ जून रोजी घेतला. Jalgaonjamod
यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्क साधून नुकसानीची माहिती घेतल्याचे सांगितले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांअंतर्गत आर्थिक मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
तसेच पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबतही अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.drsanjaykute
येत्या आठवडाभरात संपूर्ण नुकसान अहवाल तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. विमाधारक शेतकऱ्यांनी देखील आपल्या नुकसानीची माहिती आणि तक्रारी संबंधित यंत्रणेकडे तातडीने नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी आमदार डॉ. संजय कुटे म्हणाले की, “मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल.”
farmernews /दरम्यान, प्रशासनाकडून पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
री ऍडमिशन घेण्याकरिता ऑनलाईन ऑफलाइन पोर्टलची सुविधाच नाही
बारावी नापास झालेल्या विद्यार्थ्याचि री ऍडमिशन साठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पोर्टल चालू करण्याची मागणी
तळेगाव प्रतिनिधी..महाराष्ट्र मध्ये 2026 मध्ये बारावीचा निकाल लागला काही विद्यार्थी पास झाले तर काही विद्यार्थी नापास झाले पण नापास झालेलें जे विद्यार्थी आहे हे आपल्या कॉलेजमध्ये री ऍडमिशन करिता गेले असतात त्यांना कॉलेज मध्ये माहिती दिली की सध्या ऑनलाईन किंवा ऑफलाइन रिया ऍडमिशन करिता सुविधा उपलब्ध नाही.#OfflineAdmission
महाराष्ट्रातील किंवा वर्धा जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी री ऍडमिशन पासून वंचित आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिली की बारावीत नापास झालेले विद्यार्थी म्हणत आहे की आम्ही नापास झालो.#OnlineAdmission
त्याची आम्हाला खंत आहे पण आता चूक करायची नाही म्हणून आम्हाला री ऍडमिशन साठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पोर्टल चालू करून द्यावे जेणेकरून आम्ही ऍडमिशन झाल्यावर चांगल्या पद्धतीने अभ्यास करून पास होऊ व आम्ही शिक्षण विभागाला व पुणे शिक्षण आयुक्त यांना विनंती करतो.#StudentIssues
#StudentVoice/की आमच्याकडे लक्ष केंद्रित करून ऑनलाईन किंवा ऑफलाइन बारावी नापासची री ऍडमिशन पोर्टल आम्हाला उपलब्ध करून द्यावे जेणेकरून आमच्या शिक्षणाला गती मिळेल अशी मागणी बारावी नापास झालेले विद्यार्थी करीत आहे
जळगाव जामोद _तालुक्यातील राजुरा धरण परिसरात दिनांक 26 एप्रिल रोजी एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता
मृतदेहापासून काही फुटावर महिलेचा शिरही होतं या प्रकरणी तात्काळ माहिती मिळाल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक लोढा, डीवायएसपी महाजन, स्थानिक गुन्हे शाखा पथक,ठाणेदार नितीन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली व फॉरेन्सिक विभागाची टीम बोलावून या सर्व प्रकरणाचा तपास एलसीबी पथकाने केला व मध्य प्रदेशातील खडकी गावातील शिवानी बापूराव कळमेकर ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार मध्य प्रदेश पोलिसात दाखल झाली होती,policenews
एलसीबी पथकाने तिच्या वडील व भाऊ यांची चौकशी केली असता तिच्या वडिलांनी व भावाने तिची हत्या करून मृतदेह महाराष्ट्रातील जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजुरा धरणातआणून टाकला होता अशी कबुली दिली होती याप्रकरणी आपल्या मुलीच्या हत्येचा आरोप ठेवत बुलढाणा पोलिसांनी शिवानी कळमेकर चे वडील बापूराव कळमेकर व भाऊ यांना अटक करून कारागृह मध्ये ठेवले आहे ,मात्र शिवानी कळमेकर हिने बुऱ्हाणपूर पोलीस स्टेशन गाठत थेट मी जिवंत असून माझ्या हत्येच्या गुन्ह्यात माझ्या वडिलांना भावाला पोलिसांनी जेलमध्ये ठेवलं असल्याचा कबुली जबाब दिला आहे.breakingnews
त्यांना निर्दोष सोडून देण्यात यावे अशी मागणी केली आहे, शिवानी कळमेकर ही जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे, व जळगाव जामोद पोलिसांकडून सुद्धा तिची चौकशी चालू आहे,मात्र ज्या महिलेचा मृतदेह सापडला होता ती नेमकी कोण हा प्रश्न उपस्थित राहत आहे.
