शेगाव:crimenews: शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागात राहणाऱ्या दिराणीला तिच्या जीठाणीने शुल्लक कारणावरून बेॅटीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.
याबाबत शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आहे याबाबत माहिती अशी की संगीता नामक 27 वर्षीय महिलेने शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
की नात्याने जेठाणी असलेल्या महिलेने शुल्लक कारणावरून बॅटने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी आरोपी जेठानी विरुद्ध अपराध नंबर 55 ऑब्लिक 2024 कलम 324 223, 504 506 भावी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
crimenews: याबाबत अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय साहेब बक्कल नंबर 12 75 पोलीस कॉन्स्टेबल निलेश तायडे करीत आहेत
mseb bill pay: महावितरणच्या बुलढाणा येथील भरारी पथकाच्या निर्देशानुसार, उपकार्यकारी अभियंता नांदुरा यांचेकडून विज ग्राहकास देण्यात आलेले गैरकायदेशीर विज बिल रुपये एक लक्ष सात हजार सातशे मा ग्राहक तक्रार निवारण मंच (सी जी आर एफ ) अकोला यांनी रद्द ठरवून ग्राहकास न्याय दिला आहे.
वस्तुस्थिती अशी कि, नांदुरा येथे श्रीमती ज्योती सुभाष सुपे नांदुरा यांचे येथे तहसील नांदुरा समोर दूध डेअरी चे दुकान आहे. सदर दुकानास महावितरण नांदुरा कार्यालयकडून ग्राहक क्रमांक 293224603794 नुसार दि.04/04/2018 रोजी विज जोडणी देण्यात आली होती.
सदर विज जोडणीबाबत संबंधित कार्यालयाने व बिलिंग एजन्सीने कोणतेही मिटर वाचन न घेता दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एव्हॅरेज म्हणून 198 युनिट प्रतिमाह याप्रमाणे विज बिल आकाराणी सुरु ठेवली होती. याबाबत सदर विज जोडणीचा उपभोग घेणारे उपभोक्ता ग्राहक म्हणून दीपक अरुण सुपे यांनी अनेकदा संबंधित कार्यालयाकडे याबाबत प्रत्यक्ष भेटीद्वारे विनंती करून विज बिल दुरुस्तीची मागणी केली होती परंतु त्याकडे संबंधित कार्यालयाकडून कोणतीही योग्य ती कार्यवाही झाली नव्हती.
त्यानंतर मात्र महावितरण बुलढाणा मंडळ कार्यालय येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता भरारी पथक यांनी सदर विज जोडणीची दि 15/9/2023 रोजी तपासणी केली होती आणि मिटर वाचन व देखभाल ही महावितरणचीच कायदेशीर जबाबदारी असून त्याला सदर ग्राहकांसच दोषी असल्याचे दर्शवून सदर ग्राहक हिचेकडून मागील छत्तीस महिन्याकरिता दंडाच्या रुपये 107700/- ची वसुली करण्याचे उपकार्यकारी अभियंता नांदुरा यांना निर्देश दिले होते.
आणि यानुसार उपकार्यकारी अभियंता यांनी पत्र क्र. 2045 दि. 31 ऑक्टोबर 2023 नुसार, त्यांच्या विभागाच्या बिलिंग एजेंसीचे कामकाज न तपासता ग्राहकच्या विज बिलात सदर रक्कम वसुलीसाठी समायोजित केली होती आणि सात दिवसात सदर रक्कम भरणा करण्याची ताकीद दिली होती. याबाबत दीपक सुपे यांनी उपकार्यकारी अभियंता नांदुरा यांना दि. 9 नोव्हेंबर 2023 रोजी लेखी पत्र सादर करून ते गैरकायदेशीर विज बिल रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे संबंधितानी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते.
वास्तविक पाहता महाराष्ट्र विज नियामक आयोग मुंबई यांचे विनियम यानुसार विज मिटरची देखभाल दुरुस्ती तसेच मिटर वाचन करून योग्य बिल देणे ही महावितरणचीच जबाबदारी आहे. तसेच विज अधिनियम 2003 च्या कलम 56(2)नुसार सलग दोन वर्षे मागणीच नसलेली रक्कम महावितरणला वसुल करताच येत नाही यासंदर्भात मा मुंबई उच्चं न्यायालय व मा सर्वोच न्यायालय यांचे न्यायनिर्णय सुद्धा पारित झालेले आहेत.
