DNA Test: सासऱ्याने सूनेवर केले होतं संशय घेणे किंवा नवऱ्याने बायकोवर संशय घेण्याच्या घटना या दिवसेंदिवस चांगल वाढत चालल्या आहे. पण संशय निर्माण झाल्याने DNA Test ची मागणी हि होत असते.
असेच घटना आली समोर काय आहे जाणून घेऊया.
जे आयकायचं ते नवलच ज्यात सासऱ्याने केले सूनेवर संशय घेत DNA टेस्टची मागणी केली होती. परंतु डीएनए टेस्ट करणार नसेल तर नातवाला संपत्तीत अजिबात अधिकार मिळणार नाही, असं सासऱ्याने धाडस करून सांगितले.
पण जे “सासऱ्याने तिच्या नवऱ्याच्या डोक्यात टाकलं की, त्यांचा मुलगा सूनेच्या विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलाय.
मला जो पर्यंत तुम्ही डीएनए टेस्ट करणार नाही, मी तो पर्यंत संपत्तीत याला अधिकार मिळणार नाही” असं सांगितले मग त्यावरुन मुलगा आणि वडिलांमध्ये वादावादी झाली. मग काय त्यानंतर पती-पत्नी वेगळे राहू लागले.
बरेच काही वर्षांनंतर मध्यस्थी झाल्यानंतर मुलगा आणि सून पुन्हा घरी एकत्र राहायला लागलं आले.
तर सासऱ्याने पुन्हा एकदा नातवाच्या डीएनए टेस्टची मागणी केली. मग काय त्यानंतर मुलगा आणि सूनेने चर्चा करून DNA Test करण्याचे विचारल ठरवले.
त्या नंतर मग DNA टेस्ट निकाल सासऱ्याला अपेक्षित आला नाही. टेस्टमध्ये समजलं की, मुलगा पतीपासूनच झाला आहे. पण पितृक नातेवाईकांशी त्याचा DNA जोडला जात नव्हता.
मग काय संशय आलं म्हणून सासऱ्याने पुन्हा या महिलेवर आरोप करून परत DNA Test ची परत मागणी केली.
त्या नंतर या महिलेवर झालेल्या आरोपानंतर पुन्हा एकदा DNA टेस्ट झाली.
दोन चाचण्यांनंतर समजल की, तिचे सासरे निश्चितपणे तिच्या पतीचे वडील होते,
परंतु सासऱ्याचा आणि त्यांच्या वडिलांचा DNA जोडला जात नाही आहे.मग काय त्यातून सासऱ्याच्या आईचे अफेयर असल्याचे समोर आले.
DNA Test: मग सासऱ्याचे पितृक वडिल कोणीतरी वेगळेच होते. या नंतर म्हणजे सासऱ्याच्या आईचे विवाहबाह्य संबंध होते.
परंतु या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर सासऱ्याची फजिती झाली असून सगळ कुटुंब कोलमडून पडलं आहे. सत्य समोर तर आलं मग काय नात्याला कालिंबा फासणारे सत्य समोर येताच..
Maharashtra MLA Disqualification:मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत असून येणाऱ्या २० जानेवारीला मुंबईत सभा घेणार आहेत.
परंतु त्यामुळे आमदार अपात्रता निकाला महत्त्व आलं होतं. त्या मुळे या दरम्यान निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांनी संभाजीनगर पत्रकार परिषदेतून दिलेली प्रतिक्रिया दिली आहे.
आमचाही या संघर्ष सुरू आहे त्यामुळं आमचं लक्ष फक्त अरक्षणाकडे होतं आणि आम्ही 20 जानेवारीची तयारी जोमात करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
परंतु आम्हाला राजकारणाचा एवढा अभ्यास नाही., कारण कि त्यामुळे तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे.
त्या बाबत निकालाबाबत आमच्यामध्ये कुठलीही धाक धुक नव्हती. परंतु आमची लढाई फक्त मराठा आरक्षणा साठीच आहे आणि 20 जानेवारीला पूर्ण ताकतीने मुंबईला जाऊन आम्ही आरक्षण मिळवणारच, असा निर्धार मनोज पाटील यांनी यावेळी केला.
राजकारण असो कि सत्ता संघर्षाचा विषय राजकीय आहे. परंतु आमचा आरक्षणाचा विषय सामाजिक आहे. त्यामुळे आमच्या लेकरांचा प्रश्न असल्यामुळे आम्ही त्याकडे लक्ष देत नाही.
