चोपडा येथील मागासवर्गीय अल्पसंख्यांकांच्या वस्त्या अतिक्रमणाच्या नावाखाली उध्वस्त करण्याचा डाव राज्य व केंद्र सरकारने आखला असून, जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील गौतम नगर भागात 70 वर्षांपूर्वीची जुनी वसाहत दोन दिवसात खाली करा.
अन्यथा बुलडोझर चालवून जमीन दोस्त करू अशी धमकी वजा इशारा प्रशासनाने रहिवाशांना दिला असता.
मेहकर तालुक्यातील उकळी-सुकळी या गावात झालेल्या जाहीरसभेत बोलतांना आ. रायमुलकर यांचा स्वतःवरील ताबा सुटल्याचे दिसून आले, आ. रायमलकर यांनी आपल्या भाषणातून रविकांत तुपकर यांच्यावर शिव्यांची लाखोल वाहीली आणि एवढेच काय तर रविकांत तुपकर सह त्यांच्या पत्नीची ही लाज काढली…
Ravikanttupkar:- तर लोकांचा वाढता पाठिंबा पाहता आमदार आणि खासदार यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, ते बावचाळले आहेत, परंतु खालच्या दर्जाची टीका करण्याचे संस्कार त्यांच्यावर आहेत, आमच्यावर नाहीत असे प्रत्युत्तर रविकांत तुपकर यांनी दिलय…
Cricket: शेगाव .येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मंडळाकडून आयोजित प्लॅस्टीक बॉल क्रिकेट स्पर्धेत आज 28 जानेवारी रोजी दु. १ वा. शेगाव तालुका पत्रकार संघ (कर्णधार नानाराव पाटील) व रोटरी क्लब शेगाव (कर्णधार सचिन गाडोदिया) यांच्यामध्ये विशेष सेलिब्रिटी सामना रंगला होता.
शेगाव तालुका पत्रकार संघाच्या टीमने रोटरी क्लबला 30 धावांवर रोखण्यात यश आले.६ षटकात रोटरी क्लब टिमने 30 धावा रचल्या.
मात्र शेगाव तालुका पत्रकार संघाने 4 ओव्हर मध्येच 31 धावांचे लक्ष पूर्ण करून रोटरी क्लबवर दणदणीत विजय मिळवला.
या संघामध्ये नानाराव पाटील (कर्णधार) मंगेश ढोले (उपकर्णधार) ज्येष्ठ पत्रकार विजय कुलकर्णी, नारायण दाभाडे, नितीन घरडे, ज्ञानेश्वर ताकोते, संजय त्रिवेदी, प्रशांत खत्री, देविदास पुंडगे, प्रणव दिनेश महाजन, यज्ञेश नानाराव पाटील, अमोल हिरळकर, सोमेश ठाकूर या खेळाडूंचा समावेश होता.
या अतिशय रोमहर्षक सामन्यांमध्ये शेगाव तालुका पत्रकार संघाच्या टीमने दणदणीत विजय मिळवताच सर्व पत्रकारांनी आनंदोत्सव साजरा केला. या विशेष सामन्यांसाठी तीन हजार रुपयांचे बक्षीस सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मोरखडे यांचेकडून जाहीर करण्यात आले होते,
manojjarange: मनोज पाटील यांची औकात नाही, ते त्याची लायकी नाही… असं ते औकात असेल तर महाराष्ट्राचे सामाजिक न्यायाचे धोरण समजून घ्या.
तर आता त्यासाठी जरांगे यांनी त्यांच्या लोकांना घेऊन कुठल्याही मीडियाच्या चॅनेल समोर प्रतिवाद करायला यावे, अशी आव्हान लक्ष्मण हाके यांनी काय दिले जरांगे यांना आवाहन.
मराठा आंदोलनामुळे एका रात्रीत काढलेल्या अध्यादेशावर आता लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केले प्रचंड टीका केली आहे.
नेमके काय म्हणाले लक्ष्मण हाके पाहू या सविस्तर
मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर महाराष्ट्रातील ओबीसी आणि व्हिजीएनटी समाज प्रचंड नाराज झाला आहे.
ते आता तर तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मावळा निश्चित देईल. आता महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी हा मेंढपाळाचा पोरगा एल्गार पुकारणार असल्याचे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.
Manojpatil : तर आता राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी आघाडी उघडली असताना लक्ष्मण हाके समोर आले आहे.
तर या यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, लागणार नाही. मी हे वाक्य लोकांकडून ऐकत होते.
पण आता मात्र धक्का लागलाच. कुणबी प्रमाणपत्र हे ओबीसीत येतं. त्यामुळे धक्का लागला नाही, असं म्हणणं अयोग्य आहे’.
तर आता ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला यामुळे नक्कीच धक्का लागलेला आहे.
Pankaja Munde:: तर जे सत्तेत विराजमान आहेत, ते जर म्हणत असतील ओबीसींना धक्का लागला नाही, तर त्यांनी ओबीसींना समजून सांगावं, पण ते कसा धक्का लागला नाही, असंही पंकजा मुंडे या वेळी म्हणाल्या.