तसेच मीटर सुस्थितीत असतांना त्याचे चुकीचे स्टेटस दाखवून विज बिल निर्गमित केल्यास त्याबिलाची रक्कम संबंधित एजेंसीकडूनच वसुल करावी आणि ग्राहकावर त्याचा बोजा टाकू नये असे स्पष्ट निर्देश महावितरण च्या सामान्य वाणिज्य परिपत्रकानुसार महावितरणच्या स्थानीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.तरीही महावितरणने सदर ग्राहकांवर अन्याय करून रु 107700/- एवढ्या अवाढव्य रकमेची मागणी केल्यामुळे श्रीमती ज्योती सुपे यांनी मा ग्राहक तक्रार निवारण मंच, अकोला परिमंडळ (सी जी आर एफ) अकोला येथे दि.20/11/2023 रोजी तक्रार क्र 113/2023 दाखल केली होती. मा. मंचाने याबाबत अंतरीम आदेश पारित करून ग्राहकाचा विज खंडित करू नये असे दि 23/11/2023 रोजी आदेश दिले होते.
त्यानंतर मा मंचाने दोन्ही बाजूचे लेखी व मौखिक म्हणणे ऐकून घेऊन असा निर्णय पारित केला कि, ग्राहकावर लादलेले रु 107700/- विज बिल तात्काळ रद्द करावे, तसेच ग्राहकास कोणताही विलंब आकार वा व्याज न आकारता केवळ मागील सहा महिन्याचे प्रतिमाह 471 युनिट नुसार विज बिल द्यावे आणि संबंधित बिलिंग एजेंसीवर मागील 36 महिन्यात योग्य रिडींग न घेता एव्हॅरेज बिल दिल्याबाबत कारवाई करावी.
आणि केलेल्या कारवाईचा अहवाल माननीत मंचास एक महिन्याचे आत कळवावा. सदर प्रकरणी माननीय मंचासमोर, प्रमोद खंडागळे बुलढाणा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र विज ग्राहक संघटना यांनी विज ग्राहक श्रीमती सुपे यांची बाजू मांडली. मा मंचाच्या या निर्णयामुळे महावितरणच्या बिलिंग एजेंसी व संबंधित अधिकारी यांच्या गैरकायदेशीर विज बिल देणे व वसुल करण्याचा प्रयत्न करणे याला चांगiलाच दणका बसला आहे.
mseb bill pay: तसेच आतातरी धडा घेऊन चुकीचे रिडींग दर्शविणाऱ्या बिलिंग एजेंसीवर महावितरण काय कारवाई करणार कि अर्थपूर्ण संबंधाने सर्व सेटल होणार याकडे परिसरातील विज ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
गड- किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्यावर अंतिम मोहोरही उमटेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ३० : Cmomaharashtra: महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या २०२४-२५ जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठविला आहे.
याबद्दल आनंद व्यक्त करतानाच या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम गड किल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले. गेली अनेक शतके ताठ मानेने उभे असलेल्या या गड किल्ल्यांवर ऐतिहासिक वारशाची मोहोर उमटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादी (World Heritage List) मध्ये नामांकनासाठी पाठविण्यात आला आहे.
याविषयी सांगताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, नामांकनासाठी पाठविलेल्या प्रस्तावामध्ये महाराष्ट्रातील शिववारशांचा समावेश असून या किल्ल्यांना आता जागतिक ओळख मिळू शकणार आहे.
युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्राला नामांकन ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
Cmomaharashtra : या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
००००
madhuri dixit: वयाच्या पन्नाशी ही माधुरी दीक्षितची क्रेझ आणि ग्लॅमर जराही कमी झालेले नाही.
पण आता आजही तिचे चाहते तिची एखादी झलक पाहण्यासाठी तेवढेच झुरत असतात.
तर आता तिची पन्नाशी उलटून गेली तरी देखील तिच्या हसण्यातलं, व तिच्या दिसण्यातलं माधुर्य जराही कमी झालेलं नाही.
पण आता हेच बघा ना माधुरी दीक्षितने तिचे काही सुंदर फोटो आपले इन्स्टाग्रामवर शेअर केले असून ते देखील फोटो सध्या सोशल मीडिया वर जबरदस्त व्हायरल झाले आहेत.