परंतु आरक्षण म्हणजे आमचा जगण्या मारण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्या समाजाच्या कित्येक पिढ्या आतापर्यंत बरबाद झाल्या.
त्यामुळे मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. दरम्यान तलाठी भरतीमध्ये 200 पैकी 214 गुण म्हणजे वाटोळं करण्याचं काम सुरू आहे.
Maharashtra MLA Disqualification: म्हणुन त्यामुळे ही यंत्रणा कशी आहे तेच कळत नाही, असा आरोप त्यांनी या वेळी केला आहे.
Murtijapurnews: दिनांक ९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता पासून शेतकऱ्यांचा वीज वितरण कंपनी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनाला शिवसेना व राष्ट्रवादीने सहभाग घेऊन पाठिंबा दर्शविला आहे.
शेतकऱ्यांच्या वीज संदर्भात तालुक्यातील होत असलेले अन्याय बाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख अप्पू तिडके यांनी आधीच आमरण उपोषण पुकारले होते.बरेच मागण्या शेतकऱ्यांच्या तेव्हा वीज वितरण कंपनी यांनी मान्य केले होते.
परंतु आज पुन्हा कामठा,किनखेड,लसणापूर,निंबा,राजुरा घाटे,पिंपळशेडा,खांदला,मोहखेड,कमळनी,धोत्रा व या परिसरातील शेतकऱ्यांना 14 तास वीज भेटत होती.
त्यांनी ते आधारावर हरभरा गेहू ची पेरणी केली परंतु पूर्व सूचना न देता वीज वितरण कंपनी यांनी सहा तास वीजपुरवठा लागू केली आक्रमक झालेले शेतकऱ्यांनी शेतकरी संघटना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली बारा वाजता पासून हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अप्पू तिडके, शेतकरी संघटना सुरेश जोगळे,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटक सचिव रवी राठी,सम्राट डोंगरदिवे,संदीप पाटील जळमकर,पंचायत समिती उपसभापती देवाशिष भटकर,तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष गुलाबराव म्हसाये मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
वीज वितरण कंपनीची अभियंता खांडरे यांच्याशी चर्चा सुरू आहे.मात्र तोडगा निघाला नाही.
Murtijapurnews: शेतकऱ्यांना न्यायची अपेक्षा आहे.अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन पुन्हा करतील असा इशारा सुद्धा शिवसेनेचे तालुकाप्रमुख अप्पू तिडके यांनी दिला आहे.
मूर्तिजापूरात शिवसेना शिंदे गटाचा विजयाचा जल्लोष..!
मूर्तिजापूर:- Eknathshinde sarkar : शिवसेना पक्ष म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मान्यता देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला.या बहुचार्चित निर्णयाचे शिंदे गटाच्या शिवसेनेने मूर्तिजापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष केला.
शिवसेना पक्ष म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मान्यता दिली. शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरवण्याची याचिका फेटाळली असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे मूर्तिजापूर तालुका प्रमुख दिपक पाटील दांदळे यांच्या मार्गदर्शनात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून व एकमेकांना पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.
यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले.
तर “शिवसेनेचा विजय असो -शिवसेना जिंदाबाद -मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा विजय असो अश्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.
Eknathshinde sarkar :या वेळी तालुका प्रमुख दिपक पाटील दांदळे, महिला तालुका प्रमुख स्मृती सुतारे, सुनील शिंदे, सुधाकर गोपकर, शरद हेंगड, राजू मेहेरे, उमेश चिंते, अमोल वानखडे, रवी शितोळे, अशोक सुतारे, प्रविण भटकर, गोपाल लाडके आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————
प्रतिनिधी शाम वाळसकर सह ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर सूर्या मराठी न्युज अकोला.
Yaval news: ४ जणांना अटक .१५ दिवसापूर्वी न्हावीत पकडला होता सव्वा पाच लाखाचा मुद्देमाल.
यावल Yaval news : दि.१०फैजपूर पोलिसांना अवैध गुटखा वाहतुकीवर नियंत्रण मिळवणे कामी आज सर्वात मोठी कारवाई आमोदा गावाजवळील कुंदन हॉटेल जवळ करावी लागली आहे यात सुमारे ८३ लाख लाख रुपयाचा दोन आयशर मालवाहतूक वाहनांमध्ये भरलेला गुटखा जप्त करण्यात आल्याने तसेच गेल्या १५ दिवसांपूर्वी पोलीस स्टेशन हद्दीत नावी गावातून सव्वा पाच लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला.