बुलढाणा: buldhananews : मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील जेमतेम सात वर्षांच्या जिजाऊंच्या लेकीने कळसुबाई च्या शिखराला गवसणी घातली! २६ जानेवारीच्या शुभमुहूर्तावर तिने हा पराक्रम केला.
सिद्धी विठ्ठल सोनुने असे या वीर बालिकेचे नाव आहे. गिर्यारोहणचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नसताना महाराष्ट्र् मधील सर्वात उंच शिखराला गवसणी घातली.
वडिल विठ्ठल सोनुने यांच्यासह २६ जानेवारीला सकाळी ८ वाजता तिने शिखर चढण्यास सुरुवात केली. अवघ्या दीड तासात तिने आपले उद्धिष्ट गाठले.
Buldhananews : नांदुरा, अशरफी एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित अमन इंग्लिश स्कूल वडाळी येथे २६ जानेवारी २०२४ शुक्रवार रोजी संस्था अध्यक्ष हाजी मुज़म्मिल अली खान यांच्या हस्ते ध्वज वंदन करण्यात आला.
या नंतर शाळेत झालेले क्रिडा उत्सवात सहभागी झालेले सर्व विद्यार्थ्यांना सवर्ण पदके व प्रमाण पत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी हाजी मुज़म्मिल अली खान व प्रमुख पाहुणे म्हणून महेमुद सर, अफज़ल मेंबर, अ. रहेमान कुरेशी, गफुर शेख, चांद ठेकेदार,
Buldhananews: सलिम ठेकेदार,मुबिन खान,मुसा ठेकेदार, हुसेन खान, हुसेन खाँ, जा़किर खान, रिज़वान, वसिम ठेकेदार व अन्य पालक गण उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जमिल खान, अजी़म सर, शमशाद परविन, सकलैन शाह, मज़हर खान शाहिन कमर व आदींनी परिश्रम घेतले.
( maratha aarakshan news )मनोज जारांगे पाटील यांनी राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढण्यात आलं.
तर आता या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे.
तर आता त्यामुळे मराठा समाजाला यश मोठं यश मिळालं आहे.
तर आज सकाळी ७ किंवा ८ च्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल होणार असून मनोज जरांगे त्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तर आता या तसेच वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक मोठी विजयी सभा देखील मनोज जरांगे पाटलांची होणार आहे.
तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. तर आता आमच्या मागण्या मान्य करण्यात आली आहे,
या ठिकाणी असं मनोज जरांगे यांनी सांगितले. तर मध्यरात्री पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली.
तर आता तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याची माहिती देखील मनोज जरांगे यांनी यावेळी दिली. व आता यावेळी मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित होते.
मनोज पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनाबाबत महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी मनोज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर आज तोडगा निघाला आहे.
तर आता या सरकारने तोडगा काढल्याने आंदोलन सुरू ठेवण्याची गरज नाही, असे मनोज जरांगे यांनी जाहीर केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांचे उपोषण ज्यूस पिऊन संपवतील, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
तर आता या राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करून आज पहाटे सर्व अध्यादेश काढले असून आपल्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे.
आज सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थित आपली विजयी सभा पार पडणार आहे.
maratha aarakshan news: आज तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असं आवाहन देखील सकल मराठा समाजाकडून करण्यात आले आहे.
मागील वर्षी आलेल्या महापुराच्या संकटकाळी पत्रकाराने सहकार्य केल्याबद्दल सत्कार..
अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक ) 8975551991
journalist: संग्रामपूर तालुक्यातील मौजे उकडगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार शेख कदीर यांचा सत्कार करण्यात आला.
उकडगाव येथील शाळेच्या प्रांगणात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री धनंजय उर्फ राजूभाऊ दही यांनी शेख कदीर यांना शाल व श्रीफळ देऊन गावाचे वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महादेव अजणे यांनी मनोगत व्यक्त केले व त्यांनी सांगितले की पत्रकार शेख कदीर हे उकडगाव च्या विकास कामासाठी सदैव प्रयत्न करत असतात मागील वर्षी या गावात महापूर आला होता.
त्यावेळेस प्रत्यक्ष गावात येऊन त्यांनी गावकऱ्यांना सहकार्य केले त्यामुळे संपूर्ण गावाचे वतीने गावाचे त्यांचा सत्कार करण्यात आला.
journalist:- याप्रसंगी गावातील मुन्ना गायकवाड सोपान पाटील गणेशराव गोमासे ग्रामपंचायत सदस्य सौ प्रज्ञाताई दामोदर देवानंद अजणे व बापूराव दामोदर सौरभ कडाळे दीपक दामोदर बाळू पिंपळकर विशाल बांदरकर बबलू कडाळे अभिषेक भिसे अनिकेत भिसे बहुसंख्या ग्रामस्थ या सत्कार समारंभात उपस्थित होते