तर या “कोणाबद्दल तक्रार असेल, तर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली पाहिजे. मग असे अचानक पणे हे सगळं पोलीस स्टेशनच्या आवारात घडल्याची मला प्राथमिक माहिती मिळालीय”
पण असं अजित पवार यांनी सांगितलं. “देवेंद्र फडणवीस या राज्ययाचे उपमुख्यमत्री आहेत, तर मी त्यांचाशी बोलणार आहे.
Ganpat Gaikwad Firing: पण एवढी टोकाची मजल का मारली?. टीव्ही चॅनलशी फोनवरुन काही संभाषण जे केलं, ते कायद्याला धरुन अजिबात नाही. तर हे माझं स्पष्ट मत आहे” असं या ठिकाणी अजित पवार स्पष्ट म्हणाले.
शेगांव -krushiutpannabajarsamiti: येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांचे संयुक्त विद्यमाने नाफेड ची शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सोयाबीन या शेतीमालाचे खरेदीचा शुभारंभ उपबाजार माटरगाव बु. येथे बाजार समितीचे सभापती गोपाळराव मिरगे, उपसभापती श्रीकांत तायडे यांचे हस्ते करण्यात आला.
बाजार समिती मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सबएजंट म्हणून सदर खरेदी करीत असून सोयाबीन या शेतमालाला रुपये 4600/- हमीभाव शेतकऱ्यांना देणार आहे. शेतकऱ्यांकरिता शेगाव व माटरगाव या दोन्ही ठिकाणी नोंदणी करिता व्यवस्था केली असून शेतकऱ्यांनी सन 2023-24 या वर्षाचा अद्यावत पीक पेरासह सातबारा, बँक पासबुक लिंक असलेले आधार कार्ड ची स्पष्ट झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स किंवा
कॅन्सल चेक, व नोंदणी अर्ज भरून वरील कागदपत्रे दिनांक 6 फेब्रुवारी 2024 पर्यंतच घेऊन येऊन बाजार समितीचे मुख्य बाजार शेगाव किंवा उपबाजार माटरगाव येथे शेतकऱ्यांनी सादर करावित व आपला नोंदणी क्रमांक प्राप्त करून घ्यावा असे आवाहन यावेळी बाजार समितीचे सभापती गोपाळराव मिरगे यांनी शेतकऱ्यांना केले.
यावेळी खरेदी केंद्रावर शेतमाल घेऊन आलेल्या बेलुरा येथील शेतकरी प्रभाकर रामचंद्र सुलतान तसेच माटरगाव येथील शेतकरी सिकंदर हकीमखा पटेल यांना बाजार समितीचे सभापती, उपसभापती यांनी शेला,टोपी, श्रीफळ व हार घालून सत्कार केला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी माटरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक अनंतराव आळशी, सुरेशभाऊ वनारे, राजेश बाजारे, बाजार समितीचे संचालक दादाराव निळे पाटील, परमेश्वर हिंगणे, श्रीधर पुंडकर, माजी संचालक अनंत मिरगे, संचालक तेजराव दळी, रमेश पाटील, संजय गव्हांदे इत्यादी मान्यवरांसह भीमराव वाकोडे, अभिजीत मिरगे, किशोर मिरगे, विठ्ठल सोनटक्के, बाळूभाऊ निखाडे, बाळकृष्ण देशमुख,
krushiutpannabajarsamiti: नंदू अमलकर, गजानन बाजारे, पिंटू टिकार, बबलू नरवाडे, गजानन कानडे, दिनेश खंडारे, शिवाभाऊ वावटीकार, खरेदी विक्री अध्यक्ष रघुनाथ पाटील भांबेरे, खरेदी विक्री व्यवस्थापक मनोहर ताठे, मापारी रियाज उल्लाखा ताऊल्लाखान, बाजार समितीचे सचिव विलास पुंडकर, निरीक्षक नागोराव डाबेराव, लिपिक दीपक कडाळे, रितेश मेटांगे, संगणक चालक नितीन तायडे, प्रशांत घोडेराव, जानू वाकोडे यांचे सह माटरगाव परिसरातील बहुसंख्य शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
prahar news :बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील अमर दूध डेअरी चे मालक याना छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे सुशोभीकरण करायचे आहे म्हणून 11 लाखांची खंडणी मागण्यात आली होती ..