असल्याने फैजपूर परिसरासह संपूर्ण यावल तालुक्यात गुटखा अवैध तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असल्याने प्रमुख सूत्रधाराचा व्यवसायिकाचा शोध पोलीस करीत असल्याचे सुद्धा समजले.
गेल्या १५ दिवसांपूर्वी न्हावी गावात सव्वा पाच लाखाचा गुटखा पान मसाला विकणाऱ्या वर कारवाई झाल्याने फैजपूर शहरातील व्यापारी वर्तुळासह न्हावी गावात मोठी खळबळ उडाली होती. गुटखा खाणाऱ्यांना ज्याप्रमाणे व्यसन लागले आहे.
त्याचप्रमाणे अवैध गुटखा आणि अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांना अवैध कमाईची लालूच मोठ्या प्रमाणात लागली आहे याच माध्यमातून फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांना मध्य प्रदेशातील बहाणपूरकडून रावेर सावदा निंभोरा इत्यादी परिसरातून आपल्या महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यातून फैजपूरकडून भुसावळ रोडवर आमोदा गावा जवळून गुटख्याची अवैध तस्करी वाहतूक होत असल्याची गुप्त खबर मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी भल्या पहाटे पहाटे म्हणजे ब्रह्म मुहूर्ताच्या आधी तीन वाजता सापळा रचला.
आणि आमोदा गावाजवळ हॉटेल कुंदनजवळ आयशर क्रमांक (एम. एच. 19 सी.वाय.9364 व एम.एच.19 सी.एक्स.0282) आल्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यात गुटखा असल्याने दोन्ही वाहने पोलिस ठाण्यात आणली.
पंचांसमक्ष वाहनाचा पंचनामा केल्यानंतर वाहनातून राज्यात प्रतिबंधीत असलेली 83 लाख सहा हजार 800 रुपये किंमतीचा गुटखा सुगंधित आरोग्यास हानिकारक असा पान मसाला जप्त केला तर 34 लाख रुपये किंमतीची दोन्ही वाहने मिळून एकूण १ कोटी १७ लाख ६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ज्ञानेश्वर सुखलाल चौधरी (33, कोडगाव,ता.चाळीसगाव,ह.मु. शास्त्रीनगर,चाळीसगाव), जयेश सुभाष चांदलकर (33, रामेश्वर कॉलनी, जळगाव), राकेश अशोक सोनार (29, रामेश्वर कॉलनी,जळगाव) व मंगेश सुनील पाटील (31, रामनगर, एमआयडीसी, जळगाव) यांना अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे दोन्ही आयशर वाहनामागे टाटा हॅरीअर ही गाडी पोलिसांवर लक्ष ठेवून असल्याने या गाडीतील चालक मंगेश पाटील यास ताब्यात घेवून त्यालाही सहआरोपी करण्यात आले आहे.तर हा गुटखा आपला असल्याचा दावा पाटील यांनी केल्याचे समजते. हवालदार विकास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपिता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर,कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक एम. राजकुमार,अपरपोलिस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ,पोलिस उपनिरीक्षक मैनूदीन सैय्यद,उपनिरीक्षक मोहन लोखंडे,हवालदार गोकुळ तायडे,हवालदार विकास सोनवणे,हवालदार उमेश चौधरी,सहाय्यक फौजदार देविदास सुरदास, चालक अरुण नमायते आदींच्या पथकाने केली.
यावल शहराचा आदर्श घ्यायला पाहिजे.
Yavalpolice : यावल शहरात अवैध गुटखा सुगंधित पान मसाला खाणारे ग्राहक नसल्याचे स्पष्ट झाले आहे कारण अन्न व औषध प्रशासनातर्फे यावल शहरासह परिसरात पूर्व-पश्चिम उत्तर- दक्षिण भागात अवैध गुटखा विक्री वाहतूक संदर्भात एकही कारवाई होत नसल्याने याचा आदर्श जळगाव जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेने, अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांसह गुटखा खाणाऱ्यांनी घ्यायला पाहिजे तसेच संपूर्ण यावल तालुक्यात पन्नीची बनावट आरोग्यास हानिकारक अशा दारू विक्रेते निर्माते यांच्यावर सुद्धा बेधडक कारवाई व्हायला पाहिजे असे सुद्धा यावल तालुक्यात बोलले जात आहे.