हिंगणघाट : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे जिल्हा संपर्क प्रमुख अशोक शिंदे यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे व तालुकाप्रमुख मनीष देवडे यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय हिंगणघाट यांना विविध शेतकरी समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.hingnghatnews
या निवेदनाद्वारे हिंगणघाट तालुक्यासह संपूर्ण देशातील शेतकरी बांधवांच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. सध्या शेती हंगामाची सुरुवात होत असून मान्सूनपूर्व मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत.
ट्रॅक्टर, पंप, जनरेटर तसेच विविध शेती उपकरणांसाठी डिझेलची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत आहे.
मात्र जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप चालकांकडून कॅन व ड्रममध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दिनांक २१ मे २०२६ रोजी इंडियन ऑइल कंपनीकडून वितरकांना इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे पत्र देण्यात आले.wardhanews
असून शासनाकडूनही इंधन तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तरीदेखील शेतकऱ्यांना कॅन किंवा ड्रममध्ये डिझेल नाकारले जात असल्याने संताप व्यक्त करण्यात आला.farmernews
“शेतीतील बहुतांश यंत्रसामग्री ही थेट शेतामध्ये असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मशागतीची साधने पेट्रोल पंपावर आणायची काय?” असा सवाल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला केला.petrol
शेतकरी हा देशाचा कणा असून त्याच्या शेतीकामात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित पेट्रोल पंप चालकांना तात्काळ स्पष्ट निर्देश देऊन शेतकऱ्यांना कॅन व ड्रममध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सदैव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Farmernews निवेदन देताना प्रकाश आनसने, शंकर मोहम्मारे, शितल चौधरी, गजानन काटोले, हिरामण आवारी, सचिन पोटदुखे, अनंता गलांडे, राहुल मोहितकर, किशोर इंगोले, दीपक गायकवाड आदी शिवसैनिक उपस्थित होते.
हिंगणघाट : शहरातील कलोडे चौक परिसरात सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या बांधकामादरम्यान आज शनिवारी (२4 मे) सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला.
कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकाचा पाय तुटून वेगळा झाल्याची धक्कादायक घटना घडली.
या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून उड्डाण पुलाच्या कामादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांवर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
जखमींमध्ये विजय उत्तम सादा (वय २६), व्यवसाय – हमाली, रा. बिहार तसेच लल्लन सिहाहारण यादव (वय ४५), व्यवसाय – ठेकेदार, रा. बिहार यांचा समावेश आहे. दोघेही साई कृपा दालमिल परिसरात काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे कलोडे चौक परिसरातील रस्ता अत्यंत अरुंद झाला असून वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत आहे. सकाळच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी कंटेनरखाली ओढली गेल्याने दोघांचेही पाय गंभीररीत्या चिरडले गेले. अपघात इतका भीषण होता की, एका जखमीचा पाय पूर्णपणे तुटून वेगळा झाल्याची माहिती समोर आली आहे.breakingnews
अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमी अवस्थेतील दोघांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.hingnghatnews
दरम्यान, उड्डाण पुलाच्या बांधकामादरम्यान योग्य वाहतूक नियोजन, इशारा फलक, सुरक्षा बॅरिकेड्स व वाहतूक नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बांधकाम सुरू असताना जड वाहनांची वाहतूक नियंत्रणाशिवाय सुरू असल्याने मोठा धोका निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.wardhanews
शहरात मोठ्या प्रमाणावर बाहेर राज्यातील हमाल व मजूर कामासाठी आलेले आहेत. मात्र अशा गंभीर दुर्घटनांमध्ये त्यांच्या वैद्यकीय मदतीपासून अपघात भरपाईपर्यंतच्या हक्कांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. जखमी कामगारांना शासन नियमांनुसार आर्थिक मदत, उपचार खर्च व योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Accident news /या घटनेनंतर प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, कामगार विभाग आणि संबंधित कंत्राटदार यांची जबाबदारी निश्चित करून उड्डाण पुलाच्या कामादरम्यान कडक सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मा.मुख्यमंत्री ,जिल्हाधिकारी यांना तहसीलदारा मार्फत दिलेले निवेदन
– – – – – – – –
उमरगा : उमरगा तालुक्यात दि .२१ रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी मोठ्या पावसामुळे काळ लिंबाळा, कोराळ, कलदेव लिंबाळा, दाळिंब व नळवाडी आणि तालुक्यातील इतर परिसरात घरांचे ,विद्युत पोल तारा ,फळझाडे , जनावरे यांचे मोठे नुकसान झाले आहे.
.शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष बाबा जाफरी ,रमेश बिराजदार , भीमा स्वामी, शमशोद्दीन जमादार ,सुभाष गायकवाड , नेताजी कवठे यांनी नुकसान झालेल्या गावांची पाहणी करून मुख्यमंत्री तथा जिल्हाधिकारी यांना तहसीलदार यांच्यामार्फत दि.२२ रोजी निवेदन दिले आहे .
देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की ,उमरगा तालुक्यात दिनांक २१ रोजी काळ लिंबाळा, कोराळ, कलदेव लिंबाळा, डाळिंब व नळवाडी आणि तालुक्यातील इतर परिसरात अचानक जोराचे वादळी वारे व मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील मोठेमोठी झाडे उन्मळून पडल्याने अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच बहुतांश घरांवरील पत्रे उडून गेली आहेत.
वादळामुळे ठिकठिकाणी विद्युत पोल कोसळल्याने संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावांना जोडणाऱ्या मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर झाडे पडल्यामुळे वाहतूक व दळणवळणाचे रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत.
यासोबतच, शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून प्रामुख्याने आंब्याच्या बागा, पपई व इतर पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. शेतातील जनावरांच्या चाऱ्याच्या कडब्याच्या बनीमी, शेतकऱ्यांचे शेड यांचेही मोठे नुकसान झाले असून, यामध्ये काही जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. या अचानक आलेल्या संकटामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाचे अतोनात आर्थिक नुकसान झाले.
Farmernews /असून ते पूर्णपणे अडचणीत सापडले आहेत. तरी प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची त्वरित दखल घेऊन, झालेल्या सर्व नुकसानीचे शासकीय स्तरावर त्वरित व वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि बाधित ग्रामस्थ व शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक नुकसान भरपाई लवकरात लवकर मंजूर करावे असे निवेदनात म्हटले आहे . यावेळी अशोक जाधव ,मनोज देशपांडे व्यंकट बिराजदार ,आनंद नागणे ,फैयाज पठाण ,कलेश्वर जाधव ,रमेश राठोड आदी सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .
हिंगणघाट : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर हॉटेल तनवीर-सगुना कंपनी परिसरात शुक्रवारी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात घडला. भरधाव टिपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती-पत्नी आणि चिमुकली मुलगी अशा एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.breakingnews
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन मधुकरराव वानखेडे (वय ४५), पल्लवी वानखेडे (वय ३८) आणि आरोही वानखेडे (वय ६) हे दुचाकी क्रमांक एमएच ३२ एएम १६९४ ने कपडे खरेदीसाठी हिंगणघाटकडे येत होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या टिपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिस, ११२ पथक, महामार्ग सुरक्षा पथक आणि मदतकार्य करणारे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले.wardhanews
मृत वानखेडे कुटुंब हे समुद्रपूर तालुक्यातील वायगाव गोंड-कुर्ला येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, मृत झालेली आरोही ही जुळी बहीण असून तिच्या पश्चात आणखी एक बहीण आहे.hingnghatnews
Accident news /अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले असून संबंधित टिपर चालकाचा शोध सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.