त्यामुळे मालकाने देण्यास नकार दिला असता प्रहार संघटना चे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते आणि सहकाऱ्यांनी डेअरी मध्ये जाऊन आणि बोडवड येथे डेअरी मालक यांचे घरी जाऊन धिंगाणा घातला, शिवाय दुधाचे टँकर अडवून दूध रस्त्यावर सोडून देण्याची धमकी दिलीय ..
यामुळे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांच्या जाचाला कंटाळून डेअरी मालकाने धाड परिसरातील दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला असता, आपले नुकसान होणार असल्याने याविरोधात शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे खंडणी खोरांवर कारवाईची मागणी केलीय ..
जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा तत्काळ दखल घेत कारवाईचे आदेश दिले ..
prahar news: याप्रकरणी प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख वैभव राजे मोहितेसह सात जनावरं खंडणीसह विविध कलमनव्ये गुन्हे दाखल करण्यात आलेय ..
OBC: राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा २६ जानेवारी २०२४ च्या राजपत्राचा मसुदा हा मूळ ओबीसीत असणाऱ्या ओबीसी , भटक्या ,व विशेष मागास प्रवर्गातील समाज समूहाच्या अधिकारांवर घाला घालणारा आहे.
समिती ही घटनात्मक नसून ती घटनाबाह्य आहे. ती समिती बरखास्त करण्यात या मागणीसाठी ओबीसी बांधवांनी य दि १ फेब्रुवारी २४ रोजी तहसीलदार मुर्तिजापूर यांना समता परिषदेच्या वतीने निवेदन दिले व रोष व्यक्त केला,तर स्थानिक आमदार हरीश पिंपळे यांना संयुक्त निवेदन देण्यात आले.
तर ‘त्यांनी वापरलेली भाषा बरोबर नाही. ते आता शिवसेनेत आहेत म्हणजे पूर्वीही शिवसेनेत असणार.
तर आता ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सीनियर फ्रोफेसर होतो.
तस मला मंत्रिमंडळातून बाहेर काढायचं, घ्यायचं, ठेवायचं, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे,
तर तो मला मान्यच आहे’, असं प्रत्युत्तर भुजबळांनी दिलं.
तर आता या मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाविरोधात आपल्याच सरकारविरोधात मैदानात उतरलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यावर संजय गायकवाड यांनी अर्वाच्च भाषेत टीका केली.
तर आता सातत्यानं मनोज जरांगे आणि मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करण्याची मागणी करतानाही गायकवाडांनी शिवराळ भाषेचा वापर केल्यानं पाहायला मिळालं. ‘
तर आता या भुजबळ मंत्रिमंडळामध्ये राहण्याच्या लायकीचा राहिले नाही, भुजबळांच्या कंबरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा’, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली होती.
तर बुलढाणा आमदार संजय गायकवाड या वादग्रस्त विधानामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय..
Sanjaygaikwad :तर आता या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार संजय गायकवाडांच्या टीकेचा निषेध नोंदवत, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
जळगाव जामोद.चिखली येथे शेतकर्यांना न्याय देण्यासाठी गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे; तसेच शेतकऱ्यांची लुटमार करीत असलेल्या बेकायदेशीर खाजगी अडत व्यापार्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत – मनसेने दिले जिल्हा पोलिस अधीक्षक, बुलडाणा यांना जळगाव जामोद ठाणेदार मार्फत निवेदन
जळगाव जामोद: बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील एम.आय.डी.सी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणत असतात. शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतमालावर त्या ठिकाणी असलेले खाजगी अडत व्यापारी हे १% बटाव म्हणून शेतकर्यांची लुट करीत होते. शेतकऱ्यांनी त्यांना विरोध केला असता गेट बंद करून मारण्याच्या धमक्या हि अडत व्यापारी मंडळी देत होती. त्यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी हि बाब मनसे पदाधिकाऱ्यांचे निदर्शनास आणून दिली.