Shegaon News शेगाव . दि ११, शेगावातील पत्रकारांच्या रोप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्नित शेगाव तालुका पत्रकार संघाकडून महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यामध्ये आज बुधवारी शेगाव येथील श्री.मस्कुजी बिरुजी बुरुंगले विद्यालय आणि श्री.ज्ञानेश्वर मस्कुजी बुरूंगले कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात वाढत्या डिजिटल जगात मुद्रित पत्रकारितेचे भविष्य, पत्रकारितेत सोशल मीडियाची भूमिका, आणि डिजिटल पत्रकारितेचा इतिहास या विषयांवर दोन गटांमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद ३०० विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. विद्यालयाच्या प्राचार्य सौ. मीनाक्षीताई बुरुंगले, पर्यवेक्षक एस.एम. निळे, प्रा.एस.एस. मांडवे, एम.डी. कडाळे, एस.डी चोपडे, ए.जी. क्षीरसागर यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेत.
मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय संघटक राजेश चौधरी, शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष फहीम देशमुख, सचिव नंदूभाऊ कुलकर्णी,माजी अध्यक्ष धनराज ससाने, संजय ठाकूर, राजकुमार व्यास,ज्ञानेश्वर ताकोते,प्रशांत खत्री इस्माईल शेख,
Shegaon news: नारायण दाभाडे , विशाल आसोलकर, गोपाल हिंगणे यांच्या निरीक्षणात ही परीक्षा संपन्न झाली. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या कार्यक्रमामध्ये सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष फहीम देशमुख यांनी दिली.
Maharashtra Rain: या राज्यातील काही भागात चक्क पावसाने हजेरी लावली. परंतु तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणदिसत होते. व या हवामान विभागाने आज आणि उद्या अनेक भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
या राज्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. परंतु सिंधुदूर्ग जिल्ह्यातील रामेश्वर, कणकवली, देवगड, वैभववाडी येथे तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, गुहागर आणि राजापूर मध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
व या विभागाने आज पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडासह हलक्या पावासाचा येलो अलर्ट केले व माहिती दिला.
तसेच यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज व्यक्त केला. परंतु तसेच कोकणातील सिंधुदूर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात विजांसह हलक्या सरी पडतील, असा हवामान यांनी अंदाज व्यक्त केले आहे.
Maharashtra Rain: या जिल्ह्यात पुणे, सातारा, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील काही भागात हलक्या सरी पडल्या. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवड्यातील काही ठिकाणचे भागात आज पावसाचा अंदाज दिला.
मूर्तिजापूर:- Akolanews: पक्ष संघटित करण्याकरिता प्रत्येक कार्यकर्ते ने एकोप्याने व जोमाने कार्य करणे गरजेचे असून, प्रत्येक गावात व सर्कल मध्ये जास्तीत जास्त शिवदूतांची नेमणूक करून तेथील नागरिकांच्या समस्यांचे निवारण करा,
व घरोघरी आपला भगवा फडकून आगामी निवडणुकांमध्ये आपले कार्यकर्ते निवडून शिवसेना शिंदे गटाचा भगवा शिखरावर रोवावा असे शिवसेना शिंदे गटाचे अकोला जिल्हा प्रमुख अश्विन नवले मूर्तिजापूर येथील हातगाव शाखेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव सर्कल मधील शिवसेना शिंदे गटाची शाखेचे उदघाट्न मोठ्या थाटात संपन्न झाला. विशेष म्हणजे जिल्हातील ही सर्व प्रथम शाखा असल्याचे समजल्या जाते.
या वेळी तालुका प्रमुख दिपक पाटील दांदळे व महिला आघाडी तालुका प्रमुख ज्योतीताई सुतारे यांच्या मार्गदर्शनात प्रहार संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष अमोल वानखडे यांच्या सह शेकडो का कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्यात आल्याने प्रहार संघटनेला आगामी निवडणुकीत मोठा धक्का सहन करावा
लागणार असून शिवसेना शिंदे गटाची मूर्तिजापूर परीक्षेत्रात ताकद बळकट झाल्याचे बोलल्या जात आहे.
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष मजबुती करीता शिवसेना शिंदे गटाने कसली असून जिल्हातील पहिल्या शाखेचे उदघाट्न मूर्तिजापूर तालुक्यात हातगाव येथे जिल्हा प्रमुख अश्विन नवले,
नानकसेठ नेभनानी,महिला आघाडी जिल्हा प्रमुख उषाताई विरक, शशिकांत चोपडे, शहर प्रमुख गायकवाड, जगजीतसिंग विरक, यांच्या प्रमुख उपस्थित शाखा फलकाचे अनावरान करण्यात आले.
