विदर्भ प्रतिनिधी सचिन वाघे
नागपूर : “सामान्य शेतकऱ्यांसाठी एक नियम आणि सत्ताधाऱ्यांसाठी दुसरा?” असा संतप्त सवाल उपस्थित करत कामठी तालुक्यातील सुरादेवी येथील जमीन प्रकरणाने राज्यातील राजकारण तापवले आहे.
सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे यांच्या नावाशी संबंधित ७/१२ उताऱ्यावर तब्बल ८०.०० हेक्टर (सुमारे २०० एकर) अकृषक जमीन नोंद असल्याचा दावा करण्यात येत आहे.
मात्र, स्थानिक पातळीवरून धक्कादायक दावा पुढे येत आहे — प्रत्यक्षात ही जमीन केवळ २ एकर असल्याचे सांगितले जात आहे! जर हे खरे असेल, तर उरलेले “१९८ एकर” कागदावर कुठून आले? असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत.chandrashekharbawankule
याहून गंभीर बाब म्हणजे, या नोंदीच्या आधारे सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांचे बँक कर्ज मंजूर झाल्याचा आरोपही समोर येत आहे. त्यामुळे बँकिंग प्रणालीवरही संशयाची सुई वळली आहे.

“सामान्य शेतकरी २ एकर जमीन अकृषक करून बँकेकडे गेला, तर त्याला एवढे मोठे कर्ज मिळेल का?” हा प्रश्न आता गावागावात चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, ७/१२ उताऱ्यात इतका मोठा फरक कसा काय झाला?farmernews
Chandrashekharbawankule /ही केवळ तलाठी स्तरावरील चूक आहे का?
की यामागे मोठा गैरव्यवहार दडलेला आहे?
आणि जर चूक असेल, तर जबाबदार कोण?
या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत.