तर आता या फोटोंमध्ये माधुरीने जांभळा आणि गुलाबी असे अनेक जणींचं ऑल टाईम फेव्हरेट असणाऱ्या कॉम्बिनेशनची साडी नेसली असून ती साडी माधुरीवर खूपच शोभून दिसते आहे.
पण तिच्या या साडीची किंमत तब्बल पाऊण लाखांच्या घरात जाणारी आहे.
कशी आहे माधुरी दिक्षितची साडी?
पण आता ती माधुरी दीक्षितने नेसलेली जांभळी- गुलाबी साडी ही बांधणी प्रकारातली आहे.
पण या साडीवर सरसकट सगळीकडे बांधणी वर्क केलेले नाही.
तर या साडीच्या काठांना जो जांभळा पट्टा आहे, तर त्या भागातच केवळ बांधणी वर्क असून दोन्हीकडच्या काठांच्या आतला गुलाबी भाग पुर्णपणे प्लेन आहे.
पण या जांभळ्या काठांच्या बॉर्डरवर गोटा पट्टी वर्क, किरण वर्क करण्यात आलं असून तिथे भरगच्च कुंदन वर्क केलेलं आहे.
पण तिची ही साडी फॅशन हाऊसच्या किर्ती कलेक्शनमधली असून साडीची किंमत ७५ हजार रुपये एवडी आहे.
तर ते अतिशय सुंदर रंगसंगती असणाऱ्या या साडीवर माधुरीने जांभळ्या रंगाचं हेवी वर्क असणारं तर ब्लाऊज घातलं आहे.
gadchirolinews: गडचिरोली:-महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान तर्फे या वर्षी गडचिरोली जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या प्रजासत्ताकदिनी दर्पनगुडा येथील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी केतन बारसागडे आर. टी. ओ. नागपूर शहर यांनी अंश सुनिल हिचामी वर्ग 4 था जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दर्पणगुडा,
तर बिदुर अधिकारी जिल्हाप्रमुख यांनी विद्यार्थी जीवन प्रेरणा मंच गडचिरोलीच्या वतीने कु.निधी नितीश सिकदार वर्ग 4था, जिल्हा परिषद बांगला/हिंदी उच्च प्राथमिक शाळा, सिमुलतला,तर बापु भोयर राज्य कार्याध्यक्ष,महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान.
यांनी सम्राट सतीश हिचामी वर्ग 5 वा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दर्पणगुडा यांची विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य आकार मिळेपर्यंत “शिक्षक व समाज सामुहिक दत्तक पालक योजनेंतर्गत,विद्यार्थी जीवन प्रेरणा शिष्यवृत्ती साठी निवड केली.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान चे संस्थापक अध्यक्ष विजय ढाकुलकर यांच्या मार्गदर्शनात बापु भोयर राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियानाचे तंत्रविभाग प्रमुख प्रदिप भुरसे,महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियानाचे राज्य समन्वयक चांगदेव सोरते,
महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियानाचे जिल्हाध्यक्ष अशोक बोरकुटे, महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष बिदुर अधिकारी हे विद्यार्थी जीवन प्रेरणा मंच गडचिरोली विष्णुमुर्ती दुर्गम जिल्हासचिव,महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान,
गडचिरोली विद्या सोनुले मॅडम, जिल्हा उपाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान गडचिरोली,सुरेश उसेंडी जिल्हासचिव,विद्यार्थी जीवन प्रेरणा मंच गडचिरोली,यांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थितीत सत्र 2023-2024 च्या विद्यार्थी जीवन प्रेरणा शिष्यवृत्ती चे प्रजासत्ताक दिनी वितरण केले.
गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य आकार देण्याच्या उद्देशाने, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य व मार्गदर्शनाची वाटचाल सुलभतेने उपलब्ध करण्यासाठी जास्तीत जास्त शिक्षक व समाज बांधवांनी,महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान प्रणित,गत 10 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या
gadchirolinews: “शिक्षक व समाज सामुहिक दत्तक पालक” योजनेमध्ये अधिकाधिक समाजाभिमुख घटकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान चे राज्य कार्याध्यक्ष,दर्पनगुडा शाळेचे उपक्रमशील शिक्षक बापु भोयर सर यांनी केले आहे.
crimenews: शेगाव:संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा जवळ असलेल्याआवार येथील 35 वर्षेय युवकाचा शेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज 29 जानेवारी रोजी स्थानिक घडली.
याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार संग्रामपूर तालुक्यातील पातुरड्या जवळ असलेल्या आवार या गावातील रहिवासी असलेल्या 35 वर्षीय दीपक महादेव जंजाळ या युवकाला उपचारासाठी शेगाव येथील सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले.
त्या ठिकाणी ड्युटीवरील डॉक्टरांनी उपचार करीत असताना सदर युवकाचा मृत्यू झाला याबाबत शेगाव शहर पोलीस स्टेशनलासमोसा रुग्णालय शेगाव येथून वैद्यकीय अधिकारी यांचा लेखी मेमो पाठविण्यात आला.
त्यामध्ये नमूद करण्यात आले की दीपक महादेव जंजाळ वय पस्तीस वर्ष राहणार आवार तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा यास प्राथमिक आरोग्य केंद्र येथून उपचाराकरिता सईबाई मोठे सामान्य रुग्णालय येथे आणले असता.
Crimenews : उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अशा लेखी मेमो वरून पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे मर्ग नंबर झिरो झिरो ऑब्लिक 2024 कलम 174 प्रमाणे दाखल करून सदर प्राथमिक तपास पोहे का संजय करूटले,पोका नरेश तायडे करीत आहेत
तर आता या राज्यात गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
तर शेतकऱ्यांनी पंचनामे केले, पण त्यांना मिळालेली भरपाई अत्यंत कमी होती. काहींना तर 1000 रुपयेही मिळाले नाहीत.
तर आता यामुळे नाराजी व्यक्त केली जात होती. तर त्या पार्श्वभूमीवर सरकारने आता प्रधानमंत्री फसल विमा योजनेत पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
पण त्यानुसार, रब्बी हंगाम 2022-23 आणि खरीप हंगाम 2022 साठी अनुक्रमे 47,52,267 रुपये आणि 2,93,99,316 रुपये इतकी रक्कम विमा कंपनीला देण्यात येणार आहे.
तर आता यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई वाढण्याची शक्यता आहे.
काय बदलणार आहे?
मग आतापर्यंत मिळणाऱ्या भरपाईची रक्कम कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई होत नव्हते.
तर त्यामुळे सरकारने पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तर यामुळे आता शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई वाढण्याची शक्यता आहे. जरी रक्कम अद्याप निश्चित झाली नसली तरी किमान 10,000 रुपये भरपाई मिळण्याची शेतकऱ्याची अपेक्षा आहे.
तर आता या शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. तर या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
Crop Insurance Update: तर आता त्यांना या भरपाईमुळे काही प्रमाणात दिलासा मिळेल. तसेच, पुढील हंगामासाठी पेरणी करण्यासाठीही ही मदत उपयोगी ठरेल. अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
चोपडा येथील मागासवर्गीय अल्पसंख्यांकांच्या वस्त्या अतिक्रमणाच्या नावाखाली उध्वस्त करण्याचा डाव राज्य व केंद्र सरकारने आखला असून, जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील गौतम नगर भागात 70 वर्षांपूर्वीची जुनी वसाहत दोन दिवसात खाली करा.
अन्यथा बुलडोझर चालवून जमीन दोस्त करू अशी धमकी वजा इशारा प्रशासनाने रहिवाशांना दिला असता.
मेहकर तालुक्यातील उकळी-सुकळी या गावात झालेल्या जाहीरसभेत बोलतांना आ. रायमुलकर यांचा स्वतःवरील ताबा सुटल्याचे दिसून आले, आ. रायमलकर यांनी आपल्या भाषणातून रविकांत तुपकर यांच्यावर शिव्यांची लाखोल वाहीली आणि एवढेच काय तर रविकांत तुपकर सह त्यांच्या पत्नीची ही लाज काढली…
Ravikanttupkar:- तर लोकांचा वाढता पाठिंबा पाहता आमदार आणि खासदार यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, ते बावचाळले आहेत, परंतु खालच्या दर्जाची टीका करण्याचे संस्कार त्यांच्यावर आहेत, आमच्यावर नाहीत असे प्रत्युत्तर रविकांत तुपकर यांनी दिलय…