व ते शासकीय अधिकाऱ्यांसमक्ष (एम.आय. डी.सी.) परिसरातील खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गेले त्या ठिकाणी तिरुपती जिनींगचे गोविंद अशोक अग्रवाल यांनी १% बटवा हिच आमची कमाई आहे.तुम्हाला काय करायचे ते करून घ्या असे म्हणत त्या ठिकाणी कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना घेऊन सहा. निबंधक घोंगे व शेतकऱ्यांना सर्वोच्च भाषेत बोलत पैसे परत करण्यास नकार दिला.
त्या ठिकाणी आमचे पदाधिकार्यांनी त्यांना विरोध दर्शविला असता, त्या ठिकाणी कामावर असलेले परप्रांतीय बिहारी, यु.पी. चे कामगार यांनी त्यांचे अंगावर येत घाणेरड्या शिवीगाळ करीत मनसेचे राजेश परिहार व नारायण बाप्पु देशमुख या दोघांचे गळ्यातील सोन्याची चैन व प्रदिप भवर यांचे वरच्या खिशातले अंदाजे ६,५०० रुपये रक्कम त्या ठिकाणी या मंडळींनी जमावाद्वारे लोटपाट करीत काढून घेतली.
त्यामुळे तिथे वाद निर्माण झाले परंतु त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी मध्यस्थी होत वाद मिटवला. त्यानंतर गोविंद अग्रवाल यांनी आमचे मनसे पदाधिकारी हे खंडणी मागायला आले असल्याचे खोटे आरोप करीत FIR नं. ००७२/२०२४ नुसार आमचे पदाधिकार्यांवर खोटे गुन्हे दाखल केले.
मात्र आमचे उपस्थित मनसे पदाधिकारी हे शासकीय कर्मचाऱ्यांचे समवेत त्या ठिकाणी फक्त पाहणीसाठी गेले होते.जर बटाव विरुद्ध विरोध दर्शविला तर मनसे पदाधिकाऱ्यांवर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केले मग त्यांचे सोबत शासकीय कर्मचारी सुध्दा उपस्थित होते. त्यांचेवर सुद्धा खंडणीचे गुन्हे दाखल व्हायला हवे होते.
परंतु वास्तविक पाहता हा सर्व प्रकार केवळ राजकीय सुडापोटी केला जात असुन, महाराजा अग्रसेन खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक बाबुलाल अग्रवाल हे भाजपा व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष असुन सत्तेत असल्या कारणाने त्यांनी आमचे पदाधिकार्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहे.
तरी राजकीय सुडापोटी दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात येऊन शेतकऱ्यांची लुटमार करीत असलेल्या खाजगी अडत व्यापार्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येऊन शेतकर्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र भर तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा ठाणेदार पोलिस स्टेशन नांदुरा मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक बुलडाणा यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
mns news : सदर निवेदन देतेवेळी मनसे माथाडी कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष राजू राऊत , शहराध्यक्ष नागेश भटकर, प्रमोद यऊल, ऋषिकेश पाटील, यासह मनसेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते.