हिंगणघाटच्या विद्यार्थ्यांसाठी स्थानिक केंद्राची मागणी; पालकांसाठी सुविधांचा अभाव
प्रतिनिधी सचिन वाघे
वर्धा :आष्टी येथील न्यू मॉन्टफोर्ट औषध निर्माणशास्त्र संस्था येथे बुधवारी आयोजित CET (सामाईक प्रवेश परीक्षा) दरम्यान मोठा गोंधळ उडाला. बाहेरगावाहून आलेले विद्यार्थी व पालक सकाळी ७ वाजल्यापासून परीक्षाकेंद्रावर पोहोचले होते. मात्र, केंद्रावर विद्यार्थ्यांना व पालकांना प्रवेश नाकारण्यात आल्याने संतप्त वातावरण निर्माण झाले. Wardhanews
उपस्थित कर्मचाऱ्यांनी “CET विभागाकडून पैसे मिळाले नसल्यामुळे प्रवेश देता येणार नाही,” अशी माहिती दिल्याचा आरोप विद्यार्थी व पालकांनी केला. त्यामुळे काही वेळातच परीक्षाकेंद्राबाहेर मोठी गर्दी झाली. वर्षभर CET परीक्षेची तयारी केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसला असून काही विद्यार्थी रडू लागल्याचेही पाहायला मिळाले. पालकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून 112 क्रमांकावर कॉल करण्यात आला. त्यानंतर काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित विभागाशी संपर्क साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी खासदार अमर काळे यांचे पीए जितेंद्र शेट्टे देखील घटनास्थळी उपस्थित होते. Cet/
काही वेळाच्या चर्चेनंतर प्रश्न मार्गी लागला व विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रात प्रवेश देण्यात आला. मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती व मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाले.
Hingnghatnews /दरम्यान, हिंगणघाट तालुक्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हिंगणघाट येथे स्वतंत्र CET परीक्षा केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या पालकांसाठी कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यानेही संताप व्यक्त करण्यात आला.
संतप्त पालकांनी संबंधित परीक्षा केंद्राची चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
यावल पंचायत समितीमध्ये दीपक कदम यांची सहाय्यक गट विकास अधिकारी पदावर नियुक्ती
Yawal : यावल पंचायत समितीमध्ये दीपक कदम यांची सहाय्यक गट विकास अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याने तालुक्यातील प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे पंचायत समितीच्या कामकाजाला अधिक वेग मिळून ग्रामीण भागातील विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दीपक कदम यांनी यापूर्वी विविध प्रशासकीय विभागांमध्ये जबाबदारी सांभाळताना आपल्या कार्यक्षम व लोकाभिमुख कामकाजाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडविणे, विकासकामांमध्ये पारदर्शकता राखणे तसेच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करणे, ही त्यांची कार्यशैली असल्याचे बोलले जात आहे.
यावल तालुका हा ग्रामीण व आदिवासी भागांचा समावेश असलेला महत्त्वाचा तालुका मानला जातो. पंचायत समितीमार्फत शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, ग्रामीण रस्ते, महिला व बालकल्याण तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जाते. अशा परिस्थितीत सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून दीपक कदम यांच्या अनुभवाचा व प्रशासनिक कौशल्याचा फायदा तालुक्यातील विकासकामांना होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
विशेषतः ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि प्रशासन अधिक गतिमान करण्यावर त्यांच्या माध्यमातून भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पंचायत समितीच्या विविध विभागांमध्ये समन्वय निर्माण करून विकासकामांना गती देण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे.
दरम्यान, त्यांच्या नियुक्तीनंतर पंचायत समिती कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Yavalnews /दीपक कदम यांच्या नियुक्तीमुळे यावल तालुक्यातील ग्रामीण विकासाच्या कामांना नवी दिशा मिळेल तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासन अधिक सक्रिय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.