Akolanews : कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. तद-नंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे तालुका प्रमुख दिपक दांदळे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मूर्तिजापूर तालुक्यातील बहुतांश शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होत.असे तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रतिक कुऱ्हेकर यांनी कळविले.
———————-
प्रतिनिधी शाम वाळसकर सूर्या मराठी न्यूज मूर्तिजापूर.
जळगाव जामोद |केंद्र शासनाने घेतलेला हिट अँन्ड रण ह्या चालका विरोधातील कायदा मागे घेण्यासाठी आज दिनांक 9 /1 /24 रोजी उपविभागीय अधिकारी मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना लेखी निवेदनाद्वारे निवेदन सादर करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असेही केंद्र सरकारने जे चालकाविरोधात कायदा केला आहे ते अपघात झाल्यास सात लाख रुपये दंड तसेच दहा वर्षे सजा कारावास असे प्राधान दिलेले आहे सदर कायदा विरोधात आम्ही सर्व चालक स्टेरिंग छोडो आंदोलन करणार आहोत.
या आंदोलनामध्ये आमच्याकडून चक्काजाम रास्ता रोको व इतरांना कोणत्याच प्रकारचा गोंधळ होणार नाही व जोपर्यंत केंद्र सरकार हा कायदा मागे घेणार नाही तोपर्यंत आमचे लोकशाही मार्गाने स्टेरिंग छोडो आंदोलन शांतता मार्गाने चालू राहील तरी दिनांक 9/ 1 /24 रोजी रात्री नऊ वाजता पासून डायमंड ट्रान्सपोर्ट बायपास रोड जळगाव जामोद येथे सदरचे आंदोलनास सुरुवात करीत आहे.
जर कोणी खोडसाळ कोणी कोणाच्या गाडीचे नुकसान झाले असे केल्यास त्याच तो स्वतः जबाबदार राहील त्याच्याशी आमचा कोणताही संबंध राहणार नाही करीता लेखी निवेदन माहिती कारवाईसाठी सविनय सादर सदर निवेदनाच्या प्रतिलिपी ठाणेदार जळगाव जामोद यांना दिले आहे.
नांदुरा, दरवर्षी प्रमाणे ६ जानेवारी रोजी पत्रकार दिवसानिमित्त अमन इंग्लिश स्कूल वडाळी येथे नांदुरा शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांचे सतकार करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अशरफी एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष हाजी मुज़म्मिल अली खान होते सत्कार मुर्ती म्हणून शहरातील व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव हजर होते.
सत्कार समारंभ अगोदर सर्व पत्रकार बांधवांनी विज्ञान प्रदर्शन ची पाहणी केली व नंतर क्रिडा उत्सव समारंभचा हि लाभ घेतला
याच पाश्र्वभूमीवर मौलाना आझाद विचार मंच च्या वतीने जिल्हा स्तारावर मलकापूर गेस्ट हाउस , बुलढाणा पत्रकार भवन, खामगाव एक स्थानिक वार्ताहर कार्यालयात, जळगाव जामोद गेस्ट हाउस, संग्रामपूर पत्रकार भवन वरवट बकाल, शेगाव गेस्ट हाउस या ठिकाणी पत्रकार बांधवांचे सतकार केले.
कारण असे कि मागील महिन्यात १८ डिसेंबर रोजी बुलढाण्यात मौलाना आझाद विचार मंच च्या वतीने मुस्लिम समाजाला आरक्षण ,शिक्षण ,संरक्षण व अन्य मागण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनाला यशस्वी करण्यात पुर्ण जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी मोलाचे योगदान दिले होते,
माध्यमाद्वारे धरणे आंदोलन च्या मागण्या प्रशासन दरबारी पोहचवण्यात यश मिळाले होते म्हणून मौलाना आझाद विचार मंच च्या वतीने जिल्हा स्तरावर पत्रकार बांधवांचे सतकार करण्यात आले,
Buldhananews | या कार्यक्रमात हाजी मुज़म्मिल अली खान, बाबु जमादार, सय्यद इस्माईल सर, जमिल खान, सय्यद अज़ीम सर, फरहान खान, सकलैन शाह, चांद ठेकेदार, अज़हर देशमुख, मज़हर खान उपस्थित होते.