गार्डी येथे शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सर्वसामान्यांसाठी काम करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अनिल बाबर हे जनसामान्यांशी, मातीशी जोडलेले नेते – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सांगली, दि.३१ – “आमदार अनिल बाबर आपले विश्वासू सहकारी होते. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. ते कमी बोलून जास्त काम करणारे, साधी राहणी व उच्च विचारसरणी असणारे आमदार होते. सर्वसामान्य माणूस सर्वसामान्यांसाठी किती काम करु शकतो हे दाखवून देणारे ते आदर्श लोकप्रतिनिधी होते”, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिवंगत आमदार अनिल बाबर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
MLA Anil Babar Death: खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे अल्पशा आजाराने सांगली येथील खासगी रूग्णालयात आज पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज खानापूर तालुक्यातील गार्डी या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विक्रम सावंत, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका आयुक्त सुनील पवार, माजी आमदार सर्वश्री शिवाजीराव नाईक, पृथ्वीराज देशमुख, मोहनराव कदम, दिनकर पाटील आदिंसह सर्वपक्षीय नेते, मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अनिल बाबर यांच्या निधनाची बातमी सर्वांसाठी अत्यंत दुःखद असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अनिल बाबर यांनी त्यांच्या मतदार संघासाठी खूप काम केले. कृषी, पाणी, रस्ते, वीज इत्यादी कामांबाबत त्यांचा पाठपुरावा नेहमी असायचा. अनेक संस्था त्यांनी उभ्या केल्या. अनिल बाबर यांना पहिल्या निवडणुकीमध्ये लोकांनी लोकवर्गणीतून निवडून दिले.
असे देशातील एकमेव उदाहरण आहे. जनतेने प्रेम, जिव्हाळा व आत्मियता त्यांना दिली. लोकांच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करुन प्रत्येकाला त्याच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी मदत केली. टेंभू योजनेसाठी त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. इतर राज्यातही त्यांचा मोठा जनसंपर्क होता, असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमदार अनिल बाबर यांनी सांगली जिल्ह्यातील विटा परिसरामध्ये तळागाळातून काम सुरु केले होते. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि चारवेळा आमदार म्हणून त्यांनी या भागाची सेवा केली. या भागात पाणी पोहोचले पाहिजे, सिंचन झाले पाहिजे या करिताचे त्यांचे प्रयत्न कोणीच विसरु शकत नाही.
जनसामान्यांशी आणि मातीशी जोडलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. जनसामान्यांचा एक नेता हरवला अशा प्रकारची भावना त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झाली आहे. आम्ही सगळे त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत, असे ते म्हणाले.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी अनिल बाबर आणि आपला चांगला स्नेहबंध होता. त्यांच्या जाण्याने ज्येष्ठ मार्गदर्शक सहकारी निघून गेला आहे, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.
मंत्री दीपक केसरकर यांच्यासह मान्यवरांनी आमदार अनिल बाबर यांच्या विषयीच्या आठवणी जागृत करुन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि अन्य मंत्रीमहोदयांसह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी तृप्ती धोडमिसे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवास पोलीस दलाच्या जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. दिवंगत आमदार अनिल बाबर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता. या शोकाकुल गर्दीच्या साक्षीनेच पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, आमदार अनिल बाबर यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने सांगली येथील खासगी रूग्णालयात निधन झाले. त्यांचे पार्थिव दुपारी विटा येथील निवासस्थानी व त्यानंतर मूळ गाव गार्डी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येऊन दोन्ही ठिकाणी अंत्ययात्रा काढण्यात आली. गार्डी येथे सायंकाळी चिरंजीव अमोल आणि सुहास यांनी त्यांच्या पार्थिवास भडाग्नी दिला व अंत्यसंस्कार करण्यात आले.
MLA Anil Babar Death: त्यांच्या पश्चात चिरंजीव अमोल व सुहास बाबर, स्नुषा, नातवंडे यांच्यासह कार्यकर्त्यांचा मोठा परिवार आहे. आमदार अनिल बाबर यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
शेगाव: Nationalist Congress: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शेगाव शहर व तालुक्याच्या वतीने शेगावचे तहसीलदार समाधान सोनवणे यांना आज एक फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय शेगाव येथे शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार युवक महिला अंगणवाडी सेविका आदींच्या संबंधातील विविध समस्या सोडविण्याबाबत निवेदन सोपविण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा पदाधिकारी जेष्ठ नेते प्रसंजीत पाटील व पांडुरंग दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे निवेदन सोपविण्यात आले तहसीलदार शेगाव यांना देण्यात आलेल्या निवेदना
१) अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात यावी. दुष्काळ संबंधित दोन्ही शासन निर्णयातील तफावत दूर करून सर्वच महसूल मंडळांना NDRF निकषांच्या चारपट मदत देण्यात यावी२) राज्यात रिक्त असलेली सर्व विभागांच्या सर्व संवर्गाची अडीच लाख रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत.३) छुप्या पद्धतीने सुरु असलेली कंत्राटी भरती तत्काळ बंद करावी.
४) अवाजवी परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे व याआधी घेण्यात आलेले अवाजवी शुल्क परत करावे.५) ६० हजार रिक्त पदांची शिक्षक भरती, रखडलेल्या सर्व प्राध्यापक पदांची भरती यांसारख्या रखडलेल्या भरती प्रक्रिया तत्काळ सुरु कराव्यात.
तसेच प्रलंबित असलेल्या सर्व नियुक्त्या तत्काळ देण्यात याव्यात. यासह अनेक मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.
Nationalist Congress: निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रसेनजीत पाटील ज्येष्ठ नेते पांडुरंग दादा पाटील शहराध्यक्ष दिनेश साळुंखे तालुका अध्यक्ष संजय पहुरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सलमान खान सुधाकर ढोले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत
तर या यामध्ये आसुर्ले पोर्लेची विद्यार्थिनी शुभश्री लहू पाटील (वय १४) ही पन्हाळ्याहून या बसमध्ये बसली होती.
तर या बस प्रवाशांनी व विद्यार्थ्यांनी भरली होती. एसटी दालमिया शुगर कारखान्यासमोरच्या स्टॉपवर थांबत असताना अचानक या विद्यार्थीनीच्या पायाखालील एसटीचा अल्युमिनिअमचा पत्रा सरकला आणि मुलगी खाली पडून एसटीच्या इंजिनमध्ये अडकली.
तर अचानक या घटनेत विद्यार्थिनी शुभश्री पाटील जखमी झाली आहे. ती पन्हाळ्यातील उत्तुरे गावातील राहते.
तर या शुभश्रीच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. तर या अपघात झाल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी तिला तात्काळी पन्हाळा रुग्णालयात दाखल केले आहे.
ही अचानक तिच्यावर पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मग तर या घटनेची तक्रार पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळेच वन्यजीव पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलातून बाहेर येत आहे. मागील तीन वर्षात दोषी सिद्ध झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही. वन मजूर व कर्मचारी अनेक वर्षापेक्षाही जास्त कालावधी एकाच ठिकाणी. रिटायर्ड अधिकारी, कर्मचारी आजही कार्यरत आहेत.
शासनाच्या करोडोच्या निधीचा अपव्यव्हार झाल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. वन जमिनीवर दैनंदीन अतिक्रमण वाढत आहे. वन्य प्राण्यांची शिकार, हत्येच्या गंभीर घटना दैनंदिन समोर येत आहेत.
यासह प्रमुख मागण्यांच्या पृर्ततेचे निवेदन देत दोषींवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.अन्यथा उपवनसंरक्षक कार्यालयाला ताला ठोकण्याचा इशारा आझाद हिंद संघटनेच्या वतीने तक्रार निवेदनातून देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत वनसचिव मंत्रालय,मूंबई यांच्यासह वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वनबल संरक्षक नागपूर, वनपरिक्षेत्र अधिकारी अमरावती, पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्यासह संबंधितांना देण्यात आले आहे.उपवनसंरक्षक श्रीमती सरोज गवस व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून पुराव्यानिशी निवेदन देण्यात आले.
forest news: यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे,असलम शाह,शेख सईद,लियाकत खान, संजय एंडोले,सूरेखा निकाळजे,वर्षा ताथरकर, पंचफुलाबाई गवई, आशा गायकवाड,मोहम्मद रसूल,गुलाब शाह, राजेंद्र ससाने, मेहमूद शाह,रशीद शाह, कुर्बान शाह, यासह आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.